Author archives

वर्ण आणि जाती

भारतीय उपखंडातील वर्णव्यवस्था हा कायम चर्चेचा विषय आहे. बहुतेक वेळा हे वाद अपुऱ्या माहितीवर आधारित असतात. वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था ह्यांपैकी आधी काय निर्माण झाले ह्या संबंधी ब्रिटिश कालात अनेक वाद झाले. सर्व पाश्चात्त्य विद्वानांचे मत होते की आधी चातुर्वर्ण्य होते व त्याच्या विभाजनातून जाती निर्माण झाल्या. ह्या सिद्धान्ताला फक्त इरावती कर्वे ह्यांनी विरोध केला. त्यांनी दाखवून दिले की वर्णव्यवस्था ही तत्पूर्वी अस्तित्वात असलेल्या विविध ज्ञातींच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे. ह्या जाती कश्या अस्तित्वात आल्या ह्यासंबंधी विविध अंदाज बांधण्यात आले. पण पन्नास वर्षांपूर्वी आमचे प्राचीन इतिहासाचे ज्ञान अपुरे असल्यामुळे ज्ञातिसंस्थेचा उद्गम व विकास निश्चित सांगणे कठीण होते.

पुढे वाचा

समूहाचे मानसशास्त्र

‘परिस्थितिजन्य’ मानसिकता
‘दुष्ट लोकच दुष्कृत्य करीत असतात’ या विधानाविषयी जगातील यच्चयावत सर्व सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संघ-संस्थांचे एकमत आहे. जगरहाटीची समज नसलेली लहान वयातील मुले-मुलींचा अपवाद वगळता इतरांना कशाही प्रकारे वागण्याची मुभा असणे, त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करणे आणि वरील प्रकारचे विधान करणे जगातील सर्व समाजामध्ये रूढ आहे.
परंतु या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या व साध्या नाहीत. समाजशास्त्रज्ञ व मानसतज्ज्ञ यांच्याजवळील पुरावे काही वेगळेच सांगत आहेत. या क्षेत्रातील संशोधकांच्या मते बऱ्याच वेळा दुष्कृत्याला भोवतालची परिस्थिती कारणीभूत ठरते, व्यक्ती नव्हे. दुष्कृत्य करणाऱ्यांमागे त्यांच्या अवती भोवती असलेल्यांचा फार मोठा प्रभाव असतो, हे चटकन लक्षात येत नाही.

पुढे वाचा

राज्यघटनेत सुधारणा

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानसभेत भारताची राज्यघटना मंजूर करून स्वीकारण्यात आली. राज्यघटना अनंत काळपर्यंत तशीच अचल रहावी अशी कल्पना कधीच नव्हती. अनेक वर्षांच्या वापरानंतर या घटनेमधील त्रुटी लक्षात येतील, तसेच काळाबरोबर मानवी जीवनात बदल होत जाऊन, घटनेतही त्यानुसार बदल करावे लागतील, हे अपेक्षितच होते.
आजतागायत घटनेत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. पण त्यांचे स्वरूप बहुतेक वेळा कायदा करण्यातील घटनात्मक अडचणींमधून मार्ग काढण्याचे – पळवाट तयार करण्याचे होते. आज आपण प्रयत्न करणार आहोत तो अनुभवापासून शिकून, घटनेत सुधारणा करण्याचा आहे. कोणत्याही तात्कालिक अडचणीवर मात करण्यासाठी हा प्रयत्न नाही, तर भारतीय जनमानसाला, जनवर्तनाला अधिक चपखल बसणारी अधिक चांगली घटना निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे वाचा

दि.य.दे. आदरांजली

गेली नागपंचमी प्रा. दि.य.देशपांडे (ती. नाना) यांचा आज तसा नव्वदावा जन्मदिन ! काही माणसे जन्माला येतात ती केवळ इतरांना काहीतरी देण्यासाठी ! देता देता ती कुठे नि कधी हरवतात हे कळतही नाही. नानांचे देहदान अन् चक्षुदान हे दैहिक पातळीवर असले तरी ‘देहाचे पारणे फिटणे’ ही विज्ञाननिष्ठ भूमिका त्यामागे आहे. आयुष्यभर देहाची जराही चिंता न बाळगणाऱ्या नानांनी जाताना देहालाही दानाचे भाग्य मिळवून दिले! ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीचे महत्त्व आम्हाला, पटो न पटो, आम्ही मात्र साक्षात् ‘साधुत्व’ अंगी बाणलेल्या प्रा.

पुढे वाचा

गड्या, तू बोलत का नाही ?

प्रिय वाचक,
सुधारक कोणासाठी आहे असा प्रश्न मला मधून-मधून पडतो, कधी तो वाचकही विचारतात. स्वेच्छेने, काही एका अपेक्षेने जे वर्गणीदार झाले त्यातलेही कोणी हा अवघड प्रश्न विचारतात. काही भले वाचक, आपणच वाचक म्हणून कमी पडतो अशी समजूत घालून घेतात. पण हा प्रश्न गंभीरतेने घेण्यासारखा आहे. ग्राहकाचा कधीच दोष नसतो असे म्हणतात. त्या चालीवर वाचकांचा उगीच रोष नसतो असे मानायची माझी तयारी आहे. म्हणून वाचकाचे म्हणणे ऐकायला मी उत्सुक असतो. कोणत्याही वाययीन उपक्रमाला प्रतिपोषण (षशशव लरलज्ञ) हे आवश्यकच आहे. म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत की, वाचकहो, बोला!

