गतार्थ भारतीय वास्तुशास्त्र

भारतीय वास्तुशास्त्र शिल्पशास्त्राचे एक उपांग आहे. शिल्पशास्त्रात एकूण दहा विषय येतात व वास्तुशास्त्र हे त्यांतील एक. त्याचा विस्तार एकूण अठरा ऋषींनी अठरा संहितांत केलेला आढळतो. त्यातील कश्यप, भृगुव मय यांच्या संहिता जास्त प्रचलित आहेत. भौगोलिकदृष्ट्या दक्षिणेमध्ये त्या पुरातन काळापासून प्रचलित असल्याने आजही आपल्याला दक्षिणेकडील संहितांचाच प्रचार होतानाआढळतो.
शिल्पशास्त्राच्या विस्तारात वजने, मापे, पदार्थवत्यांचे गुणधर्म, त्यावर करावयाच्या प्रक्रियाव त्यापासूनचे फायदे तोटे हे विस्ताराने येतात, व वास्तुशास्त्राला पण ते लागू होतात. ह्या एका बाबतीत पुरातन वास्तुशास्त्र हे आजच्या बांधकामशास्त्राची जननी म्हणता येईल. दिशा निश्चितीच्या प्रक्रिया, मोजमापाच्या पद्धती व गणिते, ह्याचप्रमाणे बांधकामाच्या संबंधात करावयाचे करार, त्यातील अटी, मुख्यापासून ते कनिष्ठापर्यंतव्यक्तींनी करावयाची कामेव त्यातील सूत्रबद्धता, त्यांना द्यावयाची दक्षिणा इत्यादि गोष्टीआजच्यापुढारलेल्या पद्धतींशी आश्चर्यकारकरीत्याजुळतात.

पुढे वाचा

गीता-ज्ञानेश्वरीतील एक अनुत्तरित प्रश्न

‘ही भगवद्गीता अपुरी आहे’ हा प्रा.श्री. म. माटे यांचा एक महत्त्वपूर्ण लेख. ‘विचारशलाका’ या त्यांच्या ग्रंथात तो समाविष्ट केला गेला आहे.

त्या लेखात भगवद्गीतेच्या पहिल्याच म्हणजे मुखाध्यायात अर्जुनाने उपस्थित केलेले दोन प्रश्न मांडले आहेतः
(१) आप्तस्वकीयांच्या मृत्यूविषयीचापहिला चिरंतन स्वरूपाचा प्रश्न.
आणि
(२) कुलक्षयामुळे स्त्रियांमध्ये येणारी दूषितता, स्वैर आचारवत्यातून होणारावर्णसंकर हा दुसरा नैतिक, सामाजिक प्रश्न

पहिल्या प्रश्नाचे उत्तर गीताभर केलेल्या आध्यात्मिक चिंतनात येऊन जाते. देहाचा मृत्यू म्हणजे अमर आत्म्याचा मृत्यूनव्हे हा चिंतनाचा मथितार्थ. त्याअनुरोधाने या जीवात्म्याचे ध्येय काय आणि ते गाठण्याचे मार्ग कोणते याचे विवरण गीतेत येते.

पुढे वाचा

स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज

‘मृत्यू’ शब्दाला बहुतेक सर्वजण फार घाबरतात. “जातस्य हि ध्रुवो मृत्युः” किंवा “मरणं प्रकृतिः शरीरिणाम्’ ही सुभाषिते जरी पाठ असली, तसेच केव्हा ना केव्हा प्रत्येकाला मृत्यूयेणारच हे जरी सर्वांना माहीत असले, तरीही कोणाच्याही मृत्यूची चर्चा करणे अशिष्टपणाचे मानले जाते. शुभअशुभाच्या कल्पनांचाही आपल्या समाजावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूबद्दल बोलणे अशुभ, अयोग्य मानले जाते. स्वतःच्या मृत्यूविषयीसुद्धा कोणाला आपले विचार मोकळेपणाने मांडता येत नाहीत. कोणी बोलूच देत नाहीत. अलीकडे मात्र, निदान वयोवृद्धांमध्ये तरी या विषयावर थोडीबहुत चर्चा होऊ लागली आहे.
“आत्महत्या” करणार्याू व्यक्तीबद्दल आपल्याकडे तरी अजूनही कोणी मोकळ्या मनाने विचार करीत नाहीत.

