स्त्रियांवर अन्याय करणारी, मुख्यतः त्यांनाच दुःखात लोटणारी विवाहसंस्था व तिच्यासोबत उदय पावलेले अनेक समज- उदा. पातिव्रत्य, प्रत्यक्ष परमेश्वरानेच घालून दिलेल्या पतिपत्नींच्या गाठी, जन्मोजन्मी एकच पती असावा असा फक्त स्त्रियांवर केला जाणारा संस्कार, (जन्मोजन्मी एकच पत्नी असावी असा पुरुषाने विचार करून त्यासाठी काम्य व्रतांचे पालन केल्याचे कोठे ऐकिवात नाही. उलट त्याने आपल्या धर्मपत्नीला टाकून देऊन तिची परोपरीने कुचंबणा केल्याची उदाहरणे अनंत आहेत!) त्याच अनुषंगाने विवाहविधीचेआणि स्त्रीयोनीचे पावित्र्य – हे सारे मानवनिर्मित आहेत; त्यांविषयीच्या कल्पना भिन्नभिन्न काळांत व प्रदेशांत बदललेल्या आहेत; त्यांमध्ये सनातन किंवा शाश्वत असे काही नाही हे एकदा मनामध्ये स्पष्ट झाले की स्त्रियांचे दुःख कमी करण्यासाठी सध्याच्या एतद्विषयक परिस्थितीमध्ये परिवर्तनीय काय आहे हे ठरविण्याची आपल्यावर जबाबदारी येते.
विषय «इतर»
बंडखोर पंडिता (भाग २)
एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असे रमाबाईंचे जीवनचरित्र आहे. कलकत्याहून रमाबाई पुण्याला आल्या खर्या , पण मध्यन्तरी अशा काही घटना घडल्या की कदाचित् त्या कधीच पुण्याला आल्या नसत्या. कारण त्यांनी लग्न करून आसामात सिल्चर येथे संसार थाटला होता. हे लग्नही जगावेगळे होते. त्यांचा भाऊ श्रीनिवास याचे एक बंगाली मित्र बिपिनबिहारी दास मेधावी यांनी त्यांना मागणी घातली होती. भावाच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्या एकाकी झाल्या होत्या. त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. बिपिनबाबू ब्राह्मोसमाजी होते. पण बंगाल-आसामकडच्या रिवाजाप्रमाणे ते शूद्रच गणले जात. तिकडे ब्राह्मणआणि शूद्र असे दोनच वर्ण मानत.
समतेचे मिथ्य
सुधारणेची चर्चा करायची तर मूल्ये कोणती मानायची हा प्रश्न मूलभूत महत्त्वाचा ठरतो. कारण आहे त्यापेक्षा अधिक चांगले करणे यालाच सुधारणा म्हणतात व चांगलेआणि वाईट हा मूल्यांचा विचार आहे.
सुधारणेच्या बाबतीत समता हे मूल्य असल्याचा वारंवार उद्घोष करण्यात येत असतो. असा उद्घोष करणार्यांमध्ये अर्थमीमांसा करून युक्तिवाद करण्याचा दावा करणारे लोकही अन्तर्भूत आहेत.
पण समता या शब्दाच्या अर्थाचे विश्लेषण केले तर समता हे मूल्य मानता येईल काय? समतेचा अर्थ असा होतो की सर्वांना सारखीच वागणूक दिली पाहिजे. म्हणजे चोर असो वा साव असो, दोघांनाही तुरुंगात पाठवले पाहिजे वा दोघांनाही सोडून दिले पाहिजे, सारी गणिते बरोबर असणार्या व सारी चूक असलेल्या उत्तरपत्रिकेला सारखेच अंक दिले पाहिजेत, दोघांनाही शून्य द्या वा दोघांनाही शेकडा शंभर द्या.
समतेचे मिथ्य?
