लहानपणी आजी एक गोष्ट सांगत असे. भस्मासुराची गोष्ट. त्यात म्हणे भोळ्या शंकर महादेवाने भस्मासुराला एक वरदान दिले. आणि त्यात त्याला अशा काही शक्ती प्राप्त झाल्या की तो भस्मासूर ज्या कोणत्याही वस्तूवर, गोष्टीवर किंवा प्राण्यावर हात ठेवेल तो तात्काळ नष्ट होईल, जळून भस्म म्हणजे राख होईल. ही गोष्ट ऐकताना त्या भस्मासुराबद्दल राग येत होता की त्याला मिळालेल्या त्या शक्तीबद्दल त्याचा हेवा वाटत होता? हे आजतागायत ठरवता आलेले नाही. आपल्याला अशी शक्ती मिळाली तर कित्ती मज्जा! असा विचार मनात येत असतानाच आजी त्या भस्मासुराला दोन शिव्या हासडत विष्णूला मोहिनी रूप घ्यायला लावून त्या भस्मासुरालाच संपवून टाकत असे.
Author archives
कृत्रिम बुद्धिमत्ता : आळं की आळा
नोव्हेंबर २०२२ च्या शेवटी जन्म झालेल्या चॅटजीपीटीने कृत्रिमप्रज्ञेच्या जगतात खळबळ उडवली. चॅटजीपीटीची महती हा हा म्हणता बहुतांश सांख्यीक-साक्षर जगतात पोचली आणि उलट-सुलट चर्चांना ऊत आला. चॅटजीपीटी हा तुमच्यासोबतच्या चर्चेतून तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे देणारा तुमचा सखा आहे(१). लार्ज लॅंग्वेज मॉडेलवर (LLM) आधारित असल्याने निबंध लिहिणे, कविता करणे, ज्या ज्या विषयांची माहिती उपलब्ध आहे त्या विषयांवर संभाषण करणे यात तो तरबेज आहे. OpenAI च्या या प्रारूपापाठोपाठ बाजारात अनेक प्रारूपे आली. आधी आकाराने गलेलठ्ठ असलेली ही प्रारूपे फाईन-ट्युनिंगद्वारे हळूहळू रोड होताहेत.
कृत्रिमप्रज्ञा आणि सर्जनशीलता
अवघ्या सात-आठ महिन्यांपूर्वी लाँच झालेले चॅटजीपीटी आणि पर्यायाने कृत्रिमप्रज्ञा हे क्षेत्र आज जगभरात सर्वांत मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बेरोजगारीची सर्वात मोठी लाट येणार, तब्बल तीस कोटी रोजगार यातून बाधित होऊ शकतील असे काही अहवाल सांगत आहेत. मानवी सर्जनशीलतेवर कृत्रिमप्रज्ञेचा हा हल्ला आहे असे काही चिंतातूर जंतू ओरडत आहेत, तर तंत्रज्ञानाचे बहुतेक जाणकार, तज्ज्ञ तिचे स्वागतही करत आहेत. चॅटजीपीटीमार्फत ओपनएआय कंपनीने जगभरातील भाषा आणि सर्जनशीलता क्षेत्रात आघाडी घेतली आहे. त्यांनी असे एक चॅटबॉट बनवले आहे जे तुमच्यासाठी लेखनिकाचे काम करते.
जननशील कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रश्न सोडवू शकत नाही
बुद्धिमत्ता म्हणजे काय?
अवजारे वापरणे हे बुद्धिमत्ता असण्याचे एक लक्षण मानले जाते. आपण माणसेही ज्या वानरगणाचा भाग आहोत, त्यातले चिंपांझी काडी वापरून मुंग्या पकडून खातात.
