विवाह आणि नीती (भाग ५)

ख्रिस्ती नीती
‘विवाहाची मुळे कुटुंबात रुजलेली आहेत, कुटुंबाची विवाहात नाहीत’ असे वेस्टरमार्क म्हणतो. हे मत ख्रिस्तपूर्व काळात उघडे सत्य म्हणून स्वीकारले गेले असते; परंतु ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर ते एक महत्त्वाचे विधान झाले असृन त्याचे प्रतिपादन त्यावर जोर देऊन करावे लागते. ख्रिस्ती धमनि, आणि विशेषतः सेंट पॉलने, विवाहाविषयी एक अगदी नवीन कल्पना मांडली: ती अशी की विवाह प्राधान्याने अपत्योत्पादनाकरिता नसून तो अविवाहितांमधील लैंगिक संबंधाच्या (fornication) पापाचे निवारण करण्यासाठी आहे.
सेंट पॉलची विवाहविषयक मते कॉरिंथमधील रहिवाश्यांना त्याने लिहिलेल्या पहिल्या पत्रात पूर्ण स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत.

पुढे वाचा

धर्म की धर्मापलीकडे?

तुम्हाला धर्म हवा की नको? ह्या प्रश्नाचे एका शब्दात नेमके उत्तर द्या, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. धर्म की धर्मापलीकडे? हा प्रश्नही काहीसा याच स्वरूपाचा आहे. समाजामध्ये ‘धर्म हवा’ असे म्हणणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात असतो, तर ‘धर्म नको’ असे म्हणून या वर्गाला विरोध करणारा दुसरा एक छोटा वर्गही आढळतो. या दोन वर्गांमध्ये आढळणार्‍या विरोधाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी या विरोधाचे ‘शाब्दिक’ अणि ‘वास्तव’ असे दोन प्रकार ध्यानात घेतले पाहिजेत.

शाब्दिक विरोध
शाब्दिक विरोधाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते. ‘धर्म’ या संज्ञेचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे, याविषयी प्रत्येक व्यक्तीच्या धारणा वेगवेगळ्या असतात.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, नवा सुधारक यांस
स. न. वि.वि

‘नवा सुधारक’ (जून) मिळाला.

तुम्ही दर महिन्याला वैचारिक खाद्य चांगले पुरवताहात याबद्दल धन्यवाद. रसेलची (विवाह आणि नीती) ही अनुवादित लेखमाला व श्रीमती पांढरीपांडे यांचा स्त्री दास्य याबद्दलचा लेख विचारप्रवर्तक आहेत. त्या अनुषंगाने मला दोन प्रश्न उपस्थित करायचे आहे. त्याबद्दल ‘ तयार उत्तरे’ नको आहेत. पण विचारमंथन हवे आहे.

“पुरुष हा बहुस्त्रीक (पॉलीगामस्) आहे व प्रकृतितः स्त्री तशी नाही ” हे विधान शास्त्रीयदृष्ट्या बरोबर आहे का? की त्यात पितृसत्ताक कुटुंबनीतीचेच दर्शन आहे? स्त्री पुरुषांतील प्रीती आणि त्या प्रीतीतील ‘एकनिष्ठा’ सहजात आहे की ‘अक्वायर्ड’ आणि ‘एन्व्हायरनमेंटल’ आहे ?

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

सोलापूरकर अपरिचिता’चा पहिला प्रश्न असा आहे की ‘समाजात एकंदर सुधारणा हव्यात तरी कोणत्या?’ सुधारकाला असा प्रश्न करणे म्हणजे काय झाले असता तू ‘सुधारक या पदवीचा त्याग करण्यास तयार होशील, असे त्यात विचारण्यासारखेच आहे! यावर त्याचे उत्तर एवढेच आहे की, बालविवाहाचे नाव नाहीसे झाले, प्रत्येक स्त्रीस शिक्षण मिळू लागले, विधवावपन अगदी बंद झाले, स्त्रीपुनर्विवाह सर्वत्र रूढ झाला, व संमतिवयाच्या कायद्यासारखे अनेक कायदे पसार झाले, तरी त्याची तृप्ती होण्याचा संभव नाही! त्याच्या सुधारणावुभुक्षेस मर्यादाच नाही असे म्हटले तरी चालेल! ज्याप्रमाणे समुद्राला नद्यांचा, लोभ्याला द्रव्याचा, कर्णाला दानाचा व धमला शांतीचा कंटाळा कधी येत नाही किंवा आला नाही, त्याप्रमाणे खच्या सुधारकाला सुधारणेचा वीट येण्याचा कधीच संभव नाही….

पुढे वाचा

विदर्भातील पुरोगामी विदुषी – कै. प्रा. मनू गंगाधर नातू

माझे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील गुरू डॉ. भालचंद्र फडके मला १९६६ मध्ये अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रो. श्रीमती म. गं. नातू यांच्याकडे घेऊन गेले. डॉ. भालचंद्र फडके यांनी माझी हमी घेतल्यामुळे बाईंनी मला पीएच्. डी. करिता मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. मी विदर्भातील नोकरी सोडून पैठणला आलो. १९७६ मध्ये मला पीएच्. डी. मिळाली. बाईंशी या निमित्ताने आलेला ऋणानुबंध पुढेही कायम राहिला. १९४६ पासून १९७७ पर्यंत बाई विदर्भ महाविद्यालयात होत्या. निवृत्त झाल्यानंतर त्या नागपूर येथे स्थायिक झाल्या. दि. ३ एप्रिल १९८८ रोजी बाई नागपूर येथे निधन पावल्या.

