विषय «इतर»

शेती: काही सामाजिक, काही आर्थिक, काही तांत्रिक

१. भारत आजही खेड्यांचा आणि कृषिप्रधान देश आहे. जवळ जवळ ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे आणि तिचा चरितार्थ शेतीकामाशी जोडलेला आहे. अमेरिका एक तृतीयांश जगाला जेवायला घालते पण तिला आपण कृषिप्रधान म्हणत नाही कारण तिची ५-६ टक्के लोकसंख्याच शेतीकामात गुंतलेली आहे. भारतात ४० टक्के प्रजा दारिद्र्यरेषेखाली आहे. याचा अर्थ असा की एक जेवण झालेकीच तिला पुढच्या जेवणाच्या काळजीने पछाडलेले असते. गाडगीमडकी आणि चिरगुटे हीच त्यांची संपत्ती. एरवी ती पूर्णपणे कफल्लक आहेत. अशी सदैव भुकेच्या विवंचनेत वावरणारी माणसे आपली जीवनेच्छाच हरवून बसलेली असतात.

पुढे वाचा

“धर्मप्राय” श्रद्धा

आ.सु.(१२.५) मध्ये श्री. सुधीर बेडेकर यांचे ‘धर्मश्रद्धा आणि दि. के. बेडेकर’ हे टिपण प्रसिद्ध झाले आहे. आंदोलन या मासिकाच्या ऑगस्ट २००० च्या अंकात माझा ‘धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्याचा संक्षेप आ.सु. (११.८) मध्ये प्रसिद्ध झाला व त्यावर श्री. दि. य. देशपांडे यांची टिप्पणीही प्रसिद्ध झाली. प्रस्तुत संक्षेप मी केला नव्हता; तसेच, तो मला दाखवून संमतही करून घेतला नव्हता, ही वस्तुस्थिती येथे नोंदवणे आवश्यक आहे.
दि. के. बेडेकर यांच्या भूमिकांविषयी गैरसमज होऊ नये, त्यांच्या भूमिकेचा विपर्यास केला जाऊ नये, याविषयी सुधीर बेडेकर यांच्याशी माझे शंभर टक्के एकमत आहे.

पुढे वाचा

विनाश पर्व

अकरा सप्टेंबर दोन हजार एक. एकविसावे शतक उदयाचली असतानाच महासत्ता अमेरिकेवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला. आर्थिक सत्तेचे केंद्र असलेल्या न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे गगनचुंबी जुळे मनोरे आणि संरक्षण व्यवस्थेचा किल्ला पेंटॅगॉनच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. आणि अमेरिकेसकट जग सैरभैर झाले.
महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक व विख्यात विचारवंत श्री. कुमार केतकर हे त्यावेळी शिकागोहून न्यूयॉर्ककडे निघण्याच्या तयारीत होते. हतबुद्ध अमेरिकेतील स्पंदने ते इ-मेलने मित्रांपर्यंत पोहोचवत होते. त्या पत्रांतील निवडक भागाचा भावानुवाद.
प्रिय मित्रांनो,
अमेरिकेतील मूड संताप, धक्का, हतबलता, असहाय्यता, दुःख, सांत्वन, आशा, सहकार्य, करुणा, धीर, मदत इ.

