विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

नाव नसलेला धर्म
आ.सु. हे जरी बुद्धिवादी लोकांचे मासिक असले तरी त्याच्या लेखक-वाचकांच्या घरी काही धार्मिक आचार होत असावेतच असा माझा अंदाज आहे. निदान माझ्या घरी तरी असे आचार होत असतात. पण तुमच्या-आमच्या या धर्माला (आजकालच्या फॅशनप्रमाणे त्याला उपासनापद्धती म्हणायचे) काही नावच राहिलेले नाही याचा मला नुकताच साक्षात्कार झाला. त्याचे असे झाले की ३ एप्रिल रोजी हैदराबादला प्रज्ञाभारती या संस्थेच्या विद्यमाने एक विचारसत्र घडवले गेले. विषय होता “हिंदुत्व आणि धार्मिक अल्पसंख्य गट’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उप-सर-कार्यवाह श्री सुदर्शन यांनी हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान विशद करताना म्हटले की हिंदू हा शब्द प्रथम परकीयांनी चलनात आणला आणि तेव्हापासून त्याचा अर्थ भारतीय असा आहे; भारतात निर्माण झालेला विचारप्रवाह म्हणजे हिंदुत्व असाच अर्थ घ्यायला पाहिजे; ‘राष्ट्रीय विचारधारेशी समरस होऊ इच्छिणाच्या मुसलमानांनीसुद्धा स्वत:ला हिंदू । म्हणवून घ्यायला कचरू नये वगैरे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक यांस,
चीनचा उल्लेख आला म्हणून का होईना, श्री. गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांनी राष्ट्रवादावरील चर्चेत भाग घेतला, याचा आनंद झाला (आ.सु. जाने. ९८). नोव्हेंबरच्या अंकात माझे जे टिपण प्रसिद्ध झाले आहे, त्यातील काही मुद्द्यांवर जाता जाता बरीच शेरेबाजी श्री. गो. पु. देशपांडे यांनी केली आहे, पण त्यांचा प्रमुख आक्षेप आहे, तो अमेरिकी अभ्यासकाचा हवाला देऊन चीनमधील राष्ट्रवादाविषयी लिहिले हा. वास्तविक, गो. पु. देशपांडे यांनीच जर आम्हाला चीनमधील राष्ट्रवाद समजावून सांगितला असता तर इंग्रजी लिहिणारया देशांतील राष्ट्रवाद अधिक चांगल्या रीतीने समजावून घेता येईल, हा मुद्दाही काही वाईट नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

पुरोगामित्वाचे बुरखे
संपादक, आजचा सुधारक
नुकताच या संक्रातीच्या व हळदीकुंकवाच्या मोसमात दोनतीन ठिकाणी जाण्याचा योग आला. विशेष उत्सुकतेने मी सामील झाले, कारण विधवेलाही आमंत्रण करण्याचे पुरोगामी विचार स्त्रीवर्गाने दाखवल्याने विशेष आनंद वाटला. परंतु तेथे गेल्यावर कुंकू लावणे, वाण देणे व ओटी भरणे या मुख्य कार्यक्रमातून विधवांना वगळून त्यांना तिळगुळाचा प्रसाद केवळ देण्यात आला हे पाहून मन विषण्ण झाले. म्हणजे जेवायला बोलावून मुख्य पक्वान्न न वाढता, वरणभातावर बोळवण केल्याचा पंक्तिप्रंपच केल्याने उपेक्षेचे दुःख वाट्याला आले. यावरून तथाकथित पुरोगामित्वाचे बुरखे ल्यालेल्या स्त्रीसमाजाने अजूनही त्याच पक्षपाती व अपमानकारक परंपरा जपून ठेवलेल्या दिसल्या व काही कटु सत्ये लक्षात आली ती अशी :
१.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

प्रिय वाचक,
तुमचे पत्र आल्याला फार दिवस झाले. ते गेले दहा महिने अनुत्तरित राहिले याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. या ना त्या कारणामुळे उत्तर लांबणीवर पडत गेले हे मात्र खरे आहे. जानेवारी ९८ च्या अंकात आणखी एका वाचकाचे पत्र आल्यामुळे पत्रोत्तराला आणखी विलंब लावणे अक्षम्य होईल ह्या जाणिवेने तुमच्या पत्रास उत्तर देत आहे.
आपल्यापुढे असलेला पेच सुधारकी मतांच्या सर्वच लोकांसमोर उद्भवत असला पाहिजे यात शंका नाही. मुंज या संस्कारात तुम्ही दाखविले ते दोष आहेतच, आणि त्यामुळे त्या समारंभास हजर राहू नये असे वाटणे साहजिक आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

