नागरी समाजाची व्यवच्छेदक लक्षणे

व्ही. गॉर्डन चाइल्ड (१८९२-१९५७) हे विसाव्या शतकातले एक महत्त्वाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. मानवाने उभारलेल्या पहिल्या नगरांचे त्यांचे संशोधन मूलभूत होते. मानवसमाजाच्या विकासाच्या टप्प्यांसंबंधी त्यांनी महत्त्वाची सैद्धान्तिक मांडणी केली. अश्मयुग, ताम्र (ब्राँझ) युग, लोहयुग यांच्याऐवजी त्यांनी चार विकासटप्प्यांची योजना केली. अश्मयुग (पॅलिऑलिथिक) निओलिथिक, नागरी आणि औद्योगिक क्रांतीच्या विकासाची रचना त्यांनी मांडली. ते एक मार्क्सवादी विचारवंत होते. भौतिक बाबींवर अवास्तव भर दिल्याची आणि सांस्कृतिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांच्यावर केली जाते. असे जरी असले तरी त्यांनी नागरी विकासाचा मोठा कालपट उभा केला याबद्दल दुमत नाही.

पुढे वाचा

नागरी सामाजिक संबंधः तीन दृष्टिकोन

आधुनिक औद्योगिक आणि नागरी क्रांतीमुळे समाजव्यवस्थेवर मोठे परिणाम होत असल्याचे जाणून अनेक अभ्यासकांचे लक्ष सामाजिक संबंधांकडे वळले. पाश्चात्त्य विद्यापीठांमध्ये गेल्या दीडशे वर्षांत सामाजिक-शास्त्रांमध्ये मोठे संशोधन झाले. या अभ्यासातून तीन प्रकारचे मतप्रवाह निर्माण झालेले दिसतात. या तीन मतप्रवाहांची निर्मिती एका पाठोपाठ झाली असली तरी तीनही मतप्रवाह मानणारे त्यांचा सखोल अभ्यास करणारे विचारवंत आजही आहेत. या तीन मतप्रवाहांचा परिणाम देशांच्या सरकारी धोरणांवरही पडलेला दिसतो. तसेच त्या अभ्यासकांवर प्रचलित तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या घटकांचाही प्रभाव दिसतो. समाजातील घटकांचे, लोकांचे संबंध कसे आहेत, कसे असावे यावरही या अभ्यासकांनी काही टिपणे केली आहेत.

पुढे वाचा

नागरी प्रक्रिया

उद्योग, घरे आणि माणसे या तीन घटकांच्या एकत्रित संलग्न प्रक्रियेतून निर्माण होणारा भूभाग म्हणजे नागरी वस्ती. पोषक वातावरण मिळाले की ह्या घटकांमधून एखाद्या भूक्षेत्राचा विकास सुरू होतो. जसे जसे विकासाचे क्षेत्र विस्तारते तसा रिकामा भूभाग, परिसर इमारती, रस्ते अशा गोष्टींनी भरून जायला लागतो. यांच्या पाठोपाठ मालमत्तांनी, इमारतींनी व्यापलेला नागरी परिसर जुना होण्याची प्रक्रिया सुरू होते. कालांतराने अशा वस्तीमध्ये साचलेपणा, येऊ लागतो. वाढीचा काळ संपतो. वस्ती कुंठित होते. यासोबतच आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलायलाही सुरुवात होते. अशा वस्तीच्या क्षेत्रात सतत नवीन नवीन गोष्टींची भरत पडत राहिली नाही तर अशा वस्त्यांची वाढ आणि विकास होण्याऐवजी हे क्षेत्र जुनाट घरे, आणि बंद उद्योगांचे माहेरघर होते.

