सावर.. रे !

भारत सासणे यांच्या ‘एका प्रेमाची दास्तान’ ह्या कथेचे नाट्यरूपांतर केलेले सावर रे! हे नाटक नुकतेच पाहिले. नाटक वैचारिक, संवादप्रधान आहे. विषय प्रौढ अविवाहित स्त्रीसंबंधीचा आहे. नायिका इंदू ही बुद्धिमान असल्यामुळे लहानपणापासूनच ‘तू इतरांपेक्षा वेगळी आहेस’ हे तिच्या मनावर बिंबवलेले. एरवी, ‘तू मुलगी आहेस, परक्याचे धन आहे’ वगैरे, वगैरे चाकोरीबद्ध विचारांपासून तिला जाणीवपूर्वक दूर ठेवलेले. इंदूदेखील यशाचा एक एक टप्पा सहज गाठत जाते. मेरीट मध्ये येणे, इंग्रजीत एम्. ए. करणे, प्राध्यापक म्हणून सफल होणे, पीएच. डी. होणे, संशोधनपर लेख लिहिणे, चर्चासत्राला जाणे इ.

पुढे वाचा

आ. सु. चे स्वरूप सुधारण्याबद्दल

स्पष्ट विचार, नेमके शब्द, आपुलकी आणि सूक्ष्म विनोदबुद्धी यांचा परिचय देणारी एक प्रतिक्रिया.
पुण्याचा वाचक मेळावा आपल्या खुसखुशीत अहवालातून कळला. उपस्थितांची नावे वाचून विचारवंताचे अग्रणी कोणकोण आहेत ते कळले. आणि समाधान वाटले की, जाहिरात न करता, अंदाजपत्रकी कौशल्य न वापरता आजचा सुधारक एवढा मेळावा करू शकतो. जाहिरातीच्या आवश्यकतेबद्दल बोलणाऱ्यांना ही गोष्ट पुरेसे उत्तर नाही का? अन्वर भाई आणि ताहेरभाईची नावे वाचून विशेष आनंद झाला. का ते पुन्हा केव्हातरी सांगेन.
पुष्कळ हितचिंतकांना वाटते की हे मासिक अधिक आकर्षक दिसावे .. मला त्यांना विचारावेसे वाटते की ते स्वतः या मासिकाकडे आकृष्ट झाले ते कशामुळे?

पुढे वाचा

आजच्या शिक्षणातील दुखणी – एक टिपण

गेली ३० वर्षे शिक्षणक्षेत्रात शिक्षक ते उपसंचालक म्हणून काम करत असताना आमच्या शिक्षणातील जी दुखणी मला कळली आणि जी वेळोवेळी माझ्या लेखांतून, पालकशिक्षकसभांतून, शिक्षण सल्लागार मंडळांच्या बैठकींतून मांडली त्याचे एकत्रीकरण करण्याचा हा प्रयत्न.
१. सन १९४७ मध्ये आम्ही स्वतंत्र झालो. त्यावेळी आचार्य विनोबा भावे म्हणाले होते, “राज्यक्रांतीनंतर जसा झेंडा बदलतात तसेच शिक्षणही बदलावे. ” परंतु गंभीररीत्या त्यांचे म्हणणे कोणी ऐकलेच नाही. महात्मा गांधी- आचार्य विनोबा भावे यांनी जीवन – शिक्षणाची कल्पना मांडली होती. प्रयोग केले होते. परंतु आपण ते सोडून दिले.

पुढे वाचा

भारतीय शिक्षणपद्धती आणि माहिती-तंत्रज्ञान

आपले जग वेगाने बदलत आहे. विज्ञानाने आपल्याला माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आणून सोडले आहे. मोठ्या प्रमाणात संगणकांचे उत्पादन झाल्याने ते स्वस्त होणार आहेत. आणि माहिती-महाजालावरील स्थानांसाठी होणाऱ्या स्पर्धेमुळे हे सारेच तंत्रज्ञान सामान्यांनाही ‘परवडणारे’ होणार आहे. इंटरनेट, माहिती- महामार्ग (किंवा महाजाल) आमच्या संकल्पना स्पष्ट करायला मदत करणार आहेत. इंटरनेटमुळे वर्गात वसून शिकवणे येत्या पाच वर्षांत कालबाह्य होणार आहे. अशा रीतीने ज्ञान सर्वांनाच सहज उपलब्ध होणार आहे.
हा ज्ञानाचा स्फोट झेपण्यासाठी उपलब्ध ज्ञानाचा योग्य वापर करता यायला हवा. आपली शिक्षणपद्धती बहुतांशी पाठांतरावर आधारित आहे. यात विद्यार्थ्यांवर फार भार पडतो आणि त्यांची शक्ती व त्यांच्या क्षमता ह्यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.

पुढे वाचा

राज्यघटनेचा फेरआढावा कशासाठी?

भारताला भारतीय राज्यघटना हवी, अशी गेली ५० वर्षे मागणी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघाने व आताच्या भारतीय जनता पक्षाने संधी मिळताच संविधानाची समीक्षा करण्यासाठी आयोग नेमला. सत्तारूढ पक्षाला संविधानाची समीक्षा का करावीशी वाटते; कोणत्या सुधारणा/दुरुस्त्या संविधानात कराव्यात असे वाटते; संपूर्ण संविधानाचीच समीक्षा करण्याची आवश्यकता काय यावद्दल कोणतीही सैद्धान्तिक मांडणी करण्यात आलेली नाही. वारंवार निवडणुका घ्याव्या लागू नयेत म्हणून संविधानात दुरुस्ती केली पाहिजे; समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द अनावश्यक आहेत; देशाच्या ५० वर्षांच्या इतिहासातील यशापयशास संविधान किती प्रमाणात जबाबदार आहे याचा शोध घ्यायचा आहे; ५० वर्षांत ७० हून अधिक दुरुस्त्या संविधानात झाल्या आहेत म्हणून आता संपूर्ण संविधानाचा आढावा घेऊन समीक्षा केली पाहिजे अशी वेगवेगळी कारणे भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी वेळोवेळी दिली.

