जागतिक कृषि आणि जैवतंत्रशास्त्र (Bio-technology)
नवीन वैज्ञानिक शोधांनी जागतिक कुपोषणाची समस्या हाताळली जाऊ शकणार नाही काय?
अगदी अलीकडेपर्यंत कृषिउत्पन्न समाधानकारकपणे वाढते आहे असे दिसत होते. १९५० ते १९८४ या काळात शेतीचे उत्पन्न २.६ पटींनी वाढले. ही वाढ जागतिक लोकसंख्यावाढीपेक्षा जास्त होती. लक्षावधि एकर जमीन नव्याने लागवडीखाली आणली गेली, आणि नवीन यंत्रे, अधिक खते, अधिक फलप्रद सिंचन (irrigation) आणि पिकांची फेरपालट यांचा जगभर उपयोग केला गेला.
आशिया खंडात धान्यांच्या नवीन जैवतंत्रशास्त्रीय प्रजननामुळे प्रगतीचे मोठे टप्पे गाठले गेले. संकरज जातींच्या वनस्पती अधिक टिकाऊ असून रोगांचा प्रतिकार अधिक समर्थपणे करू शकतात आणि अधिकृत उत्पन्न देऊ शकतात असे दिसून आले.
स्त्री-विषयक कायद्यांची परिणामशून्यता
स्त्रीवर्ग हा समाजाचा अर्धा भाग. या वर्गाने स्वतःची प्रगती करून राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वाची भर टाकावी अशी अपेक्षा आहे. म्हणून तळागाळापासून सर्व स्तरावरील स्त्रियांना सक्षम सबल बनविण्यासाठी निरनिराळे उपाय, धोरणे, कार्यक्रम आखले जात आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, राज्य, राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय स्तरावर परिषदा, परिसंवाद, मेळावे आयोजिले जात आहेत. स्वातंत्र्यापासून भारतीय स्त्रियांच्या विशेषतः शहरी भागातील स्त्रियांच्या दर्जात बराच फरक पडला आहे. शिक्षणाचा प्रसार होऊन अनेक क्षेत्रांत त्यांचा शिरकाव झाला आहे. आर्थिक दृष्ट्या परावलंबन कमी झाले आहे. पण विकासाची फळे सर्व स्तरावरील स्त्रियांपर्यंत पोचली आहेत का ?
ग्रंथ भ्रामक होऊ शकतात
अनुभव व स्वतंत्र विचार हेच ज्ञानाचे खरे साधन होय. ग्रंथ केवळ मार्गदर्शक आहेत व कित्येक वेळी तर भ्रामकही होतात. म्हणून कोणत्याही संशोधकाने स्वतःच्या अनुभवावरून स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. इतिहासात मात्र घडलेल्या गोष्टी ज्यांनी स्वतः पाहिल्या त्यांची वचने मुख्य प्रमाण मानली पाहिजेत. संशोधन करण्यात कितीही श्रम पडले तरी ते टाळू नका. असे करात्न तरच तुम्हास सिद्धी मिळेल. विचार करताना कोणताही अभिनिवेश धरू नका. आणि तुम्हास जे ज्ञान होईल ते कोणासही न भिता बोलून दाखवा. तुमची चूक झाली आहे असे दिसून आले तरी तीही बोलून दाखविण्यास कचरू नका.
स्फुट लेख
२१ मार्च ९८ च्या ‘साधना’ साप्ताहिकात ‘लग्न जे कधी झालेलेच नसते’ या नावाचा एक लेख श्रीमती कुसुम पटवर्धन यांनी लिहिला आहे. याच विषयावर २८ मार्चच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत एक टिपण आले आहे.
मुळात लग्न झालेले नसताना लग्नाचे खोटे दस्तऐवज तयार करून मुलींचे जे शोषण सुरू झाले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती या लेखांत दिली आहे. तो सारा वृत्तान्त वाचून दु:ख झाले, पण नवल मात्र वाटले नाही. न्यायपालिकेचा उपयोग अन्याय्य कामासाठी करण्याचा जो भारतीय नागरिकांचा स्वभाव आहे तोच त्या प्रसंगातून प्रकट झाला आहे.
पुस्तक-परिचय : एकविसाव्या शतकाची तयारी (भाग १)
Preparing for the Twentyirst Century हे पॉल केनेडी या अमेरिकेतील येल विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापकाचे अतिशय लक्षणीय आणि महत्त्वाचे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झाले. त्यात एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मानवजातीपुढे कोणत्या समस्या वाढून ठेवल्या आहेत, कोणती भयस्थाने आणि कोणती आशास्थाने तिच्यापुढे उभी राहणार आहेत, यांचे अत्यंत विचारप्रवर्तक आणि समर्थ विवेचन लेखकाने केले आहे. लेखक अतिशय विद्वान असून आपल्या विषयात निष्णात आहे. पुस्तकातील विषयाशी संबद्ध शेकडो ग्रंथ, जन्ममृत्यूची कोष्टके, जगात होत असलेले संपत्तीचे उत्पादन आणि तिचा उपभोग याविषयीचे तक्ते (charts) पुस्तकात सर्वत्र विखुरलेले आहेत.
