विषय «इतर»

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ७)

निगामी व्यवस्था (Deductive Systems)

इ.स. पूर्वी चौथ्या शतकात यूक्लिड या ग्रीक गणितज्ञाने भूमितीची मांडणी निगामी व्यवस्थेच्या रूपात केल्यापासून शास्त्रीय ज्ञानाच्या जगतात निगामी व्यवस्था हा ज्ञानाचा आदर्श मानला गेला आहे आणि तेव्हापासून तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक दोघांचीही आपल्या विषयाची मांडणी निगामी व्यवस्थेत करण्याची धडपड सुरू आहे. Deduction किंवा निगमन म्हणजे काय हे आपण स्थूलरूपाने पाहिले आहे. निगामी अनुमान म्हणजे असे अनुमान की ज्याची साधके (म्हणजे साधक विधाने किंवा premises) सत्य असल्यास त्याचा निष्कर्प असत्य असू शकत नाही. निगमन हा सत्यतासंरक्षक अनुमानप्रकार आहे; म्हणजे त्यात साधकांची सत्यता निष्कर्षापर्यंत सुरक्षितपणे पोचविली जाते.

पुढे वाचा

धर्म व राजकारण: फारकतीचे उद्दिष्ट स्पष्ट हवे

धर्म आणि राजकारण यांची फारकत झाली पाहिजे, असे आपण गेली ४०-४५ वर्षे बोलत आलो आहोत. तरीही अशी फारकत आपण करू शकलेलो नाही. लोकसभेत नुकत्याच मांडण्यात आलेल्या विधेयकाने एका अर्थी आपण हीच वस्तुस्थिती मान्य केली आहे. या विधेयकाच्या निमित्ताने या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली असली, तरी धार्मिक वृत्ती-प्रवृत्तींशी तडजोडी आणि मतांचे राजकारण करण्याची धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची व त्यांच्या नेत्यांची जुनी परंपरा अजूनही अस्तित्वात आहे. त्याबरोबरच धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेचे समर्थन करण्याची तथाकथित पुरोगामी विचारवंतांची प्रवृत्तीही अजून शाबूत असल्यामुळे, धर्म आणि राजकारण यांच्या फारकतीचा घोळ संपेल, असे वाटत नाही.

पुढे वाचा

अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा

अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा
भारतातील मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात हिंदु जातीयवादाचा विचार करावयाला हवा. पण माझे मत असे आहे की हिंदु जातीयवाद हा मूलतः मुस्लिम जातीयवादाला प्रत्युत्तर देण्याच्या स्वरूपात आपल्या देशात निर्माण झाला आहे. हिंदु जातीयवाद असण्याची कारणे नष्ट करा – थोडक्यात मुस्लिम जातीयवाद नष्ट करा – आपल्याला या देशात मूठभरदेखील प्रभावी हिंदु जातीयवादी आढळणार नाहीत.

‘सय्यदनांचा हस्तक्षेप कोठपर्यंत?

अस्मा ताहेर बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेली औरंगाबादची गुणवान, बुद्धिमान विद्यार्थिनी. तिचा कल वैद्यकीय शाखेकडे; परंतु ‘सय्यदनां’नी – बोहरा धर्मगुरूंनी परवानगी दिल्याशिवाय ती वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. का ?
जुलेखाची कहाणी हृदयद्रावक. जन्मतःच हृदयाला छिद्र असलेली जुलेखा वेळीच उपचार न झाल्याने ‘अल्लाला प्यारी झाली. शस्त्रक्रिया करायची की नाही, याविषयीचे आदेश ‘सय्यदनांकडून मिळविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी मधली तब्बल पस्तीस वर्षे वाया घालविली होती ! असे का घडावे ?
माझ्या पत्नीने-झेनबने १९५१ मध्ये पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. ची पदवी संपादन केली, दिल्ली विद्यापीठात पीएच.डी.

पुढे वाचा

पडद्यातला देश

गावी शेजारच्या देवकरण भटजींना ज्योतिष चांगले समजत असे. एकदा माझा हात पाहून ते म्हणाले, ‘याला विद्या नाही. हे भविष्य ऐकून माझी माय कष्टी झाली. पण ते भविष्य तिच्या अंदाजाबाहेर मी खोटे ठरविले. दुसरे, शेंदुर्णीकरांचे भविष्य : ‘तुम्हाला वाहनयोग (चारचाकी) आहे.’ तेही मी आतापर्यंत तरी खोटे ठरवले आहे. परदेशप्रवास घडेल असे मात्र माझ्या हातावर कोणालाच दिसले नव्हते. तो घडला. आणि मुळातील भविष्यावर माझा अविश्वास अधिक पक्का झाला.
मात्र परदेशप्रवासातही एक प्रकारची वर्णव्यवस्था आहे. युरप-अमेरिका अव्वल दर्जाचे, दुबई-आफ्रिका त्या मानाने दुय्यम, सिंगापूर-हाँगकाँग यांना शूद्र म्हटले तर नेपाळ अतिशूद्रात गणले जाईल.

