अरवली गाथा (१)

पाण्याचे दुर्भिक्ष

सध्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादि राज्यांमधून भीषण दुष्काळाच्या बातम्या येत आहेत. चांगल्या मॉन्सूनच्या सलग बारा वर्षांनंतर केव्हातरी, कुठेतरी असे काही होणारच आहे ही आपली धारणा आहे.
राजस्थानातल्या “अलवर” जिल्ह्यातील “ठाणागाझी’ तहसील आणि त्याच्या आसपासच्या काही भागाची ही कहाणी!
अरवलीच्या टेकड्यांमधील पाचसहा छोट्या छोट्या नद्यांच्या पाणलोटात वसलेला हा भाग! “अर्वरी’, “सरसा”, “तिलदेही”, “जहाजवाली” आणि “ख्या-रेल’ या सुमारे ४०/४५ कि. मी. लांबीच्या आणि पुढे मोठ्या नद्यांना मिळणाऱ्या या उपनद्या!
साधारण १९३० सालपर्यंत इथली परिस्थिती बरी होती. या टेकड्यांवर पुरेशी हिरवी झाडी, चराईसाठी गवत, नवी नवलात राखलेल्या घनदाट वृक्षराजी होत्या.

पुढे वाचा

मुक्काम नासिक – १५ एप्रिल २०००

नासिक शब्द कसा लिहायचा? नाशिक, नाशीक की नासिक? नासिका म्हणजे नाक. भौगोलिक संदर्भ घेऊन सह्याद्रीच्या पाच शाखांपैकी एक जी सातमाळा ती नाकासारखी पुढे येऊन हा परिसर झाला असावा. असे अनुमान करता येईल. जुन्या नाशकाचा भाग पन्नास हजार वर्षांपूर्वी जलाशयाखाली होता हे तिथे सापडलेल्या अश्मीभूत (fossils) अवशेषांवरून समजते असे भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात. पण या भौगोलिक म्हणा की प्रागैतिहासिक म्हणा, विशेषांपेक्षा नासिकचे सुधारकी मनाला चकित करणारे एक वैशिष्ट्य आहे. खरे वाटणार नाही पण तिथल्या एका चौकाचे नाव चार्वाक चौक असे आहे. आता चार्वाकासारख्या वेदनिंदक नास्तिकाचे नाव सिंहस्थपर्वणीचे माहात्म्य लाभलेल्या या गोदाकाठच्या तीर्थक्षेत्राला कसे भावले असावे?

पुढे वाचा

प्रवाही कुटुंब – एक मिथ्यकथा!

आजचा सुधारकच्या एप्रिल २००० च्या अंकातील र. धों. कर्वे यांचा प्रवाही कुटुंब हा पुनर्मुद्रित लेख वाचला. प्रवाही कुटुंब असे शीर्षक असले तरी त्यात कुटुंबाबाबत नवीन विचार मांडलेला दिसत नाही. व्यक्तीच्या अनिर्बंध, मुक्त, लैंगिक आचार-स्वातंत्र्याबाबतच सर्व मांडणी दिसते. लैंगिक प्रेरणेविषयी भारतात जी उपेक्षा व त्यातून निर्माण झालेले ढोंग सर्वत्र दिसते त्याची चीड या लेखात प्रतिक्रियात्मक स्वरूपात व्यक्त होते आहे. ती स्वागतार्ह आहे पण व्यवहार्य मात्र नाही.
| कुटुंब प्रवाही असावे हाच नवीन विचार आहे. संपा.]
मुळात नियमनाशिवाय समाज अशक्य असतो. अगदी लेखात पुरस्कार-लेल्या स्वैर-समागम-संघातसुद्धा, ‘प्रत्येक सदस्याने दुसऱ्याची समागमाची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे’ असा नियम आहेच.

पुढे वाचा

अळीमिळी गुपचिळी

मी एक सामान्य उद्योजक. अर्थातच, एका उद्योगप्रधान घराण्यात जन्मल्या-मुळे पिढ्यान् पिढ्या वारसातून आणि संस्कारांतूनच उद्यमशीलता जोपासली गेलेली, त्यामुळे प्रथितयश! पण तरीही समाधानी मात्र नाही! सतत समोर प्र न असतात आणि त्यांची उत्तरे सुचत नाहीत त्यामुळे बेचैन असतो. आपण कोण आहोत? कशासाठी हे सारे करत आहोत? यातून नेमके साध्य काय करणार आहोत? नाहीतरी एक दिवस आपण मरणारच आणि त्यानंतर आपण जे काही, ज्या कशासाठी करत होतो, त्या कशाकशाला काही अर्थच उरणार नाही. मग हे सारे आपण करायचे तरी कशासाठी? या प्र नांचा भडिमार स्वतःवरच स्वतःहून करून घेत असतो.

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रिय वाचक
आपल्या प्राचीन संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना गुस्माहात्म्य आणि पूर्वज-पूजा यांचा उल्लेख या आधी आम्ही केला. शुद्धीचे अतोनात स्तोम हे असेच एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. चित्तशुद्धीशिवाय ब्रह्मज्ञान नाही. देहशुद्धीशिवाय चित्तशुद्धी नाही अन्नशुद्धीशिवाय देहशुद्धी नाही. या अन्नशुद्धीच्या समजुतीत पोषक आहाराच्या शास्त्रीय चिकित्सेपेक्षा कल्पनारम्य भागच अधिक. उदा. अन्न शिजवणाऱ्याची तन-शुद्धी, पावित्र्य फार महत्त्वाचे. त्यासाठी त्याची जात तुमच्याइतकी किंवा जास्त शुद्ध हवी, काम शुद्ध हवे. जितके जास्त मेहनतीचे काम तुम्ही करता तेवढी तुमची जात खालची, कमी शुद्ध. म्हणून वरच्या जातीच्यांनी खालच्या जातीच्या हातचे अन्न भक्षण करू नये हा संकेत.

