मेरसोलचा सूर्य 

‘आऊट सायडर’ ही कादंबरी माहीत आहे ना? अल्बेर कामूची ? तिचा नायक मेरसोल. कामूने त्याच्याबद्दल म्हटले आहे, “आजच्या युगाला हवा असेलला तो येशू ख्रिस्त आहे. ” मेरसोल तर एक सामान्य कर्मचारी होता. सामान्याचे आयुष्य जगणारा. बहुधा परवडत नाही म्हणून लग्न न केलेला. त्याच कारणासाठी बहुधा आईला वृद्धाश्रमात ठेवणारा. सिनेमे पाहणे, पोहायला जाणे आणि मैत्रिणीबरोबर भटकणे असे चार-चौघांसारखे आयुष्य जगणारा. तो आजच्या युगाचा येशू कसा? 

त्याच्यावर खुनाचा आरोप असतो; तो खराच असतो-मेरसोलही ते नाकारत नाही. त्याला फाशीची शिक्षा होते- मेरसोलची त्याबद्दलही तक्रार नसते; उलट तो म्हणतो, मला फाशी द्याल तेव्हा माझ्या निषेधाच्या घोषणा देणारा जमाव माझ्याभोवती राहील एवढी व्यवस्था करा.

पुढे वाचा

राष्ट्रपतिपदाची तिरकी चाल: बाबूजी ते बीबीजी! (भाग-३) 

निवृत्तलेले जनाब ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि व्याकरणतज्ज्ञांना आणि फलक रंगाऱ्यांना बुचकळ्यात टाकणाऱ्या (कारण राष्ट्रपती’ या शीर्षकात ‘बीबीजी’ला कसे बसवणार?) सौ. प्रतिभा देवीसिंग शेखावत (पूर्वीच्या कु. प्रतिभा नारायण पाटील) या दोघांचा या लेखात समाचार घ्यायचा आहे. तत्पूर्वी काही फुटकळ बाबी स्पष्ट केल्या पाहिजेत. 

प्रस्तुत वैचारिक मासिकाशी अत्यंत घनिष्ठता असणाऱ्या खरे टाऊनच्या विख्यात विचारक मित्राने ‘तुमच्या लिखाणात अंतर्मुख करणारे काही नाही’ असा सूर काढला आहे. त्याचप्रमाणे इतरांनी ‘इंडिया टुडेच्या ओंजळीने पाणी पिण्यावरही आक्षेप घेतला आहे. (नुकत्याच संपन्न झालेल्या प्रांतिक थिऑसॉफिस्ट फेडरेशन’ आणि ‘अंताराष्ट्रिय संस्कृत संमेलना’त भेटलेल्या परग्रामस्थ मित्रांनी पाठही थोपटली आहे.)

पुढे वाचा

राज्यघटनेत सुधारणा – प्रतिक्रिया 

डॉ. सुभाष आठले यांचा राज्यघटनेत सुधारणा हा लेख वाचला. ह्या सुधारणा अमलात येणे शक्य नाही हे स्पष्टच दिसते व त्याच्या कारणांची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. अगदी या सुधारणा अंमलात आल्या तरी मिळणारा राजधर्म सध्यापेक्षा नक्की चांगला असेल असे सांगणे अवघड आहे. (उदा. समजा कॉंग्रेस निवडून आली तर सगळ्या गोष्टी ठरवणार कोण? सोनियाजीच ना!) असल्या किरकोळ गोष्टी आपण सोडून देऊ. 

साधारणपणे या लेखातून व्यक्त झालेला मुद्दा हा बुद्धिमत्तेचा आहे. म्हणजे तुम्ही एक पक्ष निवडून द्या आणि तो पक्ष बुद्धिमान लोकांचे (मग ते खासदार नसेनात का) एक मंत्रिमंडळ तुम्हाला देईल.

पुढे वाचा

प्रयत्नवादाचे फसवे तत्त्वज्ञान 

आपल्या काम-क्रोधादि षड्रिपूंवर मात करायची असेल तर त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे अशी शिकवण पारंपरिक साधुसंतांनी दिलेली आहे. आमचा सारा समाज अशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुद्धा अविरतपणे प्रयत्नवादाचा पुरस्कार करीत असतो. आमची प्रचलित शिक्षण पद्धती प्रयत्नवादावरच आधारलेली आहे. आई-वडील, शिक्षक, समाजधुरीण, आध्यात्मिक गुरु सारेच अव्याहतपणे आक्रोश करीत असतात “प्रयत्न करा, प्रयत्न करा.” 

आज मी हिंसाचारी असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अहिंसक बनू शकेन; आज मी मिथ्याचारी असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी सत्यनिष्ठ बनू शकेन आज मी चोरी करीत असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी अस्तेय व्रतधारी बनू शकेन आज मी संचय करीत असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अपरिग्रही बनू शकेन; आज मी कामलोलुप असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी ब्रह्मचर्यव्रती बनू शकेन अशा भाबड्या श्रद्धेने आत्म-निग्रह करण्याचा प्रयत्न लाखो साधकांनी केलेला आहे आणि आजही लाखो साधक असा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत. 

पुढे वाचा

अगा जें घडलेंचि नाहीं ! 