पुढे वाचा

भारतामधील पहिले नगर

भारतामधील पहिल्या नगराच्या उगमाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. मानवी संस्कृती ही नागरी समाजजीवनाशी आणि म्हणूनच नगरांशी निगडित असते. भारतामधील नगरांचा उदय हा आधुनिक यंत्रयुगाच्याही आधी किंबहुना सरंजामशाही काळाच्याही पूर्वी झाला होता.
गेल्या शतकापर्यंत पहिल्या भारतीय नगराचा पाया इ.स.पू. १००० वर्ष घातला गेला होता अशी समजूत होती. वायव्येकडून आलेल्या आर्यांच्या टोळ्या पूर्वेकडे, गंगा-यमुनांच्या खोऱ्यात पसरल्या आणि स्थिरावल्या. त्यानंतर पहिले महत्त्वाचे नगर, पाटणा हे उदयाला आले असे मानले जात असे. त्याला आधार होता तो संस्कृत पुस्तके, पोथ्या, गोष्टी आणि दंतकथांचा. पण १९२५ साली पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मोहन्-जो-दारो आणि हडाप्पा या दोन प्राचीन नगरांचे अवशेष सापडले, आणि या आधीच्या सर्व समजुतींना जोरदार धक्का बसला.

पुढे वाचा

भारतीय नागरी विकासाला अडसर ठरलेले दोन कायदे

भाडे नियंत्रण कायदा
भांडे नियंत्रण कायद्याचे दुष्परिणाम * भाड्यासाठी होणाऱ्या घरबांधणीमधील गुंतवणूक आटली. * उपलब्ध घरे भाड्याने देण्यावर बंधने आली. * इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीअभावी अकाली मोडतोड वाढली. * नगरपालिकांना मिळणाऱ्या मालमत्ता करामध्ये साचलेपणा आला. * कर उत्पन्न कमी झाल्याने नागरी सेवांवर दुष्परिणाम झाले. * घरमालक आणि भाडेकरूंच्या न्यायालयीन भांडणाची प्रकरणे वाढली.
शहरांमधील झोपडपट्ट्या वाढण्यामागे भाडेनियंत्रण कायद्याचा मोठाच वाटा आहे. या कायद्यामुळे घरांच्या तुटवड्यामध्ये प्रचंड वाढ झाली. गरीब आणि मध्यम उत्पन्न गटांचे लोक प्रामुख्याने भाड्याच्या घरांवरच अवलंबून असतात, ही गोष्ट जगभर आढळते. यामुळेच भाड्याच्या घरांची गरज ही फार मोठी असते.

पुढे वाचा

“सुलभ’ भारत

१)तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग अजूनही हाताने विष्ठा साफ करतात का ? जर ‘हो’, तर हे स्वतःच्या घरात करता की नगरपालिकेच्या स्वच्छतागृहात ?

२) तुम्ही वा तुमचे जवळचे नातलग घरी संडास नसल्याने उघड्यावर जाता का ? जर ‘हो’, तर हे गावात होते की खेड्यात ?

३) तुमच्या शाळेत संडास आहे का, की नसल्याने त्याची गरज पडल्यास तुमची गैरसोय होते? जर ‘हो’, तर तुम्ही हा प्रश्न कसा हाताळता?

४) तुमच्या टप्प्यात येणाऱ्या रेल्वे, बस स्थानकांवर, बाजारांत, धार्मिक व पर्यटनाच्या स्थळांमध्ये संडास आहेत का ?

पुढे वाचा

दुर्बोध!

तसेंच लोकस्थिति सुधारावयाची असेल तर ती आंतून सुधारली पाहिजे. लोकांमधील परस्पर-संबंध काय आहेत, त्यांनी स्थापिलेल्या संस्थांचे हेतु काय असतात, राजाचा अधिकार किती असावा आणि प्रजेचे हक्क कोणते आहेत, ते इतकेच कां असावेत आणि जास्त का नाहीत; धर्म, नीती, जाती इत्यादि बंधनें अस्तित्वांत कां आलीं व कशी आली हे व असलेच आणिक प्रश्न जे लाखों आहेत, त्यांवर समाजाची इमारत रचलेली आहे. तेव्हां या विषयांचे विवेचन ज्या ग्रंथांत येणार त्यांचे परिशीलनाने लोकस्थितींत अंतर पडेल यांत नवल ते कोणते ? उदात्त विचार, दूरदृष्टि, बुद्धीची कुशाग्रता, स्वातंत्र्याची प्रीति, आणि गुलामगिरीचा तिरस्कार, डामडौलाचा आळस, आणि साधेपणाची आवड, आपल्या देशाचा, भाषेचा आणि लोकांचा अभिमान, सत्याची चाड आणि सत्तेविषयी निर्भयपणा, मानसिक धैर्य, आणि सांग्रामिक शौर्य, निःस्पृहपणा आणि लांगूलचालनाचा द्वेष इत्यादि असंख्य सद्गुणांची स्फूर्ति अंतःकरणांत उत्पन्न होण्याला उत्तम ग्रंथाचे अध्ययनासारखा दुसरा मार्ग नाहीं.

