स्वदेशी? की विवेकी आयात!

स्वदेशीबद्दलची विविध ठिकाणची चर्चा ऐकताना किंवा वाचताना असे लक्षात आले, की खरा प्रश्न स्वदेशी विरुद्ध परदेशी असा नसून आयात करावयाच्या वस्तूंमध्ये/सेवांमध्ये निवड करण्याचा आहे. आपले भारत राष्ट्र हे अमेरिकेप्रमाणे (U.S.A.) श्रीमंत नाही. अमेरिकेला कोणत्याही गोष्टींची अमर्याद आयात करणे सध्या तरी परवडते. पण भारत हे गरीब राष्ट्र आहे. आयातीवर आपण अमर्याद खर्च करू शकत नाही. आपण वस्तू व सेवा निर्यात करून जेवढे परकीय चलन मिळवू तेवढ्या परकीय चलनात विकत घेता येतील एवढ्याच वस्तू किंवा सेवा आपण आयात केल्या पाहिजेत. अल्पकाळासाठी आपण त्यापेक्षा जास्त आयात करून त्याची किंमत कर्ज, मदत, परकीय गुंतवणूक यांच्याद्वारे भागवू शकतो, पण कर्ज व्याजासकट परत करावे लागणार, परकीय गुंतवणुकीवर लाभांशही द्यावा लागणार, व परकीय गुंतवणूक केव्हाही काढून घेतली जाऊ शकते.

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रिय वाचक,
आजचा सुधारक गेली दहा वर्षे आपल्या मगदुराप्रमाणे पुरोगामी विचारांचा प्रसार-पुरस्कार करीत आहे. हा पुरोगामी विचार काय आहे नि काय नाही याचा थोडा ऊहापोह करू या. पुरोगामी – म्हणजे पुढे जाणारा. नुसता परिवर्तनशील नाही.
पण पुढे म्हणजे कुठे? ‘पुढे’ ही सापेक्ष कल्पना आहे. विवाद्य आहे. दिशा सापेक्ष. म्हणून आम्हाला अपेक्षित दिशा कोणती आहे, कोणती नाही याचा खुलासा केला पाहिजे.
आमची दिशा आहे मानवधर्माची, समतेची, न्याय्य व्यवस्थेची, व्यक्तिस्वायत्ततेची. याला आम्ही विवेकवाद म्हणतो. दिशा मानवधर्माची म्हणून आम्हाला विशिष्ट समूहाच्या धर्माच्या बंधनापलीकडे जाणे ही पुढची दिशा वाटते.

पुढे वाचा

प्रजोत्पत्तीचा परवाना

अमेरिकेतील ‘सेंट्रल मिचिगन कॉलेज’ चे एक अधिकारी आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. ट्राउट म्हणतात की ‘आईबापांना प्रजोत्पत्तीकरता परवाना लागेल’ असा कायदा पुढेमागे झाल्याशिवाय राहणार नाही. अन्नाच्या दृष्टीने जगाची लोकसंख्या कमाल मर्यादेपर्यंत वाढली म्हणजे पुढे अशी खबरदारी घ्यावी लागेल की फक्त सुप्रजाजननाच्या दृष्टीने योग्य आईबापांसच मुले व्हावीं. अर्थात् विवाहाची परवानगी सर्वांना असावी, पण सर्वांनाच मुले होऊ द्यावी असा याचा अर्थ नव्हे. आनुवंशिक दोषांमुळे कितीतरी मुलांच्या आयुष्याचा नाश होतो, इतकेच नव्हे तर यामुळे एकंदर समाजाला निकृष्ट दशा येते. याला प्रतिबंधक उपाय एवढाच की परवान्याशिवाय कोणाला मुले होऊ देऊ नयेत आणि असा परवाना फक्त मनाने व शरीराने सुदृढ लोकांनाच मिळावा.

