वैज्ञानिक तत्त्वांबद्दल एक समज असतो, की ती सर्वच वैज्ञानिकांना मान्य असतात. ती ‘निर्विवाद’ असतात. हे आपल्याला स्वाभाविक, नैसर्गिक वाटते, कारण आपण ऐकलेले असते की विज्ञानाची एक कठोर, तर्ककर्कश शिस्त आहे. कोणतीही सुचलेली कल्पना वैज्ञानिकांना प्रयोगांमधून तपासावी लागते आणि अशा तपासातून ती कल्पना खरी ठरली तरच ती ‘वैज्ञानिक तत्त्व’ म्हणून मान्य होते. आता प्रयोग, तपास, खरे ठरणे, या क्रमाने ‘सिद्ध झालेल्या गोष्टीबद्दल वाद असेलच कसा?
गंमत म्हणजे ही विज्ञानाच्या निर्विवाद असण्याची बाब फार सामान्य पातळीवरच्या विज्ञानाबाबतच खरी आहे. पाणी किती तापमानाला उकळते, यावर प्रयोग करून ते तापमान कोणते, हे सिद्ध करणे तसे सोपे असते.
देवाशी भांडण
कालनिर्णय दिनदर्शिकच्या १९९८ च्या अंकामध्ये प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचा ‘देवाशी भांडण’ हा लेख आला आहे. आम्हा विवेकवाद्यांना त्याची दखल घेणे, त्याचा परामर्श घेणे भाग आहे. तेवढ्यासाठीच मागच्या अंकामध्ये श्रीमती सुनीति देव ह्यांचा लेख प्रकाशित केला आहे. आज आमचे देवाशी भांडण आहे की नाही व असल्यास का हे येथे आणखी एका दृष्टिकोनातून मांडत आहे.
प्रा. रेग्यांचा पूर्ण लेख ‘कालनिर्णय’मध्ये आला नसावा, पानाच्या मांडणीसाठी त्याची काटछाट झाली असावी अशी शंका येते, पण वाचकांच्या समोर फक्त मुद्रित भाग असल्यामुळे त्यावरच आपले मत मांडणे भाग आहे.
जेथे श्रद्धा हेच ज्ञान असते
व्हॉल्तेर प्रमाणेच दीदरोलाही पाट्यांची चीड येत असे. व्हॉल्तेरने एके ठिकाणी म्हटले आहे. लोकांची श्रद्धा हेच त्यांचे ज्ञान’, दीदरो म्हणतो, त्यांच्या (पाद्रयांच्या) धंद्यामुळे त्यांच्या अंगात ढोंग, असहिष्णुता आणि क्रूरता हे गुण उत्पन्न होतात. पायांची शक्ति राजापेक्षाही अधिक, कारण राजा सामान्य लोकांना पदव्या देऊन बडे लोक बनवतो, पण पाद्री देवांना उत्पन्न करतो. पाढ्यापुढे राजालाही मान वाकवावी लागते. काही देशांत धर्मोपदेशक रस्त्यात नग्न हिंडतात आणि स्त्रियांना त्यांच्या दर्शनाला जाऊन त्यांच्या X X X चे चुंबन घ्यावे लागते. फ्रान्समध्ये होत नसले तरी पाद्री वाटेल तेव्हा ईश्वराला आकाशातून पाचारण करू शकतो आणि स्वत:पुढे तो इतरांना कस्पटासमान लेखतो.
