राजा पुन्हा वेताळाला खांद्यावर घेऊन वाट चालू लागला. वेताळ म्हणाला, “राजा, विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणक्रम निवडताना स्वत;चा कल, स्वतःची क्षमता, यांच्याकडे लक्ष न देता ‘चलती कशाची आहे, हेच फक्त पाहिले तर त्यातून उद्भवणाच्या प्रश्नांचे एक टोकाचे उदाहरण मी तुला दाखवले. धन्य तुझी, की तू त्या कथेला दलित-ललित न समजता किंवा आयायट्यांवर केलेली टीका न मानता छान ‘सिनिकल दुर्लक्ष केलेस! पण आज मी तुला एक वेगळी कहाणी ऐकवणार आहे. मी तुला एकच प्रश्न विचारणार आहे. पण तो अनेक उत्तरांमधून एक निवडण्याचा, म्हणजे ‘मल्टिपल चॉईस प्रश्न आहे, ऐक.”
विषय «इतर»
गुणवत्ता व आर्थिक मदत/दंड
शिक्षणासाठी आर्थिक मदत करताना शासनाने (किंवा शासनाच्या आदेशाने इतरसंस्थांनी) विद्याथ्र्यांची आर्थिक स्थिती हा निकष मानावा की त्याची गुणवत्ता हा निकष मानावा याची चर्चा या लेखात केली आहे.
सध्या वैद्यकीय किवा अन्य व्यावसायिक शिक्षणासाठी दोन प्रकारच्या शिक्षणसंस्थांत प्रवेश दिला जातो. पैकी अनुदानित शिक्षणसंस्थांना शासनाकडून अनुदान मिळाल्याने तेथील विद्याथ्र्यांना (यापुढील आकडे उदाहरणादाखल वैद्यकीय शिक्षणाचे आहेत) प्रतिवर्षी ४ ते ६ हजार रुपये फीमध्ये शिक्षण मिळते. शासनाकडून मिळणारे अनुदान प्रतिवर्षी अंदाजे रु. ५४,०००/- प्रत्येक विद्याथ्र्यामागे असते. गुणवत्ता व राखीव जागा यानुसार या सर्व जागा भरल्या जातात.
‘स्त्रीमुक्ती चे सुस्पष्ट चित्र हवे!
‘चतुरंग पुरवणीतील मीना देवल यांचा ‘स्त्रीमुक्ती : मिथक आणि वास्तव हा लेख वाचनात आला. ‘स्त्रीमुक्तीसंबंधी कार्य करणार्या’ अनेक संघटना सध्या सक्रिय आहेत. या संकल्पनेवरील लेख, भाषणे, परिसंवाद आदींतून उलटसुलट विचार मांडले जात आहेत. देवल यांच्या लेखात कार्यकर्त्यांना स्त्रीमुक्तीची चळवळ समाजापर्यंत पोहोचवता आली नाही, तसेच स्त्रीवादी भूमिका समाज तसेच स्त्रिया स्वीकारावयास तयार नाहीत, ही खंत दिसून येते. लिंगभेदविरहित समाजव्यवस्था अस्तित्वात आली तरच हे दुष्टचक्र संपेल, असे आशावादी चित्र त्यांनी रेखाटले आहे.
तेव्हा त्याच दृष्टीने हे विचार मांडत आहे. स्त्रीला एक उपभोगाची वस्तू समजले जाऊ नये किंवा तसा तिचा वापर होऊ नये, कोणत्याही क्षेत्रात तिच्या गुणवत्तेवर तिला प्रवेश असावा, स्त्री म्हणून मज्जाव, आडकाठी असू नये, तिला अमानवी वागणूक मिळू नये, समान हक्क, मतस्वातंत्र्य असावे याबद्दल दुमत असायचे काहीच कारण नाही.
इतर
आम्ही आग्न्याचा किल्ला बघायला गेलो, वाटाड्याने आम्हाला सुंदर बागबगीचे, महाल, कलाकुसर दाखविली. पण ह्या बाह्य देखाव्याने माझे समाधान झाले नाही. मला तिथली तळघरे पाहायची होती. पण तिथला रक्षक ते दाखवेना. तेव्हा मी त्याला पैसे देऊन तळघरांत प्रवेश मिळविला. राजाच्या मर्जीतून उतरलेल्या स्त्रियांना तेथे कोंडून ठेवून त्यांचा छळ केला जात असे. आम्ही त्या अंधाच्या कोठड्या पाहिल्या. माझ्या मनात आले, ह्या तुरुंगाच्या भिंती बोलू लागल्या तर किती क्रौर्याच्या करुण कहाण्या कानावर येतील! लोक इथल्या कलाकुसरीच्या, सौंदर्याच्या आठवणी घेऊन जातात. मला त्यापेक्षा तिथल्याअंधारकोठड्याच आठवत राहिल्या!
खरं, पुनर्जन्म आहे?
आपण नसावं असं कोणालाच वाटत नाही. पण वाटून काय उपयोग? जन्माला आला तो जाणार हे ध्रुवसत्य आहे. तसे मृताला पुन्हा जन्म आहे का? तेही ध्रुवसत्य आहे काय? । सश्रद्ध भावनावादी म्हणतो, ‘हो, आहे. कारण पुनर्जन्म पूर्वजन्म मानला नाही तर कशाची संगती लागत नाही. जीवनाला आधार मिळत नाही. ‘मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले, तयासारिखें भोगणें प्राप्त झालें.’ या विचाराने दुःख सहन करायला धीर मिळतो. ‘सदाचार तो थोर सांडूं नये तो का बरे,तर त्यामुळे मनाचे समाधान करता येते, या जन्मी फळ न का मिळेना’.
खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ७)
उद्याचे जग आजच्यापेक्षा जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे अधिक सुखी असावे असे विधान मी केले तर माझ्याशी कोणी विवाद करणार नाही. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांवर आज अधिक बन्धने आहेत. आणि त्यांची स्वायत्तता आज कमी आहे हे माझे विधानही बहुधा विरोधाशिवाय स्वीकारले जाईल. इतकेच नाही तर पूर्वीच्या मानाने ती बंधने आता कमी होत चालली असून स्त्रीची शारीरिक आणि आर्थिक शक्ती वाढावी ह्यासाठी समाजामध्ये ज्यूडोकराटेचे वर्ग कसे सुरू केले गेले आहेत आणि तिला नोकर्यांवमध्ये कसे सामावून घेतले जात आहे, अनुकंपेच्या आधारावर विधवांना आज नोकर्याक कश्या मिळत आहेत ते मला सविस्तरपणे समजावून दिले जाईल.
चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?
सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे.
मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर यांना क्रान्तदर्शनाची दिव्य अंतर्दृष्टी (clairvoyance) त्यांच्या पौर्वात्य गुरूंकडून प्राप्त झाली होती. ह्या दिव्य अंतर्दृष्टीमुळे सूक्ष्मात सूक्ष्म अणूदेखील मोठ्या आकारात ते आपल्या अंतर्मनात पाहू शकत असत. पातंजल योगसूत्रांत ‘अणिमा’ नामक ह्या सिद्धीची प्रक्रिया सांगितली आहे.
अन्तर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही
टॉप क्वार्कचा शोध लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या ९ एप्रिल ९५च्या अंकात आणि त्याच्या आधारे प्रा. काशीकरांचा लेख आजच्या सुधारकच्या प्रस्तुत अंकात प्रसिद्ध झाला आहे. अॅनी बेझंट आणि लेडबीटर यांनी भौतिक आणि रसायनशास्त्रातील विशेषेकरून अणुसंरचनेविषयी काही संकल्पना अंतर्दृष्टीने प्राप्त करून पूर्वीच प्रतिपादन केल्या होत्या. यावरून अंतर्दृष्टीने ज्ञान मिळू शकते असे मत ध्वनित करण्यात येत आहे. परंतु हा समज नवा नाही. विश्लेषण, संश्लेषण, विवेक, तर्क आणि प्रत्यक्ष पुरावा याभक्कम पायावर आधारलेल्या विज्ञानाने दिलेली आव्हाने पारंपारिक धर्मकल्पनांना पेलताआली नाहीत. याची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान धोकादायी आहे अशी कल्पना गेल्या शतकात : रूढ झाली.
इस्लाम आणि लैंगिकता
आजच्या सुधारकच्या मे १९९५ च्या अंकात, डॉ. र. वि. पंडित यांचा, “अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” हा लेख आहे. त्या लेखात वेगवेगळ्या जमाती आणि संस्कृतीतील लोकांच्या लैंगिक आचरणासंबंधी डॉ. पंडित यांनी विवेचन केले आहे; मुसलमान आणि इस्लामसंबंधाने त्यांनी काही विधाने केलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “इस्लाम लैंगिक आचरणासंबंधी बराच कठोर असला तरी, त्यातील बहुपत्नीकत्वाची, तसेच तात्पुरत्या पत्नीची प्रथा, पुरुषांच्या लैंगिक आचरणाला भरपूर सूट देते”. येथे डॉ. पंडितांनी धर्मशास्त्रांनी घालून दिलेले नियम आणि संबंधित धर्माचे अनुयायी पाळत असलेल्या प्रथा, या दोन गोष्टींची गल्लत करून, इस्लामी धर्मशास्त्राच्या नियमामुळे मुसलमानांतील लैगिक आचरण मोकळे असल्याचे सूचित केले आहे.
अमेरिकेमधील वास्तव परिस्थिती
डॉ. र. वि. पंडित यांच्या “अमेरिकन लोकांची लैंगिकता’ या लेखात आफ्रिकन अमेरिकन लोकांचा “काही पिढ्यांपूर्वी झाडीत राहणार्याप व वनचरांना शोभेशी नैतिक मूल्ये असणार्या ” असा उल्लेख आहे. त्यांच्या मूल्यांची तुलना डॉ. पंडित कोणाशी करीत आहेत?
डॉ. पंडितांच्या मते ह्या माणसांना पळवून अमेरिकेत आणून गुलाम म्हणून । विकणाच्या समाजाची मूल्ये कुठल्या दर्जाची होती?साधारण त्याच काळी पेशवाईत पुण्यातही “स्लेव्ह मार्केट” चालविणार्याु आपल्या पूर्वजांचा नैतिक दर्जा काय होता?
डॉ. पंडित यांनी श्री प्रल्हाद केशव अत्रे यांचे “आम्ही चावट होतो’ हे पुस्तक वाचले तर आपल्या भारतीय पायांखाली तेव्हा काय जळत होते हे त्यांना समजेल.