पुढे वाचा

पुण्याचा सुधारक-मित्रमेळा

पुण्याला सुधारकचे आजी-माजी मिळून सुमारे २५० वर्गणीदार, नागपूर दूर एका टोकाला, पुणे मध्यवर्ती, तिथे सुधारकच्या सहानुभूतिदारांचा – हितचिंतकांचा एक मेळा होऊ देत, परस्परांच्या गाठी-भेटी होतील विचारांची देवाण घेवाण होईल अशा. आपुलकी वाढवणाच्या सूचना काही बुजुर्गाकडून येत. त्या आम्हालाही हव्याशा वाटणारयाच होत्या. डिसेंबरच्या शेवटी ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये काही विदेशस्थ वाचक मायदेशी असण्याची शक्यता हा एक जादाचा मुद्दा. या सगळ्यांचा संदर्भ देऊन सहकारी संपादक श्री दिवाकर मोहनींनी पुण्याच्या वाचक-मेळाव्याची घोषणा केलेली. (आ. सु. – सप्टेंबर-९९)
जानेवारीच्या ६ तारखेला हा मित्रमेळा ठरला. स्थळ साधना सभागृह.

पुढे वाचा

‘साँस’च्या निमित्ताने थोडेसे –

साँस ही टी. व्ही. च्या स्टार प्लस चॅनेलवरील मालिका शंभरावर एपिसोड्स होऊन अजून चालू आहे. ही मालिका खरोखर सरस आहे. मालिकेचा विषय साधा जिहादाचा आणि एका गंभीर समस्येला स्पर्श करणारा आहे. एका विवाहित पुरवा या विवाहबाह्य संबंधाची ही कथा आहे. पुरुष प्रथम परिणामांची पर्वा करीत पारो, cण तोही त्यांत भरडला जातो हे दाखविताना त्यात प्रबोधनाचा अभिनिवेश नसे. तो एक प्रांजळ असा कलात्मक आविष्कार वाटतो.

ही कथा एका साध्या, सुखी, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. गौतम आणि प्रिया कपूर यांचे सधन, सुखवस्तु घर, दोन शाळेत जाणारी मुले, १५ वर्षांचा रुळलेला संसार अशी सर्वसाधारण परिस्थिती आणि त्यांच्या सरळ जीवनात मनीषा नावाचे वादळ येते.

पुढे वाचा

अचमत्कारी साधु श्री. वामनराव पै (सद्गुरु, बी. ए. ऑनर्स, वगैरे)

चमत्कारी बाबा, महाराज, योगी वा तांत्रिक यांना विरोध करणे सोपे व सोयीचे आहे. या लोकांच्या खोटारडेपणास बेपर्वाई, शुद्ध बावळटपणा, वगैरेंची जोड मिळून त्यांना हातोहात पकडणे वा कुठल्याही कायद्याखाली डांबणे, या गोष्टी शक्य होतात. अर्थात, हे सर्व असूनदेखील हे महंत ठिकठिकाणी प्रकट होतच असतात व अनेक लोकांना फसवतच असतात. त्यांना जरब बसविणे हे त्यामुळेच महत्त्वाचे काम असते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र वा “अ. भा.”) वा तत्सम संस्था हे काम करीत असतात.
अशा जनजागृतीच्या मोहिमांचा एक परिणाम म्हणून बरेचसे चमत्कारी’ बुवा ‘छुपे चमत्कारी’ बनतात.

पुढे वाचा

दलितांसाठी आरक्षण

मागासलेपणासाठी दारिद्र्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक कारणे असतात. घरात व भोवतालच्या समाजात शैक्षणिक वातावरण नसणे, मुलांनी शिकावे अशी तळमळ आई-वडलांना व संबंधित समाजाला नसणे हे एक महत्त्वाचे कारण मागासलेपणाला असते. तसेच उच्चवर्णीयांनी नाउमेद करणे, संधी न देणे, दडपून टाकणे हेही एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे आरक्षणासाठी जात हा महत्त्वाचा निकष असावा हे योग्यच आहे. मतभेद उद्भवण्याची कारणे मुख्यतः तीन –
१. जात हा एकमेव निकष असावा की धर्म, दारिद्र्य, अपंगत्व, स्त्रीत्व हे देखील निकष आरक्षणासाठी असावे? उदा. आज आरक्षणासाठी पात्र असलेल्या हिंदूधर्माच्या व्यक्तीने ख्रिश्चन किंवा मुस्लीम, किंवा बौद्ध धर्म स्वीकारला, तर लगेच त्याचे मागासलेपण जाऊन तो आरक्षणाला अपात्र होईल काय?

