मुलांच्या बुद्धिमत्तेची जोपासना . . .

महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे ह्यांनी असे नमूद केले आहे की इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत भारतात पदार्थ-विज्ञान, रसायन-शास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित इत्यादी क्षेत्रात प्रगती होत होती. त्याचे प्रमुख कारण असे आहे की त्या काळात गुरुशिष्य परंपरा होती आणि शिष्य प्रत्येक बाबतीत गुस्ता अनेक शंका विचारीत असे, आणि गुरु शिष्याचे शंकानिरसन करीत असे. कपिल, कणाद, पाणिनी, पतंजली, चरक, सुश्रुत, चाणक्य इ. त्या काळातील अनेक नावे प्रसिद्ध आहेत. गीतासुद्धा अर्जुन-कृष्णाच्या प्र नोत्तरांतूनच निर्माण झाली. अर्थात गीतेतील संस्कृत भाषा ज्याप्रमाणे लिहिली गेली आहे त्यावस्न गीता इसवी सनाच्या चौथ्या शतकात लिहिली गेली असे प्रा.

पुढे वाचा

ख्रिस्ती धर्माचा पराभव?

इंग्लंड आणि वेल्समधील रोमन कॅथलिक चर्चचे एक पुढारी गुरुवारी (६ सप्टेंबर २००१) एका मनमोकळ्या भाषणात म्हणाले की ब्रिटनमध्ये ख्रिस्ती धर्म जवळपास पराभूत झाला आहे.
बुधवारी (५ सप्टेंबर २००१) वेस्टमिन्स्टरचे आर्चबिशप कार्डिनल कॉर्मक मर्फी-ओकॉनर म्हणाले की आता शासनयंत्रणा व जनता यांच्या जीवनावर ख्रिस्ती धर्माचा कोणताही प्रभाव नाही. वाट चुकलेले (lapsed) कॅथलिक अश्रद्ध लोक व तरुण यांच्यापर्यंत ख्रिस्ती धर्म नेण्यास आता क्रांतिकारक पावले टाकायला हवी. टाईम्सच्या वृत्तानुसार कार्डिनल म्हणाले की आता सरकार व जनता यांच्या जीवनांना, सामाजिक व्यवहारांना आणि नैतिक निर्णयांना ख्रिस्ती धर्म पार्श्वभूमी पुरवत नाही.

पुढे वाचा

शिक्षण — रंगीकरण

बहुतांश भारतीय भारतातल्या औपचारिक शिक्षणव्यवस्थेवर नाराज असतात, हे निर्विवाद आहे. सामान्यपणे आपल्या आसपासची किंवा आपली स्वतःची मुले शिकत असताना आपण आपली नाराजी तपशिलात व्यक्त करतो. एकेका वर्गात प्रचंड संख्येने कोंबलेली मुले, शंकास्पद तज्ज्ञतेचे शिक्षक, खर्च, शिकवणी वर्ग, परीक्षा-गैरप्रकार, आपण सुचतील तेवढे दोष आणि जाणवतील तेवढ्या त्रुटींचा जप करत राहतो. पण साधारण नागरिक त्यांच्या ओळखीतली, नात्यातली मुले शिक्षण संपवती झाली की शिक्षणाबद्दल ‘बोलणे’ थांबवतात. काही ‘पेशेवर’ शिक्षणतज्ज्ञ शिक्षणावर सातत्याने चर्चा करत राहतात, आणि अशा चर्चा खूपशा विरळ वातावरणातच बंदिस्त होतात. मग त्यात भाग घेणारे आपापले ‘लाडके’ मुद्दे पुन्हापुन्हा मांडत राहतात आणि कोणी बाहेरचा या चर्चांमध्ये डोकावलाच तर त्याला चित्र दिसते ते दळलेलेच पीठ पुन्हा दळण्याचे.

पुढे वाचा

गर्व से कहो- हम इन्सान हैं!