पत्रव्यवहार
नाव नसलेला धर्म
आ.सु. हे जरी बुद्धिवादी लोकांचे मासिक असले तरी त्याच्या लेखक-वाचकांच्या घरी काही धार्मिक आचार होत असावेतच असा माझा अंदाज आहे. निदान माझ्या घरी तरी असे आचार होत असतात. पण तुमच्या-आमच्या या धर्माला (आजकालच्या फॅशनप्रमाणे त्याला उपासनापद्धती म्हणायचे) काही नावच राहिलेले नाही याचा मला नुकताच साक्षात्कार झाला. त्याचे असे झाले की ३ एप्रिल रोजी हैदराबादला प्रज्ञाभारती या संस्थेच्या विद्यमाने एक विचारसत्र घडवले गेले. विषय होता “हिंदुत्व आणि धार्मिक अल्पसंख्य गट’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उप-सर-कार्यवाह श्री सुदर्शन यांनी हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान विशद करताना म्हटले की हिंदू हा शब्द प्रथम परकीयांनी चलनात आणला आणि तेव्हापासून त्याचा अर्थ भारतीय असा आहे; भारतात निर्माण झालेला विचारप्रवाह म्हणजे हिंदुत्व असाच अर्थ घ्यायला पाहिजे; ‘राष्ट्रीय विचारधारेशी समरस होऊ इच्छिणाच्या मुसलमानांनीसुद्धा स्वत:ला हिंदू । म्हणवून घ्यायला कचरू नये वगैरे.
संपादकीय
मित्रहो,
अलीकडे जाणवत असलेल्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आणि वाढत्या वयामुळे संपादकमंडळाकडे मी संपादकत्वाच्या जबाबदारीमधून निवृत्त होण्याची इच्छा एक वर्षापूर्वीच व्यक्त केली होती. मासिकाचे संपादकत्व नव्या संपादकाकडे सोपविण्याची वेळ आता आली
आहे.
संपादकपदाची धुरा कोणाकडे सोपवावी याचा मी पुष्कळ विचार केला, बहुतेक सर्वांशी चर्चा केली. या सर्व विचारातून एक योजना मला सुचली. ती अशी –
संपादकमंडळ एकूण पाच जणांचे करावे, आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने आळीपाळीने एक एक वर्षभर संपादकत्व करावे.
संपादकमंडळ पुढीलप्रमाणे असावे :
दिवाकर मोहनी, प्र. ब. कुळकर्णी, बा. य. देशपांडे, नंदा खरे आणि सुनीती देव.
स्वप्न
“मी मनोराज्यात ज्या स्थितीची इच्छा करीत होते ती मला प्रत्यक्षात प्राप्त झाली. बहुरूप्याची अनेक रूपे धारण करून त्यात जी जी कामे मी केली तसे आपल्या राज्यात नियम केले –
१. सुरतेच्या लोकांना अन्न-वस्त्र-व्यापारासाठी नियम केले.
२. हत्यारांचा कायदा रद्द केला. वारली-कोळी-भिल्ल यांना हत्यारे बक्षिसे म्हणून दिली. गुरांना आधार म्हणून गोशाळा बांधल्या. मुलांसाठी रमणीय गृहे व शाळा बांधल्या. मुलांना वयाच्या चार वर्षांपासून शिक्षण-स्वच्छता शिकवली. अभ्यासक्रमात फेरफार केले. (मुले म्हणजे मुलगे व मुली दोन्ही समजावयाचे).
३. सगळे चालू कर बंद केले. सोन्याचे नाणे चालू केले.
ताहेरभाई पूनावालांचे अभीष्टचिंतन
… आज मी नास्तिक आहे. पूर्वी जच्या यात्रेला गेलो होतो. काबाच्या मशिदीत तेथल्या धर्मपंडिताने माझ्याकडून काही गोष्टी वदवून घेतल्या, त्यांत ‘मी स्त्रीकडे पाहणार नाही’ अशी एक शर्त होती. मी चक्रावलो. हे कसे शक्य आहे ? माझा श्रद्धेवरचा विश्वास डळमळला. पुढे नाथवानी कमिशनच्या स्वागतपत्रांवर मी सही केली. वृत्तपत्रांतून ते पत्रक प्रसिद्ध झाले. परिणाम काय झाला?
‘… माझ्या दुकानात शिरल्याबरोबर इमानी नोकरांनी सांगितले. सोमवारपासून आम्ही कामावर येणार नाही. बोहरा धर्मगुरू सय्यदनांच्या वतीने बहिष्काराचा फतवा निघाला आहे. जवळच्या नातेवाईकांनीही अगदी जन्मदात्री आई, भावंडे यांनीसुद्धा बहिष्कार सुरू केला.