पुढे वाचा

समाज व लोकशाही

वाटाघाटीचा शिक्षणक्रम (Negotiations Seminar) असा एक कोर्स मी घेतला होता. त्यात ‘प्रतिवादीची मूल्ये समजून घेणे’ (Understanding your adversary’s values) असा एक चार तासांचा भाग होता. ‘यशस्वी वाटाघाटींसाठी दोन्ही बाजूंची व्यक्तिमत्वे व मूल्ये समजून वाटाघाटी करणे आवश्यक आहे’ अशी ह्या शिक्षणाची धारणा होती.

या कोर्समध्ये व्यक्तींची व पर्यायाने सर्व समाजाची जी मूल्ये व थर (levels) सांगण्यात आले, त्यांचा समाजाच्या उन्नतीशी, राजकारणाशी व देशाच्या सुव्यवस्थेशीही निकट संबंध आहे असे वाटते.

या शिक्षणानुसार जगातील सर्व समाज व व्यक्ती यांच्या मानसिक व वैचारिक पातळ्यांचे आठ थर आहेत.

पुढे वाचा

निंद्य आणि हीन कृत्य

मी कोणत्याही प्रकारच्या युद्धात कोणत्याही परिस्थितीत आणि कधीही सामील होणार नाही. मग त्या युद्धामागची कारणं मला कितीही पटणारी असोत.

लढाई ही एक अतिशय नीच आणि घृणास्पद कृती आहे असं मी मानतो. मानवजातीला लांच्छनास्पद अशा या कृतीवर लवकरात लवकर बंदी घातली पाहिजे. बँडच्या तालावर रांगेने चालण्यात धन्यता मानणाच्या माणसांविषयी माझ्या मनात चीड आहे. अशा माणसाला मेंदू अनवधानानं देण्यात आलेला असावा. नुसत्या पाठीच्या कण्यावरही त्याचं उत्तम भागू शकलं असतं. रणांगणावर हुकुमाची तामिली म्हणून देशभक्तीच्या नावाखाली जे काही शौर्य गाजवलं जातं, अमानुष हत्याकांड चालतं आणि एकूणच जो काही मूर्खपणा चाललेला असतो, त्याची मला अतिशय किळस येते!

पुढे वाचा

मी आस्तिक / नास्तिक का आहे?

आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द तसे परिचयाचे. पण तरीही त्यांचा नेमका अर्थ प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून. साध्या सोप्या भाषेत मी देवावर विश्वास ठेवणारा आस्तिकआणि तसं न करणारा तो नास्तिक असं समजते. आणि याच साध्या अर्थाच्या अनुषंगानं माझे विचार मांडते. मी नास्तिक का आहे? प्रश्नाच्या उत्तराचे अनेक कप्पे आहेत. काही उदाहरणांसह ते स्पष्ट करीनच.
मुळात लोक आस्तिक का असतात? पूर्वीचा काळ ढवळून पाहिला तर कुणीतरी धर्मगुरू – धर्माची शिक्षणप्रणाली पुढं हाकणारे असे जे कुणी होते त्यांनी समाज आपल्या इशा-यांवर नाचवण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

आडारकरांच्या उत्तराविषयी

डॉ. हेमंत आडारकरांच्या लेखाला मी मे ९७ च्या अंकात दिलेल्या उत्तराला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते याच अंकात छापले आहे. त्याविषयी दोन शब्द लिहिणे अवश्य वाटते.
वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे या माझ्या विधानावर ते म्हणतात की देश म्हणजे देशातील माणसे.
त्यासंबंधी एवढेच म्हणणे पुरे की विज्ञान म्हणजे प्रमाणित ज्ञानाचा संचय, तर वैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिक उद्योग करणारी माणसे. माणसे असल्यामुळे माणसांचे दोष त्यांच्याठिकाणी असू शकतात. (उदा. आपल्या शोधाविषयी खात्री करणे किंवा प्रीति असणे.) परंतु विज्ञान कोणत्याही काळी सिद्ध झालेले आणि सर्वमान्य झालेले ज्ञान.