प्रिय वाचक, 

मागील एका संपादकीय संवादात (गड्या, तू बोलत का नाही?) आम्ही वाचकांना बोलण्याचे आवाहन केले होते. थेट त्याला स्मरून बहुधा, आमच्याकडे काही पत्रे आली आहेत. ह्या अंकातील पत्रांत त्यांतली दोन आहेत. कदाचित् त्याच वळणाने असेल आमच्या एका हितचिंतक वाचकाने एका पत्रात आमच्या पुष्कळ चुका दाखवल्या आहेत. त्याने म्हटले आहे की “जून-जुलै पासून आ. सु.त शुद्धलेखनाच्या, शब्दरचनेच्या तसेच वाक्य- रचनेच्या चुका ठळकपणे जाणवत आहेत.” त्यांची काही उदाहरणे दिली आहेत. त्यातले काना-मात्रेचे किरकोळ, ज्यांच्यामुळे अर्थहानी किंवा अर्थविपर्यास न झाला तरी तांत्रिक अर्थानि ते सदोष मुद्रण झाले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

पुढे वाचा

पत्रचर्चा 

सौ. सुमित्रा र. सराफ, डी/21, सुरस, पी.एम.जी. कॉलनीमागे, नरेंद्रनगर, नागपूर 440015, दूरध्वनी 0712-2747413. 

ऑक्टोबर ’07 च्या मुखपृष्ठावरील प्रेरक उताऱ्यावर – प्रतिक्रिया (1) 

उतरणीवरील आयुष्य 

मायेचा झरा कधी आटला 

हे कळलेच नाही । 

पक्षी उडाले ही जाणीव 

झालीच नाही. 

वाटतं नावांत, नातीत 

आपल्या परिवारात, 

प्रेमाच्या भोवऱ्यात 

गुंफून राहावे । 

वृद्धावस्थेत प्रेमाचे बोल 

त्यांच्यासाठी संजीवनीच असतात । 

नातांनी जवळ यावे, हट्टाने काही 

मागावे, त्यांच्याजवळ बसावे, पण 

छे: कोठले ते? 

त्यांना ताकीद असते ! 

त्यामुळे, आजी आजोबांचे 

नातेच नष्ट झाले असे वाटते । 

म्हणून वृद्धाश्रम बरा किंवा 

पैसा गाठीला असेल तर वेगळे खुराडे बरे । 

पुन्हा वरून सल्ला “आपले आपणच 

करावयास शिका.

पुढे वाचा

संपादकीयः श्रद्धा-अंधश्रद्धा-खरी(?) श्रद्धा

श्रद्धा म्हणजे दृढविश्वास. ज्याला अनुकूल पुरावा लागत नाही, प्रतिकूल पुरावा बाधत नाही; तरी तो कायम राहतो. जरासंधासारखा. उदाहरणार्थ, मनुष्य मेल्याने आत्मा मरत नाही. आत्मा अमर आहे असे शास्त्रांनी सांगितले त्या अर्थी ते खरे असलेच पाहिजे. ही श्रद्धा.
पुढे सत्ययुग येणार आहे. पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल असे गुरु महाराज म्हणतात, भगवान म्हणतात, पण त्यासाठी त्यांनी सांगितले तसे केले पाहिजे. अविश्वास दाखवू नका, विश्वास ठेवा. श्रद्धस्व!
सत्कर्म कोणते? दुष्कर्म कोणते ? योग्य कायह्नअयोग्य काय ? कशाने स्वर्गहह्नकशाने नरक लाभेल ? धर्म काय-अधर्म काय हे सगळे जुन्या जाणत्यांनी सांगून ठेवले आहे.

पुढे वाचा

खरी पूजा

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला झंडीच्या झुंडी अंगारिकेला जातात याबद्दल अंनिसने केलेली टीका मी वाचली. त्याबद्दल मला कीव वाटली तरी दुःख होत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश वाय.व्ही.चंद्रचूड हे त्या झुंडीत दर्शनासाठी उभे होते, (म.टा.ता.३०-०३-०५). हे वाचल्यावर अत्यंत दुःख वाटले. मी स्वतः पुण्याचा आहे. मला डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे शिकवायला होते. आम्हाला आगरकरांचे चरित्र ‘देव न मानणारा देवमाणूस’ हे पुस्तक अभ्यासाला होते. मी ८० वर्षांचा स्वातंत्र्यसैनिक आहे. माझ्यावर डॉ. सहस्रबुद्ध्यांचे बुद्धिप्रामाण्यवादाचे संस्कार दृढ झालेले आहेत. न्या. चंद्रचूड यांनी रुईया कॉलेजचे माजी प्राचार्य द. के. केळकर यांचे ‘बुद्धिवादाचा ध्रुवतारा’ हे पुस्तक आणि प्रा.

पुढे वाचा

हे ज्ञानिचि पवित्रता अखंड राहो

‘मराठवाडा’ या नावाने ३५ वर्षे आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ या नावाने १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या औरंगाबादेतील विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक मोठी घटना आहे. उच्चशिक्षण आधुनिक वळणाचे व काळानुरूप देण्याचा पाया मुंबईहून थेट मराठवाड्यात येऊन घालणारे डॉ. आंबेडकर आणि त्यांची दूरदृष्टी यांचे सुंदर फळ म्हणजे हा सुवर्ण महोत्सव ! बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाला मराठी तोंडवळा बहाल केला हीही एक मोठी कामगिरी मानली पाहिजे. मराठी संस्कृती व ब्रिटिश राजवट यांच्या संयुक्त विद्यमाने उर्वरित महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करीत असताना मराठवाडा मात्र उर्दू आणि निजाम यांच्या कचाट्यात सापडून मागासलेलाच राहिला होता.

पुढे वाचा

शोधः सर्वत्र सारखाच

तस्लिमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम सत्याऐंशी पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळे वाढवलेला, पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.
तस्लिमा ‘लज्जा’मुळे प्रकाशझोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी सहा महिने प्रकाशित झालेली. ‘फिटुं फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’ चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’ – ‘सूड’, ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला.
ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या पाच आवृत्त्या निघाल्या होत्या.

पुढे वाचा