Author archives

‘धागेदोरे’च्या निमित्ताने

काही आठवड्यांपूर्वी ‘झी टॉकीज्’वर ‘धागेदोरे’ हा सिनेमा दाखविला गेला. स्त्रियांच्या संदर्भात त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सध्या वातावरण प्रचंड तापलेले आहे. व ते योग्यही आहे. परंतु ह्या प्रश्नाची दुसरी बाजू, जी संख्यात्मकदृष्ट्या स्त्रियांवरील अत्याचारांच्या संख्येपेक्षा बरीच छोटी असू शकेल, ह्या चित्रपटात यथार्थपणे अधोरेखित केलेली आहे. त्यासंबंधी थोडे विश्लेषण व चिंतन आवश्यक आहे. श्रीमंत आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलेल्या आपल्या मुलीला तिच्या नवऱ्याने मुद्दाम खिडकीतून खाली ढकलले व त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप तिचे आईवडील करतात. केस कोर्टात उभी राहते. आरोपीची वकील मैत्रीण – जी त्याच्या मृत झालेल्या बायकोचीही बालमैत्रीण असते – त्याची केस कोर्टात लढवून त्याची आरोपातून मुक्तता करते.

पुढे वाचा

बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे – बीज-संवर्धनाचे महत्त्व

वनस्पतीः वैविध्य व अन्न
आज जगभरात वनस्पतींच्या जवळपास ३२,८३,००० प्रजातींची नोंद झाली आहे. यांपैकी २,८६,००० प्रजाती केवळ सपुष्प वनस्पतींच्या आहेत. उर्वरित प्रजातींपैकी रानात नैसर्गिक स्वरूपात वाढणाऱ्या अथवा लागवड होणाऱ्या अशा अंदाजे ७००० प्रजातींचा वापर अन्न म्हणून करण्यात येत आहे.

निसर्गात सतत बदलांना तोंड देताना वनस्पतींच्या आनुवंशिक (गुणसूत्रांच्या) रचनेत दर पिढीमध्ये सूक्ष्म बदल होत असतात. कधी कधी हे बदल अचानक देखील घडून येतात. अशा बदलjळे वनस्पतींच्या अंतर्गत व बाह्य रचनेत बदल होऊन एखादी नवी प्रजाती (species) किंवा वाण तयार होतो. हे नवे वाण दर पिढीगणिक होणारे लहान लहान बदल संकलित होत जाऊन बऱ्याच कालानंतर तयार होते.

पुढे वाचा

कर्मयोगातील हानी

कर्मयोगातील हानी

… आपल्या संस्थांचा जीवनरस उडून जात आहे, त्याचे कारण स्वाध्यायाचा अभाव हे आहे.

आपण कर्मयोगात पडलो आहोत. कर्मयोगात लाभाबरोबर हानीहि होते. शंकराचार्य, रामानुज, बुद्ध, महावीर आदींच्या अनुयायांचे जे काही दोष होते, ते आपण सुधारले आहेत ही गोष्ट खरी. आपण कर्मयोगावर जास्त जोर दिला. ही सुधारणा जरुरीची होती. परंतु ते लोक आत्मज्ञानात जितके खोल उतरत होते, तितके खोल आपण उतरत नाही. यामुळे कार्याच्या विकासाबरोबर आपली विचारनिष्ठा नि तत्त्वनिष्ठा घटत जाते. आपल्या कामाचा बोजा वाढत जातो, पण त्यातील तत्त्व नष्ट होत आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

