विषय «इतर»

प्रस्थानत्रयी व राष्ट्रवाद

भाषेचे अभ्यासक भाषेच्या दोन उपयोगांमध्ये भेद करतात. एक निवेदक, आणि दुसरा भावनोद्दीपक. निवेदक उपयोगात लेखकाचा बोलणान्याचा उद्देश माहिती देणे, वस्तुस्थितीचे वर्णन करणे हा असतो, तर दुसन्यात वाचकाच्या/श्रोत्याच्या भावना उद्दीपित करणे आणि त्याला कोणत्यातरी कर्माला प्रवृत्त करणे हा असतो. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला ‘ब्राह्मण म्हणणे जवळपास विकारशून्य असू शकेल. पण त्याला ‘भट’ किंवा ‘भटुड’ म्हणणे त्याला क्रोधाविष्ट करण्यास पुरे होईल. सामान्यपणे भाषेत दोन्ही प्रकार कमी अधिक प्रमाणात एकत्र असतात; पण क्वचित भाषेचा उपयोग शुद्ध निवेदक किंवा शुद्ध भावनोद्दीपक टोकाजवळ जाऊ शकेल. शुद्ध निवेदक प्रकार निर्विकार असू शकेल, तर शुद्ध भावनोद्दीपक प्रकार जवळपास निर्विचार असू शकेल.

पुढे वाचा

विज्ञानातील व्याधी (Diseases in Science) -प्रा. जॉन एकल्स यांचे काही विचार

. इतकेच नव्हे तर या व्याधींवर करण्याचे उपाय हे कार्ल पॉपर यांच्याच लेखनात व विचारांत मिळू शकतात हे एकल्स यांनी स्पष्ट केले आहे. विज्ञानक्षेत्रातील व्याधींबद्दल प्रा. एकल्स यांचे विचार वाचकांसमोर मांडावे असे वाटल्यावरून हे टिपण लिहिण्यास घेतले.
सुरुवातीलाच प्रा. एकल्स यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे, की त्यांना हे विचार ते स्वतः संशोधनकार्यातून निवृत्त झाल्यावर, मागील आयुष्यक्रमावर दृष्टिक्षेप करताना सुचले. ते स्वतः संशोधनात गुंतले असताना त्यांच्यातही या व्याधी व हे दोष अंशतः होतेच. विज्ञानांतील संशोधनकार्य ज्या रीतीने चालविले जाते, ज्या संस्थांचा या कार्याला पाठिंबा आहे, त्यांना विज्ञान तंत्रज्ञान यांतील प्रगतीमुळे काय अपेक्षित आहे, अशा तर्हेाच्या प्रश्नांशी त्यांनी निर्देश केलेल्या व्याधी व दोष निगडित आहेत.

पुढे वाचा

विक्रम, वेताळ आणि अप्रिय उत्तरे

राजा, आता तू मला गोंधळवण्यात पटाईत व्हायला लागला आहेस. पण अजून या ‘असली घी’ खाल्लेल्या ‘पुरान्या हड्डीत’ तुला बांधून ठेवण्याइतकी अक्कल आहे!” वेताळ म्हणाला. राजा मिशीतल्या मिशीत हसत वाट चालत राहिला.
‘राजा, माझ्या घराजवळ एक बंगला आहे. त्याच्या आवारात नोकरांसाठी काही खोल्या बांधलेल्या आहेत. बंगल्यात एक सुखवस्तू, सुस्वभावी कुटुंब गेली तीसेक वर्षे राहात आहे. ते बंगल्यात आले तेव्हा त्यांनी एक महादेव नावाचा नोकर ठेवला. अशिक्षित, पण कामसू. मुळात महादेव एकटाच होता, पण यथावकाश त्याने पार्वती नावाच्या बाईशी लग्न केले. साताठ वर्षांत त्यांना मुलगा, मुलगी, मुलगा, मुलगी अशा क्रमाने चार मुले झाली.

