ऐतिहासिक दृष्टीने पाहता अराजकवाद (Anarchism) ही सध्याच्या समाजव्यवस्थेवर टीका करणारी, तिला ‘हवासा’ पर्याय सुचवणारी आणि इथपासून तिथपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणारी विचारप्रणाली आहे. अविचारी बंडे अराजकवादी नसतात. आजच्या ऐहिक शासनाला तात्त्विक किंवा धार्मिक भूमिकेतून नाकारणेही अराजकवादी नाही. गूढवादी व स्टोइक (mystics & stoics) यांना अराजक नको असते तर इतर कोणते तरी राज्य हवे असते. अराजकवाद मात्र इतिहासात नेहेमीच केवळ माणूस आणि समाज या संबंधांवर रोखलेला आहे. त्याचा हेतू नेहेमीच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा असतो. तो नेहेमीच सध्याच्या सामाजिक रचनेला दुष्ट मानतो. हे मानणे माणसांच्या स्वभावाच्या व्यक्तिवादी आकलनातूनही येत असेल, पण अराजकवादाच्या पद्धती मात्र नेहेमीच सामाजिक बंडखोरी करण्याच्या असतात, मग त्या हिंसेचा आधार घेवोत वा न घेवोत.
विषय «उवाच»
आधार मिळतो
ज्या जगात आरोग्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि मोठा निरोगी समाज आहे तिथे वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज क्वचितच आणि माफक प्रमाणात भासते. निरोगी माणसे ती, जी निरोगी घरात राहतात, पौष्टिक आहार घेतात आणि त्यांचा परिसर जन्म, वाढ, रोगमुक्ती आणि मृत्यू ह्या सर्वांसाठी अनुकूल असतो. ज्या संस्कृतीमुळे ह्या निरोगी समाजाला आधार मिळतो त्या संस्कृतीने लोकसंख्येच्या मर्यादांचा, वार्धक्याचा, अपुऱ्या रोगमुक्तीचा आणि सतत निकट येणाऱ्या मृत्यूचा जाणीवपूर्वक स्वीकार केलेला असतो. निरोगी माणसांना संभोग, अपत्यजन्म, मानवी जीवनातील विविध अवस्थांमधला सहभाग आणि मृत्यू ह्याकरिता नोकरशाहीच्या हस्तक्षेपाची गरज कमीत कमी असते.
नगरे आणि आर्थिक विकास
आर्थिक दृष्टीने बघता छोट्या भौगोलिक परिसरात मोठी लोकसंख्या एकवटण्याची प्रक्रिया ही सर्व समाजाकराता फायदेशीर असते. नागरीकरणाची प्रक्रिया आर्थिक कारणांमुळेच घडत असते हे उघड आहे. या प्रक्रियेमुळे संपत्ती निर्माण झाली नसती तर ही प्रक्रिया कधीच वाढली नसती. जेव्हा लोकांची दाटी वाढते तेव्हा उत्पादनही वाढते. या दाटीवाटीमुळे काही लोकांच्या अंगभूत वैशिष्ट्यांना प्रगट व्हायची संधी मिळते. ज्या माणसांकडे काही विशेष कसब असते त्याचा वापर करून त्यांना त्यात प्रावीण्यही मिळवता येते. माणसांच्या आकांक्षापूर्तीसाठी मोठा परिसर उपलब्ध होतो, आणि अशाच ठिकाणी व्यक्तींच्या क्षमता उजेडात येतात. सत्ताधाऱ्यांना व्यापारी नगरांमधून खूप कर मिळतो याची चांगली जाणीव असते.
भारतामधील पहिले नगर
भारतामधील पहिल्या नगराच्या उगमाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. मानवी संस्कृती ही नागरी समाजजीवनाशी आणि म्हणूनच नगरांशी निगडित असते. भारतामधील नगरांचा उदय हा आधुनिक यंत्रयुगाच्याही आधी किंबहुना सरंजामशाही काळाच्याही पूर्वी झाला होता.