श्याम कुलकर्णी, sgk664@gmail.com
वाढता हिंसाचार व स्त्रीपुरुषसंख्येतील असमतोल
श्री. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या लेखातील विचार एकांगी वाटतात. प्रत्यक्षात बलात्काराच्या वाढत्या घटना व स्त्रीगर्भाची हत्या करण्याची प्रवृत्ती या दोन्ही गोष्टी अतिशय तिरस्करणीय व दंडनीय आहेत. परंतु या दोन्ही गोष्टींकडे जितक्या गांभीर्याने राज्यकर्त्यांनी पहायला हवे तितक्या गांभीर्याने त्यावर विचार केला जात नाही हेच या समस्योगील मूळ कारण आहे. किंवा राज्यकर्त्या जमातीतील काही व्यक्ती त्यात सामील असल्यामुळेच अशा गुन्ह्यांना अतिशय कठोर शिक्षाच काय पण शिक्षाच होण्याची शक्यता दिसत नाही. अश्या व्यक्ती लैंगिक भूक न भागल्यामुळे नाही तर केवळ सहज उपलब्ध होतात व नंतर त्याचा कोणास पत्ताही लागत नाही याची खात्री असल्यामुळेच अशा संबंधांना चटावतात.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (१०)

हुबेहूब माझ्यासारखा अजून कुणीतरी कुठेतरी असेल का?

प्रचंड अंतरावरील एखाद्या दुसऱ्या दीर्घिकत आपल्यासारखीच एक आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेतसुद्धा आपल्या येथील सूर्यासारखा तारा आहे. या तारेपासून पृथ्वीसारखाच दिसणाऱ्या एका तिसऱ्या ग्रहावर तुच्यासारखाच दिसणारा अस्तित्वात आहे. तुच्यासारखाच तो जीवन जगत आहे. एवढे कशाला, तुम्ही आता जे वाचत आहात तेच तो तिथे वाचत आहे. अगदी तीच ओळसुद्धा….
आश्चर्याचा धक्का बसला ना? ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्यासारख्या दिसणाऱ्या लाखो दीर्घिका या ब्रह्मांडात आहेत व यापैकी एखाद्या दीर्घिकेतील ग्रहावर तुचीच छाया प्रती असलेली माणसे राहतात.

पुढे वाचा

तुह्या धर्म कोंचाः एका महत्त्वाच्या विषयाचे हृदयस्पर्शी चित्रण

आदिवासी’ ह्या शब्दाचा अर्थ मूळचे निवासी असा असला, तरी भारतातल्या सुारे पावणेसात कोटी आदिवासींचे अनेक शतकांपासून येथे पद्धतशीरपणे शोषणच होत आहे. आपल्या देशात नक्षलवादी चळवळ सुरू होण्याचे मूळ कारणदेखील हेच आहे हे आता सर्वान्य झाले आहे. हे आदिवासी पूर्वीपासून जंगलातच राहत आले आहेत, मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्वतःला येथील वनांचे मालक जाहीर करून त्यांचे मूळ मालक असलेल्या आदिवासींना एका झटक्यात अतिक्रमित ठरवून टाकले. स्वातंत्र्यानंतर गेल्या साठ वर्षांत जर काही बदल झाला असेल तर तो एवढाच की आदिवासींच्या आपत्ती आणखी वाढल्या आहेत. लेखक-दिग्दर्शक सतीश मनवर ह्यांनी ‘गाभ्रीचा पाऊस’ हा विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरचा उत्कृष्ट चित्रपट काढून चित्रपटाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते.

पुढे वाचा

आकडेबाजी (३) : एक फसव्या आकड्याची

एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जोदार आहे का, ती वाढती-बहरती आहे का, हे मोजायला ऋझ हा आकडा वापरतात. GDP(Gross Domestic Product), सकल राष्ट्रीय उत्पाद) हे एखाद्या अर्थव्यवस्थेत खेळणाऱ्या पैशाचे एक माप आहे. वाढणारा GDP जोदार अर्थव्यवस्था दाखवतो, स्थिर ऋझ साचलेपण उघडे करतो आणि घटता GDP ही अर्थव्यवस्थेची वृत्ती पराभूत होत असल्याची खूण असते. आजची जगाची अर्थव्यवस्था आवर्जून स्पर्धेवर बेतलेली आहे, आणि वाढत्या अर्थव्यवस्था (=देश) साचलेल्या व आक्रसत्या अर्थव्यवस्थांना मागे टाकतात. आजच्या अर्थविचारांध्ये सर्वत्र GDPचे महत्त्व इतर सर्व निर्देशांकांपेक्षा जास्त मानले जाते. पण अनेक अर्थशास्त्र्यांनी दाखवून दिले आहे, की GDP आणि माणसांचे सुख-समाधान यांचा संबंध नाही.