पुढे वाचा

कांहीही न करणारा ईश्वर

ईश्वरावरील श्रद्धा हा एक प्रकारचा पोरखेळ आहे. मनुष्यजातीच्या बाल-पणांत ही श्रद्धा शोभली असती, परंतु प्रौढ वयांत बाललीला शोभत नाहीत. ईश्वराचा मुख्य उपयोग म्हणजे पाप केले तर ते कृष्णार्पण करतां येतें, संकट आले तर जेथे स्वतःचे कांही चालत नाही तेथे ईश्वरावर हवाला ठेवून समाधान मानतां येते, आणि ईश्वराची प्रार्थना केल्याने आपल्या मनासारखे होईल अशी आशा बाळगतां येते, पण या फोल आशेचा उपयोग काय? युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी ईश्वराची प्रार्थना केली तर तो जय कोणाला देणार? हे देखील समजण्याची ज्यांना अक्कल नाही तेच ईश्वरावर विश्वास ठेवतात.

पुढे वाचा

मनात आलं ते केलं

‘मनात आलं ते केलं’ हे हलके -फुलके तत्त्वज्ञान बाळगणारी व्यक्ती केवढे भरीव काम करू शकते हे शकुन्तलाबाई परांजपे यांनी दाखवून दिले आहे.
“मी बहुधा फ्रान्समध्ये असताना वडिलांना लिहिले की मी आज सिग्रेट ओढली.” वडिलांनी उत्तर दिले, की “हे मला आवडले नाही. पण तू आता मोठी झाली आहेस. तुझ्या मनाप्रमाणे वाग.” पुढे जन्मभर, मनात आले ते केले असे ब्रीद ठेवून वागणाऱ्या शकुन्तला परांजपे ३ मे २००० रोजी वारल्या. दिवंगत झाल्या हे म्हणणेही येथे साजायचे नाही कारण मेल्यावर काहीच राहत नाही मग स्वर्गवास काय नि दिवंगत होणे काय, सारखेच निरर्थक असे मानणाऱ्या पंथाच्या त्या होत्या.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस,
मी आपल्या आजचा सुधारकचा एक वाचक. अनेक वैचारिक आणि संशोधनात्मक लेख वाचून समाधान वाटते. मी आज न राहवून केशवराव जोशी यांच्या फेब्रु. २००० च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘ब्राह्मणेतर चळवळ’ या लेखा-बद्दल लिहीत आहे. त्यातील काही वाक्ये अत्यंत बेजबाबदार आणि पूर्वग्रहदूषित वाटतात. त्यांची डॉ. आंबेडकरांविषयी दूषित भावना आहे हे त्यांच्या अनेक ओळींवरून दिसते. ते म्हणतात, “ ‘बुद्धिवादी बॅ. आंबेडकर वृद्धापकाळी व विमनस्क परिस्थितीत म्हणू लागले की, बौद्ध धर्मात गेल्याशिवाय गती नाही.’ अस्पृश्य बौद्ध झाले तरी त्यांचे प्र न सुटलेले नाहीत.

पुढे वाचा

तत्त्वबोध

श्री. प्रकाश अकोलकर यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. एस. एस. गिल यांच्या पुस्तकाचे भाषांतर छान केले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. “ख्रि चन न्यायशास्त्राच्या गाभ्यात पाप ही संकल्पना एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे सदैव जळत राहिलेली असते’ हे पटण्यासारखे आहे. हिंदू किंवा मुस्लिम धर्मसंस्थापक निष्कलंक चारित्र्याची संकल्पना मांडत नाहीत हे सुद्धा खरे आहे. ख्रिस्ताच्या चारित्र्यात कपटनीती नाही. राजीव गांधींना बोफोर्स प्रकरणात गुंतविले गेले. जे. आर. डी. टाटा म्हणाले होते की “राजीव गांधी पोरकट आहेत” (टाईम्स १४/४/९१). ते श्री. गिलच्या पुस्तकाचे भाषांतर करीत असल्यामुळे त्यांना त्यात काही भर घालण्याचा प्र नच नव्हता तरी सर्वसाधारपणे जनमानसात “काँग्रेसवालेच भ्रष्ट आहेत’ असा समज असतो आणि वृद्ध लोक तर याबाबतीत ब्रिटिशांचे राज्य चांगले होते असे समजतात.

पुढे वाचा

बॉम्बिंग बॉम्बे

(‘इंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ न्यूक्लियर वॉर (IPPMW)”, या नोबेल शांतिपुरस्काराने गौरवित संस्थेने प्रकाशित केलेल्या बॉम्बिंग बॉम्बे या एम. व्ही. रमण यांच्या पुस्तकाचा हा सारांश आहे.)
आपण कल्पनेने मुंबईवर एक हिरोशिमावर टाकला गेला होता तसा बॉम्ब टाकू. स्थळ असेल हुतात्मा चौकाच्या वर सहाशे मीटर. यात हुतात्मा चौकाचे ‘भावनिक’ महत्त्व आहे. नुसतीच माणसे मारायची झाली तर हा बॉम्ब चेंबूरजवळ टाकणे जास्त परिणामकारक ठरेल.
आपला बॉम्ब पंधरा किलोटन क्षमतेचाच फक्त आहे, म्हणजे पंधरा हजार टन टीएनटी या स्फोटकाएवढ्या संहारकतेचा. मध्यम आकाराचे हायड्रोजन बॉम्बही आजकाल याच्या दसपट विध्वंसकतेचे असतात.

पुढे वाचा