इतिहास लेखनाची शिस्त

[गजानन भास्कर मेहेंदळे यांचा “श्री राजा शिवछत्रपती (पुणे १९९६)” हा ग्रंथ सच्चा साधनांवर आधारित इतिहास लेखनाचा आदर्श व मानदंड म्हणून गौरवला गेला आहे. त्याच्या प्रस्तावनेतील हा काही भाग, विवेकवादी शिस्तीची रूपरेषाच असावा, असा.]
शिवचरित्राच्या अभ्यासाची माझी ही वाटचाल चालू असताना सुस्वातीची दोन-तीन वर्षे मी चुकून भलत्याच वाटेला लागलो होतो. मी तेव्हा जी चूक केली तीच सध्या काही इतिहाससंशोधक, विशेषतः युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करीत असलेले संशोधक, करीत असल्याचे मला आढळून आले आहे. म्हणून, ते वेळीच सावध व्हावेत अशा हेतूने, इथे त्याविषयी थोडक्यात लिहितो.

पुढे वाचा

एक यंत्र आणि स्त्रियांचे काम

कार्यालयीन यंत्रांमुळे सध्याच्या कामांचे स्प जास्त वेगवान, बिनचूक, नियमित आणि कार्यक्षम व्हावे, अशी अपेक्षा होती. टंकलेखक (typewriter) म्हणजे नवा आणि सुधारित कारकून. गणनयंत्र (calculator) म्हणजे नवा आणि सुधारित हिशेबनीस—-जो माणसांची हिशेबाची कामे आ चर्यकारक वेगाने आणि कार्यक्षमतेने, विद्युद्वेगाने करील, असा. आणखी हत्यारे, आणखी अवजारे, आणखी पुरुष कर्मचाऱ्यांसाठी. पण जेव्हा टंकलेखक, झेरॉक्स यंत्रे, टेलेफोन स्विचबोर्ड्ज, गणनयंत्रे, संगणक आणि अनेक पंच्ड-कार्ड यंत्रे प्रत्यक्षात कार्यालयांमध्ये अवतरली तेव्हा पुरुष कर्मचाऱ्यांच्या जागा स्त्रिया आणि यंत्रांची जंजाळे घेऊ लागली. स्त्रियांची बोटे जुन्या ‘हस्तकांच्या’ हातांपेक्षा स्वस्ताईने व नेमकेपणाने कामे करीत.

पुढे वाचा

कामांचा गुणाकार

डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग ही माणसे, त्यांची ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) ही संस्था, हे सगळे महाराष्ट्राच्या ओळखीचे आहे. वैद्यकशास्त्राचे उत्कृष्ट शिक्षण घेऊन ते ज्ञान आदिवासी भागात वापरणारे हे लोक. आपल्या हृद्रोगाचा वैयक्तिक अनुभव वापरून ‘माणसांनी निरामय कसे जगावे’ हे शिकवणारे अभय, झाडांशी स्त्रियांचे नाते आणि ग्रामीण स्त्रियांची स्वतःच्या शारीरिक व्यवहारांकडे पाहायची दृष्टी अशा दोन महत्त्वाच्या संकल्पनांच्या कर्त्या राणी, नुकतेच पन्नाशी उलटलेले हे लोक ‘कर्त्या’ सुधारकांपैकी महत्त्वाचे. त्यांचे काम आणि त्या कामाची इतर जागी ‘लागवड’ करण्याच्या शक्यता, यांच्याविषयी अनौपचारिक गप्पांमधून माहिती मिळवायचा प्रयत्न ‘आजचा सुधारक’ने केला–आपल्या नेहमीचा स्वभाव जरा बाजूला ठेवून!

