माननीय संपादक
आजचा सुधारक,
आ. सु. मध्ये बर्याच महिन्यांपूर्वी एका वाचकाने व्रतबंध समारंभाविषयी; त्याला आस्था नसताना, उपस्थित राहावे काय म्हणून पृच्छा केली होती. त्यानंतर अलीकडे दुसन्या वाचकांनी विवाह समारंभाविषयी त्याच स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. या दोन्ही वाचकांना आपण ‘‘आ.सु., १९९८, ८:११’ मध्ये वेगवेगळी उत्तरे दिली आहेत व त्यात विश्वास नसेल तर अशा समारंभांमध्ये सहभागी होऊ नये, परंतु आपले मत सौम्य शब्दांत कळवून, समारंभानंतर यथावकाश संबंधितांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करावी असे उत्तर दिले आहे. या विषयावर मलाही काही सांगावयाचे आहे.
विषय «इतर»
कहाणी – एका ज्ञानपिपासू तपस्विनीची
१९३४ सालची गोष्ट. एका १६ वर्षांच्या उपवर मुलीचे लग्न ठरले अन् त्याप्रमाणे नाशिक क्षेत्री झाले पण. त्यावेळचे ऑल इंडिया रिपोर्टरचे संचालक श्री रा.रा. वामनराव चितळे, हे होते वरपिता. वर चि. दिनकर, वकील अन् ‘युवराज’, तर वधू होती मराठी लेखक श्री. वि.मा.दी. पटवर्धन यांची एकुलती एक भगिनी, व शेंडेफळ चि. सौ. कां. श्यामला. मुलीच्या जन्मानंतर अल्पावधीतच मातृच्छत्र हरपले व लगोलग वडील, प्रा. ग.स. दीक्षित, प्रकृति-अस्वास्थ्यामुळे पुण्याच्या फर्म्युसन महाविद्यालयांतून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे ही चिचुंद्री (आजमितीसही जेमतेम ५ फूट उंचीची बुटकी अन् शिडशिडीतच मूर्ति आहे ही) तीन बंधू व वडील यांचा जीव की प्राण होती.
विकृत संस्कार
श्रीमती कल्पना कोठारे यांनी डिसेंबर ९७ च्या आजचा सुधारक मध्ये एक चांगला लेख लिहून माझ्या लेखातील वैगुण्ये दाखवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.
पण ब्रेन-ड्रेन किंवा काही भारतीयांची पाश्चात्त्य देशांत होणारी कुतरओढ हा माझ्या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा नव्हताच. माझ्या मुंबईत राहणार्याो मराठीभाषक भावाची दोन मुले अनुक्रमे सातवी व नववीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांना प्रादेशिक भाषा म्हणून ‘मराठी हा विषयही शिकावा लागतो. या मुलांना सोमवार, मंगळवार, मराठी आकडे, वगैरे नेहमीच्या वापरातील मराठी शब्दांचे अर्थ समजत नाहीत, मराठी वृत्तपत्र नीट वाचता येत नाही.
श्रीमती कोठाऱ्यांना उत्तर
श्रीमती कल्पना कोठाऱ्यांचा ‘ब्रेन-ड्रेन’ वरील लेख (आ.सु. डिसें. ९७) वाचून सुचलेले काही मुद्दे नोंदत आहे. मुळात या महत्त्वाच्या विषयावर अशी तुकड्या-तुकड्याने चर्चा होण्याने फारसे साध्य होत नाही याची पूर्ण जाणीव ठेवून हे वाचावे.
(१) कोठाऱ्यांची समजूत दिसते की GREv TOEFL (TOFFEL नव्हे) या परीक्षा गुणवत्ता ठरवण्याच्या फार उच्च प्रतीच्या कसोट्या आहेत. कोठाभ्यांनी IIT चा उल्लेख करून उदाहरण अभियांत्रिकीचे दिले आहे. IIT व इतर अभियांत्रिकी संस्थांच्या पदवीधरांना पुढे शिकायचे झाले तर त्यांना भारतातच ‘गेट’ (Graduate Aptitude Test in Engineering) ही परीक्षा देऊन भारतीय संस्थांमध्ये पुढे शिकता येते.
ग्रंथपरिचय
भाषांतर मीमांसा, सं. कल्याण काळे व अंजली सोमण, प्रतिमा प्रकाशन, पुणे, पृ. ४१५, किं. रु. २६०/-.
वेगवेगळ्या भाषांमध्ये नित्यनव्याने विकसित होणार्याव ज्ञानक्षेत्रांची ओळख करून घ्यावयाची, त्यांचा उपयोग करायचा. त्यांमधील वाङ्मयीन समृद्धतेचा आस्वाद घ्यायचातर भाषांतराला पर्याय नाही. कधी व्यावहारिक गरज म्हणून तर कधी केवळ आंतरिक ऊर्मी म्हणून भाषांतरे केली जातात. भाषांतर म्हणजे काय?भाषांतर कसे करायचे?कुणी करायचे?असे वेगवेगळे प्रश्न या संदर्भात अभ्यासकांच्याच नव्हे तर सामान्य वाचकांच्याही मनात उभे राहात असतात. या सगळ्यांचा परामर्श घेणारे एक चांगले पुस्तक नुकतेच वाचनात आले. डॉ. कल्याण काळे व डॉ.
श्रद्धा कीं आत्मवंचना?
