विषय «इतर»

दशावतारांचे पुनरवलोकन

भारतातील बहुसंख्य लोक आपला धर्म हिंदू असल्याची कागदोपत्री नोंद करतात. हिंदू धर्माच्या काही मूलभूत मान्यता अथवा आधारभूत संकल्पना आहेत त्या म्हणजे ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व, ब्रह्मा-विष्णु-महेश व शक्ति या प्रमुख देवतांना मान्यता देणे, मोक्ष, पुनर्जन्म, दशावतार, वर्णव्यवस्था, वेद, ब्राह्मणे, पुराणे, उपनिषदे, रामायण-महाभारत (गीतेसह) हे धर्मग्रंथ, इत्यादी. ह्यांपैकी वेद फार पूर्वीपासून, आर्यांचे उत्तर भारतात आगमन झाल्यापासून, मौखिक परंपरेने अस्तित्वात आहेत. वेदांमधील आराध्यदेवता निसर्गातील विविध शक्ती होत्या. त्यात ब्रह्मा, विष्णु, महेश यांना स्थान नव्हते असे म्हटले तरी चालेल. या तीन ‘देवता’ व शक्ती ह्यांचे उल्लेख इसवी सनापूर्वी पाचव्या सहाव्या शतकानंतरच्या पुराणांमध्ये आढळतात.

पुढे वाचा

‘टिळक विरुद्ध आगरकर’

सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य यांमध्ये अग्रक्रम कशाला यासंबंधी लोकमान्य आणि आगरकर या मित्रद्वयांमध्ये टोकांचे मतभेद होते हे महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित जनांना माहीत आहे. १६ जून १८९५ ला प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकरांना देवाज्ञा झाली. त्यानंतर २१ वर्षांनी मुंबईला त्यांचा स्मरणदिन म्हणून मोठा समारंभ झाला. त्यावेळी प्रसंगाला अनुसरून लोकमान्यांनी ‘आगरकरांची श्राद्धतिथी’ म्हणून केसरीमध्ये जो लेख लिहिला त्यामध्ये प्रि. आगरकरांविषयी त्यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत आपल्याला समजू शकतात आणि त्या समजणे आवश्यकही आहे. कारण सुधारकाग्रणी प्रिन्सिपल आगरकर यांचे कार्य पुढे चालविणारी मंडळी आजही आहेत.

पुढे वाचा

विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका

लहानपणी, कॉलेजमध्ये असताना, मला विज्ञानामध्ये गोडी वाटू लागली तेव्हा तत्त्वज्ञानाचे काही ग्रंथ वाचनात आले. त्यात पाश्चात्त्यांपैकी बटैंड रसेल असावा, तसेच संस्कृतातील काही ऊहापोहात्मक पुस्तके असावीत. त्या लहान वयात उमेद फार असते आणि अवाजवी आत्मविश्वास असतो. मी विज्ञानविषयक माझी पूर्वपीठिका एका ‘श्लोकरूपात” मांडायचे ठरवले. वर्णनं नियमात् पूर्वम्, अनायासा हि भावना । समविचारी च तत् तुल्यश्च पूर्वग्रहाः मम दृढाः ।।
काव्यरचना खचितच बालिश आहे. पण तिच्यातला बराचसा विचार अनेक वर्षे संशोधक म्हणून वावरल्यानंतरही थोडाच बदलला म्हणून मला ती रचना अजून आठवते. तिचा भावार्थ : १.

