१. मार्च २००२ च्या आ.सु.मधील संपादकीयावर चर्चा होणे आवश्यक आहे. अशा चर्चेसाठी पूरक असे काही विचार इथे मांडत आहे. मूळ मुद्दा आहे ‘नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन’, ‘नैसर्गिक संसाधनांवर सर्वांचा हक्क’ आणि ‘नैसर्गिक संसाधनांवर येणारे लोकसंख्येचे सातत्याने दडपण’. माल्थसपासून हा विचार अधून मधून पुढे येतच राहिला आहे. पण विज्ञानामुळे उत्पादनवाढही पटीत होऊ शकते (Geometrical increase) आणि लोकसंख्यावाढ नियंत्रणही शक्य झाले आहे. आणि सुजाण, जागरुक, ज्ञानी समाज आज याचा पुरेपूर फायदा करून घेताना दिसत आहे. खास करून राजकीय सत्तासंपादनाच्या खेळाबाहेरच या गोष्टी राहायला हव्यात.
विषय «इतर»
हिंदू! एक शिवी!
काही महिन्यापूर्वी आ.सु.च्या काही वाचकांनी ‘हिंदू म्हणजे नेमके काय’ असे प्रश्न विचारले होते. भल्याभल्या विद्वानांना नेमक्या हिंदुत्वाची परिभाषा करता आली नाही. एक विचार असाही वाचायला मिळाला, ज्यात ‘हिंदू नावाचा कोणी धर्मच नाही’ असे मांडले होते. प्रत्येक धर्मपंथाला एखादा संस्थापक असतो, ग्रंथ असतो, ठराविक तत्त्वज्ञान, कर्मकांड असते, तसे हिंदूधर्माचे नाही.
जैन-बुद्ध धर्माच्या वैचारिक आक्रमणानंतर आर्य पुरोहितशाहीची बरीच पिछेहाट झाली. त्यांनी मग पडते घेतले. गोमांस, पशुपक्षीमांसभक्षक यज्ञ बंद केले. यज्ञातील अ लील प्रकार बंद केले. भरतखंडात पसरलेल्या अनार्यांच्या देवदेवता स्वीकारल्या, मंदिरे, मूर्तिपूजा स्वीकारल्या.
धैर्य
तापलेल्या आणि धूळभरल्या डांबरी रस्त्यावर एका स्त्रीचा, गीताबेनचा, नग्नदेह पडला आहे. तिचे कपडे जवळच अस्ताव्यस्त पडले आहेत. अंतर्वस्त्रांपैकी एक वस्तू तिच्यापासून फुटाभरावर आहे, तर दुसरी तिच्या डाव्या हाताने जिवाच्या आकांताने धरली आहे. तिचा डावा हात आणि धड हे रक्ताळले आहेत. धडावर खोल जखमा आहेत. डाव्या मांडीवर रक्त आहे आणि घोट यावर एक पैंजण. प्लास्टिकच्या चपला शेजारी आहेत. चित्राच्या मध्यावर एक वेडावाकडा, लाल, द्वेषभरला विटेचा तुकडा आहे—-बहुधा तिच्या मारेकऱ्यांनी तिचा अंत घडवायला वापरलेला.
गीताबेन अमदाबादेत २५ मार्चला दिवसाढवळ्या मारली गेली, तिच्या घराशेजारील एका बस-थांब्याजवळ.
निवेदन
आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाने आता बारा वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचे अंदाजे एक हजार वर्गणीदार आहेत. हिंदी द्वैमासिकाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या वर्गणीदारांची संख्या दीडशेच्या घरात आहे. आजचा सुधारकचे बारा वर्षे अविरत प्रकाशन केल्यामुळे मासिकाच्या आयुष्याचा एक टप्पा गाठला गेला आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. असा टप्पा गाठल्याचे प्रतीक म्हणून आणि आपल्या संस्थापक संपादकांचे स्वास्थ्य तितकेसे बरे नाही म्हणून आपल्या मासिकांच्या प्रकाशनाची एक वेगळी व्यवस्था करण्याचे योजिले आहे. विवेकवादाला वाहिलेल्या ह्या दोनही मासिकांचे स्वामित्व आता एका अनौपचारिक विश्वस्तमंडळाकडे सोपवावयाचे आहे.