गेल्या शतकापर्यंत पहिल्या भारतीय नगराचा पाया इ.स.पू. १००० वर्ष घातला गेला होता अशी समजूत होती. वायव्येकडून आलेल्या आर्यांच्या टोळ्या पूर्वेकडे, गंगा-यमुनांच्या खोऱ्यात पसरल्या आणि स्थिरावल्या. त्यानंतर पहिले महत्त्वाचे नगर, पाटणा हे उदयाला आले असे मानले जात असे. त्याला आधार होता तो संस्कृत पुस्तके, पोथ्या, गोष्टी आणि दंतकथांचा. पण १९२५ साली पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मोहन्-जो-दारो आणि हडाप्पा या दोन प्राचीन नगरांचे अवशेष सापडले, आणि या आधीच्या सर्व समजुतींना जोरदार धक्का बसला.
नागरी प्रक्रिया
उद्योग, घरे आणि माणसे या तीन घटकांच्या एकत्रित संलग्न प्रक्रियेतून निर्माण होणारा भूभाग म्हणजे नागरी वस्ती. पोषक वातावरण मिळाले की ह्या घटकांमधून एखाद्या भूक्षेत्राचा विकास सुरू होतो. जसे जसे विकासाचे क्षेत्र विस्तारते तसा रिकामा भूभाग, परिसर इमारती, रस्ते अशा गोष्टींनी भरून जायला लागतो. यांच्या पाठोपाठ मालमत्तांनी, इमारतींनी व्यापलेला नागरी परिसर जुना होण्याची प्रक्रिया सुरू होते. कालांतराने अशा वस्तीमध्ये साचलेपणा, येऊ लागतो. वाढीचा काळ संपतो. वस्ती कुंठित होते. यासोबतच आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलायलाही सुरुवात होते. अशा वस्तीच्या क्षेत्रात सतत नवीन नवीन गोष्टींची भरत पडत राहिली नाही तर अशा वस्त्यांची वाढ आणि विकास होण्याऐवजी हे क्षेत्र जुनाट घरे, आणि बंद उद्योगांचे माहेरघर होते.
“सुलभ’ भारत
१)तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग अजूनही हाताने विष्ठा साफ करतात का ? जर ‘हो’, तर हे स्वतःच्या घरात करता की नगरपालिकेच्या स्वच्छतागृहात ?
२) तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग घरी संडास नसल्याने उघड्यावर जाता का ? जर ‘हो’, तर हे गावात होते की खेड्यात ?
३) तुमच्या शाळेत संडास आहे का, की नसल्याने त्याची गरज पडल्यास तुमची गैरसोय होते? जर ‘हो’, तर तुम्ही हा प्रश्न कसा हाताळता?
४) तुमच्या टप्प्यात येणाऱ्या रेल्वे, बस स्थानकांवर, बाजारांत, धार्मिक व पर्यटनाच्या स्थळांमध्ये संडास आहेत का ?
‘काश’ राष्ट्रवाद: तिथेही तेच!
पाकिस्तानातील प्रस्थापितांना वर्षांनुवर्षे एक काल्पनिक इतिहास शिकवला गेला आहे. तरुणांना स्वतःच्या राष्ट्राची महत्ता सांगणारी गुळगुळीत घोषणावाक्ये तपासायला शिकवले जातच नाही. पर्यायी दृष्टिकोन सुचवलेच जात नाहीत. यामुळे कार्ये आणि कारणे यांच्याबद्दल सार्वत्रिक अज्ञान आहे. आणि शिवाय याने ‘काश! वृत्ती रुजते. काश! इंग्रजांनी दक्षिण आशियात हिंदूंची बाजू घेतली नसती, तर!’ किंवा ‘काश. अमेरिकेने आपली वचने पाळून आपल्याला काश्मीर मिळवून दिला असता तर!’ असल्या सुलभीकृत विचारांमुळे विश्लेषणच थांबते.
