विषय «इतर»

चर्चा

हिन्दु कोण?
आपल्या में ९९ च्या संपादकीयामध्ये “ज्याने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले त्याला आपल्याला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. हिंदुत्वाचे मुख्य लक्षण ह्या भूमीवरची निष्ठा आहे” अशा धर्तीची विधाने आहेत. मला संपादकांना पुढील प्रश्न विचारावयाचे आहेत.
१. भारताचा नकाशा कायम वदलत आलेला आहे. (उदा. वांगला देश, पाकिस्तान) असे झाले तर भारतावाहेर राहिलेले हिंदू अहिंदू होणार का?
२. जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांनी भारतात पाऊलही ठेवलेले नाही पण ते स्वतःला हिंदू मानतात. अगदी छोट्या कॉस्टारिका ह्या देशात स्वतःला हिंदू मानणारी माणस मला भेटलेली आहेत.

पुढे वाचा

सर्वच त्या वातावरणाचे कैदी

… अॅबे दुब्वाने* म्हैसूर व दक्षिण भारत यांवरील आपली नजर काढून जवळच उत्तरेकडे जर ती लावली असती तर त्याच्या ज्ञानात जास्त भर पडली असती. व्यक्तीप्रमाणे एखादा समाजदेखील आपल्या जीवनप्रवासात पुष्कळ वेळा आगंतुक कारणाने देखील वाट चुकून आडमार्गास लागतो. एकदा आडमार्गास लागला म्हणजे कालांतराने त्या समाजाभोवती त्या परिस्थितीस अनुरूप असे पारंपरिक मानसिक वातावरण अस्तित्वात येते. मग वैयक्तिक व सामाजिक जवाबदारी यांचा भेद लयास जाऊन सर्वच त्या वातावरणाचे कैदी होऊन वसतात याचा पुरावा महाराष्ट्राच्या इतिहासात चांगलाच प्रत्ययास येतो. एका युगपुरुषाच्या नेतृत्वामुळे मराठी समाजात एकोपा व स्वातंत्र्य यांचे अननुभूत वारे खेळू लागले.

पुढे वाचा

सामाजिक कार्यकर्ता-परस्पर-संवाद

[आमचे मित्र श्री. तारक ,काटे ह्यांनी चार महिन्यांपूर्वी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीचा अहवाल आमच्याकडे पाठविला. अहवाल वाचल्यानंतर अशी कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची प्रेरणा त्यांना कशी काय झाली असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्याला त्यांनी जे उत्तर दिले ते, आणि त्यांच्या बैठकीचा निष्कर्ष आजचा सुधारक च्या वाचकांसाठी पुढे देत आहोत. त्यांच्या निवेदनात काही व्यक्तिगत तपशील आलेला आहे पण त्यामुळे त्यांच्या कार्यकलापाचे यथायोग्य आकलन होण्यास साह्य होईल, त्याचप्रमाणे त्यांनी काढलेले निष्कर्प योग्य आहेत वा नाहीत याची चर्चा करण्यास मदत होऊ शकेल असे वाटल्यामुळे तो समग्र वृत्तान्त येथे प्रकाशित करीत आहोत.]

पुढे वाचा

विद्रोही विवेकवाद

दोन ईश्वरांतील विद्रोह हा माझा लेख एप्रिल ९९ च्या अंकात प्रकाशित करून त्यावर संपादकीय स्पष्टीकरणही दिल्यामुळे आजचा सुधारक विषयीचा माझ्यातील आदर दुणावला. परंतु आपले (व वाचकांचेही) गैरसमज झालेले दिसतात. माझे स्पष्टीकरण प्रकाशित करावे ही नम्र प्रार्थना.
जगात दोन प्रकारचे ईश्वर अजून जिवंत आहेत (१) मानवहित केंद्री (२) पुरोहित-ब्राह्मण-हित केंद्री ह्या माझ्या वाक्यातील लाक्षणिक अर्थ लक्षात घ्यावा. (१) मानवहित केंद्री : साधुसंतांनी मानलेला ईश्वर. मध्यस्थ-पुरोहित-ब्राह्मणांना डावलून संतांनी सरळ आपापल्या ईश्वराशी (विठ्ठल, राम, कृष्ण) संवाद साधण्याचा सत्याग्रह, विद्रोह मांडला होता. त्यांचा ईश्वरसुद्धा भक्तांना अभिप्रेत असलेल्या रूपात येऊन चंदन घासणे, दळण दळणे, ढोरे ओढणे, वगैरे अति सामान्यांची कामे करीत होता.

पुढे वाचा

दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ

प्रा. दि. य. देशपांडे यांनी घातलेला प्रचंड वैचारिक गोंधळ व अध्यात्माला ‘गोंधळ’ ठरविण्याच्या अट्टाहासापायी केलेले स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन
प्रा. दि. य. देशपांडे यांनी आ. सु. च्या मे ९९ च्या अंकात लिहिलेला अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ” हा लेख म्हणजे वैचारिक गोंधळाचा उत्कृष्ट नमुना आहे. हा संपूर्ण लेख अत्यंत तर्कदुष्ट पद्धतीने लिहिलेला असून इतकी तर्कदुष्ट विधाने देशपांड्यांसारखे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक कशी काय लिहू शकतात ही खरोखरच । आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. या लेखात अनेक चुकीच्या विधानांचीही रेलचेल आहे. काही उदाहरणे खाली देत आहे.