संकलक आणि गुराखी जीवनपद्धती
सामाजिक शास्त्रांमध्ये एखाद्या समाजाचा आदिमानवी स्थितीपासून किती विकास झाला आहे हे तपासायला एक निकष वापरतात. त्या समाजात वस्तूंचे उत्पादन करण्याची प्रक्रिया, तिच्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि उत्पादन करणाऱ्यांचे एकमेकांशी संबंध, हा त्या समाजाचा पाया समजतात. या संरचनेला मार्क्सने पायाभूत संरचना, infrastructure, असे नाव दिले. समाजाचे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वगैरे व्यवहार म्हणजे या पायावरची इमारत किंवा Superstructure. पायाच अखेर इमारत कशी असेल ते ठरवतो, ही मार्क्सची मांडणी. ती सर्वमान्य नाही.
राज्यव्यवस्था आणि तिच्यातील सत्तेसाठीचा संघर्ष यांना पुरेसे वजन दिलेले नाही, ही एक टीका, प्रामुख्याने मार्क्सच्या अनुयायांकडून होणारी.
वैद्यकीय व्यवसाय
१० वैशिष्ट्ये —- इतर व्यवसायांपेक्षा वैद्यकीय व्यवसाय वेगळा आहे.
(१) मानवी शरीर हे बऱ्याच वेळा स्वतःची दुरुस्ती स्वतःच करणारे यंत्र आहे. सर्दी-पडसे-फ्ल्यू पासून क्षयरोग, विषमज्वर, हिवताप अशा रोगांपर्यंत बऱ्याच रोगांपासून शरीर आपले आपणच बरे होत असते—-बहुतेक वेळा. सण अज्ञानामुळे नक्की आपोआप बऱ्या होणाऱ्या रोगांसाठी देखील उपचारकाकडे जात असतो. त्यामुळे काहीही उपचार केले तरी सण बराच होतो—-इतकेच नाही तर उपचारकांनी चुकीचे उपचार केले तरी बहुतेक वेळा शरीर त्यावरही मात करून बरेच होते. त्यामुळे उपचारकाच्या ज्ञानाचा, कौशल्याचा व प्रामाणिकपणाचा कस लागतच नाही. त्यामुळेच शास्त्रीय व अशास्त्रीय (आयुर्वेद, होमिओपथी, नेचरोपथी, इलेक्ट्रोपथी, युनानी, बाराक्षार, सिद्ध, धनगरी, रेकी, ॲक्युपंक्चर वगैरे) उपचारांत, बुद्धिमान व मूर्ख, सर्वच प्रकारचे उपचारक व्यावसायिक यश मिळवतात.
पर्यायी विकासनीतीची ओळख
नर्मदा बचाव आंदोलनाच्या निमित्ताने चर्चिल्या गेलेल्या अनेक प्रश्नांबरोबर पर्यायी विकासनीतीचा उल्लेख बऱ्याच वेळा केला जातो. प्रचलित विकासनीतीसंबंधाच्या असमाधानातून पर्यायी विकासनीती गेली कित्येक वर्षे मांडली जात आहे. पर्यावरण-वाद्यांचे एक नवीन फॅड आहे’ ह्या मतापासून ‘पर्यायी विकासनीती’ हीच शाश्वत विकासनीती आहे आणि त्याशिवाय तरणोपाय नाही ह्या मतापर्यंत ह्या संबंधात अनेक मते मांडली जातात. पण पर्यायी विकासनीती म्हणजे काय? ह्याचे साकल्याने विवेचन अपवादात्मकच दिसून येते. श्री दिलीप कुलकर्णी ह्यांनी ही उणीव ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’ (राजहंस प्रकाशन जाने. २००१, पृष्ठसंख्या १४८, मूल्य १२०/- रु.) ह्या पुस्तकाद्वारे भरून काढली आहे.
