प्रा. शेषराव मोरे यांनी वाचकांचा त्यांच्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून केलेला खुलासा माझे आक्षेपच अधिक बळकट करणारा आहे. माझ्या परीक्षणाचा एकूण रोख जाणीवपूर्वक लक्षात न घेता त्यांनी आत्मसमर्थनार्थ बरीच मखलाशी केली आहे. जाणीवपूर्वक हा शब्द मी मूळ परीक्षणातही मुद्दाम दुहेरी अवतरणचिन्हांत टाकला होता। (आजचा सुधारक – १९९२ पृ. २७६). फडके-पळशीकरादी टीकाकार फक्त सावरकरांची बदनामी करण्यासाठीच किंवा त्यांच्यावर खोटीनाटी टीका करण्यासाठीच लिहितात अशा आशयाची डझनोगणती वाक्ये प्रा. मोरे यांच्या ग्रंथात आहेत. माझा प्रश्न एवढाच की या संशोधकांचे हे हेतू’ एवढ्या ठाम शब्दांत मांडण्याजोगे कोणते पुरावे लेखकापाशी आहेत?
विषय «पत्र-पत्रोत्तरे»
पत्रव्यवहार
संपादक,आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
प्रा. रूपा कुलकर्णी ह्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्याचे वाचले. त्यांचे अभिनंदनसुद्धा केले गेले. वास्तविकरीत्या आपण ज्या देशाचे नागरिक आहोत, त्या देशाच्या घटनेचे आणि इतर कायदेकानूंचे पालन केले की, ह्या पृथ्वीतलावर सुखाने जगण्यास ते पुरेसे आहे.
भारताच्या घटनेनुसार धर्म ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे. व्यक्ती कोणत्या धर्माची आहे, ह्याच्याशी शासनाला कर्तव्य नाही. सर्वच धर्म पारलौकिक समाधान कशा प्रकारे मिळावे ह्यासाठी आहेत. इहलौकिक समाधानासाठी धर्माची जरुरी नाही.
ज्येष्ठ नागरिक नात्याने इंग्रजी म्हण सांगावयाची झाली तर व्यक्ती वयाच्या साठीनंतर शहाणी झाली असे समजतात.
सेक्युलरिझम : प्रा. भोळे-पळशीकर यांना उत्तर
‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या संपादकांनी ‘धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) या विषयावर एक परिसंवाद घ्यावा या हेतूने प्रा. भा. ल. भोळे आणि श्री वसंत पळशीकर ह्या महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंतांकडून एक दहा कलमी प्रश्नावली तयार करून घेऊन एप्रिल १९९१ च्या अंकात प्रकाशित केली. अनेक लेखकांनी ह्या उपक्रमांला प्रतिसाद देऊन आपापले विचार मांडले. मीही गेली ३०-४० वर्षे सेक्युलरिझम ह्या विषयावर लिहीत, बोलत असल्याने ‘आजचा सुधारक’मध्ये तीन लेख लिहिले.
गेल्या शंभरसव्वाशे वर्षांच्या इतिहासात आपल्या देशाला विनाशाकडे खेचून नेणार्या ज्या समस्येने आजच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे आणि ज्या समस्येची सोडवणूक अद्यापही होऊ शकली नाही ती समस्या म्हणजे हिंदु आणि मुस्लिम या दोन प्रमुख धार्मिक लोकसमूहांतील संघर्ष ही होय.
निसर्ग आणि मानव : श्री वसंत पळशीकरांना उत्तर
१८ जुलैच्या साधनेत श्री नानासाहेब गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या उत्तरार्धात नानासाहेबांनी गांधीवादी पर्यावरणवाद्यांवर परखड टीका केली आहे. तिला श्री वसंत पळशीकरांनी २९ ऑगस्टच्या साधनेत उत्तर दिले आहे. त्या उत्तरावरील ही प्रतिक्रिया.
ज्याला आपण निसर्ग म्हणतो तो प्रथमतः भौतिक, निर्जीव पदार्थांचा आणि शक्तींचा, आणि नंतर वनस्पती आणि प्राणी यांचा, त्यांच्या जीवनव्यवहारांचा बनलेला आहे. यांपैकी भौतिक निसर्ग हा पूर्णतः अचेतन, निर्जीव अशा शक्तींचा आणि त्यांच्या घडामोडींचा वनलेला आहे; परंतु निसर्गाचा जो भाग वनस्पती आणि प्राणी यांचा बनलेला आहे त्यात जीव, संज्ञा, हेतुपुरस्पर कृती या गोष्टी आढळून येतात.
पत्रव्यवहार
समतावादी कुटुंब!
संपादक आजचा सुधारक यांस,
ऑक्टो. ९२ च्या ‘आजचा सुधारक’मध्ये ‘विवाह आणि नीती-आमची भूमिका’ या संपादकीयात समतावादी कुटुंबाची केलेली तरफदारी केवळ भयानक आहे. समतावादी कुटूंब कोणाला नको आहे? प्रत्येक गृहस्थाला व गृहिणीला ते हवेसे वाटते. ते सहजी होणारे नाही हे खरे, पण प्रयत्नसाध्य तर आहेच. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ह्या व्यवहार्य तत्त्वालाही कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण वरील संपादकीयात तथाकथित समतावादी कुटुंबाची ज्या पद्धतीने भलावण केली गेली आहे ती समाजस्वास्थ्यावरच घाला घालणारी आहे.
कामप्रेरणा ही भुकेसारखी स्वाभाविक व प्रबल प्रवृत्ती असल्याने तिची पुरुषार्थात गणना होऊन तिला वाट मिळून विवाहसंस्थेत तिचे उदात्तीकरण झालेले आहे.
