श्री माधव रिसबूड यांस आणखी एक उत्तर

आ. सु. (जुलै ९७) ला लिहिलेल्या पत्रात श्री. माधव रिसबूड लिहितात – ‘फलित बीजांडापासून आरंभ करून संपूर्ण देह तयार होईपर्यंत ज्या क्रिया घडतात त्यात जोडीजोडीचे अवयव ज्या पेशींपासून बनतात त्या पेशींची दोन अधुके एकमेकांपासून वेगळी होऊन दूर होण्याची क्रिया असते. ही दोन अधुक एका काल्पनिक मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस ठराविक अंतरावर जाऊन थांबतात, त्यांना डावे-उजवेपणाचे भान असते व त्यानुसार त्यांची पुढली जडणघडण होते, आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना सिमेट्रीचे भान असते. या तीन गोष्टी निश्चितपणे हे दर्शवितात की कसलीतरी जाणीव इथे कार्यरत आहे.”

पुढे वाचा

धर्म आणि विवेकवाद -प्रा. स. ह. देशपांडे यांना उत्तर

आजचा सुधारकच्या जुलै आणि चालू अंकात डॉ. स.ह. देशपांडे यांचा ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचा उत्तरार्ध (या अंकात प्रसिद्ध झालेला) पूर्णपणे मला उद्देशून लिहिला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ईश्वर ही कल्पना मानवी मनातून सर्वस्वी काढून टाकणे शक्य दिसत नाही. मी या प्रश्नाशी नीट भिडत नाही. माझी उत्तरे मूळ मुद्दा सोडून असतात. मनुष्य जगात एकटा असून त्याला आधाराला ईश्वर लागतो या मुद्याचा प्रतिवाद मी केला तरी तो उपयुक्त होईल. एरव्ही ईश्वर आणि धर्म यांच्या समाजजीवनावरील प्रभावाचा मी पुरेसा विचार करीत नाही असा आरोप मला पत्करावा लागेल.

पुढे वाचा

परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद (उत्तरार्ध)

(७) विवेकनिष्ठेचा सांभाळ
पण हा विषय एवढ्यावरच सोडून द्यावा असे मला वाटत नाही. विवेकनिष्ठा मला प्रिय आहे आणि राष्ट्रवादही. म्हणून या समस्येतून मार्ग काढण्यासाठी एक उपाय सुचतो तो सांगतो.

विवेकनिष्ठा आदर्श समाजाचा आधार म्हणून इष्ट तर आहेच, पण एकूण विचार करता राष्ट्रवादालाही पोषक आहे. कारण राष्ट्रवादाला संघटनेच्या आड येणारे समाजाचे दोषही दूर करायचे असतात. हे दोष परंपरेतून, इतिहासातून निर्माण झालेले असतात. त्यांची नीट चिकित्सा झाली पाहिजे; कारण चिकित्सा झाल्याशिवाय त्यांच्यावर उपाययोजना करता येत नाही. पण आवाहनात्मक, स्फूर्तिकारक मांडणी करताना गटाच्या दौर्बल्यांचे विश्लेषण करणे टाळले जाते आणि त्याची उभारणी निरोगी पायावर होत नाही.

पुढे वाचा

लोक काय म्हणतील?

वास्तविक पाहिले तर ज्यांना आपण लोक म्हणतो, व ज्यांच्या अपवादाला आपण भीत असतो, त्यांवर आपले फारच थोडे अवलंबून असते. लोकांना संतुष्ट राखण्याकरिता स्ववंचन करणे हे महापातक आहे असे समजले पाहिजे. सामान्य लोक अंधासारखे गतानुगतिक असतात. विचारी पुरुष अशांच्या छंदाने नेहमी वागतील तर सत्पक्षाचा प्रसार कधीच व्हावयाचा नाही. तेव्हा अज्ञानमग्न, अविचारी आणि ज्यांच्याशी आपला अर्थाअर्थी संबंध नाही अशा लोकसमुदायाच्या निंदेकडे आणि स्तुतीकडे दुर्लक्ष्य करून ज्याच्या मनाला जी मते प्रशस्त वाटत असतील त्यांचे त्याने निर्भयपणे प्रतिपादन करावे. असे केल्याने उलट पक्षांचे ऐकून घेण्याची व विचारपूर्वक सत्यासत्याचा निर्णय करण्याची संवय सर्वास लागेल,

पुस्तकपरिचय

श्रद्धांजली
लेखक : विजय हर्डीकर, प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, मूल्य : १७५
‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पुस्तकाचे लेखक म्हणून आपल्याला परिचित असलेल्या श्री. विनय हर्डीकरांचे श्रद्धांजली हे नवे पुस्तक. यात आपले जीवन श्रीमंत करणार्याल चौदा व्यक्तींच्या कर्तृत्वाचे आलेख आहेत असे ते म्हणतात. पण पुस्तक वाचून होताच वाचकाच्या मनावर ठसते ते पंधरा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व. कारण या चौदा जणांच्या कार्याची ओळख करून देत असताना अभावितपणे लेखकाचीही ओळख पक्की होत जाते. या पुस्तकातून हर्डीकर लेखक कमी आणि कार्यकर्ते जास्त असे दिसून येतात. लेखकाचे जीवन समृद्ध करणार्याय या महानुभावांची व्यक्तिवैशिष्ट्ये चितारताना त्यांनी जागोजागी स्वानुभवाचे अस्तर लावलेले आहे.

पुढे वाचा

मी नास्तिक का आहे?