आम्हांला हल्ली सर्व गोष्टी कळत नाहीत हे खरें, आणि असेही पाहिजे तर म्हणू की काही गोष्टी कदाचित कधीही न कळण्यासारख्या असतील. पण त्यासंबंधीं अमुक प्रकारची श्रद्धा ठेवा असे तुम्ही कोण मला सांगणार?ज्या गोष्टी अज्ञात आहेत, त्यासंबंधी मला वाटेल ती कल्पना करण्याची मुभा आहे, तेथे श्रद्दा ठेवणे हा मूर्खपणा आहे. आत्मज्ञान वगैरे गप्पा मी ऐकणार नाही. तुम्ही ज्याला आत्मज्ञान म्हणतां ती आत्मवंचना कशावरून नाहीं?कितीही मोठा विद्वान् असला तरी त्याचे बाबतींत आत्मवंचना शक्य असते, आणि हे ज्याचे त्याला कधीही कळत नाहीं, हे सांगितलेल्या विद्वानांच्या उदाहरणावरून दिसते.
श्रद्धा प्रमाण आहे काय?
ज्ञान म्हणजे वस्तुस्थितीविषयी यथार्थ माहिती, ‘ज्ञान’ या शब्दाचा हा एकमेव अर्थ नाही. कारण संज्ञा किंवा जाणीव या अर्थानेही या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थी कोणतीही जाणीव ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, यथार्थ आणि अयथार्थ, किंवा सत्य आणि मिथ्या ज्ञान असेही म्हणतात. पण या लेखात ‘ज्ञान’ हा शब्द सत्यज्ञान या अर्थानेच वापरला आहे.
ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यांना प्रमाणे म्हणतात. उदा. ज्ञानेंद्रिये ही एक प्रकारची प्रमाणेच आहेत, कारण त्यांनी आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या संवेद्य गुणांचे ज्ञान होते.
रोमन लोकशाही
रोमन नागरिकांची स्वतःच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची (identity) जाणीव दोन कल्पकथांमध्ये (myth) रुजलेली होती.
एनियस हा रोमचा मूळ पराभूत संस्थापक ट्रॉयच्या युद्धानंतर (१२०० ख्रिस्तपूर्व) वडिलांना खांद्यावर घेऊन, मुलाला हाताशी धरून निर्वासितांसह देशोधडीस लागला. त्याच्या वडिलांच्या हातात त्यांच्या देवाच्या मूर्ती होत्या. एनियस ट्रॉयमध्ये युद्धात हरणेआवश्यकच होते. कारण त्याच्या नियतीत (destiny) रोमची स्थापना करणे होते. (प्रत्यक्षात एनियसच्या नंतर अनेक पिढ्या उलटल्यावर रोमची स्थापना झाली ही गोष्ट वेगळी.)
हा एनियस वाटेत निर्वासितांसह थांबला. तिथे तो डो डो ह्या विधवेच्या प्रेमात पडला. डोडोवरच्या प्रेमामुळे त्याला पुढे निघून जाण्याची इच्छा नसते.
परिशिष्ट
ललिता गंडभीर, स.न.
‘आजचा सुधारक’मधील ‘समाज आणि लोकशाही’ हा लेख प्रभावी वाटला. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांचा लोकशाही पद्धतीवरचा (आणि एकूणच जीवनावरचा) विश्वास उडत चालल्याचा भास होतो. हे विधान परंपरेने विचारी असलेल्या मध्यमवर्गास लागू होते. त्यांतले बरेचसे अमेरिकेकडे डोळे लावून असतात. त्यांच्या हा वाचनात यायला हवा असे वाटले. म्हणून तो ‘रुची’च्या पुढील अंकात (दिवाळी विशेषांक – प्रसिद्धी ३० ऑक्टोबर) समाविष्ट करावा अशी इच्छा आहे. अनुमतीसाठी हे पत्र आपणास लिहिले आहे.
सुधारक’मधील आपले लेखन वाचत असतो.‘रुची’मध्ये काही लेख पुनर्मुद्रित करीत असतो. पूर्वी यासाठी ग्रंथमाला’ नावाचे नियतकालिक असे.
विवाहाचा रोग
विवाह हा समाजाला जडलेला एक रोग आहे, आणि त्याच्या परिणामी उत्पन्न होणारी विवाहसंस्था ही जुलमी राज्यकारभाराला पोषक होते हे माहीत असूनही राजकीय जुलमाविरुद्ध झगडणारे लोक तिकडे लक्ष देत नाहीत. राजकीय जुलमाच्या ज्या ज्या पद्धती आहेत, त्या सर्व बीजरूपाने कुटुंबसंस्थेत आढळतात.
अनियंत्रित सत्ता, सत्ताधान्याची प्रचंड शक्ती, शिक्षणाच्या व न्यायाच्या सबबीवर केलेले कायदे आणि शिक्षा, मृत्युदंडाचा अधिकार, इतकेच काय पण कर घेण्याची योजना, या सर्वांचे मूळ कुटुंबसंस्थेत सापडते, आणि झोटिंगशाहीत राहण्याचे शिक्षण प्रथम कुटुंबात मिळते, आणि सर्व प्रकारचा जुलूम विवाहसंस्थेत पाहायला मिळतो. तनुविक्रय, मर्जीविरुद्ध समागम, या गोष्टींमुळे वेश्यावृत्ति मात्र वाईट समजतात, आणि याच गोष्टी विवाहात असूनही त्या मात्र कायदेशीर, इतकेच नव्हे तर पवित्र समजायच्या!