माणसाच्या आरोग्याची पाळेमुळे तो राहतो, त्या भोवतालात दडलेली असतात. त्याचे कुटुंबातील व समाजातील स्थान, त्याचा आर्थिक स्तर, आसपासचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण, तसेच त्याच्या मनातील श्रद्धा/विश्वास हे त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत असतात. म्हणूनच पश्चिमी वैद्यकशास्त्राचा आद्य जनक हिपोक्रेटस म्हणाला होता. “माणसाला कोणता आजार झाला आहे हे जाणण्यापेक्षा कोणत्या आणि कशा प्रकारच्या माणसाला आजार झाला आहे, हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.”
वरील विधान निर्धन, ग्रामीण स्त्रियांना अधिक प्रकर्षाने लागू होते, कारण अशा स्त्रियांभोवती रूढी, परंपरा, सामाजिक संकेत, सांस्कृतिक निर्बंध यांचा विळखा अधिक घट्ट असतो.
विषय «इतर»
प्रकाशित झाले मेंदूच्या अंतरंगात,
[ एक साक्षात्कारी अनुभवकथन या नावाने चित्रा बेडेकरांचा लेख आसुच्या —– अंकात छापला गेला होता. बेडेकरांनी आता ती पूर्ण कहाणी तपशिलात पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. त्याचा हा त्रोटक परिचय. – सं. ]
माणसाची कुशाग्र बुद्धिमत्ता, अनाकलनीय मन, गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व, त्याचं अवघं अस्तित्व हे सर्व कशात सामावलंय याचा शोध घ्यायचा ठरवलं तर त्याचं मूळ मेंदूत सापडतं. ‘मी’ म्हणून आपण अस्तित्वात असतो, आपल्याभोवती जग असतं, ते जग आपल्याला कसं वाटतं, कसं जाणवतं किंवा कसं भासतं हे आपल्या मेंदूतल्या क्रियाप्रकियांवरून ठरत असतं.
कॉर्पस कॅलोजमने जोडले गेलेले मेंदूचे दोन अर्धगोल बाहेरच्या जगाचं आपल्याला एकसंध आकलन करून देण्यात वाकबगार असतात.
मराठी तरुण काय वाचतात ?
1.0. छप्पन्न तरुण-तरुणी. वये, 18 ते 25 वर्षे. शिक्षणे, बारावी ते पी.एच.डी. करत असलेले; पण डॉक्टर-एंजिनियरांची संख्या भरपूर. गावे, महाराष्ट्रभर विखुरलेली. निर्माणसाठी (हा एक युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम आहे, अभय व राणी बंग यांनी सुरू केलेला.) एकत्र आलेली ही मुले. एका अर्थी महाराष्ट्रातल्या संवेदनशील, सामाजिक जाणिवा जाग्या असलेल्या मुलीचा हा छेद किंवा सूचिपरीक्षा.
1.1. तर या मुलांना दोन याद्या घडवायला सांगितले. प्रत्येकाने आपल्याला सर्वांत आवडलेली पाच पुस्तके आणि पाच चित्रपट नोंदायचे होते. सध्या माणसे वापरत असलेली ही ज्ञान कमावण्याची व मनोरंजन करवून घेण्याची दोन महत्त्वाची माध्यमे.
नियंत्रण आणि विश्वास
नियंत्रणाच्या हेतूबद्दलची शिक्षकाची कल्पना काय, यावर बरेच काही अवलंबून असते. नियंत्रणाची गरजच नसल्याचे लक्षात आणून देणे हाच त्याचा अंतिम हेतू असेल; मुलांनी ठाम, समर्थ, जबाबदार बनावे असे शिक्षकाला वाटत असेल आणि ती तशी बनू शकतात असा त्याला विश्वास असेल, तर शिकण्याला मुलांनी नकार देण्याचा असा धोका खूपच कमी होईल याची मला खात्री आहे. शिक्षक मुलांची कदर करतात का आणि मुलांना त्याची जाणीव आहे का, या मुद्द्याकडेच आपण पुन्हा एकदा येतो. एवढी एक गोष्ट सांभाळली गेली तर बांधीव वातावरणात शिकण्यास मार्गदर्शन करणे तुरुंगरक्षकाच्या कामासारखे भयावह वाटणार नाही.
संपादकीय
आजचा सुधारक चा पाण्यावरचा हा विशेषांक वाचकांपुढे ठेवताना मी जरा बेचैन झालो आहे. पाणी हा विषय इतका मोठा आणि आपल्या जिव्हाळ्याचा आहे की एकट्यादुकट्या माणसाने त्याला न्याय देणे अवघड आहे. तरीदेखील हे धारिष्ट्य आसु वरील प्रेमापोटी आणि वाचकांच्या उदारपणावर विश्वास ठेवून करत आहे.
पाणी हा पदार्थ मोठा विचित्र आहे. घन, द्रव आणि वायुरूप (बर्फ, पाणी, वाफ) अशा तिन्ही अवस्थेत तो आढळतो. त्याला स्वतःची ना चव ना रंग. पाण्यात जेवढे पदार्थ विरघळतात तेवढे आणि तितके विविध (रसायने, खनिजे -) पदार्थ इतर कुठल्याच द्रवात विरघळत नाहीत.