पुढे वाचा

स्त्रियांचे शिक्षण कसे असावें?

सदाचरणी होण्यास व सदाचरणी राहण्यास त्यांस सदाचरणाची किंमत कळली पाहिजे, ती किंमत कळण्यास त्यांची सापेक्ष बुद्धि जागृत झाली पाहिजे, व तसे होण्यास त्यांस सुशिक्षण दिले पाहिजे. लहान मुलांस खोटे बोलणे वगैरे पापांपासून दूर ठेवण्यास छडीचाच केवळ उपयोग नको आहे. पाप केल्यास शरीरदंड होतो येवढेच ज्ञान ज्यास मिळाले आहे तो सदैव पापपराङ्मुख राहील, असे मुळीच नाही. शिक्षा होण्याचा संभव गेला की, तो पाप करण्यास सोडणार नाही. सदाचरण व असत्प्रतिकार यांविषयीं तात्त्विक ज्ञान मनुष्यमात्रास झाल्यावाचून दोहोंचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम पूर्णपणे कळून येणे शक्य नाही, व जोपर्यंत हे परिणाम कल्लले नाहीत तोपर्यंत मनुष्यास सदा-चरणाची खरी योग्यता, व असत्पथावलंबनाची स्वपरवंचक प्रवृत्ति ही कधीहि कळणार नाहीत.

पुढे वाचा

परिसंवाद निसर्ग आणि मानव – १

श्रीमती मेधा पाटकर गेल्या आठवड्यामध्ये पुण्यास आल्या असता स्नेहसदनात भरलेल्या सभेत त्यांनी जी भूमिका मांडली तिचे माझ्या मते दोन स्थूल विभाग पाडता येतील. पहिला भाग म्हणजे त्यांनी नर्मदा घाटीतील धरणात बुडणार असणाऱ्या ग्रामीण जनतेला जागे करून एक जबरदस्त संघटन उभे केलेले आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नर्मदा प्रकल्पाच्या अनावश्यकतेचा, त्याच्या सिद्धीसाठी चाललेल्या अमानुष सरकारी दडपशाहीचा आणि त्या प्रकल्पामुळे अपरिहार्यपणे होणाऱ्या निसर्गविध्वंसाचा प्रश्न.
नर्मदा प्रकल्पाची योजना आखताना शासनाने (गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ही राज्य शासने व केंद्रशासन या सर्वांनी) जी हरत-हेची माहिती जमा करावयास हवी होती तशी ती मिळवण्याचे कष्ट न घेता सगळी आखणी मनमानीपणाने केलेली आहे, हा मेधा आणि तिचे सहकारी यांनी घेतलेला मूलभूत आक्षेप.

पुढे वाचा

परिसंवाद निसर्ग आणि मानव – २

साधनाच्या (१८ जुलै) अंकातील ‘निसर्ग आणि मानव या आपल्या लेखात श्री. नानासाहेब गोरे यांनी म्हटले आहे, आदिम क्षणापासून या चालू घटकेपर्यंत निसर्ग होता तसाच राहिला आहे : लहरी, निर्हेतुक.’ त्यांनी मानवाचे आणि निसर्गाचे स्वर पूर्वीच्या काळी कधी तरी खरोखर जुळले होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. लेखाच्या अखेरीस ‘स्वस्थितिमग्न निसर्ग व विज्ञानधर पुरुषार्थी मानव यांच्या संयोगाची गोष्ट केली आहे.
निसर्ग कसा आहे याचे वर्णन करते वेळी विश्व, पृथ्वी व पृथ्वीवरील सजीव सृष्टी या व्यवस्था आहेत आणि त्यांना एक इतिहास आहे, या दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

पुढे वाचा

परिसंवाद निसर्ग आणि मानव: एक अनिवार्य समग्रता – ४ प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लेखाच्या निमित्ताने

प्रा. दि. य. देशपांडे यांचा साधनेतील (१४ नोव्हें. १९९२) टिपणवजा लेख वाचून मनात आलेले काही विचार म्हणा, काही शंका आणि प्रश्न म्हणा मी येथे व्यक्त करू इच्छितो. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या लेखाला एक दुहेरी पाश्वभूमी आहे. एक म्हणजे मा. नानासाहेब गोरे यांचा साधनेतील (१८ जुलै ९२) लेख आणि दुसरी म्हणजे त्या लेखावरील मा. श्री. वसंत पळशीकर (साधना २९ ऑगस्ट ९२) यांची प्रतिक्रिया. माझ्या प्रस्तुत । लेखनालाही ही पाश्वभूमी अंशतः असणे स्वाभाविकच आहे. तथापि, श्री. गोरे काय किंवा श्री. पळशीकर काय, यांच्या विचारांचे खंडन अगर मंडन करावे या हेतूने मी हे लिहिलेले नाही.

पुढे वाचा