पुढे वाचा

गॉड इज डेड

गॉड इज डेड असे कुणीतरी हट्टी तत्त्ववादी मागेच सांगून गेला म्हणे. असेलही कदाचित हे सपशेल खरे किंवा धादान्त खोटेही अथवा अर्धे खरे अर्धे खोटे. पण ज्या काळी तू खऱ्या अर्थाने जिवंत होतास तेव्हा तरी काय दिवे लावलेस? सोळा सहस्र गवळणींसह नाचलास आपल्या बायकोसह वनात
चालता झालास रोजच घडणारे आम रस्त्यावरचे इन-मिन-तीन सीन बघून सारा संसार असार म्हणत महाशून्यात पसार झालास किंवा सर्वांगावर खिळे ठोकून घेत शेवटी आपलीच मान खाली घातलीस वा स्वतःचाच देह चरकात पिळून घेत त्याचे सताड चिपाड केलेस: आणि ज्या क्षणी हा तुझा पवित्र-पीडित अन्तरात्मा चाबुकराणीचा रोग लागलेल्या उसागत शेंड्यावर निमूळ होत होत दिवंगत झाला तेव्हा तुझ्या ह्या ग्यानी अनुगामी भक्तांनी तुलाच आकाशात व पाताळात समुद्रात नी पहाडात ढकलून दिले (आगामी सिसिफसच्या गड चढणीसाठी) इतकेच नव्हे तर म्हातारी मेली उन्हाळ्यात नी रड आला पावसाळ्यात या म्हणीनुसार त्याच बिलंदर बुकींनी इहलोकाशी विचित्र फिक्सिंग करून तुझ्या अज्ञात व अदृष्ट गढी-मढी वर मोठमोठाली देवळे — रावळे पुतळे व मकबरे उभारलेत, कला आणि साहित्य याचे उदंड पीक अशाच मूठ मातीतून तरारलेत असे नंतरचे शोधकर्ते सांगतात: आणि आजकाल तर सारा आनंदी आनंदच परमेश्वरा!

पुढे वाचा

सांस्कृतिक नेतृत्व?

महाराष्ट्रातील सांस्कृतिक नेतृत्वाने (पत्रकार, विचारवंत, संपादक, लेखक, कवी इत्यादी) या बदलत्या जगाचे, माध्यममाहितीच्या क्रांतीचे, विज्ञान-तंत्रज्ञानाचे, दोलायमान मनःस्थितीचे आणि बहुसांस्कृतिकतेचे आव्हान विचारा तही घेतलेले नाही. आपल्या मानसिकतेच्या भौतिक (जातीय आणि भाषिक) कक्षा रुंदावल्या नाहीत. आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत आणि अर्जेटिनापासून ऑस्ट्रेलिया-पर्यंत जे नवे प्रवाह साहित्य-संस्कृतीत येत होते, लोकांचे दैनंदिन जीवन बदलत होते, नवी मूल्ये तयार होती, नाती बदलत होती, त्यांची दखल घेतलेली नाही.
या सर्व जगडव्याळ घटनांचा संस्कार साहित्यातून प्रगट व्हायला ‘साहित्याचे राजकीय जागतिकीकरण’ होण्याची गरज नाही. अगदी कौटुंबिक, सामाजिक कथेतून वा राजकीय कादंबरीतूनही बदलणाऱ्या मानसिकतेचे चित्र रेखाटता येते.

पुढे वाचा

अक्कलखाते

यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही संस्था लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांना देशातील उद्योगांमध्ये ‘थेट’ गुंतवणूक करता यावी यासाठी घडली. सरकारी नियंत्रणाखाली आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या संस्थेत गुंतवलेले पैसे उद्योगांचे समभाग (शेअर्स) घेण्यासाठी वापरुन ही गुंतवणूक होत असते. बँका उद्योगांना कर्जे देतात तर युनिट ट्रस्ट थेट मालकीचा भाग विकत घेते, असा हा प्रकार असतो. सध्या यू.ट्र.ऑ.इं.ची यूएस ६४ ही योजना चर्चेत आहे. हिच्यात गुंतवणूक होती १४० अब्ज रुपये, आणि आज हिचा तोटा आहे ४५ अब्ज रुपये. काही उद्योगांचे समभाग अवास्तव किमतींना विकत घेतले गेले, व नंतर ते उद्योग अकार्यक्षम (किंवा फसवणूक करणारे) असल्याने तोटा आला, हे आता जगजाहीर झाले आहे.

पुढे वाचा

हक्क केवळ मातेचाच

वसंत पळशीकर यांच्या लेखात (आ.सु. सप्टें. २००१) पुढील विधान आहे. “मुलांना जन्म देणे, अर्भकावस्थेत त्यांचे पोषण व संगोपन करणे हे कार्य सामान्यपणे माता बनणाऱ्या स्त्रीचे राहावे हे स्वभाविक व इष्टही आहे. ते अटळही आहे.”
“एकदा मुलाचा जन्म झाल्यावर त्याचे पोषण व संगोपन करणे हे मातेचे काम व ते स्वाभाविक व इष्टही आहे” ह्या वसंत पळशीकरांच्या भूमिकेला माझा विरोध आहे. आपल्या मुलांचे संगोपन कुणी करावे हा मातेचा निर्णय आहे. आपल्या मुलांसाठी काय इष्ट आहे हे ठरवण्याचा हक्क फक्त मातेला आहे. तीच स्वतःची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेऊन स्वतःच्या व मुलांच्या हिताचा विचार करू शकते.

