उदारीकृत जागतिक अर्थव्यवस्थेच्या पूर्वसंध्येतील भारत

भारतीय अर्थव्यवस्थेचे जसजसे उदारीकरण आणि जागतिकीकरण होईल, तसतसे आपल्याला राष्ट्र म्हणून खुल्या, स्पर्धात्मक जागतिक बाजारपेठेचे धक्के-झटके सहन करावे लागतील. स्वातंत्र्यानंतर आपल्या उद्योगधंद्यांना संरक्षण दिले गेले, ज्यामुळे कमी गुणवत्तेचा माल प्रचलित होत राहिला. जसे, अनेक वर्षे नवे ‘मॉडेल’ न काढलेली हिंदस्तान मोटर्सची अॅम्बॅसेडर कार, “आपण जे काही बनवू ते खपतेच’ या भारतीय उद्योजकांच्या भावनेतून जागतिक बाजारपेठांमध्ये गुणवत्तेत किंवा किंमतीतही न टिकू शकणारी उत्पादने आज आपल्या येथे दिसतात. आता आपल्याला विकसित देशांचे तंत्रज्ञान व भांडवल मिळवणे गरजेचे वाटू लागले आहे. हे तंत्रज्ञान आणि भांडवल ज्या किंमतीत मिळेल, ती किंमतही जागतिक बाजारपेठेतच ठरेल, कारण इतरही विकसनशील देशांना याच सेवांची गरज आहे.

पुढे वाचा

विश्वातील सर्वव्यापी मूलतत्त्व

डॉ. हेमंत आडारकरांनी माझ्या पत्राची (आ.सु. ८:४, १११-११२) दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार. विश्वाच्या उत्पत्तीत व संरचनेमध्ये कोणा सूत्रधाराचा हात आहे असे डॉ. आडारकरांना जाणवते (आ.सु. ८:२, ५९-६१) या त्यांच्या जाहीर विधानावर आमचा तीव्र आक्षेप आहे. एखादा डॉक्टर, पोलीस अधिकारी, कवी, वकील यांच्यासारखाच शास्त्रज्ञ आस्तिक/नास्तिक असू शकतो ( आ.सु. ८.५, १५२-१५३) हे आडारकरांचे म्हणणे ही शोचनीय गोष्ट आहे. भारतातील एका नामवंत विज्ञानसंस्थेशी संबंध असलेल्या डॉक्टरआडारकरांसारख्या वैज्ञानिकाने अशी अवैज्ञानिक विधाने सार्वजनिकपणे करावीत हे भारतीय विज्ञानाच्या प्रगतीसाठी अयोग्य आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे.

पुढे वाचा

विक्रम, वेताळ आणि अप्रिय उत्तरे

राजा, आता तू मला गोंधळवण्यात पटाईत व्हायला लागला आहेस. पण अजून या ‘असली घी’ खाल्लेल्या ‘पुरान्या हड्डीत’ तुला बांधून ठेवण्याइतकी अक्कल आहे!” वेताळ म्हणाला. राजा मिशीतल्या मिशीत हसत वाट चालत राहिला.
‘राजा, माझ्या घराजवळ एक बंगला आहे. त्याच्या आवारात नोकरांसाठी काही खोल्या बांधलेल्या आहेत. बंगल्यात एक सुखवस्तू, सुस्वभावी कुटुंब गेली तीसेक वर्षे राहात आहे. ते बंगल्यात आले तेव्हा त्यांनी एक महादेव नावाचा नोकर ठेवला. अशिक्षित, पण कामसू. मुळात महादेव एकटाच होता, पण यथावकाश त्याने पार्वती नावाच्या बाईशी लग्न केले. साताठ वर्षांत त्यांना मुलगा, मुलगी, मुलगा, मुलगी अशा क्रमाने चार मुले झाली.