ताज्या निवडणुकांचा संदेश
दोन वर्षांच्या काळातच पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या व दुसर्यांदा त्रिशंकू संसद अस्तित्वात आली. कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. अनेक प्रादेशिक पक्षांचे उमेदवार निवडून आले. त्यातून निर्माण झालेली परिस्थिती अशी आहे की या प्रादेशिक पक्षांची मदत घेतल्याशिवाय कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला सत्तेवर येणे कठीण झाले आहे. राष्ट्रीय पक्षाचे सरकार किती दिवस टिकवायचे हे आता प्रादेशिक पक्ष ठरवणार अशी अभूतपूर्व स्थिती आज निर्माण झाली आहे व हेच ताज्या लोकसभा निवडणुकांचे प्रधान वैशिष्ट्य आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
धर्म व जात यांच्या आधारे निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता.
रोजगार हमी योजना (रोहयो)
रोजगार हमी योजना सुरू झाल्याला जवळ-जवळ पंचवीस वर्षे होऊन गेली. त्यामुळे ह्याबाबत पुनर्विचार करणे फार महत्त्वाचे झाले आहे. रोहयोचे महत्त्व जाणूनच जगभर ह्या योजनेचे मूल्यमापन झाले व त्यात काही दोष असले तर ते काढून टाकून ही योजना राबवावी असा एक सूर होता. अर्थात बदलत्या राजकीय परिस्थितीत कोठल्याही विधायक कार्याची उपेक्षा होते आहे त्यात रोहयोचीही झाली आहे असे वाटल्यास आश्चर्याचे कारण नाही. कोठला कार्यक्रम आजच्या परिस्थितीत जोमाने उभा राहू शकेल ? परंतु गरिबी हटविणे व ग्रामीण लोकांचा लोंढा नागरी भागात जाऊन अनागोंदी न माजु देणे ह्या दोनही गोष्टींसाठी रोहयोचा उपयोग करवून घेणे शक्य होते.
पर्यटन-व्यवसायातील एक अपप्रवृत्ती : बालवेश्या
अलीकडे नवीन आर्थिक सुधारणांबाबत खूप चर्चा होत आहे. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण व परकीय भांडवल गुंतवणूक ही या आर्थिक सुधारणांची मुख्य सूत्रे आहेत. भारताने हे नवे आर्थिक धोरण १९९१ पासून स्वीकारले आहे. भारताप्रमाणेच इतर ब-याच विकसनशील देशांत या धोरणाचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे हे देश विकसित संपन्न देशांकडून जास्तीत जास्त भांडवल (जास्तीत जास्त परकीय चलन) कसे मिळवावे यांबाबत
आटोकाट प्रयत्न करीत आहेत. वस्तूंची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्याचा रूढ मार्ग सगळे देशच वापरतात. पण गेल्या २५/३० वर्षांत पुष्कळ देशांनी आपले परकीय चलन वाढविण्यासाठी पर्यटन-व्यवसायाचा विकास व विस्तार करण्याचे धोरण ठेवले आहे पण ब-याच ठिकाणी पर्यटन विकासाच्या निमित्ताने बरीच लहान मुले (विशेषत: मुली) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात आणून ती भाड्याने देणे किंवा विकणे असे लांच्छनास्पद प्रकार घडत आहेत.
विज्ञानाची शिस्त
वैज्ञानिक तत्त्वांबद्दल एक समज असतो, की ती सर्वच वैज्ञानिकांना मान्य असतात. ती ‘निर्विवाद’ असतात. हे आपल्याला स्वाभाविक, नैसर्गिक वाटते, कारण आपण ऐकलेले असते की विज्ञानाची एक कठोर, तर्ककर्कश शिस्त आहे. कोणतीही सुचलेली कल्पना वैज्ञानिकांना प्रयोगांमधून तपासावी लागते आणि अशा तपासातून ती कल्पना खरी ठरली तरच ती ‘वैज्ञानिक तत्त्व’ म्हणून मान्य होते. आता प्रयोग, तपास, खरे ठरणे, या क्रमाने ‘सिद्ध झालेल्या गोष्टीबद्दल वाद असेलच कसा?
गंमत म्हणजे ही विज्ञानाच्या निर्विवाद असण्याची बाब फार सामान्य पातळीवरच्या विज्ञानाबाबतच खरी आहे. पाणी किती तापमानाला उकळते, यावर प्रयोग करून ते तापमान कोणते, हे सिद्ध करणे तसे सोपे असते.
देवाशी भांडण
कालनिर्णय दिनदर्शिकच्या १९९८ च्या अंकामध्ये प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचा ‘देवाशी भांडण’ हा लेख आला आहे. आम्हा विवेकवाद्यांना त्याची दखल घेणे, त्याचा परामर्श घेणे भाग आहे. तेवढ्यासाठीच मागच्या अंकामध्ये श्रीमती सुनीति देव ह्यांचा लेख प्रकाशित केला आहे. आज आमचे देवाशी भांडण आहे की नाही व असल्यास का हे येथे आणखी एका दृष्टिकोनातून मांडत आहे.
प्रा. रेग्यांचा पूर्ण लेख ‘कालनिर्णय’मध्ये आला नसावा, पानाच्या मांडणीसाठी त्याची काटछाट झाली असावी अशी शंका येते, पण वाचकांच्या समोर फक्त मुद्रित भाग असल्यामुळे त्यावरच आपले मत मांडणे भाग आहे.