विवेकवादाविषयी प्रचलित असलेल्या अनेक विलक्षण आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की विवेकवादी माणसे भावनाहीन असतात. हा आक्षेप इतका विपरीत आहे की सामान्यपणे शहाणी असणारी माणसेही जेव्हा त्याचा पुरस्कार करतात, तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते. वस्तुतः विवेकवाद ही एक अतिशय शहाणपणाची भूमिका असून तिचे स्वरूप नीट लक्षात घेतल्यास तिच्यात शंकास्पद किंवा विवाद्य असे काही शोधूनही सापडणार नाही अशी आमची समजूत होती. तिच्याविषयी अनेक खोटेनाटे, सर्वथा गैरलाग. असमंजस आक्षेप कोणी का घ्यावेत हे अनाकलनीय आहे.
या (कु)प्रसिद्ध आक्षेपांपैकी या लेखाच्या शीर्षकात व्यक्त झालेला आक्षेप एक आहे.
विषय «इतर»
दि. य. एक माणूस
दि.यं.च्याबद्दल काही लिहिणे म्हणजे तो एक शुद्ध औपचारिकपणाचा पाठ ठरेल की काय अशी भीती वाटते. ते मला जमणार नाही आणि दि.यं. ना (नानांना) रुचणार नाही याची जाणीव असूनही त्यांच्याबद्दल लिहिण्याचे हे धारिष्ट्य करीत आहे. काही वर्षांपूर्वी वहिनींनी (नातूबाई) नानांचे सर्व लिखाण संकलित करून प्रसिद्ध करावे व त्याबरोबरच त्यांच्याबद्दलच्या आठवणींचा एक भाग संकलित करून तो भाग मी संपादित करावा अशी सूचना केली होती. नानांना याचा वास आला आणि त्यांनी तात्काळ आपली नाराजी दर्शविली. प्रसिद्धिविन्मुख अशा नानांना मी केलेले मूल्यमापनाचे कृत्य कितपत रुचेल याची दाट शंका आहे.
सुधारक दि. य. देशपांडे
मोठा माणूस गेला की त्याच्या निधनाने आपल्याला दुःख होते. त्याच्या जाण्याने एखाद्या क्षेत्राची अतोनात हानी झाली असे आपण म्हणत असतो. तो बरेचदा एक उपचार असतो. कारण वृद्धापकाळामुळे त्याचे जगणे नुसते क्रियाशून्य अस्तित्व बनले असते. तरी त्याने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण तसे म्हणतो. सभ्य समाजाची ही रीत आहे.
प्रा. दि.य. देशपांडे यांच्या निधनाने झालेली हानी खरीखुरी आहे. ते एकोणनव्वदाव्या वर्षी वारले, (३१ डिसेंबर २००५) त्याआधी सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांचे तर्कशास्त्रावरचे एक पुस्तक प्रकाशित झाले. तर्कशास्त्रावरील एका अभिजात ग्रंथाचे ते भाषांतर आहे.
मी कृतज्ञ आहे
प्रा. दि. य. देशपांडे (यांचा उल्लेख ह्यापुढे ‘नाना’ असा करू) यांची माझी ओळख कशी आणि कधी झाली हे आठवत नाही. १९८५ च्या सुमारास माझ्या कुटुंबात आलेल्या एका संकटामुळे मी त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो. त्यावेळी मनुताई आणि नाना ह्या दोघांनी मला भक्कम पाठिंबा दिला आणि सर्वतोपरी साहाय्य केले. साहजिकच माझे त्यांच्याकडे जाणेयेणे वाढले. मी केलेले काही लेखन त्या अवधीत मी त्यांना दाखवले आणि मनुताई गेल्यानंतर दोन वर्षांनी ‘नवा सुधारक’ काढण्याच्या वेळी त्यांनी मला बोलावले. त्या अंकांच्या मुद्रणामध्ये मी त्यांना मदत करू लागलो. ‘नवा सुधारक’च्या पहिल्याच अंकात मी लिहिलेले एक पत्र त्यांनी प्रकाशित केले आणि मला माझ्या मनातल्या विषयांवर लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले.
To Sir, With Love
नाना म्हणजे माझे लॉजिकचे प्रोफेसर डी.वाय.देशपांडे उर्फ डी. वाय. ते गेल्याचा ३१ डिसें. २००५ च्या सकाळी सुनीतीचा फोन आला अन् मला रडूच कोसळले. सारा दिवसभर नानांच्या विविध आठवणी मनात दाटून येत होत्या आणि कोणत्याही विवेकाला (विवेकवादाला ?) न जुमानता डोळे भरून, भरून येत होते. १०/१२ दिवसांपूर्वीच मी नागपूरला गेले असतांना त्यांची भेट घेतली होती. तेव्हा ते प्रसन्नपणे, मोकळेपणाने बोलले होते. जवळजवळ चार वर्षांनी आम्ही भेटलो होतो. पण नव्वदी गाठत आलेल्या नानांची स्मृती तल्लख होती, विनोदबुद्धी शाबूत होती आणि आपल्या परंपरागत (खास ब्रिटिश धाटणीच्या) तत्त्वज्ञानावरचा प्रगाढ विश्वासपण तसाच कायम होता.
विवेकवादी मनुष्याला रडूही येते!