माझ्या एका मित्राकडे कुत्रा आहे. काही वर्षांपूर्वी तो मला सांगत होता की त्याच्या कुत्र्याची प्रजाती कुत्र्यांमधली दुसऱ्या क्रमांकाची आहे, हुशारीच्या बाबतीत. मी त्याला म्हणाले, “माझ्याकडे मांजर आहे. तिला कॅल्क्युलस येत नाही; कोडिंग करता येत नाही; तिची भाषा अत्यंत मर्यादित आहे. मला कॅल्क्युलस येतो, कोडिंग येते. त्यामुळे दोघींच्या पोटापाण्याची सोय मला लावता येते. आणि आपल्याला खायला कोण घालते, कुणावर विश्वास ठेवता येतो हे तिला बरोबर समजते.
कृत्रिमप्रज्ञा आणि सर्जनशीलता
दिलेल्या उत्तरांच्या आधारे जर एखाद्या मानवी परीक्षकाला, ती उत्तरे मानवाने दिली आहेत की यंत्राने हे ठामपणे निश्चित करता आले नाही तर ते यंत्र मानवासारखे आणि मानवाएवढे विचारी आहे असे म्हणता येईल अशी ही यंत्राची बुद्धिमत्ता/प्रज्ञा तपासण्याची परीक्षा अॅलन टुरिंग ह्या ब्रिटिश गणितज्ञाने १९५० मध्ये सुचवली. २०२२-२३ मध्ये ChatGPT, Bard आणि ह्यांसारख्या माध्यमांद्वारे सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिलेली कृत्रिमप्रज्ञा टुरिंगच्या परीक्षेत उत्तीर्ण होते. म्हणून आजच्या कृत्रिमप्रज्ञेला मानवाएवढी बुद्धिमत्ता/प्रज्ञा आहे म्हटले जाते. मात्र मानवी मेंदूच्या माहितीच्या साठवण आणि प्रक्रिया करण्याच्या क्षमतेच्या तुलनेत आजच्या कृत्रिमप्रज्ञेची क्षमता अफाट असल्याने आजची आधुनिक कृत्रिमप्रज्ञा मानवाहून जास्त बुद्धिमान ठरेल आणि (नजीकच्या?)
कृत्रिमप्रज्ञेच्या युगात भविष्यातील शिक्षण
सगळीकडे आर्टिफिशिअल इंटलिजन्सची चर्चा सुरू आहे. Chat-GPT, AI हे शब्द विविध समाजमाध्यमांत, न्यूज चॅनेल्सवर ऐकू येत आहेत. काही जणांच्या मते हे खूळ आहे. तर काही जणांना वाटते की यामुळे जग बदलेल. पण खरे सांगू का? तुम्हाला-आम्हाला काय वाटते ते आता महत्त्वाचे राहिलेले नाही. त्या AI रोबोट्ला काय वाटते ते महत्त्वाचे आहे. हो, बरोबर वाचताय तुम्ही. कारण माणसांनी जरी AI रोबो बनवले असले तरी त्यांना माणसाची बुद्धिमत्ता प्रदान करून दिल्यामुळे हे माणसांपेक्षा जलदगतीने आणि अचूक निर्णय घेऊ शकतात. म्हणून तर मोठ्या मोठ्या आस्थापनांमध्ये बरेच ठिकाणी CEO म्हणून AI रोबोट्सना नियुक्त केले गेले आहे.