पुढे वाचा

ब्राह्मणेतर चळवळ

कॉ. शरद पाटील ह्यांनी समाज प्रबोधन पत्रिकेच्या सप्टें. ऑक्टो. १९७८ च्या अंकात ब्राह्मणेतर चळवळीवर एक प्रदीर्घ लेख लिहून मार्क्सवाद भारतातील जातीय गुंतागुंत समजून घेण्यास असमर्थ असल्यामुळे त्याचा विचार पुन्हा झाला पाहिजे असे प्रतिपादन केले आहे. कॉ. शरद पाटील ह्यांचे विचार कितपत बरोबर आहेत ते पाहण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
कॉ. नारायण देसाई लिहितात : “वर्गविग्रहाची धग जेव्हा जेव्हा असह्य झाली तेव्हा तेव्हा बहुजनसमाज नव्या धर्माला घेऊन पुढे आला. शास्त्या वर्गाचे बंदे पंडित-पुरोहित नेहमी ह्या नवधर्मावर तुटून पडत. परंतु बहुजनसमाजाचे बंड प्रभावी ठरून शेवटी शास्त्या वर्गाला एका निराळ्याच मार्गाचे बहुजनसमाजाला हतबल करावे लागे.

पुढे वाचा

प्राचीन आर्यसंस्कृती -२.

पुराणांत व इतिहासग्रंथांतहि भाऊबहिणीच्या लग्नाचे उल्लेख आलेले आहेत. पुराणांत राजांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यांत राजाची राणी ही कोणत्या राजाची कन्या हे दिलेले असते. काही ठिकाणी पितृकन्या असा उल्लेख असतो, ती कन्या पितृलोकांतील असा अर्थ टीकाकार करतात, पण तो अर्थ बरोबर नाही. बापाची मुलगी हा खरा अर्थ आहे. म्हणजे लग्न सख्ख्या बहिणीबरोबर किंवा सावत्र बहिणीबरोबर झाले असेल.
पुराणांत अगदी जुना असा संबंध अंग व त्याच्या बापाची मुलगी सुनीथा यांचा आहे. यांचाच पुत्र वेनराजा. वेन हा पुराणांत तर प्रसिद्ध आहेच, परंतु वेदांतहि त्याचे नांव अनेकदा आलेले आहे.

पुढे वाचा

प्रिय वाचक

१. ६ जानेवारीला पुण्याला झालेल्या सुधारक-मित्रमेळाव्याचा वृत्तान्त या अंकात आहे. तो सविस्तर आहे असा आमचा दावा नाही. मुख्य पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या भाषणातला आणि दुस-याही वक्त्यांच्या बोलण्यातला प्रशंसेचा भाग गाळला आहे. सूचना, टीका-टिप्पणी यांना प्राधान्य दिले आहे. साधनाचे संपादक श्री नरेन्द्र दाभोलकर आणि सुधारकचे चाहते-वाचक श्री. प्रकाश व मंजिरी घाटपांडे यांच्या भरीव सहकार्यामुळे हा मेळा शक्य झाला. तसेच ज्यांचा नामोल्लेख आम्ही केला नाही अशाही अनेकांच्या मदतीचा जेवढा उपयोग झाला तेवढाच त्यांच्या उपस्थितीचाही झाला. या सर्वांचे आभार.
यावेळी काही गोष्टी करायच्या राहून गेल्या.

पुढे वाचा