स्वेच्छामरण चळवळीचा आरंभ व्हायलाच हवा!
‘स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज’ हा आजचा सुधारक सप्टेंबर ९७ मधील लेख वाचला. लेखाच्या विषयाबद्दल कोणतेही दुमत नाही. फक्त स्वेच्छामरण ह्या शब्दाच्या विविध छटा आणि ते स्वीकारण्याचे नियोजित मार्ग याविषयी काही मुद्दे मांडावेसे वाटतात.
आयुष्य पुरेसे जगून झाल्यानंतर म्हणजेच त्यातील स्वारस्य कमी झाल्यानंतर मरण स्वीकारण्याचा मार्ग कायद्याने मोकळा असावा आणि नसला तर तो करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ती वेळ आता आली आहे हे निश्चित. पण त्यासाठी आत्महत्येकरिता पोटॅशियम सायनाईड पुरविण्यापेक्षा सांगलीचे वि.रा. लिमये यांनी सुचविलेली महानिर्वाण गृहे व त्यांच्या माध्यमातून तज्ज्ञांकरवी दिले जाणारे विनायास मरण ही कल्पना अधिक व्यवहार्य वाटते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री बाबूराव यांस सप्रेम नमस्कार
सुधारकचा जूनचा अंक तीन आठवड्यांपूर्वी माझ्या हातात आला त्यात तुमचा लेख वाचला. सध्या बरेच दिवसांपासून माझे वास्तव्य हैदराबादला असल्यामुळे पूर्वीच्या अंकांतून तुमचे व श्री कुळकर्णी यांचे काय लिखाण आले आहे ते कळले नाही. त्याचा संदर्भ न घेता काही विचार सुचले ते लिहीत आहे.
चर्चा करण्या अगोदर define your terms” अशी मागणी करणे रास्तच आहे. पण प्रत्येकाने स्वत:पुरत्या वेगळ्या व्याख्या केल्या तर अनवस्था माजेल. अशी काहीशी अवस्था हिंदुत्व या शब्दाबद्दल झालेली आहे. हिंदू असण्याचा भाव म्हणजे हिंदुत्व असा सोपा अर्थ आता राहिलेला नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
यांस,
जुलै १९९७ च्या आजचा सुधारक च्या अंकात ‘वैज्ञानिक रीत’ हा डॉ.र. वि. पंडित यांचा लेख वाचण्यात आला. या लेखात डॉ. पंडित यांनी विश्वाबद्दलची त्यांची धारणा मांडताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांविषयी थोडेसे.
र. वि. पंडित ह्यांचे ‘विश्व बहुतांशी खगोलशास्त्रज्ञांना आज तरी तत्त्वतः मान्य नाही. आजमितीस विश्वाची उत्पत्ती ही एका प्रचंड स्फोटामुळे झाली असे शास्त्रज्ञ मानतात. त्यानंतर विश्व हळूहळू थंड होत गेले आणि त्याचे आजचे तपमान -२७०° से. (कोबे उपग्रहावरील प्रयोगातून मोजलेले) आहे.
डॉ. र. वि. पंडित ह्यांची संकल्पना ही हॉईल-नारळीकर यांच्या ‘जैसे थे’ (steady State) संकल्पनेसदृशआहे.

पुढे वाचा

धर्म आणि विवेकवाद -प्रा. स. ह. देशपांडे यांना उत्तर

आजचा सुधारकच्या जुलै आणि चालू अंकात डॉ. स.ह. देशपांडे यांचा ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचा उत्तरार्ध (या अंकात प्रसिद्ध झालेला) पूर्णपणे मला उद्देशून लिहिला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ईश्वर ही कल्पना मानवी मनातून सर्वस्वी काढून टाकणे शक्य दिसत नाही. मी या प्रश्नाशी नीट भिडत नाही. माझी उत्तरे मूळ मुद्दा सोडून असतात. मनुष्य जगात एकटा असून त्याला आधाराला ईश्वर लागतो या मुद्याचा प्रतिवाद मी केला तरी तो उपयुक्त होईल. एरव्ही ईश्वर आणि धर्म यांच्या समाजजीवनावरील प्रभावाचा मी पुरेसा विचार करीत नाही असा आरोप मला पत्करावा लागेल.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. दि. य. देशपांडे यांना स. न.
मे ९७ च्या आ. सु. मधील आपल्या लेखावरील माझे विचार कळवितो.
आपण असे म्हटले आहे की श्री आडारकर यांनी त्यांना काय अनुभव आले ते सांगितलेले नाही; ते नेमके काय होते हे कळेपर्यंत त्यांचे महत्त्व निश्चित करणे अशक्य आहे. पण मला असे वाटते की जरी ते अनुभव त्यांनी लिहिले असते तरी आपण बहुधा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असते, कारण आपली जी एक साचेबंद विचारसरणी आहे तिला ते गैरसोयीचे वाटले असते. मी हे म्हणतो त्याला कारण आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आस्तिकता आणि विज्ञान
– हेमंत आडारकर
जानेवारी ९७ च्या अंकातील प्रा. ठोसर यांचा ‘कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स…’ हा लेख आणि मार्च ९७ च्या अंकातील दि. य. देशपांडे यांनी लिहिलेला, ‘प्रा. ठोसर, प्रा. एकल्स …’ हा लेख वाचून मनात आलेले विचार आजचा सुधारकच्या वाचकांपुढे मांडावेत ह्यासाठी हा लेखनप्रपंच.
आस्तिकता आणि विज्ञान ह्या परस्परविरोधी गोष्टी आहेत असे गृहीत धरणे बरोबर नाही. माझा स्वतःचा विज्ञानक्षेत्रातला दहा वर्षांचा अनुभव आणि अवांतर वाचन जर गाठीशी धरले तर एक वेगळीच स्थिती समोर येते. वैज्ञानिक पेशा आणि आस्तिकता ह्यांचा घनिष्ठ संबंध दिसतो.

पुढे वाचा