पुढे वाचा

ख्रिस्ती धर्माचा पराभव?

इंग्लंड आणि वेल्समधील रोमन कॅथलिक चर्चचे एक पुढारी गुरुवारी (६ सप्टेंबर २००१) एका मनमोकळ्या भाषणात म्हणाले की ब्रिटनमध्ये ख्रिस्ती धर्म जवळपास पराभूत झाला आहे.
बुधवारी (५ सप्टेंबर २००१) वेस्टमिन्स्टरचे आर्चबिशप कार्डिनल कॉर्मक मर्फी-ओकॉनर म्हणाले की आता शासनयंत्रणा व जनता यांच्या जीवनावर ख्रिस्ती धर्माचा कोणताही प्रभाव नाही. वाट चुकलेले (lapsed) कॅथलिक अश्रद्ध लोक व तरुण यांच्यापर्यंत ख्रिस्ती धर्म नेण्यास आता क्रांतिकारक पावले टाकायला हवी. टाईम्सच्या वृत्तानुसार कार्डिनल म्हणाले की आता सरकार व जनता यांच्या जीवनांना, सामाजिक व्यवहारांना आणि नैतिक निर्णयांना ख्रिस्ती धर्म पार्श्वभूमी पुरवत नाही.

पुढे वाचा

मुलांच्या बुद्धिमत्तेची जोपासना . . .

महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे ह्यांनी असे नमूद केले आहे की इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत भारतात पदार्थ-विज्ञान, रसायन-शास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित इत्यादी क्षेत्रात प्रगती होत होती. त्याचे प्रमुख कारण असे आहे की त्या काळात गुरुशिष्य परंपरा होती आणि शिष्य प्रत्येक बाबतीत गुस्ता अनेक शंका विचारीत असे, आणि गुरु शिष्याचे शंकानिरसन करीत असे. कपिल, कणाद, पाणिनी, पतंजली, चरक, सुश्रुत, चाणक्य इ. त्या काळातील अनेक नावे प्रसिद्ध आहेत. गीतासुद्धा अर्जुन-कृष्णाच्या प्रश्नोत्तरांतूनच निर्माण झाली. अर्थात गीतेतील संस्कृत भाषा ज्याप्रमाणे लिहिली गेली आहे त्यावस्न गीता इसवी सनाच्या चौथ्या शतकात लिहिली गेली असे प्रा.

पुढे वाचा

सामाजिक विकृतिविज्ञान

[शिवसेनेचे नेते आनंद दिघे ठाण्याजवळ एका अपघातात जखमी झाले. इस्पितळात उपाय योजना होत असतानाच ते वारले. ह्यात वैद्यांचा हलगर्जीपणा आहे असे मत बनवून शिवसैनिकांनी ते अद्ययावत खाजगी इस्पितळ नष्ट केले. ह्या घटनेबद्दल डॉक्टर जोशी लिहितात . . .]

वैद्यकक्षेत्रातील लोक व इतर विचारवंत यांनी शिवसैनिकांचा फक्त निषेध करणे पुरेसे नाही. सामाजिक विकृती व त्यांवरील उपाय शोधणे व ते अंमलात आणणे हा वैद्यकीय पेशांचा हेतूच असायला हवा.

काही वर्षांपूर्वी आजचा संतप्त भारतीय या मथळ्याच्या एका (मासिकातील) लेखात असे सुचवले होते की सामाजिक राग व असंतोषाचे नियमन करणाऱ्या पारंपारिक ‘सुरक्षा झडपा’ नष्ट होत असल्याने आजचे तणावपूर्ण जीवन हिंसाचाराच्या उद्रेकांपर्यंत जाऊन पोचते.

पुढे वाचा