“तुम्ही स्वतःला दोन गटांमध्ये विभागून घ्या. एकात मुस्लिम, दुसऱ्यात हिंदू, म्हणजे आपापल्या मृतांची तुम्हाला काळजी घेता येईल”, भोपाळचे आयुक्त रणजित सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणाले. हे विद्यार्थी गॅस दुर्घटनेनंतर मदत करायला आले होते.
आयुक्तांच्या सूचनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटली. एका विद्यार्थ्याने विचारले, “अशा वेळी हिंदू आणि मुसलमानांत काही फरक असतो का?” दुसरा म्हणाला, “हे घडू देणारा देव तरी असतो का?” आयुक्त नंतर म्हणाले, “मी एकाएकी खूप क्षुद्र झालो. मला त्यांचे कोणत्या भाषेत आभार मानावे हेच कळेना.”
[डॉमिनिक लापिएर आणि जेवियर मोरो यांच्या “इट वॉज फाईव्ह मिनिट्स पास्ट मिडनाईट इन भोपाल” (फुल सर्कल, २००१) या पुस्तकातून.]

पुढे वाचा

स्त्री-हत्या: जैविक प्रतिसाद की सामाजिक मानसिकता?

आजचा सुधारक, ऑक्टो. २००१ मधील श्री. सुभाष आठले यांचा ‘स्त्री : पुरुष प्रमाण’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनगणनेनुसार समाजात स्त्रियांचे प्रमाण घसरण्याचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्त्रीहत्या आहे हे निर्विवाद. पण त्याची कारणमीमांसा करताना जनसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाल्यावर अबोध समाजमनाकडून केवळ जैविक प्रतिसादरूप असा स्त्रीहत्येचा निर्णय आपोआप घेतला जात असावा असे जे प्रमेय मांडले आहे ते मुळीच विवेकाला धन नाही. समाजातील स्त्री/पुरुष प्रमाणाचा नैसर्गिक समतोल ढळतो आहे. लेखक म्हणतात त्याप्रमाणे स्त्रीहत्या जैविक पातळीवर नैसर्गिकपणे घडून आली असती, तर हा समतोल बिघडण्याचे कारण नव्हते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सुधाकर देशमुख, कन्सल्टिंग सर्जन, देशमुख हॉस्पिटल, उदगीर, जि. लातूर–४१३५१७
सध्या इंग्रजी वाङ्मयामध्ये J. K. Rowlings ह्यांच्या पुस्तकांचा बोलबाला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांचा नायक Harry Potter हा पा िचमेत आणि भारतातही (अर्थात इंग्रजीवाचकांत) लोकप्रिय होत आहे. दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकविक्रीच्या याद्यांत ह्या पुस्तकाची आघाडी गेली कित्येक महिने कायम आहे. Times of India सारख्या मान्यवर वृत्तपत्राच्या संपादकीयातही Harry Potter Phenomenon संबंधी लिहिले गेले आहे. जादूटोण्याच्या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्यांचे लेखन आहे. ह्या पुस्तकांच्या वाचनानंतर माझ्या मनात दोन प्र न निर्माण झाले. पहिला असा की जादूटोण्यासारख्या अशास्त्रीय विषयावर मुलांकरिता लिहिलेले पुस्तक एवढे लोकप्रिय का व्हावे?

पुढे वाचा

संपादकीय:

आस्तिकांविरुद्धची आघाडी कशासाठी?
श्री. श्यामकान्त कुळकर्णीचे पत्र या अंकात अन्यत्र दिले आहे. श्री. कुळकर्णी ह्यांना पडलेला प्र न अनेकांच्या मनांत येत असावा. देव मानल्यामुळे फायदे पुष्कळ होतात हे मान्य आहे. पण तोटे फायद्यांपेक्षा जास्त आहेत. कारण फायदे व्यक्तींचे होतात. तोटे समाजाचे होतात. पुन्हा माझे आवडते उदाहरण द्यावयाचे झाले तर ते विहिरींचे आहे. जो आपली विहीर सर्वांत खोलपर्यंत खणील त्याचा फायदा. त्याच्या विहिरीला कायम पाणी, कारण तो बाकीच्यांच्या विहिरीमधले पाणी ओढून घेतो. देवाला मानणारा बाकीच्यांचे काय घेतो हा प्र न आता निर्माण होतो.

