हा लेख वाचकांना दिलासा देण्यासाठी किंवा एखादी उपचारपद्धती (थेरपी) समजावून सांगण्यासाठी लिहिलेला नाही. अनेक उपचारपद्धती अशा आहेत, की ज्या तात्कालिक विश्राम व शुश्रूषा मिळवून देण्यात यशस्वी ठरतातही; पण थेरपीजना लगटून थिअरीजही (सिद्धान्त) डोक्यात घुसतात. त्यातील अनेक धारणा, जीवनदृष्टीबाबत दिशाभूल करणाऱ्या आणि म्हणूनच सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या घातक ठरणाऱ्या असतात. परिणामतः मनःस्वास्थ्याचे जे नुकसान होते ते थेरपीतून मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा बरेच जास्त ठरते. म्हणूनच या ‘लगटून घुसणाऱ्या’ सिद्धान्ताची/धारणांची समीक्षा करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. हा लेख अशा समीक्षेच्या अंगाने जाणारा आहे.
मनःशांती म्हणजे भावनिक सपाटीकरण नक्कीच नव्हे.
विषय «इतर»
द्राक्षबागायत, निमित्त, लागवड व विक्रीव्यवस्था
मी साधारण १९७३-७४ सालात द्राक्षबाग लावण्याचे ठरविले कारण माझे काही मित्र (ज्यांच्या व माझ्या परिस्थितीत बरेच साम्य होते) ते बऱ्याच अंशी यशस्वी द्राक्षबागायतदार होते. मला खरे म्हणजे ‘द्राक्षउद्योजक’ हा शब्द अधिक समर्पक वाटतो. कारण सध्याच्या द्राक्षांचे उत्पादन, विक्री इत्यादींचे स्वरूप पाहता द्राक्ष पिकवणारा शेतकरी उद्योजकच असला पाहिजे असे वाटते.
सध्या महाराष्ट्र आपल्या देशात जी खाण्याची द्राक्षे (ढरलश्रश सीरशिी, ही दारूच्या द्राक्षांपेक्षा, winegrapes पेक्षा वेगळी असतात.) पिकविली जातात त्यात अग्रेसर आहे, सर्वच दृष्टीने, एकरी उत्पादन, गुणवत्ता एकूण क्षेत्र वगैरे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या व गुणवत्ता हीपण आपल्या देशात अव्वल असली पाहिजे!
मानवी स्वभाव व डार्विनवाद (४)
[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
मुक्त इच्छा (ईहा) व अंतिम जबाबदारी
स्टीव्हन रोज या वैज्ञानिकाच्या मते जनुकयंत्रसिद्धान्तातील गर्भितार्थ माणसावरील जबाबदारी व त्याच्यातील गुणदोष यांच्याकडे बोट दाखवतो. आनुवंशिकतेतून गुणदोष आलेले असल्यास त्यांसाठी व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये, कारण कृतीची जबाबदारी त्याच्यावर ढकलता येत नाही.
फेल्युअर टु कनेक्टः पुस्तकपरिचय
(‘Failure to Connect: How Computers Affect Our Children’s Minds – for Better and Worse’ – Dr. Jane M. Healy, 350 pp. Simon and Schuster, 1998.)
गेल्या काही वर्षांत संगणकाचा दैनंदिन वापर शहरी मध्यमवर्गात झपाट्याने वाढलेला दिसतो. व्यवसायामुळे ज्यांचा संगणकाशी संबंध येत नाही, असेही अनेक लोक आता संगणक वापरू लागले आहेत. संगणकांच्या घटलेल्या किमती आणि इंटरनेटची सहज उपलब्धता, अशांसारखी काही कारणेही यामागे आहेत. शिवाय, मराठी मध्यमवर्गाच्या भविष्यात कशाला किती स्कोप आहे याचा वेध घेऊन त्याप्रमाणे बदलण्याच्या प्रवृत्तीचा जसा मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याच्या निर्णयात हात होता, तसेच काहीसे लहान मुलांच्या संगणक वापराच्याही बाबतीत होताना दिसते.
आपुलकीने वागणाऱ्या माणसांची अखेर
विसाव्या शतकाची ती सुरुवात होती. लाल-बाल-पाल व नंतर गांधी-नेहरू इत्यादींनी राष्ट्रीय चळवळीत दिलेल्या योगदानामुळे जनसामान्यांना स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांना हुसकावून लावणे नव्हे तर त्याचे उद्दिष्ट होते स्वयंशासनाचे, सुशासनाचे, राष्ट्रीय पुनर्बाधणीचे, विकासाचे, प्रगतीचे. यासाठी केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नव्हते तर समाजजीवनाच्या प्रत्येक दालनात स्वदेशीचा पुरस्कार आवश्यक ठरवला जात होता. आर्थिक जगतात हॉटेल ‘ताज’ घ्या की जमशेदपूर येथील टाटांचा पोलादाचा कारखाना घ्या, अनेक आर्थिक उपक्रम हाती घेतले जात होते. ज्यांमध्ये स्रोत एकच होता तो म्हणजे ‘स्वदेशीचा’. हेच ध्येय उराशी बाळगून पश्चिम भारतातील सातारा जिल्ह्यातील विमा महर्षी म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब चिरमुले यांनी १९३६ साली युनायटेड वेस्टर्न बँकेची स्थापना केली.