पुढे वाचा

भाषेच्या रचनेस यत्किंचितही अपाय नको

इंग्लिश भाषेचा आम्ही द्वेष करीत नाहीं. हे तर काय पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास ती मोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. सर्व जगांतील ज्ञानभांडार तींत साठवले असल्यामुळे तिचे साहाय्य मराठीसारख्या परिपक्व होऊ पहाणा-या भाषेस जितकें होईल तितकें थोडे आहे! इतकेच मात्र कीं, ते ज्ञानभांडार खुद्द आपलेसे करून घेण्यास आपल्या भाषेचें सत्त्व म्हणजे निराळेपण कायम राखलें पाहिजे. ज्याप्रमाणे तेच रस शरीरास हितावह होत, की जे शरीर प्रकृतीस मानवून जीवतत्त्वास ढका लावणार नाहींत; त्याचप्रमाणे जे भाषांतरादि ग्रंथ भाषेच्या सरणीस अगदी बरोबर उतरून तिच्या रचनेस यत्किंचितही अपाय न करतील तेच मात्र तीस वर्धक होतील.

पुढे वाचा

समस्त मराठीभाषाप्रेमींना अनावृत पत्र

सप्रेम नमस्कार,
मुद्रित मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंताग्रस्त होऊन मी हे प्रकट पत्र आपणास लिहीत आहे. आयुष्यभर मुद्रणाचा व्यवसाय केल्यामुळे मराठीची जी अवनती आज झालेली आहे तिचा मी साक्षी आहे; किंवा असे म्हणा की ती अवनती पाहण्याचे दुर्भाग्य मला लाभले आहे. आपल्या लिखित वो मुद्रित मराठी भाषेविषयी आपण नेटाने काही प्रयत्न आताच केले नाहीत तर आपल्या भाषेचे हाल कुत्रा खाणार नाही किंवा ती मरेल अशी भीती मला सध्या वाटत आहे. मराठी मरेल म्हणजे ती पूर्णपणे. नष्ट होईल असे नाही; पण तिचे विदग्ध, अभिजात, परिष्कृत स्वरूप मात्र नष्ट होईल.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ : गर्वाच्या खुट्या

राजाच्या खांद्यावरून वेताळ बोलू लागला. त्याचा स्वर नेहमीपेक्षा खिन्न होता. “राजा, आज अकरा में एकोणीसशे नव्याण्णऊ”. आपण गेल्या वर्षी याच दिवशी पोखरण – २ अणुचाचण्या केल्या, हे तुला आठवतच असेल.” राजाने मान डोलावून होकार भरला.
“काही लोकांना ह्या चाचण्यांमुळे बुद्ध हसला असे वाटले, आणि एकूणच या घटनेमुळे जगातील इतर देशांमध्ये आपली पत वाढली असे वाटले”. हा हर्षोन्मादाचा काळ तुला आठवत असेल, होय ना?” राजाच्याने राहवेना, तो भडाभडा बोलू लागला. “लोक फार विघ्नसंतोषी असतात, वेताळा. आपण आपल्या तंत्रशक्तीचे प्रदर्शन केले रे केले, आणि त्या बाकी लोकांनीही दोनचार बाँवस्फोट करून सारा मजा किरकिरा केला.

पुढे वाचा

स्वदेशी चळवळ : एक मुक्त चिंतन

मे १९९९ च्या अंकात श्री. र. वि. पांढरे यांचा स्वदेशीची चळवळ हा लेख वाचण्यात आला. स्वदेशीच्या चळवळी बद्दल मतभेद असू शकतात. पण श्री. पांढरे या चळवळीचा विचार ज्या पद्धतीने मांडतात ती पद्धत वैचारिक लेखाला अंशोभनीय आहे. लेखकाचा रोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असल्याचे दिसून येते. वास्तविक संघाचा हिंदुत्ववाद कधीच आक्रमक नव्हता. त्याला एवढेच अभिप्रेत होते आणि आहे की, संपूर्ण हिंदू समाज संघटित झाल्याशिवाय आक्रमक शक्तींचा प्रतिकार करणे शक्य नाही. पूर्वीच अस्तित्वात आलेली हिंदु-महासभा ही हिंदुत्ववादी राजकीय संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांत हेतुतः साम्य असल्याने राजकारणाचे आकर्षण व अगत्य असणारी संघाची काही माणसे हिंदु-महासभेत गेली.

पुढे वाचा

स्फुट लेख

भांडवलाचे वास्तव स्वरूप
एप्रिल ९१ च्या अंकात महागाई नाही – स्वस्ताई! या नावाचा स्फुट लेख लिहिलेला आहे. त्यानंतर आज भांडवलाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. विवेकी नजरेने जगाकडे पाहण्याची ही एक खटपट आहे.
कोणतेही उत्पादन करावयाचे असेल तर त्यासाठी भांडवल, श्रम आणि भूमि आणि कच्चा माल या चार वस्तूंची गरज असते हे आपण सगळेच जाणतो, मात्र भांडवलाच्या विपयीची आपली अगोदरची कल्पना ही शोपणाधिष्ठित असल्या मुळे एका वाजूला उत्पादन वाढत राहिले तरी दुस-या वाजूला विपमता कायम राहते. शोषणाचे पूर्वीचे स्वरूप आता थोडे फार वदलले असले, जो शोषित आहे तो अगदी सर्वहारा, सर्वस्व गमावलेला नसला तरी विषमता आणि शोपण हे शब्द पर्यायवाची वनले आहेत, आजवरच्या भांडवलाच्या व्याख्या खाजगी मालकी गृहीत धरून केलेल्या आहेत असे जाणवते.

पुढे वाचा