पुढे वाचा

विश्वातील सर्वव्यापी मूलतत्त्व

डॉ. हेमंत आडारकरांनी माझ्या पत्राची (आ.सु. ८:४, १११-११२) दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार. विश्वाच्या उत्पत्तीत व संरचनेमध्ये कोणा सूत्रधाराचा हात आहे असे डॉ. आडारकरांना जाणवते (आ.सु. ८:२, ५९-६१) या त्यांच्या जाहीर विधानावर आमचा तीव्र आक्षेप आहे. एखादा डॉक्टर, पोलीस अधिकारी, कवी, वकील यांच्यासारखाच शास्त्रज्ञ आस्तिक/नास्तिक असू शकतो ( आ.सु. ८.५, १५२-१५३) हे आडारकरांचे म्हणणे ही शोचनीय गोष्ट आहे. भारतातील एका नामवंत विज्ञानसंस्थेशी संबंध असलेल्या डॉक्टरआडारकरांसारख्या वैज्ञानिकाने अशी अवैज्ञानिक विधाने सार्वजनिकपणे करावीत हे भारतीय विज्ञानाच्या प्रगतीसाठी अयोग्य आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे.

पुढे वाचा

उदारीकृत जागतिक अर्थव्यवस्थेच्या पूर्वसंध्येतील भारत

भारतीय अर्थव्यवस्थेचे जसजसे उदारीकरण आणि जागतिकीकरण होईल, तसतसे आपल्याला राष्ट्र म्हणून खुल्या, स्पर्धात्मक जागतिक बाजारपेठेचे धक्के-झटके सहन करावे लागतील. स्वातंत्र्यानंतर आपल्या उद्योगधंद्यांना संरक्षण दिले गेले, ज्यामुळे कमी गुणवत्तेचा माल प्रचलित होत राहिला. जसे, अनेक वर्षे नवे ‘मॉडेल’ न काढलेली हिंदस्तान मोटर्सची अॅम्बॅसेडर कार, “आपण जे काही बनवू ते खपतेच’ या भारतीय उद्योजकांच्या भावनेतून जागतिक बाजारपेठांमध्ये गुणवत्तेत किंवा किंमतीतही न टिकू शकणारी उत्पादने आज आपल्या येथे दिसतात. आता आपल्याला विकसित देशांचे तंत्रज्ञान व भांडवल मिळवणे गरजेचे वाटू लागले आहे. हे तंत्रज्ञान आणि भांडवल ज्या किंमतीत मिळेल, ती किंमतही जागतिक बाजारपेठेतच ठरेल, कारण इतरही विकसनशील देशांना याच सेवांची गरज आहे.

पुढे वाचा

श्री माधव रिसबूड यांस आणखी एक उत्तर

आ. सु. (जुलै ९७) ला लिहिलेल्या पत्रात श्री. माधव रिसबूड लिहितात – ‘फलित बीजांडापासून आरंभ करून संपूर्ण देह तयार होईपर्यंत ज्या क्रिया घडतात त्यात जोडीजोडीचे अवयव ज्या पेशींपासून बनतात त्या पेशींची दोन अधुके एकमेकांपासून वेगळी होऊन दूर होण्याची क्रिया असते. ही दोन अधुक एका काल्पनिक मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस ठराविक अंतरावर जाऊन थांबतात, त्यांना डावे-उजवेपणाचे भान असते व त्यानुसार त्यांची पुढली जडणघडण होते, आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना सिमेट्रीचे भान असते. या तीन गोष्टी निश्चितपणे हे दर्शवितात की कसलीतरी जाणीव इथे कार्यरत आहे.”

