विषय «इतर»

मेपुरे आणि दियदे

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये झालेले मेळाव्यातील प्र. ब. कुळकर्णी यांच्या वृत्तांताबद्दल हे पत्र लिहीत आहे. पुढची चर्चा आचार्य रेगे व प्रो. दि. य. देशपांडे यांच्या मतभेदाविषयी आहे. आचार्य रेगे यांचे मत ‘धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन साधणे योग्य असे होते.’ तर प्रो. दि. य. देशपांडे हे ‘समाजास’ “धर्म, देव हानिकारक असल्याने समाजसुधारणेसाठी विवेकवादाकडे समाजास वळवावे’ ह्या (कडव्या) मताचे आहेत.
या विषयावर मेळाव्यात झालेल्या चर्चेत मला दोन मुद्दे उपस्थित करायचे आहेत.
१. गेल्या शतकात चीन व रशियात कम्युनिस्ट क्रान्ती झाली. रशियात ७४ वर्षे (१९१७ ते १९९१) व चीनमध्ये १९५० ते आजतागायत कम्युनिस्ट तत्त्वांना अनुसरून जनतेला निधर्मी करण्याचे महाप्रयत्न झाले.

पुढे वाचा

ग्रंथ-परिचय

हंग्री फॉर ट्रेड (हाऊ पुअर पीपल पे फॉर फ्री ट्रेड) (१) (जॉन मेडेली, पेंग्विन बुक्स इंडिया, २००१, पृ. १७८, किं. रु. २००/-.)
परिचायक: श्रीनिवास खांदेवाले
प्रस्तावना
ह्या छोटेखानी ग्रंथात प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जॉन मेडेली ह्यांनी १९९४ साली झालेला जागतिकीकरणाचा करार विषम कसा आहे व तो विकसित देशांच्या —- व त्यातल्या त्यात तेथील बहुराष्ट्रीय खाजगी कंपन्यांच्या —- अधिक फायद्याचा कसा आहे ह्याचे अतिशय सखोल व गंभीर असे विवेचन केले आहे. ह्या कराराच्या मूलभूत असमतोलामुळे विकसनशील देशांतील लहान कास्तकारांचा शेती व्यवसाय व मुख्यत्वेकरून ग्रामीण लोकांची सध्याची अन्नसुरक्षा धोक्यात कशी आली आहे, येत आहे व येणार आहे ह्याचे —- विषयाचा केंद्रबिंदु मानून —- असंख्य संदर्भासह विश्लेषण त्यांनी केले आहे.

पुढे वाचा

दूरदर्शन आणि स्त्रीची दुर्गती

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका अतिशय लोकप्रिय मालिकेच्या संदर्भात एक विस्मयकारक घटना घडली. “क्योंकि सास भी कभी बहू थी’ ह्या मालिकेतले पात्र मिहिर ह्याचा अपघाती मृत्यू घडल्याचे एका भागात दाखवताच संपूर्ण देशभर हाहाःकार उडाला. आपल्या घरचेच कोणी गेल्यासारखे दुःख अनेकांना झाले. लोकांनी फोन, पत्र, ई मेल ह्यांद्वारेच नव्हे तर अगदी मोर्चा काढून मिहिरला पुन्हा जीवदान देण्याची मागणी मालिकेच्या निर्मात्यांकडे केली. एखाद्या मालिकेच्या कथानकाशी आणि पात्रांशी अशा मोठ्या प्रमाणात भावनिक तादात्म्य होण्याची ही घटना अभूतपर्व अशीच म्हटली पाहिजे. छोट्या पडद्यावर प्रथमच दीर्घ मालिका (soap operas) सुरू झाल्या तेव्हाही ‘हम लोग’, ‘बुनियाद’, ‘खानदान’ यांना अशीच अफाट लोकप्रियता लाभल्याचे आता आठवते.