पुढे वाचा

क्वाँटम् गतिसिद्धान्ताचा आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक भांडवलदारीवरील परिणाम

[थत्ते स्मृती व्याख्यान मालेमधील सोळावे पुष्प गुंफताना ११ जानेवारी २००१ रोजी नागपुर विद्यापीठात प्रा. पानटानी दिलेल्या व्याख्यानाचा गोषवारा]
मला थत्ते स्मृती व्याख्यान देण्याकरता ट्रस्टचे विश्वस्तांनी जे निमंत्रण दिले त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक ऋणी आहे. नागपूर विद्यापीठाने भारतास जे विविध पदार्थवैज्ञानिक पुरवले त्यांचे शिल्पकार प्रा. थत्ते असल्याने, हे भाषण देण्यासाठी मला बोलावल्यावर जरा धास्तीच वाटली. तरी पण मी माझे मुक्त विचार आपणास सांगणार आहे.
सर्वप्रथम तंत्रज्ञान म्हणजे काय ह्याचा आपण विचार करू. मनुष्यास निसर्गाचे निरीक्षण करण्यात आनंद मिळतो, तो निखळ असतो. त्यावरून तो काही आडाखे बांधतो, निष्कर्ष काढतो व सिद्धान्त मांडतो.

पुढे वाचा

आर्थिक साहाय्यातून साम्राज्यवाद

[AID As IMPERIALISM (१९७१, पेंग्विन) या पुस्तकाचा परामर्श अंजली प्रकाश कुलकर्णी यांनी जाने-मार्च १९९७ च्या ‘अर्थसंवाद’ या नियतकालिकासाठी घेतला. त्या लेखाचा हा संक्षेप]
विदेशी साहाय्य हे उदार अंत:करणाने व निःस्वार्थ बुद्धीने केलेले वित्तीय साधनसंपत्तीचे विनाअटींचे हस्तांतरण होय या कल्पनेला कधीच तिलांजली मिळाली आहे. १९६१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकेचे जगावरील सार्वभौमत्व, दबाव व अंकुश राखण्यासाठी अवलबिलेली ही एक पद्धती असून विदेशी मदतीच्याद्वारे ऋणको देशांना साम्यवादी गटामध्ये समाविष्ट होण्यापासून परावृत्त केले जाते तसेच त्या देशांना अधःपतनापासून वाचविले जाते असे नमूद केले आहे.

पुढे वाचा

स्वयंसिद्ध विधाने आणि परतःसिद्ध विधाने

अमुक विधान स्वयंसिद्ध आहे असे आपण अनेकदा ऐकतो, आणि आपणही म्हणतो. तेव्हा स्वयंसिद्ध विधान म्हणजे काय? आणि अशी काही विधाने आहेत काय? असे प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करावयाचा विचार आहे.
स्वयंसिद्ध विधान म्हणजे असे विधान की जे अन्य कोणत्याही विधानापासून निष्पन्न होत नाही, आणि ते अन्य कोणत्याही विधानापासून निष्पन्न व्हावे हे आवश्यकही नाही. त्याची सत्यता उघड असते. उलट परतःसिद्ध विधान म्हणजे असे विधान की जे दुसऱ्या एका किंवा अधिक विधानांपासून निष्पन्न होते. एक विधान दुसऱ्या विधानापासून निष्पन्न होते याचा अर्थ असा की जर दुसरे विधान खरे असेल तर पहिले विधानही अपरिहार्यपणे खरेच असते.

पुढे वाचा

कोटिच्या कोटि अज्ञाने!

संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतीच एक पाहाणी केली. जगभरातल्या लोकांना प्रश्न विचारला होता, “कृपया शेष जगातल्या अन्नाच्या तुटवड्याबद्दलचे तुमचे मत सांगाल का?”

पाहाणी ठार अयशस्वी झाली, कारण अफ्रिकेत कोणालाच ‘अन्न’ म्हणजे काय ते माहीत नव्हते. पश्चिम युरोपात कोणालाच ‘तुटवडा’ ह्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. पूर्व युरोप ‘तुमचे मत’ हा शब्दप्रयोग ओळखत नव्हता. दक्षिण अमेरिकेत ‘कृपया’ हा शब्द अनोळखी होता, आणि अमेरिकन संघराज्यात कोणालाच ‘शेष जगा’ची ओळख नव्हती.