आमचे मित्र डॉ. नी. र. वर्हा डपांडे यांचा ‘समतेचे मिथ्य या शीर्षकाचा एक लेख याच अंकात इतरत्र छापला आहे. त्यात त्यांनी आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्त्रीमुक्तिवादी लिखाणावर जोरदार हल्ला चढविला आहे. आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेले या विषयावरील लिखाण अत्यंत अज्ञतेचे असून ते करणार्याआ लोकांचा या विषयाच्या मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय व ऐतिहासिक संशोधनाचा काडीचाही अभ्यास नसतो, एवढेच नव्हे तर ते त्या लेखकांचे ‘जैविकीचे व मानसशास्त्राचे प्राथमिक अज्ञान दर्शविते असे ते म्हणतात. लेखाच्या शेवटी ते लिहितात की आजच्या सुधारकाने अभ्यासशून्य, बेजबाबदार व पुरोगामी हा छाप आपल्यावर लागावा या एकमात्र उद्देशाने लिहिलेले लिखाण प्रसिद्ध केल्याने तो आपल्या समाजप्रबोधनाच्या कर्तव्यात कसूर करीतआहे असे म्हणण्यास जागा होते.
चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?
फेब्रुवारी १९९५ अंकामध्ये माझ्या लेखमालेचा पाचवा भाग प्रकाशित झाल्यानंतर मला जी पत्रे आली ती पुढे दिली आहेत. बहुतेक सार्या पत्रलेखकांनी सध्याच्या स्त्रीपुरुषसंबंधविषयक संकल्पनांमुळे मुख्यतः स्त्रियांवर गुलामगिरीसदृश अन्याय होतो ह्या माझ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे, त्याबद्दल मौन बाळगले आहे. त्यांनी सद्यःपरिस्थितीमध्ये माझ्या कल्पना कश्या व्यवहार्य नाहीत, रोगापेक्षा उपचार कसा भयंकर आहे, मी कसा स्वप्नात वावरत आहे किंवा माझ्या सूचनांमुळे कसा स्वैराचार माजणार आहे ह्याचाच सविस्तर ऊहापोह केला आहे. मी (दिवाकर पुरुषोत्तम मोहनी) कोणी एक राजा आहे. वा स्मृतिकार आहे व मी फर्मान काढल्याबरोबर स्त्रियांना लैंगिक स्वायत्तता प्राप्त होऊन स्त्रीमुक्ती प्रत्यक्षात येणार आहे अशी कल्पना करून घेऊन माझ्यावर बहुतेकांनी टीका केली आहे.
तुमचे सर्व लिखाण भाबडेपणाचे, तर्कदुष्ट
श्री दिवाकर मोहनी यांस
सप्रेम नमस्कार
गेले सहा महिने आजचा सुधारकच्या वेगवेगळ्या अंकांतून आपले स्त्रीमुक्तिविषयक विचार मोठ्या हिरीरीने तुम्ही मांडत आहात. त्यामुळे समाजकल्याण होणारच असा तुमचा विश्वास तुमच्या लिखाणात दिसतो. स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य हा स्त्रीमुक्तीचा ‘अनिवार्य पैलू तुमच्या मते आहे. स्त्रियांची मागणी असो किंवा नसो, हे दिले नाही तर समाज कर्तव्याला चुकला असे तुम्ही सतत लिहीत असता. यासंबंधी तुमच्याशी सहज बोलणे झाले असता त्यावर तुम्हाला याहून भिन्न दृष्टिकोण समजून घ्यायचा आहे असे तुम्ही सुचविल्यामुळे पुढील विचार तदनुसार कळवीत आहे.
तुमचे हे सर्व लिखाण भाबडेपणाचे, भावनावशतेने लिहिलेले, तर्कविरुद्ध व अयुक्त असल्याचे कां वाटते ते पुढे नमूद करीत आहेत.
स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य
श्री. दिवाकर मोहनी यांच्यावर टीकेचा भडिमार न होण्याचे कारण त्यांचे स्त्रीमुक्तीवरील सर्वच विचार पटण्याजोगे आहेत हे नाही एवढेच त्यांना कळावे हा पत्र लिहिण्याचा उद्देश.