पुढे वाचा

नैतिक उपपत्तींचे दोन प्रकार

नीतिशास्त्राच्या इतिहासाकडे थोड्या बारकाईने पाहिल्यास त्यातील नीतिशास्त्रीय व्यवस्थांचे किंवा उपपत्तींचे स्थूलमानाने दोन प्रकार आढळून येतात. त्यांना अनुक्रमे empirical आणि transcendental अशी नावे देता येतील. empirical म्हणजे अनुभववादी आणि transcendental म्हणजे अतिक्रामी. अनुभववादी उपपत्ती अर्थातच पंचज्ञानेंद्रिये आणि मन यांच्यावर आधारलेली; आणि अतिक्रामी म्हणजे सामान्य अनुभवांखेरीज अन्य ज्ञानस्रोतांवर विश्वास ठेवणारी. या दुसऱ्या वर्गातील उपपत्तीत intuition (साक्षात्कार)१ या ज्ञानसाधनाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो, उदा. goodness किंवा साधुत्व हा काही इंद्रियगोचर गुण नव्हे. तो जाणण्याकरिता अनेंद्रिय साक्षात्काराची आवश्यकता असते. तसेच कर्तव्याची कल्पनाही अनेंद्रिय साक्षात्काराशिवाय आकलन करणे अशक्य आहे.

पुढे वाचा

खादीचे नवसर्जन

[‘साम्ययोग साधना’ (१६ मे २००१) या नियतकालिकातील हा लेख आ. सु. त सुरू असलेल्या विचारमंथनाचा भाग वाटला, म्हणून तो त्यांच्या सौजन्याने येथे घेत आहे. हा लेख मोहनींच्या लेखाला उत्तरादाखल लिहिलेला नाही. (तिरपा टाइप आ. सु. च्या संपादकाचा)]
१९०८ मध्ये गांधींच्या मनात चरख्याची कल्पना पहिल्यांदा आली. गिरण्या उभ्या राहिल्या तर विणकरांचे काय होईल, हा प्रश्न मनात उभा झाला आणि गांधी हातकताईच्या शोधात लागले. एका महिला कार्यकर्तीने गुजराथमध्ये विजापूरला कताई जाणणाऱ्या मुसलमान भगिनींचा शोध लावला आणि कताईचा जन्म झाला. १९१५ मध्ये गांधी प्रथम विणकर झाले.

पुढे वाचा

आम्हाला विचारत का नाहीत?

एका गोष्टीचा मात्र जरूर विचार करायला हवा. आपल्या मुलांच्या आयुष्यासंदर्भातल्या ह्या महत्त्वाच्या निर्णयात आपलं स्थान काय? राजकारणी आणि सरकार यांच्या ताब्यात मुलांचे भवितव्य सोपवून नि िचंत रहाणं योग्य ठरेल का? आपल्याला केवळ कल्पनांचे पतंग नको आहेत. आपल्या मुलांसाठी आनंदाचं आणि चांगलं शिक्षण जर खरोखर हवं असेल तर आपल्यासाठी नेमकं काय भलं, काय नाही हे समजावून घेण्यासाठी आपण समर्थ व्हायला हवं. शासनाची भूमिका, त्यावर तज्ज्ञांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया यांचं आपल्या अनुभवांच्या कसोटीवर घासून विश्लेषण करायला हवं, त्या समजावून घ्यायला हव्यात. अशा प्रकारच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी, विशेषतः सरकारच्या धोरणांसंदर्भातली माहिती सहजी उपलब्ध होत नाही.

पुढे वाचा

चौथ्या क्रांतीचे शिल्पकार नररत्न मुरली मनोहर जोशी!

