काही वर्षांपूर्वी काझीरंगा अभयारण्याला गेलो असता, एक गंमतीची गोष्ट पाहिली. गेंड्याच्या लीदीचे चारपाच ढिगारे पाहिले. त्यांनी मर्यादित केलेली जमीन दोन-अडीच हेक्टर होती. कर्मचाऱ्यांशी चौकशी करता असे कळले की हे काम कर्मचाऱ्यांनी केले नसून गेंड्यानेच तसे ढीग घातले आहेत. आपल्या जागेचे स्वामित्व दाखवण्यासाठी गेंड्याची ती युक्ती होती. हत्तीप्रमाणे गेंडा कळपात रहात नसल्यामुळे एका गेंड्याला जगण्यासाठी किती जमीन लागते हे सिद्ध झाले. आ.सु.मधील संपादकीयात (१२.१२) सुरुवातीच्या परिच्छेदात उत्क्रांतीचा आधार घेऊन जमिनीचे परिमाण ठरवले आहे, त्या पद्धतीत व गेंड्याच्या रांगड्या पद्धतीत थोडेफार साम्य आहे.
विषय «इतर»
अशरीरी आत्मा (?)
दहा वर्षांपूर्वी आम्ही सूझन ब्लॉकमोअरला तिच्या ससेक्स परगण्यातल्या ‘पेअरट्री कॉटेज’मध्ये भेटलो. त्यावेळी शरीरबाह्य अनुभव (out of body experiences उर्फ OBE) या क्षेत्रात संशोधन करणारी ती बहुधा जगातली एकुलती एक परामानस शास्त्रज्ञ (Parapsychologist) होती.
शरीरबाह्य अनुभव म्हणजे आपण आपल्या शरीरबाहेरून शरीराकडे पाहत असल्याचा अनुभव. यासारखाच एक प्रकार म्हणजे मृत्यूच्या निकटचे (near death) अनुभव, किंवा NDE. वैद्यकीयदृष्ट्या मृत शरीराबाहेर आपण एका अंधाऱ्या बोगद्यातून जात आहोत, आणि मृत शरीराचे ‘पुनरुज्जीवन’ होताच आपण परत शरीरात ओढले जात आहोत, अशा धर्तीचे हे NDE अनुभव असतात. OBE आणि NDE अनुभवांच्या अनेक वर्णनांमधून अशरीरी आत्मा (Spiritual self) आणि तारकांच्या पातळीवरील शरीर (astral body) या कल्पना घडल्या.
पुस्तक-परिचय
कुंपणापलिकडचा देश – प्रमोद सहस्रबुद्धे
भौगोलिक प्रदेशमानाप्रमाणे संस्कृती बदलत राहते.पण हा बदल बहुधा हळू हळू घडत जातो. शेजारच्या किंवा जवळच्या भूभागातील संस्कृतीत साम्यस्थळेच अधिक असतात. विविध कारणांसाठी बऱ्याच जणांना हे सत्य पटत नाही, किंवा ते अशी परिस्थिती बदलवू इच्छितात. बहुतांशी ही कारणे धार्मिक वा राजकीय असतात. असे लोक मग ठिकठिकाणी आपल्या कुवतीनुसार सांस्कृतिक बेटे तयार करू लागतात. अर्थात अशा गोष्टी अनैसर्गिकच असतात, आणि त्यामुळेच की काय, संस्कृतीचे विभाजन करू इच्छिणाऱ्यांना भयाचे किंवा लाचलुचपतीचे कुंपण घालावे लागते. दोन देशांतील संस्कृती-साठी मात्र हेच कुंपण ‘प्रत्यक्ष’ असू शकते.
शिक्षणात बदल : गोरगरिबांच्या शिक्षणावर गदा
भारतात आता बदलत्या शिक्षणाच्या धोरणामुळे गरिबांचे शिक्षणच बंद होणार असे श्री. अरविंद वैद्य यांनी त्यांच्या लेखात (आ. सु., जुलै-ऑगस्ट, २००२) सांगून वाचकांचे डोळे उघडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आता भारतात समाजपरिवर्तन हा शिक्षणाचा हेतू राहिला नसून, भांडवली विषमतेची रचना मजबूत करणे हाच शिक्षणाचा हेतू होऊ लागला आहे, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण हा हेतू आजचाच नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या उच्चवर्णीय श्रीमंत नेत्यांनी गोरगरिबांच्या शिक्षणाकडे खुल्या मनाने लक्ष दिलेच नव्हते आणि आता नव्या धोरणाने गरिबांच्या शिक्षणावर ते गदाच आणणार हे वाचून वाईट वाटते.
तळागाळातील घबाड
शीतयुद्ध संपून एका सोव्हिएत संघाची अनेक राष्ट्रे झाली. दक्षिण अमेरिकन देश, भारत, चीन, सारे बुरखे फाडून उदार आर्थिक धोरणे राबवू लागले. ह्या सर्व देशांमधील अनेक कोटींचा मध्यमवर्ग आता आपल्या कक्षेत आला, आणि आता आपली उलाढाल आणि आपले नफे दिवसा दुप्पट, रात्री चौपट होऊ लागणार; असा बहु राष्ट्रीय कंपन्यांचा ( MNC, ‘बराकं’) समज झाला. प्रत्यक्षात मात्र आर्थिक अरिष्टे येतच राहिली आणि ‘बराकं’ होत्या तेथेच घुटमळत राहिल्या. अखेर गेल्या अकरा सप्टेंबरला दहशतवादाने जागतिक व्यापार केंद्र प्रतीकात्मक रीत्याही जमीनदोस्त केले.
आता ‘बराकं’नी आपली व्यापारी गणिते नव्याने सोडवायला हवी आहेत.
