आमच्या मुलाचा विवाह २४ डिसेंबर १९९७ रोजी नोंदणी पद्धतीने झाला. आमचे कुटुंबच पुरोगामी विचारांचे, विवेकवादी विचारसरणीवर चालणारे! आम्हाला व्याहीही समविचारी मिळाले.
विवाह किती साध्या पद्धतीने साजरा करावा ह्याचा विचार केल्यानंतर ठरले की फक्त सख्खी बहीण भावंडे बोलवायची. मामा, मामी, मावशी, आत्या, काकू कोणीही नाही. मित्रमैत्रिणींचे प्रतिनिधित्व करणारी एक मैत्रीण व एक मित्र! ते दोघेही साक्षीदार म्हणूनही होते. दोन डॉक्टर्स, ज्यांनी आमच्या कुटुंबाला अडचणीच्या वेळी अगदी आपलेपणाने मदत केली. त्यांच्या प्रती कृतज्ञता दर्शविण्यासाठी म्हणून त्यांना आमंत्रण दिले. (आमंत्रणपत्रिका छापल्या नाहीत. सर्वांना घरी जाऊन विवाहाला येण्याविषयी सांगून आलो.)