युगायुगाच्या अंधकारानंतर भारतवर्ष पुन्हा एकवार सूर्यासमान तळपणार! देशात दुधाची गंगा वाहणार! अन्नधान्य, फळफळावळांची रेलचेल असेल. समस्त जनता धष्टपुष्ट आणि सुखी समाधानी असणार. रोगराईची निशाणी उरणार नाही. डॉक्टर मंडळी इतर क्षेत्रांत कौशल्याचा ठसा उमटवतील. चौसष्ट कलांमधून आपलाच ध्वज दिसेल. ऑलिंपिकची सगळी सुवर्ण पदके आपल्यासाठीच असतील. बकाल सिलिकॉनच्या व्हॅलीत स्मशान शांतता आणि ऐश्वर्याने नटलेल्या गंगेच्या खोऱ्यात जाल तेथे सोन्याचा धूर दिसेल. कुबेराला लाजवणारी आपली समृद्धी पाहून जगातले शास्त्रज्ञ, विद्वान रोजगारासाठी आपल्याकडे याचना करतील. अमेरिका, जपानमधील भारतीय दूतावासाबाहेर रांगा लागतील. ते पाहून एकेकाळची धनाढ्य राष्ट्र मनात जळफळाट करून घेतील.

पुढे वाचा

खादी (भाग ३)

गरज आणि उत्पादन

खादीग्रामोद्योगप्रधान समाजरचनेमुळे खेड्यापाड्यांमधला पैसा खेड्यांतच राहतो, तो शहरांत जात नाही आणि पैसा खेड्यांतच खेळल्यामुळे शहरे त्यांचे शोषण करू शकत नाहीत अशा जो एक समज आहे —- आणि हा समज विकेन्द्रित अर्थव्यवस्थेचे म्हणजे खादीग्रामोद्योगांचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो —- तो आता तपासून पाहू. तसे करताना पैसा म्हणजे काय आणि शोषण कशामुळे होते हे आपणापुढे स्पष्ट होईल अशी आशा आहे.
ग्रामीण प्रदेशात मुळात पैशांचा उपयोग फार थोडा असतो. पैशांशिवायच बराचसा व्यवहार पार पडतो. धान्याची किंवा इतर वस्तूंची देवाणघेवाण करून आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचा प्रघात फार प्राचीन आहे.

पुढे वाचा

सनातन भूल

पृथ्वीवरील इतर देशांबद्दल मला फारशी माहिती नसल्याने त्यांच्या बाबतीत काही विधान करीत नाही. पण भारत या माझ्या देशाची मला जी माहिती आहे तीवरुन माझी अशी समजूत झाली आहे की या देशाच्या प्राचीन रहिवाशांवर एक मोठी भूल पडली. प्रारंभी यांची संख्या थोडी होती. पण कालांतराने ती वाढत गेली. लेखनकला भारतीयांना अवगत झाल्यापासून या भूलग्रस्तांची संख्या वेगाने वाढत गेली आणि मुद्रणकला अवगत झाल्यानंतर तो वेगही वेगाने वाढत गेला असावा. १९ व्या व २० व्या शतकात त्या वेगावर थोडी मर्यादा पडली पण एकूण भारतीयांची संख्याच वेगाने वाढू लागल्याने त्या सनातन भुलीच्या प्रभावाखालील जनलोक वाढतच राहिले.

पुढे वाचा

अमेरिकेत आ.सु. वाचकांशी हृदयसंवाद

आधी अमेरिकेत येणे झाले तेव्हा आजचा सुधारकचे चार वर्गणीदार होते. त्यातली एक माझी मुलगी आणि इतर तीन पद्मजा फाटकांनी मिळवून दिलेले. त्यांपैकी दिलीप फडणीस म्हणाले, चार आहेत त्यांचे चाळीस करू. त्यांना एकत्र आणू. एकत्र यावे हा विचार मनात होताच. Summit ला राजेन्द्र मराठे असतो. त्याच्याजवळ बोललो. (इथे एकेरी संबोधायला वेळ जावा लागत नाही. फारशी जवळीक लागत नाही, आपलीच जीभ रेटत नाही. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत.) आजचा सुधारक च्या वाचक-हितचिंतकांची पहिली सामूहिक गाठभेट झाली ती Summit लाच राजनकडे, सप्टेंबर १२, १९९८ ला. त्यावेळी आणि नंतरच्या पाठपुराव्यामधून वर्गणीदारांची संख्या ऐंशीवर गेली.

पुढे वाचा