पुढे वाचा

भारतीय स्त्रीजीवन

भारतीय स्त्रीजीवन
एकोणिसाव्या शतकाच्या प्रबोधनाच्या उलाढालींमध्ये स्त्रियांचे प्रश्न केंद्रस्थानी होते. राम मोहन राय, विद्यासागर, अक्षयकुमार दत्त, केशवचंद्र सेन अशा अनेक धुरंधर व्यक्तींनी स्त्रियांना कौटुंबिक दडपणातून बाहेर काढून सुशिक्षित व सुरक्षित करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजामध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी स्वतःच्या घरातही स्त्रीशिक्षणाचे प्रयोग केले. याशिवाय देवेंद्रनाथ टागोरांच्या घराण्यात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच घरातल्या स्त्रियांना इंग्रजी, बांगला धर्मग्रंथ वगैरे वाचायला-लिहायला शिकवण्यासाठी परदेशी शिक्षिका व वैष्णवी नेमल्या जात असत. तसेच देवेंद्रनाथ कर्मठ विचारांचे होते व घरातल्या मुलीबाळींना शिक्षणासाठी घराबाहेर पाठविणे त्यांना मंजूर नव्हते.

पुढे वाचा

संपादकीय प्र.ब.कुळकर्णी

प्रिय वाचक,
ह्या अंकात अव्वल इंग्रजीतील समाजसुधारक आणि प्रबोधनकार भाऊ महाजन यांचा त्रोटक परिचय दिला आहे. तसेच त्यांच्या ‘धूमकेतु’ या साप्ताहिकातील ‘गुजराथ्यांचे महाराज’ हा लघुलेखही पुनर्मुद्रित केला आहे. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. तिच्या अनुषंगाने आपल्या संस्कृतीतील गुरु ह्या संस्थेबद्दल काही विचार मनात येतात. सर्वप्रथम जाणवते ते हे की आपल्या संस्कृतीत गुरुमाहात्म्य म्हणा किंवा गुरुमहिमा म्हणा ह्याचे अतोनात स्तोम आहे. सगळे लहान-मोठे गुरु, महाराज, संत-महंत, आपल्या शिष्यमंडळींना स्वतःच्या गुरुची महानता वर्णन करण्याची एकही संधी दवडत नाहीत. जेणकरून श्रोत्यांच्या किंवा शिष्यांच्या गुरुचे माहात्म्य म्हणजे स्वतःचे माहात्म्य आपोआपच वाढते.

पुढे वाचा

परित्यक्तांची स्थिती व सामाजिक संस्थांचे कार्य (मुक्काम नाशिक)

परित्यक्ता स्त्रियांच्या समस्येची कारणे पुढील असू शकतात. १) हुंडा, २) व्यसनाधीनता, ३) आर्थिक समस्या, ४) पालक, सासू सासरे इतर यांच्याकडून होणारा छळ, ५) दैन्यावस्था, गरिबी, निराधार स्थिती, माहेरचे नातलग नसणे, ६) घरगुती समस्या व जबाबदारी यामुळे निर्माण होणारे संघर्ष, ७) अपत्य नसणे, ८) नवऱ्याचा संशयी स्वभाव, ९) फक्त मुलींनाच जन्म देणे, १०) मनोरुग्णता, ११) कुमारी माता होणे इ. .
अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ह्या स्त्रियांना आधार देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक संस्था स्थापन झालेल्या आहेत. महाराष्ट्रात ‘शॉर्ट स्टे होम’ची सुविधा आहे.

पुढे वाचा

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे कवित्व

भारताच्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांची निवड होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्व स्तरांतील निवडणुकींमध्ये जे होते ते म्हणजे व्यक्तिगत आरोप, प्रत्यारोप, उमेदवारांच्या आयुष्यातील घटना व सत्तेच्या किंवा संपत्तीच्या दुरुपयोगासंबंधी टीकाटिप्पणी, उमेदवाराच्या निवडीबाबत ऐनवेळेस केलेली घाई व शेवटी निवडणुका हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या स्तरावर पहिल्यांदाच बघायला मिळाले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे स्वरूप कसे असावे याची चर्चा म्हणूनच नव्याने करायला हवी व शक्य झाल्यास काही उचित परंपरा व पायंडे पाडायला हवेत असे वाटू लागले आहे.

या निवडणुकीच्या समग्र प्रक्रियेत राष्ट्रपतिपदासारख्या महत्त्वाच्या पदासाठी कोणाला उमेदवार करायचे याचा पुरेसा विचार राष्ट्रीय पक्षांनी बरेच दिवस केलाच नव्हता.

पुढे वाचा

कुरूप असण्यातही मजा

तशी ही नवल वाटावी अशी गोष्ट आहे. पण तिला भक्कम ऐतिहासिक आधार आहे. गोष्ट अशी की अगदी कुरूप माणूस असला तरी त्याने हताश होऊ नये. स्त्रियांचे अगदी रुपवतींचेसुद्धा, लक्ष, आपल्याकडे वेधून घेण्याचे प्रयत्न सोडू नयेत. ब्रिटनचे उपपंतप्रधान जॉन प्रिस्कॉट आणि त्यांचे प्रेमपात्र ह्यांच्यासंबधात उठलेले वादळ ह्याचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात् ह्या प्रकरणात सत्ता ही कामात करणारी गुटी होती असे म्हणता येईल. हेन्री किसींजर अशा मामल्यांचा मोठा दर्दी अभ्यासक. त्याचा दावा असा की, सत्ताच, काय साधे अधिकारपददेखील बायकांना वश करण्याचे हुकमी साधन आहे.

पुढे वाचा