पुढे वाचा

अग्नि व यज्ञ: वेदकाल आणि विसावे शतक

अग्नीला साक्ष ठेवून सध्याचे भारतवर्षीय त्रैवर्णिक हिंदू लोक विवाह-संपादन करतात. अग्नीची साक्ष नसेल, तर तो विवाह धर्म्य समजला जात नाही. येथे असा प्रश्न उद्भवतो की, अग्नीचा व विवाहाचा संबंध काय? . . .

अशा प्रश्नांना उत्तर द्यावयाचे म्हणजे रानटी आर्यांची पुरातन काळी सामाजिक व भौम स्थिती काय होती ते पाहावे लागते.

ऋषींचे अतिप्राचीन पूर्वज वानरीय पाशवावस्थेत असताना, वानरांप्रमाणेच त्यांनाही झाडे, पर्वतांचे कपरे, गुहा वगैरेंच्या आश्रयाने राहून हिंस्र पशृंपासून, वादळांपासून व थंडीवाऱ्यापासून आपला बचाव मोठ्या संकटाने करावा लागे. . . . हरणे वगैरेंना बचावाकरिता शिंगे, दाढा, टापा वगैरे सहज शस्त्रे तरी असतात, मनुष्यांना तीही नाहीत.

पुढे वाचा

११ सप्टेंबर आणि भारतापुढील पर्याय

११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादाने अमेरिकेत हाहाकार उडवून दिला. अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याचा मानबिंदू असलेले जागतिक व्यापार केंद्र आणि लष्करी सामर्थ्याचे मानबिंदू पेंटॅगॉन, हे दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य बनले. कॅपिटॉल हॉल आणि राष्ट्राध्यक्ष निवास हे राजकीय सामर्थ्याचे मानबिंदू या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. तालिबानच्या आश्रयास असलेला ओसामा बिन लादेन हा या हल्ल्यांमागील प्रमुख सूत्रधार असल्याचे अमेरिकेने घोषित केले. ओसामा, त्याची अल-कायदा ही अतिरेकी संघटना, आणि अफगाणिस्तानातील तालिबान राजवट यांना धडा शिकवण्याचा आता अमेरिकेने निर्धार केला आहे.
अमेरिका, इस्राएल आणि भारत हे आपले प्रमुख शत्रू असल्याचे ओसामाने यापूर्वीच जाहीर केले आहे.

पुढे वाचा

तीच दहशत: लक्ष्य वेगळे

(नोम चोम्स्की |Noam Chomski] हे मॅसॅच्युसेट्स तंत्रविज्ञान संस्थेत भाषाविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. अमेरिकन परराष्ट्रधोरणाचे परखड टीकाकार म्हणून त्यांची कीर्ती आहे. ११ सप्टेंबर २००१ च्या घटना आणि त्यांचे संभाव्य पडसाद याबद्दल बेलग्रेडच्या एका रेडिओवाहिनीने चोम्स्कींची मुलाखत घेतली. तिच्यातील काही उतारे टाईम्स ऑफ इंडियाने २४ सप्टेंबर २००१ ला प्रकाशित केले. त्यांचा हा सारांश —-) तुम्हाला हल्ले का झाले असे वाटते?
ओसामा बिन लादेनला वाटते की १९९० मध्ये अमेरिकेने सौदी अरेबियात तळ स्थापणे, ही रशियाने अफगाणिस्तानावर केलेल्या आक्रमणाचीच आवृत्ती होती. मुळात इस्लामी धर्मस्थळे असलेल्या धर्मसंरक्षक सौदी अरेबियावरच्या या अतिक्रमणा-नंतर ओसामा आणि त्याचे ‘अफगाण’ साथी अमेरिकाविरोधी झाले.

पुढे वाचा