कायदे कशासाठी? (श्रीमती प्रतिभा रानडे ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने)
श्रीमती प्रतिभा रानडे ह्यांनी माझ्या लेखांच्या उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात ‘कायदे करावयाचे ते समाजातील कमकुवत, अन्याय सोसाव्या लागणा-यांचे हितसंबंध जपण्यासाठीच असे म्हटले आहे त्याच्याशी कोणीही सहमत होईल. ज्या समाजाची सर्वांगीण आणि निकोप वाढ झालेली नाही तेथे बळी तो कान पिळी अशी स्थिती दिसते. कायद्याचे राज्य निर्माण करणे म्हणजे अन्याय करणा-यांना आवर घालणे, हे मान्यच आहे.
वरील वाक्याच्या अगोदर त्या जे म्हणतात त्याच्याशी मात्र मतभेद आहे. त्या म्हणतात, ‘…आपला समाज हा एका विशिष्ट पातळीपर्यंत सुसंस्कृत, बुद्धिमान, न्यायअन्यायाची चाड असलेला, स्वतःच्या स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवतानाच दुस-याच्या स्वातंत्र्याचाही मान ठेवणारा वगैरे आहे असे (मोहनी) गृहीत धरीत आहेत असे दिसते.
रक्तदान व एडस् ह्यांविषयी शासकीय धोरण
रक्तदात्यांना त्यांच्या रक्त-तपासणीत दोष सापडल्यास तसे कळवावे की नाही याबद्दल वृत्तपत्रांत सध्या चर्चा चालू आहे. त्याबद्दल निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नाची व्याप्ती समजून घेतली पाहिजे. नमुन्यादाखल कोल्हापूर शहराचा विचार करू. कोल्हापूर शहरामध्ये गेल्या वर्षी २५,००० जणांनी स्वेच्छेने (त्याबद्दल आर्थिक मोबदला न घेता) रक्तदान केले. त्यापैकी ५% म्हणजे १२५० जणांचे रक्त एडस् व्हायरस युक्त, १०% म्हणजे २५०० जणांचे रक्त हिपॅटायटिस बी (एक प्रकारच्या काविळीने युक्त) व १% म्हणजे २५० जणांचे रक्त व्हीडीआरएल पॉझिटिव्ह म्हणजे गुप्तरोग युक्त निघाले. काही जणांच्या रक्तात दोन किंवा तीनही दोष निघाले पण या ४००० व्यक्तीपैकी एकालाही, “तुला असा रोग आहे व तू उपचार करून घे, किंवा तुझ्यापासून इतरांना हा आजार होऊ नये यासाठी काळजी घे” असे सांगितले जात नाही.
माध्यमिक शिक्षणसंस्थांपुढील आह्वान
माध्यमिक शिक्षणक्षेत्रात शिकवणीवर्गाचे वाढते प्रस्थ याविषयी बरीच उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांतून होत असते. सामान्य पालकवर्गास आपल्या पाल्यास शिकवणी लावणे हे एक अप्रिय परंतु आवश्यक कर्तव्य वाटू लागले आहे. मोठ्या महानगरांपासून तर अगदी तालुक्याच्या गावांपर्यंत सर्वत्रच शाळांबरोबरच लहानमोठे शिकवणी वर्गही उत्तम व्यवसाय करीत आहेत. पूर्वी, म्हणजे ३०-४० वर्षांपूर्वी काही मोजकेच सुखवस्तु पालक आपल्या मुलांना शाळेतील नाणावलेल्या शिक्षकांच्या घरी शिकण्यासाठी पाठवीत असत. त्यामध्ये परीक्षेत अधिक गुण मिळावेत या ऐवजी विद्यार्थ्याचा विषय पक्का व्हावा हीच अपेक्षा महत्त्वाची असे. परंतु हे साधे, सरळ समीकरण गेल्या अर्धशतकात पार बदलून गेले असून, आता केवळ परीक्षेत अधिक गुण मिळावेत याच एकमेव उद्देशाने शिकवणी लावली जाते, कारण बोर्डाच्या
परीक्षेत उत्तम गुण मिळविल्याखेरीज आयुष्यातील उत्कर्ष शक्य होत नाही.