पुढे वाचा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधीविचार

शिांतिवन कुष्ठधाम ह्या गांधीवादी संस्थेत काही महिन्यापूर्वी रा. स्व. संघाची उच्चस्तरीय बैठक पार पडली व तीत मोहन भागवतांपासून ते तोगडियांपर्यंत अनेक नेते हजर होते ह्या बातमीने सध्या सर्वत्र खळबळ माजवली आहे. महत्त्वाची बाब ही की त्यामुळे गांधीवादी संस्था व संघपरिवार ह्यांच्या परस्पर-संबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुळात गांधींचे रामराज्य व संघाचा हिंदुत्ववाद ह्यांतील मूलभूत फरक खुद्द गांधीवादी मंडळी विसरली व त्यामुळे खादी व खाकी ह्यांच्यातील फरकही—विचाराच्या तसेच आचाराच्या पातळीवर – दिसेनासा झाला, ही प्रक्रिया बरीच जुनी आहे. हिंदुत्वाला खरा धोका गांधींपासून आहे, बोलघेवड्या निधर्मीवाद्यांपासून नाही हे सर्व छटांच्या हिन्दुत्ववाद्यांना फार आधीपासून माहीत आहे.

पुढे वाचा

संयत पण ठाम

एक मे महाराष्ट्र दिन. अलिकडे तो राजभाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्या दिवशी एक वाईट बातमी कळली. सामंत बाई गेल्याची… अगोदर राजभाषा मराठीची व त्यानंतर शेवटपर्यंत मराठी भाषेची निरलसपणे सेवा करणाऱ्या बाईंनी अखेर जाण्यासाठीही तोच दिवस निवडावा!
अभ्यास, करियर वा चळवळ करण्यासाठी ‘भाषा हा विषय अगदीच दुर्लक्षित व बिनमहत्वाचा वाटला जाण्याच्या काळात त्यांनी तो आपल्या आवडीचा विषय म्हणून स्वीकारला, जोपासला. सुसंस्कृत समाजाला चांगल्या भाषेची आवश्यकता का असते, ती कशी पूर्ण व्हायला हवी, तसेच तिचे संवर्धन न केल्यामुळे समाजाचे काय नुकसान होते ह्यावर त्यांनी जोरकसपणे मांडणी केली.

पुढे वाचा

अनवरत भंडळ (३)

मन व अंतःकरण
आपल्या अस्तित्वाची अनेक अंगे अथवा घटक असतात. पदार्थय भौतिक शरीर हा एक घटक, प्राण दुसरा, मन तिसरा, बुद्धी चौथा आणि जाणीव हा आणखी वेगळा घटक आहे. त्याखेरीज आत्मा हाही एक घटक अति-महत्त्वाचा असल्याचे अध्यात्म मानते, परंतु आत्म्याचे अस्तित्व हा वादाचा विषय आहे. प्राण आणि बुद्धीच्या मधात मन आहे. मन म्हणजे वासना, भावना, विचार अथवा कल्पना नव्हे. माझ्या मनात कल्पना आली किंवा विचार आला असे आपण म्हणतो. म्हणजेच आपण मनाला कल्पनेपेक्षा किंवा विचारापेक्षा वेगळे मानतो. थोडे तटस्थ होऊन आपण आपल्या मनाला न्याहाळले तर असे दिसून येते की त्यात अनेकानेक भावना, कल्पना, विचार तरंगत येतात.

पुढे वाचा