एखादी गोष्ट अस्तित्वात आहे की नाही, हा ज्ञानक्षेत्राशी निगडित प्रश्न आहे. आणि त्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण किंवा अनुमान हे ज्ञानसाधन आहे. ईश्वराविषयी जेव्हा पुरावा मागितला जातो तेव्हा हा श्रद्धेचा प्रश्न आहे, असे आस्तिक म्हणतात. श्रद्धा ही ज्ञानसाधन होऊ शकते काय?ज्याचा पुरावा देता येत नाही त्यावर विश्वास म्हणजे श्रद्धा. ही श्रद्धा ज्ञानसाधन कशी काय होऊ शकते?
ज्याप्रमाणे आस्तिक ईश्वर हे अंतिम तत्त्व मानतात त्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानात पुरुष आणि प्रकृती ही अंतिम तत्त्वे मानली जातात. तर अनेकेश्वरवादात अनेक ईश्वर मानले जातात. श्रद्धा हे ज्ञानसाधन असेल तर या विश्वाच्या, सृष्टीच्या मागचे अंतिम तत्त्व काय, या प्रश्नाचे उत्तर सारखे असले पाहिजे, हे उघड आहे.

पुढे वाचा

यांचा सेक्युलरिझम् म्हणजे केवळ हिंदुद्वेष!

बंगलोरला येत असताना, नागपूर ते मद्रास या प्रवासात आजचा सुधारकचा मे १९९७ चा अंक वाचला. या अंकात श्री अविनाश भडकमकर नावाच्या सद्गृहस्थाचा ‘‘धर्मनिरपेक्षतेला आव्हान’ या शीर्षकाचा लेख आहे. लेखकाचा आव तात्त्विक चर्चा करण्याचा असला, तरी त्यांचा खरा हेतु भारतीय जनता पार्टीला झोडपून काढण्याचा दिसून येतो. तत्त्वचिंतन कमी आणि पूर्वग्रह अधिक अशा लेखाला तात्त्विक म्हणावे किंवा नाही, असा प्रश्न कुणाच्या मनात उत्पन्न झाला, तर त्याला त्याबद्दल दोष देता येणार नाही. तथापि, श्री भडकमकर यांच्या या लेखाच्या संदर्भात,विशेषतः त्यांच्यासाठी आणि सामान्यतः सर्व तथाकथित सेक्युलरिस्टांसाठी मी काही मुद्दे प्रस्तुतकरीत आहे.

पुढे वाचा

वैज्ञानिक व आस्तिकता

वैज्ञानिक व आस्तिकता यांविषयी गेल्या तीन महिन्यात ‘आजचा सुधारक’मध्ये वेगवेगळी मते मांडण्यात आली. ह्याच चर्चेचा धागा पकडून काही माहिती देत आहे. अत्याधुनिक ज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या व सर्व प्रकारचे ऐहिक सुख भोगत असलेल्या अमेरिकन वैज्ञानिकांना ईश्वर व अमरत्व (life after death) यांविषयी काय वाटते याबद्दलची एक चाचणी नुकतीच घेण्यात आली. ३ एप्रिल १९९७ च्या ‘नेचर’च्या अंकात याविषयीचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. जॉर्जिया विद्यापीठाचे एड्वर्ड लार्सन व लॅरी विथम यांनी १९९६ मध्ये यथातथाच निवडलेल्या १००० वैज्ञानिकांची चाचणी घेण्यात आली. अशीच वैज्ञानिकांची चाचणी यापूर्वी १९१६ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व संशोधक जेम्स ल्यूबा यांनी घेतली होती.

पुढे वाचा

वैज्ञानिक रीत

डॉ. हेमंत आडारकर यांच्या पत्राच्या (आ. सु., ८:२, ५९-६१) संदर्भात थोडे विवेचन.
आपल्या पत्रातील पहिल्याच परिच्छेदात डॉ. आडारकरांनी आम्ही आमच्या लेखात (आ. सु., ८:१, २४-२५) वर्णन केलेल्या भस्मधारी तथाकथित वैज्ञानकांच्या वर्णनाची पुष्टीच केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.

विज्ञान हे गृहीतकांपासूनच सुरू होते हे खरेच. सर्वप्रथम कोणा एका वैज्ञानिकाच्या (अथवा सामान्यजनांच्याही!) तल्लख डोक्यात एखाद्या भन्नाट कल्पनेचा (idea) उगम होतो. त्यानंतर, ती व्यक्ती वैज्ञानिक असली तर, अशी कल्पना उपलब्ध ज्ञानावर तपासली जाते व ती अगदीच निराधार (म्हणजे पाण्यापासून पेट्रोल सारखी) नसेल तर ती कल्पना तपासून पाहण्यासाठी (test करण्यासाठी) प्रयोगांची आणखी केली जाते व त्यानुसार प्रयोग वारंवार (हे महत्त्वाचे) केले जातात.

पुढे वाचा

‘सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी’

उडत्या तबकड्यांमधून परग्रहांवरले जीव पृथ्वीवर येतात. इथल्या जीवजातींचे नमुने गोळा करून अभ्यासासाठी न्यायच्या हेतूने ही मोहीम असते. कुत्रे, झाडे वगैरेंना पकडून नेण्यात येते, तसेच माणसांनाही. पण त्या ‘परक्यांना इथल्या व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करायची नसते, म्हणून सर्व ‘नमुन्यांच्या तपासण्या झाल्यावर त्यांना परत स्वगृही पोचवले जाते. मांजरे, गुलाबाची रोपे वगैरेंना या प्रकारांचे स्मरण राहत नाही, व ते जीव आपल्या भाईबंदांना सावध करू शकत नाहीत. माणसांना मात्र स्मरण राहते व ती इतर माणसांना सजग करण्यासाठी अशा अनुभवांची वर्णन करतात. कधीकधी या घटनांचे स्मरण सहजपणे मनाच्या पृष्ठभागावर येत नाही.

पुढे वाचा