ग्रंथपरिचय
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात सामाजिक स्वास्थ्य आणि रोगप्रतिबंध याकडे अधिक लक्ष दिले गेले व वर्षानुवर्षे या कार्यासाठी अधिकाधिक आर्थिक व्यवस्था करण्यात आली. कुटुंबनियोजन तसेच देवी निर्मूलन, मलेरिया, हत्तीपाय, कॉलरा, पोलिओ, कुष्ठरोग यासारख्या घातक संक्रामक रोगांविरुद्ध विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. क्षयरोग, हिपॅटायटिस, एड्स यांसारख्या रोगांविरुद्ध प्रतिबंधात्मक योजना आणि जनमत जागृतीचे कार्यही चालू आहेच. हे सर्व झाले शासकीय स्तरावरील प्रयत्न. परंतु याचसोबत सामान्य जनतेतही मंद गतीने का होईना, आरोग्यविषयी जागृती होत आहे. स्वच्छ व शुद्ध पेयजल, भेसळरहित अन्न, समतोल आहार, व्यायामाचे महत्त्व, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, रोगप्रतिबंधात्मक उपाय याविषयी मुख्यतः नागर आणि शिक्षित जनतेची जाणीव वाढीस लागली आहे.
एका सम्राज्ञीचा मृत्यू
अखेर ज्याची भीती होती तेच झाले. नागपूरची सव्वाशे वर्षे जुनी एम्प्रेस कापड गिरणी बंद पडली. एका फटक्यात २८०० नोकऱ्या रद्द झाल्या. तोट्यातील कापड गिरण्या बंद करायचे राज्य सरकारने ठरवले आहे. वस्त्रोद्योग महामंडळाच्या म्हणजे सरकारच्या मालकीच्या एकूण ९ पैकी ५ गिरण्या सरकारने आतापर्यंत बंद केल्या असून कामगारांचे हिशोबही केले आहेत. बंद होणारी एम्प्रेस ही सहावी गिरणी. एम्प्रेसची केस वेगळी आहे. एखादा उद्योग कुणी बंद करायला निघाले तर आंदोलन होते, वातावरण तापते. कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होते. पण इथे असे काहीही झाले नाही.
मानवताशून्य मूलतत्त्ववादाकडून नव्या राष्ट्रवादाकडे!
“गुजरातचा प्रयोग हा अत्यंत यशस्वी प्रयोग असून आम्हाला त्याची पुनरावृत्ती भारतभर करावयाची आहे”, अशा आशयाचे उद्गार विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष श्री. अशोक सिंघल यांनी काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. (इंडियन एक्सप्रेस/५ सप्टें. ०२) यावेळी ते पुढे म्हणाले की, “गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासात हिंदूंनी दिलेली ही पहिली सकारात्मक प्रतिक्रिया आहे. २७ तारखेला गोध्रा घडले आणि दुसऱ्या दिवशी ५० लाख हिंदू रस्त्यावर होते.” गुजरातमधील गावागावांतून मुस्लिमांना हाकलून त्यांना शरणार्थी शिबिरात दाखल करण्यात आले, याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. केंद्रामध्ये भाजपचे सरकार नसते तर गुजरातमधील अमानुष हत्याकांडाचा गौरव करण्याचे धैर्य अशोक सिंघल यांनी दाखवले असते असे वाटत नाही.
नीतीची भाषा
आपला जागेपणीचा सर्व काळ भाषेचा उपयोग करण्यात व्यतीत होतो. आपण दररोज शेकडो, नव्हे हजारो, वाक्ये सहजपणे उच्चारतो. त्यांपैकी काही वाक्ये श्रोत्याला/ना काही माहिती देण्याकरिता असतात. काही आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण वापरतो, तर काही नको असलेली गोष्ट दूर करण्याकरिता. एखादे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, ते उच्चारणाऱ्या व्यक्तीचा ते उच्चारण्याचा उद्देश काय आहे, इत्यादि गोष्टी आपल्याला वाक्याच्या रचनेवरून कळतात. उदा. केवळ माहिती देणे एवढाच हेतू असलेल्या वाक्यरचनेला indicative (कथनात्मक, वर्णनपर) रचना म्हणतात. एखादी गोष्ट करवून घेण्याकरिता वापरलेल्या रचनेला आज्ञार्थी किंवा विज्ञाप-नार्थी रचना म्हणतात.
तंट्या भिल्लाचे इंग्रजांस पत्र
मे. हुजूर जनाब डिप्टी कमिशनर साहेब, निमाड इलाका,खंडवा.
अर्जदार तंट्या वलद भावसिंग भील, रा. पोखर, जि. निमाड सरकार चरणी अर्ज पेश करतो, की सरकार आम्हा गरिबाच्या जिवावर उठले आहे. जंगलातल्या लोकांना हुसकावून लावण्याचा सरकारचा इरादा चांगला नाही. आतापर्यंत कोणत्याही मायबाप सरकारनी डोंगरातल्या आम्हा लोकांना हात लावला नाही, की त्यांची खोड काढली नाही. होळकर सरकार, असीरगड–बु-हाणपूरच्या सरकार आणि इतर रियासतीने या जंगलातल्या माणसाला सांभाळून घेतले आहे. मग गोऱ्या सरकारलाच ह्या जंगलाच्या वाट्याला का जावे वाटले? आतापर्यंत पाटील, पटवारी, सावकारांनी ह्या आम्हा लोकांना पिळले–लुबाडले; पण अडचणीच्या वेळी त्यांनीच मदतही केली आहे; परंतु आता तुमच्या हुकुमावरून त्यांनी जास्ती पिळवणूक सुरू केली आहे.