विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

गंगाधर गलांडे
4 Aldridge Court, Meadway, High Wycombe, Bucks, HP11 1SE, UK
आ. सु. चे स्वरूप सुधारण्याबद्दल मूळ उद्दिष्टाकडे दुर्लक्ष नको
अंकांतले श्री. श्रीराम गोवंडे यांचे पत्र वाचल्यावर मनात आलेले विचार :
आजचा सुधारकचे संपादक व संपादक मंडळ यांच्या वाचकांच्याविषयी (वर्गणीदारांची संख्या, त्यांची वैचारिक/बौद्धिक पातळी, दर्जा, इत्यादि विविध दृष्टिकोनांतून) काय अपेक्षा आहेत, तसेच वाचकमंडळींची संपादकांकडून,व मासिकाकडून काय अपेक्षा आहेत अशी छाननी/तपासणी करताना मासिकाचे मूळ हेतू, मूळ उद्दिष्ट यांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.
__आता अकराव्या वर्षांत पदार्पण करताना ३७६ ‘आजीव वर्गणीदार’ लाभलेले आहेत आ.सु.ला

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस,
मी आपल्या आजचा सुधारकचा एक वाचक. अनेक वैचारिक आणि संशोधनात्मक लेख वाचून समाधान वाटते. मी आज न राहवून केशवराव जोशी यांच्या फेब्रु. २००० च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘ब्राह्मणेतर चळवळ’ या लेखा-बद्दल लिहीत आहे. त्यातील काही वाक्ये अत्यंत बेजबाबदार आणि पूर्वग्रहदूषित वाटतात. त्यांची डॉ. आंबेडकरांविषयी दूषित भावना आहे हे त्यांच्या अनेक ओळींवरून दिसते. ते म्हणतात, “ ‘बुद्धिवादी बॅ. आंबेडकर वृद्धापकाळी व विमनस्क परिस्थितीत म्हणू लागले की, बौद्ध धर्मात गेल्याशिवाय गती नाही.’ अस्पृश्य बौद्ध झाले तरी त्यांचे प्र न सुटलेले नाहीत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजचा सुधारक, जानेवारी २००० मधील नंदा खरे यांचा ‘एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा’ हा लेख परत परत वाचला. इथे कै. मृणालिनी देसाई, या गांधीवादी लेखिकेची आठवण होणे अपरिहार्य आहे. ज्या काळी मिश्रविवाह हेच एक धाडस होते, त्या काळात महाराष्ट्रीय मृणालिनीने गुजराती पतीशी विवाह केला. पतीच्या कुटुंबात ती समरस झालीच पण देसाई कुटुंबीयांनीही या बहूचा प्रेम-आदर राखला. गुजराती समाजात, विवाहप्रसंगी झडणा-या जेवणावळी पाहून गरिबांचा कळवळा असणा-या मृणालिनीने अशा प्रसंगी न जेवण्याचा निर्णय घेतला. नवी बहू ‘नाही’ म्हणतेय हे पाहून हळूहळू सर्व देसाई कुटुंबानेच अशा जेवणावळींवर बहिष्कार घातला.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस,
डिसेंबर ९९ चा आपला अंक मिळाला. मी गेली ९ वर्षे आपले मासिक नियमित व काळजीपूर्वक वाचले आहे. ते मला आवडलेही आहे. त्याने मला विचार करायची दिशा दाखवलेली आहे. तसेच देव, धर्म, जात व त्या संबंधित विषयाचे विचार मी वाचले व पटले आहेत.
लेखक, विषय, तेच तेच आपण प्रसिद्ध करता आहात. एखाद्या यत्तेत चांगल्या प्रकाराने पास झाल्यावर त्या वर्गातच परत बसून शिकल्यावर जसे वाटते तसे मला वाटत होते. म्हणून ह्यापुढे आपले मासिक पाठविणे बंद करावे. दुस-या मासिकाची वर्गणी मी भरली आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

दोन महिन्यांपूर्वी श्री. मोहनी येथे आले होते त्या वेळी डिसेंबर महिन्यात पुण्यात काही कार्यक्रम घेण्याचे विचार बोलले होते. त्याचे पुढे काय झाले? आम्हाला नागपूर एका बाजूस पडल्यासारखे वाटते. पश्चिम महाराष्ट्र वैचारिक बाबतींत बराच पुढारलेला आहे. आपल्या विचाराच्या पूर्व-पश्चिम महाराष्ट्रातल्या मंडळींना एकमेकांस पाहू दे तरी. मग विचार सुरू होतील. एखादी मध्यवर्ती जागा घेतली तरी चालेल. वैचारिक वादळ जोराने सुरू झाले आहे. आपल्या विचारांना गती देणे जरूर आहे. आपल्या सल्लागार मंडळीपुढे हा विचार मांडावा.*
श्री. वा. किर्लोस्कर
४४७, सिंध हौ. सोसायटी, औंध, पुणे – ४११ ००७
*टीप : आता पुणे येथे जानेवारी ६ रोजी सायंकाळी ६ वाजता साधना सभागृहात वाचक मेळावा घेत आहोत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