[टाईम्स ऑफ इंडिया, १३ मार्च २००१]

अवैज्ञानिक जनहितविरोध?

फेब्रुवारी २००१ (११.११) च्या अंकात मराठी विज्ञान परिषदेच्या एका स्मरणिकेचा डॉ. र. वि. पंडितांनी परामर्श घेतला आहे. विज्ञान परिषद आणि आजचा सुधारक यांची उद्दिष्टे एकमेकांशी जुळती आहेत, हे डॉ. रविपंचे निरीक्षण योग्यच आहे. ते पुढे नोंदतात की विवेकवाद, स्त्रियांचे समाजातले स्थान, धर्मश्रद्धा वगैरे विषय आ. सु.तल्या अती झालेल्या चर्चेने गुळगुळीत झाले आहेत. त्याऐवजी डॉ. रविपना सुधारणा आणि विकासाचे व्यवस्थापन यावर जास्त खल होऊन हवा आहे.
सुधारणेचा पाया सुशिक्षणात आहे, यावर दुमत नसावे. ‘प्रोब’ हा प्राथमिक शिक्षणावरचा अहवाल दाखवतो की स्त्रियांना महत्त्व न देणाऱ्या आणि जातीपातींच्या विळख्यातल्या ‘बीमारू प्रांतांमध्ये शिक्षणाचे चित्र भीषण आहे.

पुढे वाचा

संपादकीय अस्वस्थता!

अकरा वर्षांपूर्वी आजचा सुधारक सुरू झाले तेव्हा जागतिकीकरण—-खाजगीकरणही सुरू होत होते. त्यावेळी मनमोहनसिंगांनी परकीय मदत मिळवून विकासाचा दर सहा टक्क्यांवरून नऊ टक्क्यांवर नेला. तेव्हा एक प्रवाद असा होता की सहा टक्के विकास दर, ही प्रकाशाच्या वेगासारखी एक अनुल्लंघ्य मर्यादा आहे! तिला हेटाळणीने ‘हिंदू विकास दर’ म्हटले जाई. ही मर्यादा मोडणारे सिंग-राव सरकार अर्थातच कौतुकाचे धनी झाले.
जागतिकीकरण-खाजगीकरणावर टीका करणाऱ्यांना त्यावेळी सरसकट ‘कम्यूनिस्ट’ ही शिवी (!) देऊन डावलले जात असे. सिंग सांगत होते, की हा एक–दिशा मार्ग आहे. एकदा ही वाट धरायची तर ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको’ असे स्वतःला बजावत, अत्यंत शिस्तबद्धतेने वागावे लागेल.

पुढे वाचा

पत्रसंवाद

गंगाधर गलांडे, 4 Aldridge Court, Meadway, IIIGII WYCOMBE, Bucks. IIP 11 1SE, UNITED KINGDOM

काही महिन्यांपूर्वी, अकस्मात वाढलेल्या टपालखर्चामुळे, काही आर्थिक मदत करण्याबद्दल आवाहन केले होते आपण वर्गणीदारांना. त्याला साद देण्यासाठी मी अेकदा संगणकापुढे बसलेलोही होतो. मधेच कसलेतरी खुसपट उपटल्याने स्थगित झाले ते लेखन. क्षमस्वमे. सोबत १० पौडांचा धनादेश जोडत आहे. कृपया, त्याचा स्वीकार व्हावा.

नोव्हेंबर २०००च्या अंकातील श्री. आत्रे यांचा जातींचा उगम—-एक दृष्टिकोन हा लेख वाचत असता सहज एक विचार मनीं आला व मला उत्तर सापडेना म्हणून आवर्जून हे पत्र लिहीत आहे मी आपणांस.

पुढे वाचा