प्रस्तुत लेखकाने फेब्रुवारी महिन्यात, १०-२-२००० पासून १४-२-२००० पर्यंत पाच दिवस तरुण भारत संघाच्या काही कार्यकर्त्यांच्या समवेत ६/८ गावांची भटकंती केली, २०/२५ जोहड, अनिकट इत्यादि पाहिले, जमेल तितक्या मंडळींशी संवाद, चर्चा केल्या आणि जो अनुभव मिळाला तो थोडक्यात असा :
१. फेब्रुवारी २००० मध्ये २०/२५ पैकी फक्त दोन जोहडांमध्ये थोडेसे पाणी होते. बाकी जोहड, अनिकट, बांध हे कोरडे होते.
२. गावांमधल्या आणि शेतांमधल्या विहिरींना भरपूर पाणी होते. शेतांवर डिझेलचे पंप होते आणि कितीही उपसा केला तरी चालेल अशी परिस्थिती होती.
३. शेते हिरवीगार होती.