पुढे वाचा

श्रॉडिंजरचे गूढवादी दर्शन

(भाषांतर)

हायसेनबर्ग वगैरे मंडळी ‘मॅट्रिक्स मेकॅनिक्सची’ (चरीीळ चशलहरपळली) बांधणी करीत होती त्याच वेळी इर्विन श्रॉडिंजरने, (Erwin Schroedinger [1887-1961]), स्वतंत्ररीत्या, तरंग यांत्रिकी (Wave Mechanics) चा शोध लावला. लगेचच, ते मॅट्रिक्स मेकॅनिक्सच्या समतल असल्याचे सिद्ध झाले. शिवाय हे Wave Mechanics अनेक बाबतींत Matrix Mechanics पेक्षा सुलभ व सुंदर आहे असे दिसून आले. म्हणूनच श्रॉडिंजरचे Wave Mechanics लवकरच आधुनिक पुंजयांत्रिकीच्या (Quantum Mechanics) हृदयस्थानी विराजमान झाले व सर्वत्र त्याचा गणिती शस्त्र म्हणून वापर चालू झाला.

श्री. केन् विल्बर (Ken Wilber) यांनी संपादित केलेल्या Quantum Questions या संग्रहातील श्रॉडिंजरचे खालील लिखाण, (उतारा) (बहुधा) What is Life ह्या पुस्तकातील आहे.

पुढे वाचा

भारतीय राज्यघटना व प्रचलित समाजव्यवस्था

भारताला स्वतःची राज्यघटना हवी अशी मागणी प्रथमतः १९२२ साली म. गांधी यांनी केली. त्यावेळी आणि त्यानंतरसुद्धा अनेकवेळा ब्रिटिश सरकारने ती फेटाळली. पेब्रुवारी १९४६ मध्ये ज्यावेळी नाविकांनी बंड केले. त्यावेळी सैन्य आता आपल्या ताब्यात राहणार नाही याची ब्रिटिशांना खात्री पटली आणि मे १९४६ पासून भारताला स्वातंत्र्य देण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर डिसें. ४६ मध्ये भारताची घटना तयार करण्यासाठी स्वतंत्र घटनासमिती निर्माण करण्याचे ठरले.
या घटनासमितीमध्ये प्रत्येक राज्याच्या विधानसभेने लोकसंख्येच्या प्रमाणात असे २९२ सभासद पाठविले होते आणि ९३ सभासद संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. साहजिकच या प्रतिनिधींना गरिबांबद्दल किंवा दलितांबद्दल कळवळा असण्याचे कारणच नव्हते.

पुढे वाचा

पत्रबोध

केशवराव जोशी, तत्त्वबोध , कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) ४१०१०१, दूरभाष : ९५२१४८-२३८६५२
आ.सु.च्या सप्टे.०७ च्या अंकारा “वायकांचे आ.सु.बद्दलचे विचार मागविले आहेरा” हे फार चांगले झाले. दि.य.देशपांडे ह्यांनी आसुच्या पहिल्या अंकारा (एप्रिल १९९०) मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की “शंभर वर्षांपूर्वीचे जे आगरकरांनी समाजास बुद्धिवादी घडविण्याचे कार्य करण्यास आरंभ केला; ते आज अपुरे ठरल्यामुळे पूर्णत्वाला नेण्याचे कार्य करण्याच्या हेतूने सुधारक काढीत आहोत. विवेकवादाच्या बरोबरच व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय इ. मूल्ये हाताळली तरी प्राधान्य विवेकवादाच्या प्रसाराला आहे.”
मुंबईला मराठी विज्ञान परिषद आहे. ते विज्ञान छापतात.

पुढे वाचा

लेखकाचा अंगरखा

समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांच्याकडे विद्यार्थिदशेत एकच सदरा असल्याने रोज रात्री धुऊन वाळत घालीत व दिवसा पेहरत. ही कथा अनेकांनी ऐकली असेल. अमेरिकन साहित्यिक एडगर अॅलन पो (ज्याने आधुनिक रहस्यकथा लेखनाचा पायंडा पाडला) आणि नॅथानियल हॉथॉर्न हे दोघे एकत्र राहत. दोघेही साहित्याच्या मस्तीत धुंद, परंतु खायला चण्या-कुरमुऱ्यांचेही वांधे. त्यांच्या साहित्यावर लुब्ध होऊन एका धनिक स्त्रीने त्यांना पार्टीचे निमंत्रण दिले. दोघे मिळून एकच कोट बाहेर जाताना आळीपाळीने वापरीत. आता आली का पंचाईत ? पो ने बाईसाहेबांना विचारले, ‘बाईसाहेब, आम्ही बरोबर न येता, एकानंतर दुसरा असं आलेलं चालेल का?’