नोव्हेंबर ‘९९ चा आजचा सुधारकचा अंक वेगळा व लक्षणीय वाटला. लेखांचे विषय अधिक वैविध्यपूर्ण व समाजापुढील वेगवेगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे वाटले. अभिनंदन!
डॉ. सुभाष आठले
२५,नागाळा पार्क,
कोल्हापूर – ४१६००३

संपादक, आजचा सुधारक, यांस,
नोव्हेंबरचा अंक खूप माहितीपूर्ण वाटला. समान्यपणे १ ल्या पानांवर थोर व्यक्तींच्या लेखनातील एखादा महत्त्वाचा मुद्दा उद्धृत केलेला असतोच. यावेळच्या अंकातील हमीद दलवाईंचे मुस्लिम समाजाच्या सामाजिक सुधारणाबाबतचे विचार दिलेले आहेत. त्यातील शेवटचे वाक्य तर फारच महत्त्वाचे आहे.
पूर्वीच्या एका अंकातील ‘संपादकीया’ वर मी टीकाटिप्पणी कळवली होती व आपण ती छापलीही होती.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
जून महिन्याच्या अंकातील श्री. किर्लोस्कर, श्री. पांढरे यांचे पत्र आणि संपादकीय मला खूप आवडले. श्री. किर्लोस्करांचा लेख चांगला आहे असे म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे होय. त्यांचे भारतीय संस्कृती आणि बुद्धिवाद आणि चार्वाक ही नाटके माझ्या संग्रही आहेत.
परंतु त्यांनी मूर्तिभंजक होण्यास सांगितले आहे ते मात्र तितकेसे पटत नाही. याबाबत लो. टिळकांची गोष्ट सांगतो. लोकमान्य टिळकांकडे एकदा शिवराम महादेव परांजपे गेले आणि त्यांना म्हणाले की, “तुम्ही सशस्त्र लढ्याची घोषणा का करीत नाही?” त्यावर टिळक म्हणाले, “तू मला ५०० माणसे अशी आणून दे, की जी मरावयास तयार आहेत.”

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. भाटे ह्यांनी रास्त सल्ला डावलला
संपादक, आजचा सुधारक यांस,
आ. सु. च्या जुलै १९९९ च्या अंकात दुस-याच्या मताचे खंडन करायचे असेल तर ते कसे करावे याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ललिता गंडभीर यांची चर्चा या सदरातील टीप (“हिंदू कोण?”) पाहावी. तसेच निकृष्ट तथा सदभिरुचिहीन खंडन कसे करावे याचा नमुना म्हणून त्याच अंकात अनिलकुमार भाटे यांचा लेख (“दि. य. देशपांडे यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ”) पाहावा, गंभीर यांनी अत्यंत मुद्देसूदपणे, कमीत कमी शब्दांत, आपले म्हणणे मांडले असून त्याचा रोख संपादकाचा अगर कुणाचाही उपमर्द करण्याकडे नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

मनुष्याचा आत्मा अन् विज्ञान
संपादक, आजचा सुधारक यांस,
प्रस्तावना : मनुष्याचा आत्मा व विज्ञान. यांमधील परस्पर संबंधावर इंग्लंडमधील फिजिक्स वर्ल्ड (मे १९९२) या नियतकलिकात काही वेधक विचार वाचावयास मिळाले. त्यांचा स्वैर व संक्षिप्त अनुवाद येथे दिला आहे. मनुष्य जी बुद्धिमत्तेची कामे करू शकतो, त्यांचा कर्ता असतो त्याचा आत्मा. ही संकल्पना होती देकार्त यांची! याच अर्थाने (फंक्शनल) येथे आत्मा ही संज्ञा वापरली आहे. इंग्लंडमध्ये वैज्ञानिक विचाराची एक दीर्घ परंपरा आढळते. आधुनिक विज्ञानाचा आद्यप्रणेता न्यूटन याचा जन्म इंग्लंडमध्येच झाला होता. त्यानंतरच्या सुमारे दोनशे वर्षांच्या कालखंडात ज्या युरोपिअन देशांनी विज्ञानाचा विकास करण्यास साहाय्य केले त्यांमध्ये इंग्लंडचा सहभाग महत्त्वाचा होता.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आविष्कारस्वातंत्र्यावर गदा
संपादक आजचा सुधारक
श्री. स. ह. देशपांडे ह्यांनी ए. डी. गोरवाला ह्यांच्याबद्दलच्या लेखात असे ध्वनित केले आहे की ‘‘सरकारी सत्ता आविष्कारस्वातंत्र्यावर गदा आणू शकते’ इ. परंतु हे फक्त सरकारंपुरते मर्यादित नाही. सर्वच प्रस्थापित सत्ता आविष्कारस्वातंत्र्य दडपतात. त्याची दोन उदाहरणे –
1) Tunes of India 11-10-84. A. D.Gorwala handed ove editorship of Opinion to J. R. Patel. But an article about G. D. Birla was refused for publication in Opinion by Patel and then A. D. Gorwala closed Opinion in Sept.

पुढे वाचा