जोवर पाकिस्तानातील भडकावू घोषणा आणि ‘ब्रेनवॉशिंग’ संस्कृतीची जागा खऱ्याखुऱ्या वैचारिक विविधता येणार नाही, तोवर पाकिस्तान हे आधुनिक, कार्यप्रवण राष्ट्र होणार नाही.
उलटे नियोजन
पाणी हवे आणि वीजही हवी; पण वीजनिर्मितीला पाणी देण्याची आमची तयारी नाही. पाणी संपले, तर औरंगाबादची तडफड बघवणार नाही, अशी भीती सर्वांना वाटते, ती अनाठायी नाही. परळी विद्युत केंद्रातील तीन संच आधीच बंद पडले आहेत. एक संच चालू आहे; पण त्याला पाणी कमी पडते. नाथसागराचे दरवाजे उघडले, परंतु तहानलेल्या औरंगाबादकरांच्या रेट्यापुढे ते बंद करावे लागले. नियोजनाचा अभाव असल्यामुळेच टँकरमुक्तीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्र दिवसेंदिवस टँकरग्रस्त होत चालला आहे. कोट्यवधी रुपये उधळून अनेक सिंचनप्रकल्प उभारले. 80 टक्के शेतीला आजही ओलितांची सोय नाही. जायकवाडी, खडकवासला किंवा आता कोरडीठाक पडलेली बिंदुसरा-मांजरासारखी धरणे खास शेतीसाठीच बांधली; पण ना शेती भिजली, ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.
बॅक्टीरियांचे वंशज
एक जीवजात म्हणून पाहता आपण अजूनही स्वतःबद्दलच्या धारणांमध्ये जे विक्षिप्त वाटते त्याला घाबरतो. डार्विन होऊन गेल्यावरही किंवा डार्विनमुळेही, एक संस्कृती म्हणून आपल्याला आजही उत्क्रांतीमागचे विज्ञान समजत नाही. विज्ञान आणि संस्कृति यांच्यात संघर्ष झाला तर नेहमीच संस्कृतीचा विजय होतो. (पण) उत्क्रांतीच्या शास्त्रांची जास्त समजून घेण्याची पात्रता आहे – हो, माणसे उत्क्रांत झाली आहेत, पण कपी किंवा इतर सस्तन प्राण्यांपासूनच नव्हे. आपल्या पूर्वजांमध्ये एक लांबलचक बॅक्टीरियांची यादी आहे, अंतिमतः अगदी पहिला बक्टीरियाही त्यात येतो. [लिन मार्गुलिसच्या ‘सिंबायॉटिक प्लॅनेट’ (बेसिक बुक्स, 1998) च्या पुस्तकाच्या उपोद्घातातून]
प्रचंड धोका
एकलव्य या संस्थेचे काम आणि संस्थेच्या अनुभवांचे सार नजरेखालून घालणे महत्त्वाचे आहे. शासकीय शाळांतून प्रयोग किंवा उपक्रम यांना एकलव्यने विज्ञान शिक्षणाचे माध्यम बनवायचा प्रयत्न केला. त्यामुळे अनुभवाधाराने ज्ञान कमाविणे आणि ते वापरणे यांना महत्त्व मिळाले. याचा परिणाम असा झाला की अनेकांना विज्ञान सोपे आणि रंजक वाटू लागले.
इथेच सगळा घोटाळा झाला, असे मला वाटते. अनेकांना विज्ञान हा विषय रंजक आणि आवाक्यातील वाटू लागला, तसेच समजा इतर विषयांचेही झाले, तर मोठी अडचण समोर ठाकणार होती. ती म्हणजे सारेच विद्यार्थी हुशार ठरतील. त्याचवेळी अर्थार्जनाच्या चांगल्या संधी मात्र मोजक्याच राहिल्या तर निवड करायला फारशी जागा राहणार नाही.