पुढे वाचा

विज्ञानातील व्याधी (Diseases in Science) -प्रा. जॉन एकल्स यांचे काही विचार

. इतकेच नव्हे तर या व्याधींवर करण्याचे उपाय हे कार्ल पॉपर यांच्याच लेखनात व विचारांत मिळू शकतात हे एकल्स यांनी स्पष्ट केले आहे. विज्ञानक्षेत्रातील व्याधींबद्दल प्रा. एकल्स यांचे विचार वाचकांसमोर मांडावे असे वाटल्यावरून हे टिपण लिहिण्यास घेतले.
सुरुवातीलाच प्रा. एकल्स यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे, की त्यांना हे विचार ते स्वतः संशोधनकार्यातून निवृत्त झाल्यावर, मागील आयुष्यक्रमावर दृष्टिक्षेप करताना सुचले. ते स्वतः संशोधनात गुंतले असताना त्यांच्यातही या व्याधी व हे दोष अंशतः होतेच. विज्ञानांतील संशोधनकार्य ज्या रीतीने चालविले जाते, ज्या संस्थांचा या कार्याला पाठिंबा आहे, त्यांना विज्ञान तंत्रज्ञान यांतील प्रगतीमुळे काय अपेक्षित आहे, अशा तर्हेाच्या प्रश्नांशी त्यांनी निर्देश केलेल्या व्याधी व दोष निगडित आहेत.

पुढे वाचा

प्रस्थानत्रयी व राष्ट्रवाद

भाषेचे अभ्यासक भाषेच्या दोन उपयोगांमध्ये भेद करतात. एक निवेदक, आणि दुसरा भावनोद्दीपक. निवेदक उपयोगात लेखकाचा बोलणान्याचा उद्देश माहिती देणे, वस्तुस्थितीचे वर्णन करणे हा असतो, तर दुसन्यात वाचकाच्या/श्रोत्याच्या भावना उद्दीपित करणे आणि त्याला कोणत्यातरी कर्माला प्रवृत्त करणे हा असतो. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला ‘ब्राह्मण म्हणणे जवळपास विकारशून्य असू शकेल. पण त्याला ‘भट’ किंवा ‘भटुड’ म्हणणे त्याला क्रोधाविष्ट करण्यास पुरे होईल. सामान्यपणे भाषेत दोन्ही प्रकार कमी अधिक प्रमाणात एकत्र असतात; पण क्वचित भाषेचा उपयोग शुद्ध निवेदक किंवा शुद्ध भावनोद्दीपक टोकाजवळ जाऊ शकेल. शुद्ध निवेदक प्रकार निर्विकार असू शकेल, तर शुद्ध भावनोद्दीपक प्रकार जवळपास निर्विचार असू शकेल.

पुढे वाचा

स्वातंत्र्याच्या जबाबदार्याश

“समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य रुजवायचे असेल तर ती दुहेरी प्रक्रिया असते. एक तर इतरांच्या बाबतीत आपण सहिष्णू असावे लागते. आमच्या सहिष्णुतेच्या मर्यादा आपल्यापेक्षा वेगळा विचार करणान्यांच्या बाबत उदासीनता इतक्याच आहेत. सहिष्णुतेची खरी कसोटी आपल्या श्रद्धांवर आघात करणाच्या लिखाणांच्याविषयी आपण किती सहिष्णुता दाखवतो या ठिकाणी लागते. कुणीच कुणाची मने दुखवायची नाहीत, सर्वांनी एकमेकांच्या अंधश्रद्धा जपायच्या, या दिशेने आपल्या सहिष्णुतेचा प्रवास चालू असतो! मुळात ही दिशाच चूक आहे. सर्वांनीच सर्व बाबींची चिकित्सा करायची आणि या चिकित्सेबाबत श्रद्धा कितीही दुखावोत, सहिष्णुतेने वागायचे – या दिशेने आपल्याला प्रवास केला पाहिजे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
यांस,
जुलै १९९७ च्या आजचा सुधारक च्या अंकात ‘वैज्ञानिक रीत’ हा डॉ.र. वि. पंडित यांचा लेख वाचण्यात आला. या लेखात डॉ. पंडित यांनी विश्वाबद्दलची त्यांची धारणा मांडताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांविषयी थोडेसे.
र. वि. पंडित ह्यांचे ‘विश्व बहुतांशी खगोलशास्त्रज्ञांना आज तरी तत्त्वतः मान्य नाही. आजमितीस विश्वाची उत्पत्ती ही एका प्रचंड स्फोटामुळे झाली असे शास्त्रज्ञ मानतात. त्यानंतर विश्व हळूहळू थंड होत गेले आणि त्याचे आजचे तपमान -२७०° से. (कोबे उपग्रहावरील प्रयोगातून मोजलेले) आहे.
डॉ. र. वि. पंडित ह्यांची संकल्पना ही हॉईल-नारळीकर यांच्या ‘जैसे थे’ (steady State) संकल्पनेसदृशआहे.