पुढे वाचा

सामाजिक सुधारणा आणि आजचा सुधारक

विवेकवादाला (rationalism) ला वाहिलेले “आजचा सुधारक’ हे जगातील प्रमुख मराठी मासिक आहे. या मासिकाचे लक्ष्य मराठी भाषिक, विशेषत: महाराष्ट्रातील जनता हेच आहे हे सुद्धा उघड आहे. ही जनता म्हणजे सामान्य जनता नसून, समाजातील विचार करण्याची आवड व कुवत असलेली मंडळी एवढीच “आ.सु.” ची वाचक आहेत. परंतु ही मोजकी मंडळीच नवे तर्कशुद्ध विचारही प्रसवू शकतात.
“आजचा सुधारक’ च्या पहिल्या संपादकीयामध्ये (आ.सु., १-१ : ३-५) यामासिकाची काही उद्दिष्टे विशद केलेली आहेत. त्यात अंधश्रद्धेचे व बुवाबाजीचे निर्मूलन, सामाजिक जीवनातील धर्माचा ‘धुडगूस’, व्रतेवैकल्ये, यज्ञ, कुंभमेळे यांवर आवर घालणे; दलित, स्त्रिया यांचे शोषण थांबविणे; अनाथ, अनौरस मुलांना आधार देण्याचे महत्व पटवून देणे.

पुढे वाचा

सुधारणा, लैंगिकता व क्लोनिंग

हे विश्व अनादि व अनंत आहे. त्याचा पसारा, त्याचे वस्तुमान, त्याचे तेज, त्याची शक्ती, त्याचे वेग, या सर्वच गोष्टी मानवी कल्पनेबाहेरच्या आहेत. गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण त्या समजू शकत नाही. या उलट अणु-रचनेचे, अणु-परमाणूंचे आकार, वेग, भ्रमणकक्षा, वस्तुमान वगैरेंची कल्पना, गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण करू शकत नाही. पण ही विश्वाची अवाढव्य यंत्रणा काय किंवा अणूची सूक्ष्मतम यंत्रणा काय, त्या एखाद्या घड्याळाप्रमाणे नियमबद्ध आहेत. त्यामधील घटकांना स्वयंप्रज्ञाही नाही व आत्मभानही नाही. त्यांना संवेदनाही नाही व बुद्धिमत्ताही नाही. स्मृतीही नाही, व प्रगतीही नाही.

पुढे वाचा

आस्तिकता आणि विज्ञान : दि. य. देशपांडे ह्यांच्या लेखाला उत्तर

मे १९९७ च्या ‘आजचा सुधारक’च्या कव्हरवर बर्ट्रॅंड रसेल यांचा ‘इतरांच्या मताबद्दल आदर’ हा उतारा, तर पहिल्या पानावर दि. य. देशपांडे यांच्या लेखात माझ्या नावाच्या आसपास असलेले उद्गारवाचक चिन्ह हा विरोधाभास गंमतीशीर वाटला.

वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे हे देशपांडे यांचे मत. ‘देश म्हणजे देशातील माणसे’हे माझे त्याला उत्तर.

दि. य. देशपांडे ह्यांना कोणता ईश्वर अभिप्रेत आहे? आइन्स्टाइन-बोर-एकल्स ह्यांच्या परमेश्वराच्या संकल्पना कोणत्या? ईश्वराची व्याख्या कोणती? दि. य. देशपांडे ह्यांना अभिप्रेत असलेला ईश्वर हा सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वसाधु आहे. ह्या काटेकोर चौकटीत मी नास्तिक आहे.

पुढे वाचा

आडारकरांच्या उत्तराविषयी

डॉ. हेमंत आडारकरांच्या लेखाला मी मे ९७ च्या अंकात दिलेल्या उत्तराला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते याच अंकात छापले आहे. त्याविषयी दोन शब्द लिहिणे अवश्य वाटते.
वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे या माझ्या विधानावर ते म्हणतात की देश म्हणजे देशातील माणसे.
त्यासंबंधी एवढेच म्हणणे पुरे की विज्ञान म्हणजे प्रमाणित ज्ञानाचा संचय, तर वैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिक उद्योग करणारी माणसे. माणसे असल्यामुळे माणसांचे दोष त्यांच्याठिकाणी असू शकतात. (उदा. आपल्या शोधाविषयी खात्री करणे किंवा प्रीति असणे.) परंतु विज्ञान कोणत्याही काळी सिद्ध झालेले आणि सर्वमान्य झालेले ज्ञान.

पुढे वाचा