पुढे वाचा

प्रासंगिक —रिझवानुरचे रहस्य 

ही कलकत्त्याची गोष्ट आहे. पण ती मुंबईची असू शकते. हैद्राबादची असू शकते किंवा दिल्लीची देखील असू शकली असती. ही एका प्रेमविवाहाची आणि त्याच्या दुःखान्ताची कहाणी आहे. कलकत्त्याच्या प्रियंका तोडी नावाच्या तरुणीने रिझवानुर्रहमान ह्या मुस्लिम तरुणाशी लग्न केले. सिव्हिल मॅरेज केले. आपापले धर्म कायम राखून हे लग्न करता येते. लग्नातून घटस्फोट मिळविणेही सोपे आहे. रिझवान कॉम्प्युटर विद्येतील ग्राफिक डिझाइनर होता. मध्यमवर्गीय कुटुंबातला जबाबदारी उचलणारा तरुण प्रियंकाचे वडील उद्योगपती अशोक तोडी. ‘यह अंदर की बात है’ अशा व्यंजक शब्दांनी ज्यांची जाहिरात केली जाते अशा स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांची निर्मिती करणारा तो एक कारखानदार, सालिना दोनशे कोटींची आय असणारा.

पुढे वाचा

अगा जें घडलेंचि नाहीं ! 

प्रिय वाचक, 

मागील एका संपादकीय संवादात (गड्या, तू बोलत का नाही?) आम्ही वाचकांना बोलण्याचे आवाहन केले होते. थेट त्याला स्मरून बहुधा, आमच्याकडे काही पत्रे आली आहेत. ह्या अंकातील पत्रांत त्यांतली दोन आहेत. कदाचित् त्याच वळणाने असेल आमच्या एका हितचिंतक वाचकाने एका पत्रात आमच्या पुष्कळ चुका दाखवल्या आहेत. त्याने म्हटले आहे की “जून-जुलै पासून आ. सु.त शुद्धलेखनाच्या, शब्दरचनेच्या तसेच वाक्य- रचनेच्या चुका ठळकपणे जाणवत आहेत.” त्यांची काही उदाहरणे दिली आहेत. त्यातले काना-मात्रेचे किरकोळ, ज्यांच्यामुळे अर्थहानी किंवा अर्थविपर्यास न झाला तरी तांत्रिक अर्थानि ते सदोष मुद्रण झाले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

पुढे वाचा

प्रयत्नवादाचे फसवे तत्त्वज्ञान 

आपल्या काम-क्रोधादि षड्रिपूंवर मात करायची असेल तर त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे अशी शिकवण पारंपरिक साधुसंतांनी दिलेली आहे. आमचा सारा समाज अशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुद्धा अविरतपणे प्रयत्नवादाचा पुरस्कार करीत असतो. आमची प्रचलित शिक्षण पद्धती प्रयत्नवादावरच आधारलेली आहे. आई-वडील, शिक्षक, समाजधुरीण, आध्यात्मिक गुरु सारेच अव्याहतपणे आक्रोश करीत असतात “प्रयत्न करा, प्रयत्न करा.” 

आज मी हिंसाचारी असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अहिंसक बनू शकेन; आज मी मिथ्याचारी असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी सत्यनिष्ठ बनू शकेन आज मी चोरी करीत असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी अस्तेय व्रतधारी बनू शकेन आज मी संचय करीत असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अपरिग्रही बनू शकेन; आज मी कामलोलुप असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी ब्रह्मचर्यव्रती बनू शकेन अशा भाबड्या श्रद्धेने आत्म-निग्रह करण्याचा प्रयत्न लाखो साधकांनी केलेला आहे आणि आजही लाखो साधक असा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत. 

पुढे वाचा