विषय «इतर»

विज्ञानाचे रूपांतरण

कालिदासाच्या ‘शाकुंतला’त एक प्रसंग आहे. दुष्यंत शिकारीच्या नादात कण्वाच्या आश्रमाजवळ येऊन हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमवासी त्याला सांगतात की तसे करू नये, कारण पवित्र वनांत प्राण्यांची व झाडांची हिंसा निषिद्ध आहे. 1801 सालानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस बुकॅनन कारवारच्या देवरायांबाबत लिहितो की देवरायां-मधील झाडे तोडायला गावप्रमुखामार्फत देवाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी फुकट मिळते, पण ती न घेतल्यास देवाचा कोप होतो. पुढे तो म्हणतो की सरकारने ती मालमत्ता (देवराई) काबीज करू नये यासाठी घडवलेली ही क्लृप्ती आहे.
मला देवराया, देवतळी, पवित्र पशुपक्षी यांच्याबद्दल कालिदासाची भूमिका बुकॅननच्या भूमिकेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ वाटते.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख-२)

धनवान व निर्धनातील भेदरेषा पाण्याने आखल्या जाणाऱ्या जलविषमतेची वाटचाल आपल्याला इथिओपिया व सोमालियातील हिंसक अनागोंदीकडे नेऊ शकते. काही राजकीय नेते, काही अधिकारी यांना याचे भान आहे. त्यांच्यामुळे काही सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
चेन्नईजवळ मोठी नदी नसल्याने पिण्याच्या पाण्याची कायम रड असते. चेन्नई ते महाबलिपुरम परिसरातून पाणी उपसून टँकर सदासर्वकाळ पळताना दिसतात. ही पाण्याची खाण असली तरी ती काही अक्षय नाही. पातळी झपाट्याने घटू लागली. ती कोरडी पडली तर चेन्नई महानगरीची तहान भागविण्याकरिता रेल्वेने पाणी आणण्याशिवाय इलाज नाही, हे लक्षात आल्यावर पाणीपुरवठा सचिव शीला नायर यांनी पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणले आणि समस्त इमारतींना पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य असल्याचा आदेश काढला.

पुढे वाचा

परस्परावलंबनाविषयी आणखी काही (१)

अंदाजे दोन वर्षांपूर्वी मी काही अर्थकारणविषयक लेख लिहिले. ह्या लेखांची सुरुवात खादीपासून केली असली तरी त्यांचा प्रतिपाद्य विषय ‘अर्थकारणातील सुधारणा’ हा आहे. माझ्या ह्या लेखांवर काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यांमध्ये मुख्यतः डॉ. चिं. मो. पंडित आणि श्री. भ. पां. पाटणकर ह्या दोघांनी माझ्या लेखांत मनापासून स्वारस्य दाखविले. पाटणकरांच्या आणि पंडितांच्या काही मुद्द्यांवर माझे म्हणणे मी सुधारकाच्या अंकांमधून मांडले असले तरी त्यांच्या सर्व मुद्द्यांचा परामर्श व्यवस्थितपणे घेण्याची गरज आहे.

डॉ. पंडित ह्यांनी माझ्या सर्व लिखाणाचा अत्यन्त साक्षेपाने विचार केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांना माझ्याकडून अधिक स्पष्टीकरण हवे आहे; त्याचप्रमाणे जेथे त्यांचा-माझा मतभेद आहे, असेही मुद्दे त्यांनी निःसंकोचपणे मांडले आहेत.

पुढे वाचा

गांधीवाद विरुद्ध नथुरामवाद

संदर्भ : आ.सु. डिसेंबर 02 मधील श्री. मधुकर देशपांडे यांचा ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हा लेख एप्रिल 03 मधील श्री. शांताराम कुळकर्णी यांचा ‘हे चित्र पहा,’ हे पत्र:
कोणत्याही संत-महात्म्याच्या किंवा महापुरुषाच्या संदर्भात जनसामान्यात प्रामुख्याने तीन प्रकारचे लोक असतात. (1) द्वेषी (2) प्रेमी (3) कुंपणावरचे. रा.स्व.संघ, म.गांधी, पं.नेहरूंचा द्वेषी होता. ‘प्रेमी’ मध्ये दोन प्रकारचे लोक असतात. भक्त आणि वादी. भक्त आपल्या प्रिय संतमहंताचे गुणगान, आरत्या, भजने, भाषणे जोशात करतील, पण आचरण करीत नसतात (थोडेसे अपवाद वगळता). आचरणाच्या वेळी त्यांचा स्वार्थ उफाळून येतो.

पुढे वाचा

‘बुश-बटन’ साम्राज्यवाद

इराकी मोहिमेचे वैशिष्ट्य दोन प्रतिमांच्या रूपांत नजरेसमोर येते. बगदादच्या फिरदौस चौकातील सद्दाम हुसेनचा पुतळा उखडून टाकणे ही पहिली प्रतिमा. एका जुलमी राजवटीचा होत असलेला अंत आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगात प्रस्थापित होत असलेली एक नवी व्यवस्था (World Order) ह्यांचे प्रतीक म्हणजे जणू ही प्रतिमा. दुसरी प्रतिमा आहे इराकी वस्तुसंग्रहालयाची आणि अमेरिकन तैनाती फौजांच्या नजरेसमोर गुंड तिथे करीत असलेल्या लुटीची. “अमेरिकाप्रणीत शांती’ (Pax Americana) ह्याच्या यश-अपयशावर ह्या दोन प्रतिमा फार अचूक टिप्पणी करतात : जबाबदारीशिवाय सत्ता! बुशचे पाठिराखे ह्या ‘बुश तत्त्वज्ञानाचे’ वर्णन साम्राज्यवादाचे पुनरागमन म्हणून करत नाहीत.