पुढे वाचा

आस्तिक/नास्तिक

नास्तिकांचे दोन प्रकार असतात. एक म्हणतात ईश्वर नाही. ते सरळ बोलत असतात. दुसरे बिरबलाप्रमाणे वक्रोक्तीने बोलतात. बिरबल म्हणतो की बादशहाचा पोपट खात नाही, पीत नाही, बोलत नाही, श्वास घेत नाही, चोच वासून उलटा पडला आहे. पण तो स्पष्टपणे “पोपट मेला आहे’ असे म्हणणार नाही. तसेच काही नास्तिक “ईश्वर निराकार, निर्गुण, निर्विकार, इंद्रियगम्य नसलेला, व सर्वव्यापी – म्हणजे खास कोठेही आहे सांगता येणार नाही असा आहे असे म्हणतात. ते स्वतःला आस्तिक म्हणवून घेतात; पण खरे म्हणजे तेईश्वर नाही हेच विधान वेगळ्या शब्दात करत असतात.

पुढे वाचा

बाराला दहा कमीः अण्वस्त्रांचे महाभारत

एखाद्या भाषेचे सामर्थ्य त्या भाषेत ज्ञान-विज्ञान-तत्त्वज्ञान किती लिहिले गेले आहे यावरून दिसते. तिच्यात जर सूक्ष्म वैचारिक विश्लेषण करता येत असेल, गुंतागुंतीच्या कल्पना चोखपणे मांडता येत असतील, अमूर्तातील अमूर्त भेद दाखविता येत असतील, विचारांचे बारकावे व्यक्तविता येत असतील, तात्त्विक चिकित्सा, तार्किक मीमांसा आणि सैद्धान्तिक अभिव्यक्ती सहजपणे साधता येत असतील, तर ती भाषा समृद्ध आहे असे समजावे. मराठीला या दिशेने अजून पुष्कळ वाट चालायची आहे. म्हणून मराठीत या प्रकारच्या ग्रंथांची जेवढी निर्मिती होईल तेवढी हवीच आहे. यादृष्टीने ‘बाराला दहां कमी’ या ग्रंथाचे आपण तोंडभर स्वागत केले पाहिजे.

पुढे वाचा

डॉ. स. ह. देशपांड्यांचा राष्ट्रवाद

आजच्या सुधारकच्या मागील दोन अंकांत ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील डॉ.स.ह. देशपांडे यांचे दोन लेख वाचले. त्यात त्यांनी राष्ट्रवादाची जी मीमांसा केली आहे त्यासंबंधी मी माझे विचार मांडीत आहे.
डॉ. देशपांड्यांच्या मते राष्ट्रवाद हा स्पर्धाशील असूनगटस्वार्थाची प्रेरणात्यातप्रधान असते. विशुद्ध भूतदया किंवा मानवी अनुकंपायांसआंतरराष्ट्रीय सहकार्यात फारसा थारा नसतो. पणअंतर्गत व्यवहारात इंग्लंडसारख्या देशात विशुद्ध चारित्र्य जपलेले आहे. राष्ट्रवाद हा प्राधान्याने सांस्कृतिक राष्ट्रवादच असतो. राष्ट्रीय भावना उद्दीपित करण्यासाठी सर्वसामान्य जनतेस जागृत करण्यासाठी स्फूर्तीची केंद्रे उज्जीवित करावी लागतात. इत्यादि, इत्यादि.
गेल्या दोनशे वर्षांच्या राष्ट्रवादाच्या विकासामध्ये स्पर्धा आणि स्वार्थ यांचाच बोलबाला होता असे म्हणणे बरोबर होणार नाही.

पुढे वाचा