एकोणीसशे ऐंशी-ब्याऐंशीच्या सुमाराला मराठी विज्ञान परिषदेच्या नागपूर विभागाने अंधश्रद्धा, देवभोळेपणा वगैरे विषयांशी संबंधित एक परिसंवाद भरवला. त्या काळचे धनवटे रंग मंदिर पूर्ण भरले होते. सहभागी वक्त्यांमध्ये अनेक ख्यातनाम माणसे होती. सर्वात प्रभावी भाषण झाले ते मात्र अतिशय सौम्य शैलीतले आणि अगदी साध्या दिसणाऱ्या माणसाचे. हे होते प्राध्यापक दि.य. देशपांडे विदर्भात ‘दिय’, ‘डीवाय’ किंवा क्वचित् ‘नाना’ म्हणून उल्लेखले जाणारे तत्त्वज्ञ. दिय आणि त्यांच्या पत्नी मनूताई नातू यांच्या कहाण्या विदर्भात, विशेषतः अमरावतीत, प्रेमादराने सांगितल्या जात आजही कधीकधी अशा कहाण्यांच्या ‘फटाक्यांची माळ’ एखाद्या संध्याकाळच्या गप्पासत्राला उजळवून जाते.
मानवी सुरक्षा
मानवी सुरक्षेची संकल्पना पुरेशी ठरण्यासाठी तिच्यात पुढे नोंदलेले वेगवेगळे घटक सामावून घ्यायला हवेत.
(१) ‘राष्ट्रीय सुरक्षा’ ही तंत्रशाही संकल्पना अखेर लष्करी सुरक्षेत रूपांतरित होते. त्याऐवजी मानवी जीवांवर लक्ष केंद्रित व्हायला हवे.
(२) माणसांच्या व्यक्तिगत कोंडीचा सामाजिकदृष्ट्या तटस्थ विचार न होता माणसांची जीवने सुरक्षित करण्यातले सामाजिक रचनांचे अंग ठसायला हवे.
(३) सामाजिक हक्क आणि व्यक्तिगत स्वातंत्र्ये महत्त्वाची आहेतच, पण माणसांच्या मूलभूत हक्कांचे जास्त व्यापक आकलन हवे म्हणजे अन्न, आरोग्यसेवा, मूलभूत शिक्षण यांबाबत सामाजिक आस्था हवी.
[टाईम साप्ताहिकाने प्रिन्सिपल व्हॉईसेस नावाचा जगापुढील आह्वानांवर चर्चा घडवण्याचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतला आहे.
उपयोगितावाद (२): जॉन स्टुअर्ट मिल्
[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]
प्रकरण २: उपयोगितावाद म्हणजे काय?
जे लोक उपयोगितेचा पुरस्कार युक्त आणि अयुक्त यांचा निकष म्हणून करतात ते उपयोगिता हा शब्द काहीतरी सुखविरोधी अशा संकुचित आणि बोलभाषेतील रूढ अर्थीच वापरतात अशी जी अडाणी समजूत आहे तिचा ओझरता उल्लेखही पुरेसा होईल. इतका विपरीत गैरसमज करून घेणाऱ्यांत उपयोगितावादाच्या विरोधकांचा समावेश क्षणभरही करताना दिसल्यास त्यांची क्षमा मागितली पाहिजे.
राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (३)
८. सांस्कृतिक परिणाम
टेलिव्हिजन, इंटरनेट आणि वृत्तपत्रे ह्यांमुळे जगात घडणाऱ्या घटना काही सेकंदांत जगभर प्रसारित होत आहेत. क्रिकेटचा चालू असलेला खेळ आपण आपल्या दिवाणखान्यात बसून आरामात नित्य बघत असतो. ह्या माध्यमांतून बातम्या, टेलिव्हिजन मालिका, करमणुकीचे कार्यक्रम, खेळ आणि जाहिराती इत्यादींतून अनेक प्रतिमा प्रसारित होत असतात. माध्यमांनी दाखविलेल्या ह्या प्रतिमांत आपण इतके गुरफटून गेलेले असतो की वास्तव आणि कल्पना ह्यांतील सीमारेषा आपल्याला ओळखू येत नाहीत. माध्यमांनी तयार केलेल्या प्रतिमांनाच वास्तव समजण्याची चूक आपण करतो. माध्यमांनी प्रसारित केलेल्या प्रतिमा व्यक्तीच्या सावल्यासारख्या असतात. सावली खरी असते, पण सावली म्हणजे वास्तव नव्हे ती व्यक्ती नव्हे.
रोजगारहमी योजनेची चिकित्सा
[ह्या लेखामध्ये दिवाकर मोहनी ह्यांच्या जुन्या लेखांमधील काही मुद्द्यांची पुनरुक्ती झाली आहे परंतु ती सहेतुक आहे.]
आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत तीव्र स्वरूप धारण करीत आहे आणि कदाचित ही समस्या अत्यंत गंभीर स्वरूप धारण करून परिस्थिती लवकरच स्फोटक बनेल अशी शक्यता आहे. प्रश्न अत्यंत अवघड आहे एवढे मात्र खरे. अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने रोजगारहमी कायदा केला. त्यायोगे बेरोजगारांची परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आणि त्याबरोबरच त्या कामांवर देखरेख करणारे आणि हजेरी मांडणारे ह्यांची परिस्थिती पुष्कळ जास्त सुधारली. भारत सरकारने त्याच पद्धतीवर काही जिल्ह्यांतून घरटी एका माणसाला वर्षातून शंभर दिवस रोजगार देण्याचा निर्णय केला आहे.