लेखक परिचय
चिं.मो.पंडित : स्थापत्य विशारद, सल्लागार म्हणून निवृत्तीनंतर शेती व त्यासंबंधी प्रश्न सोडवू पाहणाऱ्यांशी संपर्क राखून असतात.
आसुचे जुने लेखक पत्ता : 6, सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400 057 दूरध्वनी – 26147363
सुहास परांजपे : मुंबई आय.आय.टी.मधून केमिकल इंजिनिअरिंग चे पदवीधर. नोकरी न करता अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांत कार्य.
SOPPECOM (Society for Peoples Porticipatory Ecosystem Management) चे संस्थापक सभासद, K. Joy यांचेबरोबर कार्यरत. पाणी व्यवस्थापनावर पुस्तक, अहवाल.
पत्ता : 9, सर्वेष को.सो. India Hume Pipe Co. शेजारी, ठाणे (पूर्व), 400 603, दूरभाष 25324538
सीमा कुलकर्णी : SOPPECOM बरोबर कार्यरत.
पाव नाही? केक खा!
पाव नाही? केक खा!
आजकाल एक गैरसमज प्रचलित झाला आहे, की विज्ञान-तंत्रज्ञानाचे गतकाळातील यश पाहता पुढेही सर्व प्रश्न नेहेमीच विज्ञान-तंत्रज्ञानाने सुटत राहतील; भलेही पृथ्वीची लोकसंख्या कितीही वाढो. विज्ञानाबाबतच्या अपुऱ्या आकलनातून हा गैरसमज विश्वव्यापी झाला आहे. जसे, सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ या पुस्तकाचे लेखक बार्नेट व मोर्स हे थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम थेट उलटा करून ही भूमिका मांडतात. ते लिहितात, “संसाधनांमध्ये फरक असतो आणि सर्व संसाधने सारखीच नसतात, हे विज्ञानाने खोटे पाडले आहे. आजच्या जगात तुम्ही कोणत्या संसाधनापासून सुरुवात करता याला महत्त्व उरलेले नाही.”
चिकोत्रा खोऱ्यातील पाण्याच्या समन्यायी वाटपाचा पथदर्शक प्रकल्प
पार्श्वभूमी, रूपरेषा व वाटचाल
1. महाराष्ट्र राज्यातील सुमारे 83 टक्के शेती कोरडवाहू आहे. निसर्गाच्या लहरीवर ती अवलंबून आहे. सिंचनाखाली फक्त 17 टक्के जमीन आहे. पण उपलब्ध पाणी मोजून दिले जात नसल्याने त्याची उधळपट्टी होते, जमिनी बिघडतात आणि नियोजित सर्व क्षेत्रालाही पाणी मिळत नाही. प्रकल्पाच्या पाण्याला, पाणलोट व्यवस्थापनाद्वारे मिळणाऱ्या पाण्याची आणि भूजलाची जोड देऊन ते काटकसरीने वापरल्यास सिंचनक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात करणे शक्य होईल. तसेच ते राबवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना समन्यायाने वाटल्यास त्यांना निसर्गावर मात करता येईल. अशा रीतीने ग्रामीण भागातील दारिद्र्याचे, बेकारीचे आणि शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचे मूळ कारण नष्ट होईल.
पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू
1) विषयप्रवेश
पाऊस आकाशातून पडतो. केव्हाही, कुठेही, कितीही पडतो. लोकांना वाटते पावसाचे पाणी फुकट मिळते. पाऊस आपल्या अंगणात आणि शिवारातच फक्त पडत नाही. रानावनात, डोंगरदऱ्यांत… सर्वत्र पडतो. हे पाणी धरून ठेवावे लागते. वाहून न्यावे लागते. आयात-निर्यात करावे लागते, स्वच्छ ठेवावे लागते, पुढील पाऊसकाळ येईपर्यंत पुरवावे लागते. म्हणून पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी लागणारे व्यवस्थापक, अभियंते, धरणे, कालवे, नळ, जलशुद्धीकरणाच्या सोयी, पंप, डिझेल, वीज या गोष्टी फुकट मिळत नाहीत. हा एक पूर्वनियोजित प्रचंड खटाटोप असतो. म्हणूनही व्यवस्थापन यंत्रणा उभी करावी लागते.
व्यवस्थापन म्हटले की नियम आणि नियमन आले.
जलक्षेत्रात कायद्याचे राज्य असावे!
महाराष्ट्राने आजवर अंदाजे एक लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक करून विविध सिंचन-प्रकल्पांच्या माध्यमातून साधारण 33000 द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची व्यवस्था केली आहे. त्यातून अंदाजे 58.5 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून पिण्याकरता, घरगुती वापराकरता तसेच औद्योगिक वापराकरता मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले आहे. राज्यातील फार मोठ्या लोकसंख्येला याचा फायदा आज मिळत आहे. राज्याच्या या जलक्षेत्राची (water sector) कायदेशीर बाजू मात्र अद्याप लंगडी आहे. त्या संदर्भात काही मुद्द्यांचे संक्षिप्त विवेचन या लेखात केले आहे.
सिंचनविषयक खालील चार कायदे आज महाराष्ट्रात एकाच वेळी लागू आहेत.