स्त्रीमुक्तीचा एक भाग म्हणून स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य द्यावे हा श्री मोहनी यांचा विचार आंधळ्याला बघण्याचे किंवा बहिर्याला ऐकण्याचे स्वातंत्र्य देण्यासारखा आहे. याचे कारण कळण्यासाठी आजचा सुधारक मार्च ९२ च्या पान क्र. २९ वरील श्री. विठ्ठल प्रभु यांच्या पत्रातील तिसरा परिच्छेद वाचावा.
स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य द्यावे म्हटल्यावर पुरुषासही लैंगिक स्वातंत्र्य देणे हे क्रमप्राप्तच आहे. सध्या पुरुषासही लैंगिक स्वातंत्र्य आहे असे म्हणता येणार नाही.
ईश्वर, धर्म आणि अंधश्रद्धा
आगरकरांच्या अज्ञेयवादी भूमिकेतून ईश्वरावरील श्रद्धा अप्रमाणितच असते – असिद्धचअसते. आगरकर हे समाजसुधारक असल्याने समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर त्यांनी सातत्याने प्रहार केले. सती, बालविवाह, बळी देण्याची प्रथा, शिमगा यांपासून तो स्त्रियांचे पोषाख, मृतासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे समाजासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे प्रचलित असणार्याे रूढी, पंरपरा, चालीरीती, सणवार हे धर्मसंकल्पनेशी निगडित असल्याने व धर्म सर्वसामान्यपणे ईश्वरनिष्ठ, ईश्वरवादी असल्याने तात्त्विकदृष्ट्या किंवा ‘इंद्राय तक्षकाय स्वाहा’ या नात्याने अ-धार्मिक निरीश्वरवादाची भलावण समाजसुधारकांकडून केली जाते. परिणामतः समाजसुधारणा ही ईश्वर आणि धर्म या विरोधी असलेले तत्त्वयुद्ध आहे असे समाजसुधारक आणि धार्मिक मानतात.
देव कसा आहे?
‘एथिओपियन लोक म्हणतात की आमचे देव बसक्या नाकाचे आणि काळ्या रंगाचे आहेत, तर श्रेसचे लोक म्हणतात की आमच्या देवांचे डोळे निळे आहेत आणि त्यांचे केस लाल आहेत. आणि जर गुरे, घोडे किंवा सिंह यांना मनुष्यासारखे हात असते, त्यांना चित्रे काढता आली असती, आणि मूर्ती कोरता आल्या असत्या, तर घोड्यांनी आपले देव घोड्यांसारखे आणि गुरांनी गुरांसारखे चितारले असते, आणि प्रत्येक पशूने आपल्या देवाच्या शरीरांना आपापल्या शरीराचा आकार दिला असता.’
(इ. पू. ५००)
बंडखोर पंडिता (भाग १)
पंडिता रमाबाईंच्या कार्याची ओळख आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याचा विचार तसा लांबणीवरच पडत गेला. मध्यंतरीच्या एका घटनेने ते काम आणखी रेंगाळले.आजचा सुधारकच्या सल्लागार मंडळावरील एका विदुषीने धर्मांतर केले. ही गोष्ट सुधारकाला खटकली. समाजसुधारणेसाठी धर्माचे माध्यम आवश्यक समजणे ही गोष्ट त्याच्या धोरणात बसत नाही तर मग धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या रमाबाई सुधारक कशा? आणि आंबेडकर, गांधी यांना तरी तुम्ही सुधारक समजता की नाही? त्यांची धर्मनिष्ठा तर जगजाहीर आहे. अशी बरीच भवति न भवति (मनाशी) केली. शेवटी निष्कर्ष निघाला तो असा:
आजचा सुधारकला स्वतःचे धोरण ठरविण्याचा अधिकार आहे.