पुढे वाचा

समाजरचना–विचार

समाजरचनेचा विचार करताना तळागाळातील व्यक्तीपासून ‘उच्च’ वर्गातील व्यक्तींसकट सर्वांच्या हितासाठी नेमके काय हवे याचे भान हवे. जोडणारे बंध व्यक्ती-व्यक्तीमध्ये वा एकूण समाजामध्ये वितुष्ट आणणारे असल्यास त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. सामान्यपणे कुठलाही वाद व विशेषकरून टोकाचा राष्ट्रवाद व अशा राष्ट्रवादांच्या संकेत-संज्ञा वापरण्यावर दुराग्रह या कुठल्याही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाला हितावह ठरणाऱ्या नाहीत. भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घेणारी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. समाजातील अभिजन वर्गाकडे role-model म्हणून इतर बघतात. त्यांचे सही सही अनुकरण करतात. म्हणून या अभिजनवर्गाने आपले आचार-विचार, वर्तणूक, सोई-सुविधा, छंद-सवयी इत्यादींबद्दल जास्त जागरूक व संयमित असणे गरजेचे आहे.

पुढे वाचा

कुटुंबाच्या मर्यादेत वृद्धांचा सांभाळ

आठ पंधरा दिवसांपूर्वी माझ्या सासूबाई हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 83 व्या वर्षी निवर्तल्या. गेली 8-10 वर्षे त्या आमच्याचकडे होत्या. आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची एकुलती एक मुलगी-माझी पत्नी–वारल्यानंतरही मी त्यांना प्रेमाने सांभाळले, हवे नको पाहिले, दवापाणी काटेकोरपण बघितले. यात जगावेगळे मी काही करीत आहे अशी माझी भावना नव्हतीच. पण त्या निवर्तल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त झाल्या त्या मात्र धक्कादायक वाटतात.
“काय, म्हातारीचा बोजा उतरला? सुटलात तिच्या …ला.’ ही त्यातली एक प्रतिक्रिया. “काही बोलू नका हो तुम्ही, वस्तुस्थिती हीच होती.” हे वर. हे बोलणारे माझे मित्र एरवी मनाने मायाळू आहेत.

पुढे वाचा

“धोकादायक पाणी!”

पण मौजेची गोष्ट अशी, की पाणी जरी थंडगार, मधुर आणि पारदर्शक असले तरी त्याच्या मालकीचा किंवा वाटपाचा प्रश्न मात्र अत्यंत स्फोटक, कडवट आणि गुंतागुंतीचा होऊ शकतो, एवढेच नाही तर समाजव्यवस्थेत फार मोठी उलथापालथ त्यामुळे होऊ शकते. प्राचीन इराकमधली वैभवशाली संस्कृती पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन उजाड होऊन नष्ट झाली, असे मत एरिक एकहोल्म ह्या पर्यावरणशास्त्रज्ञाने मांडले आहे. सिंधू संस्कृतीचा नाश परकीय आक्रमणामुळे झाला नसून त्यांचे पाणी व्यवस्थापनाचे तंत्र बिघडल्यामुळे झाला असे मत नवीन संशोधनाद्वारे सध्या पुढे येत आहे. शाक्य आणि कोलीम या दोन गणराज्यांमधल्या ‘रोहिणी’ नदीच्या पाणीवाटपाच्या संघर्षाचे निमित्त होऊन गौतम बुद्धाला राजत्याग करावा लागला, असे डॉ.

पुढे वाचा

तव्य (ought) आणि कर्तव्य (duty)

नीतिशास्त्रातील प्रमुख संकल्पना म्हणजे ‘साधु’ (good) आणि ‘तव्य-कर्तव्य’ (ought-duty) या. त्यांपैकी ‘साधु’ म्हणजे काय याविषयी मी अनेक लेखांत (विशेषतः गेल्या दोन लेखांत) लिहिले आहे. परंतु ‘तव्याविषयी मात्र फारसे स्पष्टीकरण झाले नाही अशी माझी समजूत आहे. ती चर्चा या लेखात करण्याचा मानस आहे.
‘कर्तव्य’ किंवा ‘तव्य’ म्हणजे काय? प्रथमदर्शनी उत्तर सुचते ते म्हणजे त्या कल्पनेत बंधकत्वाची, एखादे कर्म करण्यास बद्ध करण्याची, कल्पना प्रामुख्याने समाविष्ट आहे असे दिसते. ‘अमुक कर्म माझे कर्तव्य आहे’ म्हणजे ते कर्म करण्यास मी बांधील आहे, ते मला आवडो की न आवडो, ते कर्म करण्याची इच्छा असो की नसो.

पुढे वाचा

उत्क्रांतीची तोंडओळख (लेख-२)

19 व्या शतकात पा चात्त्य जगातही धर्म, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचे साम्राज्य होते. खरे तर डार्विनने 1838 मध्येच उत्क्रांतीची उपपत्ती (theory of cvolution) मांडणारा Origin of Specics नावाचा ग्रंथ लिहिला होता. परंतु डार्विनची ‘उत्क्रांतीची उपपत्ती’ पारंपारिक पा चात्त्य मनाला रूचणारी नव्हती. केवळ यासाठीच त्याने हा ग्रंथ उपपत्ती सुचल्यावर लगेच प्रकाशित केला नाही. एव्हढेच नव्हे, तर त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले होते की उत्क्रांतीवरचे आपले लेखन अपेक्षेप्रमाणे आपल्या हयातीत झाले नाही, तर या विषयावरची आपली हस्तलिखिते आपल्या मृत्यूनंतरच प्रकाशित करण्यात यावी. ख्रिश्चन धर्मानुसार ईश्वरानेच सर्व काही घडवून आणले आहे.

पुढे वाचा