तंत्रज्ञान आणि नीतिमूल्य
कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि त्यावर आधारित ChatGPT सारख्या अनेक प्रभावशाली प्रणालींचा गेल्या एक-दोन वर्षांतच माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात जोरदार प्रवेश झाला आहे. अशा प्रकारच्या साधनांमुळे व्यवसायक्षेत्रात मोठे बदल होतील. कृत्रिमप्रज्ञेच्या वापरतून जर मानवी बुद्धिमत्तेचा वापर कमी झाला तर त्याचे अनेक फायदे आहेत – त्यातून खर्च कमी होईल, चुका कमी होतील, दिवसातले २४ तासही काम करता येईल आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल. म्हणजे उद्योगधंद्यांचा आणि देशाचा फायदा. आज प्रत्येक मोठ्या कंपनीतून कृत्रिमप्रज्ञेचा वापर चालू झाला आहे. पण कृत्रिमप्रज्ञेमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील ही भीती आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक आव्हाने
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटले की आजही एका पिढीला डोळ्यांसमोर येते ते टर्मिनेटर चित्रपटातले रोबोट्सचे दृश्य! स्वतःच्या अफाट ताकदीची जाणीव झाल्यानंतर मानवजातीचा संहार करायला निघालेला स्कायनेट आणि त्याने बनवलेले टर्मिनेटर हे आपल्या नेणिवेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भागच बनलेत जणू! भविष्यात कधीतरी वैज्ञानिक प्रगतीच्या एका टप्प्यावर संगणकांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित होईल, ‘स्व’ची जाणीव झालेले यंत्रमानव निर्माण होतील, आणि ते मानवाकडे कसे पाहतील या मूळ कल्पनेचा आधार घेऊन अनेक कल्पित विज्ञानकथा-कादंबऱ्या जगभरात लिहिल्या गेल्या, असंख्य नाटके-चित्रपट बनवले गेले. अगदी डॉ. जयंत नारळीकरांसारख्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात संशोधक असणाऱ्या, कल्पित विज्ञानकथा लिहिणाऱ्या लेखकालाही ‘वामन परत न आला’ या पुस्तकात ही कल्पना घेऊन कथा रचावी वाटली.
तुका म्हणे सोपी केली पायवाट ….
विलियम झिन्सरचे पुस्तक Writing to Learn (१९८८) मध्ये ते म्हणतात, “विचारांचा आणि शिकण्याचा परिपाक म्हणजे लिहिणे नव्हे; तर विचार करणे हेच लिहिणे”. लिहिण्याची कृती आपली समजूत अधिक प्रगत करत जाते असेही ते पुढे म्हणतात. असे म्हणणारे किंवा लिहिणारे झिन्सर एकटेच नाहीत. आईनस्टाईननंतरचे सर्वांत महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे, नोबल पारितोषिकाचे मानकरी, पुरोगामी विचारांचे भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईन्मन ह्यांनी केलेल्या काही नोंदी वाचून त्यांचा एक सहकारी म्हणाला, “तुझ्या लिखाणातून तुझे विचार खूप चांगल्या रीतीने प्रगट झाले आहेत.” यावर त्याला खोडत रिचर्ड फाईन्मन त्वरित उद्गारले, “लिखाण माझ्या विचारांचे प्रगटीकरण नाही, माझे विचार हेच माझे लिहिणे होय.
कृत्रिमप्रज्ञेचा दशकांपासूनचा प्रवास
कृत्रिम आणि नैसर्गिक
कृत्रिमप्रज्ञा (Artificial Intelligence: AI) म्हणजे काय हे सांगणे हे सोपे नाही. येथे सुरुवातीलाच कृत्रिम आणि नैसर्गिक या शब्दांचे द्वंद्व आहे. सोपे करून सांगायचे झाल्यास कृत्रिम म्हणजे मनुष्यप्राण्याच्या इच्छेनुसार (free will, स्वेच्छेनुसार) बनलेले आणि या बनवण्याच्या प्रक्रियेत जीवशास्त्रीय प्रक्रियांचा समावेश नसलेले असे काहीतरी. नैसर्गिक प्रक्रियांमध्ये आपण स्वेच्छा किंवा हेतू नसलेल्या सर्व भौतिक प्रक्रियांचा आणि त्याचबरोबर जैविक प्रक्रियांचा, विशेषतः गर्भधारणा आणि प्रजोत्पादन प्रक्रियांचा, समावेश करू. उद्या मानवाने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून महाबुद्धिमान प्राण्यांची नवीन जात बनवली तर त्यांच्या प्रज्ञेला आपण कृत्रिम म्हणण्याचे कारण असणार नाही.