स्त्री-भ्रूणहत्याः कोल्हापुरातले वास्तव (भाग ३)
[अमृता वाळिंबे यांनी मालतीबाई बेडेकर अभ्यासवृत्ती २००५-२००६ वापरून केलेले संशोधन आम्हाला प्राप्त झाले. त्याचा जुजबी संक्षेप करून आम्ही काही भागांमध्ये ते संशोधन प्रकाशित करीत आहोत. या प्रकारचे संशोधन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकरिता व्हायला हवे.]
सोनोग्राफी केंद्राची संख्या व स्त्री-पुरुष यांचे ‘अतूट’ नाते
जिल्हा सोनोग्राफी केंद्राची संख्या दरहजारी मुलग्यांमागे
तुलनेने जास्त मुलींचे प्रमाण (०-६ वयोगट)
कोल्हापूर २११ ८५९
अहमदनगर २११ ८९०
सातारा २०९ ८८४
सांगली १८३ ८५०
तुलनेने कमी
भंडारा १९ ९५८
नंदुरबार १५ ९६६
गोंदिया १० ९६४
गडचिरोली ५ ९७४
(संदर्भः ‘अ स्टडी ऑफ अल्ट्रा साऊंड सोनोग्राफी सेंटर्स इन महाराष्ट्र’, केंद्रशासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागासाठी पॉप्युलेशन रिसर्च सेंटर, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटक्स अँड इकॉनॉमिक्सने सादर केलेला अभ्यास.
जीवन-मरणाचे प्रश्न आपण कसे सोडवतो?
कोणत्याही परिस्थितीत कोणते वागणे इष्ट, कोणते अनिष्ट, याबद्दलचे आपले दृष्टिकोन विवेकातून येतात असे आपण मानतो. मुळात मात्र ते भावनांपासून उपजतात. हे म्हणाला डेव्हिड ह्यूम. तो नीतिविचारांबद्दल लिहिताना “विचारा’ भोवती अवतरण चिह्न घालून तो भाग शंकास्पद असल्याचे ठसवत असे.
ह्यूमचे म्हणणे खरे की खोटे यावर तत्त्वज्ञ अडीचशे वर्षे वाद घालत आहेत, पण निर्णय होत नाही आहे. आता वेळ संपली आहे. मेंदूतले व्यवहार तपासणारी उपकरणे वापरत वैज्ञानिक त्या वादात उतरत आहेत. आज तरी असे दिसते आहे की ह्यूमला काहीतरी योग्य असे सुचले होते.
बेरोजगारीची हमी देता येणार आहे!
आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (खङज) सांगते की २००३ साली २.८ अब्ज माणसांना औपचारिक रोजगार मिळाला, एकूण लोकसंख्येच्या सुमारे चाळीस टक्के लोकांना. पण हा अंदाज कामगार व त्यांची कुटुंबे यांच्यापुढील अनेक गंभीर आह्वाने दडवतो. सुमारे १.४ अब्ज लोक (औपचारिक रोजंदारांपैकी अर्धे) सरासरीने रोजी दोन डॉलर (रु.८९/-) पेक्षा कमी पगारात खर्च भागवायला धडपडतात. सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकेतील नव्वद टक्के लोक या ‘गरीब रोजगारप्राप्त’ वर्गीकरणातले आहेत. त्यांना सुरक्षित जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न उपलब्ध नाही. याच काळात १८.६ कोटी लोक बेकार होते. एकूण बेकारांचे प्रमाण ६.२ टक्के आहे.
विषमता की विविधता?
ऑलिव्हर जेम्स हा ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ माणसांच्या मूलभूत भावनिक गरजांवर विचार करत होता. शरीरांसाठी अन्न, वस्त्र, निवारा या जशा मूलभूत गरजा, तशा मनांसाठी कोणत्या ? जेम्सची यादी चार एकमेकांशी निगडित भावनांची आहे. पहिली गरज आहे स्वतःला सुखवस्तू मानता येण्याची. आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आपल्याला उपलब्ध आहेत, असे वाटणे गरजेचे असते. इथे प्रत्यक्षात गरजेच्या वस्तू आहेत की नाहीत हे महत्त्वाचे नाही, तर त्या आहेत अशी भावना महत्त्वाची आहे. दुसरी गरज आहे, ती स्वतःला आजूबाजूच्या समूहाचे आपण एक अंग आहोत असे वाटण्याची. आपण जगण्याची क्रिया सक्षमपणे, स्वायत्तपणे आणि सच्चेपणाने पुरी करतो आहोत असे वाटणे, ही तिसरी गरज.
गोष्ट माणसाची, सांस्कृतिक उत्क्रांतीची
जीवन म्हणजे ‘एकमेकां साह्य करूं अवघे धरू सुपंथ’ असा सहयोगाचा प्रवास आहे ? का जीवन म्हणजे एक संघर्ष आहे ? एकमेकांचे गळे कापत ही यात्रा सुरू आहे ? जीवसृष्टीच्या इतिहासाच्या, उत्क्रांतीच्या अभ्यासकांपुढे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जीवनात नक्कीच सहकारही आहे. संघर्षही आहे. नेहमी संघर्षाबद्दल खूप बोलले जाते; पण जीवशास्त्राचे ज्ञान जसजसे सखोल होत चालले आहे, तसे उघड होत आहे, की मोठ्या प्रमाणात जीवन हा एक सहकारी उपक्रम आहे. उत्क्रांतीच्या वाटेवर जीवन सतत विस्तारत जाते, नवी नवी संसाधने वापरू लागते, वैचित्र्याने नटत राहते.