पुढे वाचा

आस्तिकता आणि विज्ञान : दि. य. देशपांडे ह्यांच्या लेखाला उत्तर

मे १९९७ च्या ‘आजचा सुधारक’च्या कव्हरवर बर्ट्रॅंड रसेल यांचा ‘इतरांच्या मताबद्दल आदर’ हा उतारा, तर पहिल्या पानावर दि. य. देशपांडे यांच्या लेखात माझ्या नावाच्या आसपास असलेले उद्गारवाचक चिन्ह हा विरोधाभास गंमतीशीर वाटला.

वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे हे देशपांडे यांचे मत. ‘देश म्हणजे देशातील माणसे’हे माझे त्याला उत्तर.

दि. य. देशपांडे ह्यांना कोणता ईश्वर अभिप्रेत आहे? आइन्स्टाइन-बोर-एकल्स ह्यांच्या परमेश्वराच्या संकल्पना कोणत्या? ईश्वराची व्याख्या कोणती? दि. य. देशपांडे ह्यांना अभिप्रेत असलेला ईश्वर हा सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वसाधु आहे. ह्या काटेकोर चौकटीत मी नास्तिक आहे.

पुढे वाचा

सुधारणा, लैंगिकता व क्लोनिंग

हे विश्व अनादि व अनंत आहे. त्याचा पसारा, त्याचे वस्तुमान, त्याचे तेज, त्याची शक्ती, त्याचे वेग, या सर्वच गोष्टी मानवी कल्पनेबाहेरच्या आहेत. गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण त्या समजू शकत नाही. या उलट अणु-रचनेचे, अणु-परमाणूंचे आकार, वेग, भ्रमणकक्षा, वस्तुमान वगैरेंची कल्पना, गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण करू शकत नाही. पण ही विश्वाची अवाढव्य यंत्रणा काय किंवा अणूची सूक्ष्मतम यंत्रणा काय, त्या एखाद्या घड्याळाप्रमाणे नियमबद्ध आहेत. त्यामधील घटकांना स्वयंप्रज्ञाही नाही व आत्मभानही नाही. त्यांना संवेदनाही नाही व बुद्धिमत्ताही नाही. स्मृतीही नाही, व प्रगतीही नाही.

पुढे वाचा

सामाजिक सुधारणा आणि आजचा सुधारक

विवेकवादाला (rationalism) ला वाहिलेले “आजचा सुधारक’ हे जगातील प्रमुख मराठी मासिक आहे. या मासिकाचे लक्ष्य मराठी भाषिक, विशेषत: महाराष्ट्रातील जनता हेच आहे हे सुद्धा उघड आहे. ही जनता म्हणजे सामान्य जनता नसून, समाजातील विचार करण्याची आवड व कुवत असलेली मंडळी एवढीच “आ.सु.” ची वाचक आहेत. परंतु ही मोजकी मंडळीच नवे तर्कशुद्ध विचारही प्रसवू शकतात.
“आजचा सुधारक’ च्या पहिल्या संपादकीयामध्ये (आ.सु., १-१ : ३-५) यामासिकाची काही उद्दिष्टे विशद केलेली आहेत. त्यात अंधश्रद्धेचे व बुवाबाजीचे निर्मूलन, सामाजिक जीवनातील धर्माचा ‘धुडगूस’, व्रतेवैकल्ये, यज्ञ, कुंभमेळे यांवर आवर घालणे; दलित, स्त्रिया यांचे शोषण थांबविणे; अनाथ, अनौरस मुलांना आधार देण्याचे महत्व पटवून देणे.

पुढे वाचा