अभयप्रतिज्ञा
आजचा सुधारक हे मासिक गेली बारा वर्षे नागपूरहून अत्यंत निष्ठेने प्रसिद्ध केले जात आहे. ‘विवेकवादा’ला– – रॅशनॅलिझम’ला—वाहिलेले मासिक असे या मासिकाचे वर्णन करता येईल.
आजचा सुधारकच्या फेब्रुवारीच्या अंकात ‘माझी प्रतिज्ञा’ या नावाचा अभय विष्णुकांत वैद्य यांनी एक लेख लिहिलेला आहे. १ डिसेंबर १९९८ रोजी केलेली ही ‘भीष्मप्रतिज्ञा’ वाचून मी थक्क झालो. त्यांच्या ‘प्रतिज्ञे’चे पहिले वाक्य असे आहे–खालील अटींचे पालन झाले नाही तर अभय वैद्य त्या लग्नावर बहिष्कार
टाकेल:
(१) पत्रिका न बघता लग्न ठरलेले असावे. (२) मूहूर्त न बघता लग्नाचा दिवस ठरलेला असावा.
आरक्षणाबद्दलचे गैरसमज आणि वास्तविकता
श्री दिवाकर मोहनी आपल्या लेखात (आ.सु. नोव्हेंबर, २००२) जातीनिहाय आरक्षणाचे पाऊल अर्थकारणाच्या दृष्टीने चुकीचे ठरले की काय अशी शंका घेण्यास (आज) पुष्कळ जागा आहे असे सांगून आरक्षणामुळे कोणतेही उत्पादन न करता व किंवा केलेच तर दुय्यम, तिय्यम दर्जाचे कस्न हक्क म्हणून मिळवावयाची रक्कम असे त्याला स्वरूप आले व परिणामी देशाचा नैतिक दर्जाच घसरला असे म्हणतात. श्री मोहनी यांच्या ह्या निष्र्कषानिमित्ताने आरक्षणाच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने या लेखाची गरज भासली व म्हणूनच लिहिण्याची तसदी घेतली आहे.
आरक्षणामुळे काही दलित/आदिवासी सरकारी कर्मचारी आपल्या कामात कामचुकारपणा कस्न ‘मुर्गी-चोरी’ सारखे छोटे गुन्हे करीत असतील असे जरी कबूल केले तरी त्यांचे हे गुन्हे इतर उच्चपदस्थ अधिकारी, जे बहुधा उच्चवर्णीयच असतात, ह्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारांच्या मोठ्या देशद्रोही गुन्ह्यांच्या प्रमाणात किती-तरी क्षुल्लक आहेत.
वैसार्थ
ब्रह्म, ब्रह्मज्ञान व ब्रह्मसाधना या तीन्हीसाठी ‘परमार्थ’ हा शब्द संत वापरतात. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ व अर्थ म्हणजे ज्ञेय वस्तू. म्हणून अनंत ज्ञेय वस्तूंमधील सर्वोत्कृष्ट वस्तू शोधून काढणे हाच परमार्थ. ब्रह्म किंवा आत्मा ही सर्वोत्कृष्ट वस्तू आहे म्हणून त्याचे ज्ञान म्हणजेच परमार्थ (दासबोध दशक १ समास ९). ब्रह्म कधी न ढळणारे अनंत, स्थिर आहे. ते कल्पनारहित आहे. ब्रह्मांडात ब्रह्मासारखे दुसरे काही नाही. केवळ सद्गुरूपदेशाने त्याचे ज्ञान होते व ते अनुभवावे लागते, वर्णन करिता येत नाही. (दासबोध दशक ७ समास २)
आत्म्याच्या प्रथम संकल्पनेसाठी ब्रह्म ही कल्पना प्रथम वैदिक काळात रुजू झाली.