पत्रव्यवहार
श्री. संपादक आजचा सुधारक
स. न. वि. वि.
श्री. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी माझे वाक्य उद्धृत करताना त्याच वेळी, दुसऱ्या अंगाने हे शब्द गाळले आहेत. सावरकरांच्या सुधारणेची प्रेरणा त्यांच्या अनुयायांवर जे परिणाम घडवून आणताना दिसते त्याकडे मला लक्ष वेधायचे होते. सुधारणेमागील प्रेरणा आणि परिणाम यांचा काही अंगभूत संबंध आहे असे मला सुचवावयाचे होते. त्यांनी सावरकरांचे जे युक्तिवाद उद्धृत केले आहेत ते लक्षात घेतलेच पाहिजेत यात शंका नाही. ते ध्यानात घेऊन मी माझी मांडणी सुधारून घेऊन असे जरूर म्हणेन की, सावरकरांच्या सुधारणाकार्याची प्रेरणा संमिश्र व गुंतागुंतीची होती.
पत्रव्यवहार
श्री. संपादक,
आजचा सुधारक स.न.वि. वि.
श्री केशवराव जोशी यांना पळशीकरांनी दिलेले उत्तर वाचले (आजचा सुधारक, ऑगस्ट ९२). सावरकरांची ‘धार्मिक-सामाजिक सुधारणेमागची प्रेरणा …. माणसांना कडवी, आंधळी, निरुंद, निर्दय, वैरवृत्तीची बनविणारी, विध्वंसक व विनाशक होती, असे पळशीकर म्हणतात. हिंदुसमाज बलवान करण्यासाठी सावरकरांना समाजसुधारणा हवी होती, त्यामागे न्याय, माणुसकी ही प्रेरणा नव्हती, असा आरोप समोर ठेवून पळशीकरांनी हे विधान केलेले आहे.
मी थोडाबहुत सावरकर वाचलेला आहे. अस्पृश्यता पाळणे म्हणजे ‘मनुष्यत्वाविरुद्ध अत्यंत गर्छ असा अपराध करणे होय असे सावरकर म्हणतात (खंड ३, पृ.४८३). न्यायाच्या दृष्टीने, धर्माच्या दृष्टीने, माणुसकीच्या दृष्टीने ते कर्तव्य आहे, म्हणूनच अस्पृश्यतेचे बंड आपण हिंदूंनी साफ मोडून टाकले पाहिजे.
चर्चा-केशवराव जोशी यांच्या पत्रास उत्तर
श्री. केशवराव जोशी यांचा मी आभारी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव मी उल्लेख केलेल्या नामवलीत घेणे शक्य होते. पं. नेहरूंनी, सावरकरांप्रमाणे, जाणीवपूर्वक समाजसुधारणेचे कार्य केले असे म्हणता येणार नाही. जसे रानड्यांचे शिष्य नामदार गोखले यांनीही केले नाही. पण या दोघांचेही जीवन व कार्य सामाजिक सुधारणांना उपकारक ठरले. पं. नेहरू दीर्घकाळ पंतप्रधान नसते तर केंद्रशासनाचे वळण जेवढे सुधारणांना अनुकूल राहिले तेवढेही राहिले नसते हे अगदी शक्य आहे.
मला जो मुद्दा करावयाचा होता त्या दृष्टीने सावरकरांचे नाव तेथे घेणे आवश्यकचहोते असे मात्र नाही.
पत्रव्यवहार
प्रा. काशीकर ज्या स्टीफन हॉकिंगचे संदर्भ देतात त्या (आजचा सुधारक, मे-जून ९२) प्रोफेसर हॉकिंग यांचेबद्दल थोडी अधिक माहिती वाचकांना नसल्यास करून द्यावीशी वाटते. डॉ. स्टीफन हॉकिंग (वय वर्षे ५०) हे केंब्रिज विद्यापीठात थिऑरेटिकल फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड व नंतर केंब्रिज विद्यापीठात झाले व वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी १९६६ मध्ये “Universe could have sprung from a singularity, and there is a singularity in our past” हा विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीआपला Ph.D. चा प्रबंध मांडला व तो सर्वमान्यही झाला.
वयाच्या २१ व्या वर्षापासून हॉकिंग यांना ‘अ-मायोट्रॉफिक स्क्लरोसिस’ या भयानक रोगाची प्रारंभिक लक्षणे दिसू लागली.
प्रा. काशीकरांचा नवविवेकवाद!
गीतेवरील माझ्या लेखावर प्रा. श्री. गो. काशीकर यांनी घेतलेल्या आरोपांना मी जे उत्तर दिले ते त्यांना पटले नसून त्यांनी आता नवविवेकवादाची गरज आहे’ या शीर्षकाचे प्रत्युत्तर पाठविले आहे. हे प्रत्युत्तर या अंकात अन्यत्र छापले असून त्याबद्दलची माझी भूमिका येथे देत आहे.
प्रथम मी प्रा.काशीकरांचे आभार मानतो, कारण त्यांनी एका गोष्टीकडे माझे लक्ष वेधले आणि माझा एक गैरसमज दूर केला. माझी अशी समजूत होती (आणि अजूनही बर्या च प्रमाणात आहे) की विश्वाची उत्पत्ती हा विषय वैज्ञानिक पद्धतीच्या आटोक्यात नाही. काही वैज्ञानिक विश्वरचनेच्या (cosmology) क्षेत्रात काम करीत आहेत हे मला माहीत होते.