पुढे वाचा

विवेकवाद – ४

विज्ञान, अध्यात्म आणि साक्षात्कार
गेल्या दोन लेखांकांत आपण पाहिले की ईश्वरारितत्वसाधक कोणताही युक्तिवाद निर्णायक नाही. त्यांपैकी काही निराधार गोष्टी गृहीत धरून त्यावर आधारलेले आहेत, तर काहींत स्वच्छ व्याघात आहे असे आपल्याला आढळून आले. पण एक युक्तिवाद अजून तपासायचा राहिला आहे, आणि त्यावर ईश्वरवाद्यांची बरीच भिस्त आहे. हा युक्तिवाद म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होतो या दाव्यावर आधारलेला. त्याकडे आता वळू.

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात असे म्हटले होते की कोणत्याही विधानावर विश्वास ठेवायचा (किंवा ते स्वीकारायचे) तर तो त्या विधानाच्या पुराव्यावर आणि त्या पुराव्याच्या प्रमाणात ठेवावा; आणि पुरावा आपल्याला तपासता येत नसेल, तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रमाण मानावे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ४)

लिंगपूजा, तापसवाद आणि पाप
जेव्हा पितृत्वाचा शोध लागला त्या क्षणापासून धर्माला लैंगिक व्यवहारात मोठा रस उत्पन्न झाला. हे अपेक्षितच होते; कारण जे जे गूढ आहे आणि महत्त्वाचे आहे अशा सर्व गोष्टींत धर्म रस घेतो. कृषीवलावस्था आणि मेंढपाळ अवस्था यांच्या आरंभीच्या काळात राहणाऱ्या मनुष्यांच्या दृष्टीने सुपीकपणा, मग तो जमिनीचा असो, गुराढोरांचा असो, किंवा स्त्रियांचा असो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. शेती नेहमीच पिकत नसे, आणि तसेच मैथुनातून अपत्यजन्मही नेहमी होत नसे. म्हणून धर्म आणि जादू (अभिचार) यांना इष्टफलप्राप्तीसाठी आवाहन केले जाई. सहानुभवात्मक अभिचाराच्या (sympathetic magic) तत्कालीन समजुतीनुसार लोक असे मानीत की मानवांतील बहुप्रसवत्व वाढले की जमिनीचेही वाढेल; आणि तसेच मानवांतील बहुप्रसवत्वाची आदिम समाजात मोठी मागणी असल्यामुळे तिच्याही वृद्ध्यर्थ विविध धार्मिक आणि अभिचारात्मक कर्मकांड सुरू झाले.

पुढे वाचा

यशोदाबाई आगरकर

यशोदाबाई आगरकर ह्या थोर समाजसुधारक कैलासवासी गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्नी होत. आगरकर बी.ए. च्या वर्गात असताना कऱ्हाडजवाज गावातील मोरभट फडके यांची कन्या अंधुताई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर तिचे नांव यशोदाबाई ठेवण्यात आले. या विवाहाच्या वेळी यशोदाबाईचे वय दहा वर्षांचे होते. आगरकर पुण्याला शिकत असल्यामुळे आणि यशोदाबाईचे वय लहान असल्यामुळे त्या या काळात माहेरी म्हणजे उंब्रजला रहात असत. आगरकर सुट्टीत आले की, मग त्या टेंभूला सासरी जात.

सन १८८० मध्ये आगरकर एम.ए. झाले आणि वर्षभरात ते पुण्याला न्यू इंग्लिश स्कूल व केसरी या कार्यांत गुंतल्यावर त्यांनी पुण्याला संसार थाटला.

पुढे वाचा

वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया

वा. वि. भट
संपादक ‘संग्रहालय’
अभिनव प्रकाशन
अंक मिळाला. लगेच वाचूनही काढला. त्यातील मनुताईंच्या परिचयाचा श्री. कुळकर्णी यांनी लिहिलेला लेख खूप आवडला. डॉ. भोळे यांचा सोव्हिएट रशिया व पूर्व युरोपातील घडामोडी संबंधीचा लेखही विचार प्रवर्तक आहे. श्री. दिवाकर मोहनी यांचे पत्र अत्यंत मार्मिक वाटले.

श्रीमती दुर्गा भागवत
अंक वाचनीय व उद्बोधकही आहे. बरट्रॅंड रसेल रसेलच्या पुस्तकाचा अनुवाद या मासिकाचे वैशिष्ट्य ठरावे.आपल्या कार्यात आपल्याला यश मिळो हीच इच्छा.

ना. ग. गोरे
अंक मिळाला. धन्यवाद, लेख आवडले.

श्री. वि. भावे (आय्. ए. एस्.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री दिवाकर मोहनींचे पत्रांना उत्तर

संपादक,
नवा सुधारक यांस,
सप्रेम नमस्कार

आपल्या ३ मे च्या अंकात माझ्या पत्राला उत्तरादाखल आलेली तीन पत्रे प्रकाशित झाली आहेत. डॉ. न. ब. पाटील, प्रा. म. ना. लोही, प्राचार्य ना. वि. करबेलकर, श्री. राम वैद्य आणि डॉ. विजय काकडे आदींनी मोठी पत्रोत्तरे पाठविली आहेत. त्याशिवाय श्री. वसंत कानेटकर, श्री. यदुनाथ थत्ते इत्यादींनीही आपापल्या प्रतिक्रिया कळविल्या आहेत. ती पत्रे आपण माझ्याकडे पाठविल्याबद्दल मी आपला आभारी आहे. पहिली गोष्ट अशी की कोठल्याही पूर्वग्रहाशिवाय ह्या प्रश्नाकडे बघितले जावे ह्यासाठीच मी माझे पत्र एखाद्या धर्माच्या कैवारी वृत्तपत्राला न लिहिता आपणांस लिहिले आहे.

पुढे वाचा