पुढे वाचा

कृषि व ग्रामीण विकास (भाग-२)

महबूब उल् हक् ह्यांनी १९९० पासून मानव विकास अहवाल प्रकाशित करताना पारंपरिक अर्थशास्त्रीय विचाराला हादरे दिले व आव्हाने दिली. ती अशी:

(१)विकसनशील देशांनी काहीच प्रगती केली नाही असे समजणे/सुचविणे चूक आहे. त्यांची प्रगती देशोदेशांत कमीअधिक झाली असेल परंतु मानव विकासाचे निकष लावले तर त्यांनी बरीच प्रगती केली आहे.

(२)मानवविकासाकरता आर्थिक वृद्धी अनावश्यक आहे असे समजणे चूक आहे. आर्थिक वृद्धीशिवाय मानवी कल्याणात सातत्याची प्रगती होऊ शकत नाही. पण हेही समजणे चूक आहे. की आर्थिक वृद्धीने आपोआपच मानव विकास उच्च पातळीवर जाईल.

(३) दारिद्र्यनिर्मूलन हे उद्दिष्ट मानव विकासाच्या उद्दिष्टापेक्षा वेगळे आहे असे समजणे चूक आहे.

पुढे वाचा

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात स्त्रिया

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात शिरताना माझ्या दृष्टीला एक महान आंतराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेची प्रतिमा दिसत होती. तिथे तरुणतरुणींना मूलभूत आचारविचारांशी ओळख करून दिली जात असेल, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणात अडकलेल्यांना ते बंध तोडण्याच्या वाटा दाखवल्या जात असतील, वगैरे वगैरे, पण माझ्या तिथल्या चार वर्षांच्या वास्तव्यात मला शिक्षण आणि प्रगती यांच्यातली भिंत अभेद्य का आहे, ते कळले. एक महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यापीठाचा लिंगभेदाबाबतचा बुरसटलेपणा.

विद्यापीठात एक महिना काढल्यानंतर मला कळले की बारावीपर्यंतचे आणि पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम मुलींना व मुलांना वेगळे ठेवत असत. हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे का ?

पुढे वाचा

विवेकवाद – भाग २

(प्रथम प्रकाशन मे १९९० अंक १.२, लेखक – दि. य. देशपांडे) या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण ज्ञानक्षेत्रातील विवेकित्वाचा एक नियम पाहिला. तो नियम असा होता की ज्या विधानाच्या सत्यत्वाचा पुरेसा पुरावा उपलब्ध असेल अशाच विधानावर आपण विश्वास ठेवावा, आणि तो विश्वास पुराव्याच्या प्रमाणात असावा. तसेच विधानाचा पुरावा तपासण्याची शक्ती आपल्याजवळ नसेल तर त्या त्या ज्ञानक्षेत्रातील तज्ज्ञाला किंवा वैज्ञानिकाला प्रमाण मानावे.

नंतर आपण कर्मक्षेत्रातील विवेकाकडे वळलो, आणि आपली कर्मे विवेकी केव्हा होतील याचा विचार करण्यास आरंभ केला. आपल्या असे लक्षात आले की कर्माचा विचार आपण जसा साध्य म्हणून करू शकतो तसाच एखाद्या साध्याचे साधन म्हणूनही करू शकतो.

पुढे वाचा