पुढे वाचा

पौगंडावस्थेतील दुर्लक्षित मुली

युनोतर्फे उद्घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यास १९९८ सालीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. जगातील सर्व व्यक्तींना समान मानवी हक्क असावेत व स्त्री-पुरुष किंवा मुलगा-मुलगी असा भेद नसावा हे त्याचे मुख्य सूत्र आहे. जग आता एकविसाव्या शतकात पदार्पण करणार आहे. अजूनसुद्धा समाजाचा निम्मा भाग- स्त्रीवर्ग कनिष्ठ व हीन समजला जाऊन त्याच्याविरुद्ध पक्षपात व अन्याय केला जातो. १९७५ ते १९८५ हे आंतरराष्ट्रीय महिला दशक साजरे झाले. भावी काळात मुलींच्याकडून भरीव कार्य व्हावे यासाठी त्यांच्या विरुद्ध होणारा पक्षपात थांबवून त्यांना सवल, सक्षम कसे बनवावे याबाबत जगातील शासनव्यवस्था व समाज यांनी निश्चित धोरण व उपाययोजना आखून अंमलात आणल्या पाहिजेत.

पुढे वाचा

साडेचार दिवसांचा स्वर्गनिवास ( १ )

पाश्चात्त्य समाजात वृद्धाना कोणी विचारत नाही हे खरे आहे का? आमच्याकडील वृद्धांचे जे समाधान आहे ते अज्ञान आणि जाणीवेचा अभाव यामुळे की आमच्या तत्त्वज्ञानामुळे? देह जर्जर अन् व्याधिग्रस्त झाला की, गंगाजल हेच औषध आणि नारायणहरि हाच वैद्य – ही विचारधारा पुरेशी आहे?
माझी एक वृद्ध मैत्रीण अमेरिकेत असते. वय ७९; वजन २१५ पौंड; उंची ५ फूट १ इंच. दोनही पायांनी अधू झाल्याने पांगुळगाडा घेऊन चालत असे. आता तीही विजेवर चालणारी चारचाकी गाडी घेऊन कोठेही फेरफटका करीत असल्याने आनंदात असते. पण त्यामुळे वजन व अधूपण दोनही वाढून आणखी गोत्यात येते आहे व त्याची जाणीव ती सुखाने विसरते आहे.

पुढे वाचा

एक लक्षवेधी संपादकीय

मार्च २००० चा आजचा सुधारक वाचला. प्र. ब. कुळकर्णी यांच्या चिंतनातून उतरलेले संपादकीय मननीय आणि विचारप्रवर्तक आहे. आतापर्यंत आ. सु. तील विवेकवादी विचारांचा मार्ग धुक्यात हरविल्यासारखा मला अस्पष्ट होता. प्र. व. ह्यांच्या संपादकीयातून विवेकवादी विचारसरणीला जे अपेक्षित आहे ते सुस्पष्ट झाले आहे. आजच्या सुधारकाने जी वैचारिक भूमिका घेतली आहे ती कर्मठांना आणि परंपरावाद्यांना मस्तकशूळ उत्पन्न करणारी आहे. आमचा स्वतःचा कर्मठपणाला आणि परंपरावादी विचारांना मुळीच विरोध नाही. त्यांच्या विचारातील हिंसेला आमचा विरोध आहे. शंकराचार्यांना आकल्प जगविण्यासाठी घुटी पाजणाऱ्या सनातनी विचारांचा आम्हाला संताप येत नाही.

पुढे वाचा

प्रवाही कुटुंब (१) ई. आर्मी यांच्या फ्रेंच लेखावरून

“धर्म फेकून देतां येईल, नीति नेहमीच बदलत असते आणि कायदेहि बदलतां येतात. मनुष्यजातीच्या सुखाकरता हें सर्व बदलण्यास काय हरकत आहे?” आपल्या नीतिकल्पनांना धक्के देणारी ही विचार- सरणी. (व्यक्ति) ‘स्वातंत्र्या’ चा अर्थ इतका त्याच्या तर्कपूत मर्यादे पर्यंत ताणणे आपल्याला झेपेल ?
वाचकांनी प्रतिक्रिया दयाव्या. नाव गुप्त ठेवता येईल. मात्र कायदेशीर गरज म्हणून आमच्या दफ्तरी नाव-पत्ता आवश्यक आहे.
सवानऊ वाजेपर्यंत तुमची पत्नी तुम्हाला स्वर्गीय देवता भासत होती. जणू काय तुमचें पृथ्वीवरील आयुष्य सह्य व्हावें म्हणून ईश्वराने तिला मुद्दाम स्वर्गांतून तुमच्याकडे पाठवली होती. सर्वांगसुंदर अशी ही सगुणखनि तेथपर्यंत तुम्हाला अवर्णनीय आनंद देत होती.

पुढे वाचा

लोकशाहीची तीन पथ्ये

लोकशाहीला शाबूत ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज केले पाहिजे. सनदशीर मार्गांचा अवलंब करणे आपल्या स्वाधीन नव्हते तेव्हा असनदशीर मार्गांचा अवलंब करणे योग्य होते. म्हणजे बेबंदशाहीची उगमस्थाने होत.. असनदशीर मार्ग
दुसरी गोष्ट ही की, जॉन स्टुअर्ट मिल याने दिलेला जो भयसूचक संदेश आहे तो पाळणे. ज्यांनी आयुष्यभर मायभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत.

पुढे वाचा