डिसेंबर १९८७ मध्ये दाखल केलेल्या निवडणूकर्याहचिकेचा निकाल डिसेंबर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालय देते ही मोठी चिंतेची बाब आहे. भारतातील विधिमंडळाची मुदत (राष्ट्रीय
आणिबाणीचा अपवाद वगळता) जास्तीत जास्त पाच वर्षे आहे. याचा अर्थ निकाल लागण्याच्या वेळी सदर विधिमंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला फक्त शैक्षणिक मूल्य उरते. अर्थात् “हिंदुत्व’ हा भारतातील राजकारणातील आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या राजकारणातील केंद्रबिंदू राहणार असल्याने या निर्णयाला वेगळे महत्त्व प्राप्त होते.
सर्वोच्च न्यायालयाने बाळासाहेब ठाकरे, रमेश प्रभू, सूर्यकांत महाडिक यांच्यावर ठपका ठेवणारा, तर मनोहर जोशींसह राम कापसे, प्रमोद महाजन, मयेकर, मोरेश्वर सावे, त्रातभरादेवी इत्यादींना दोषमुक्त करणारा निर्णय ११ डिसेंबर १९९५ रोजी दिला.
सर्वोच्च न्यायालय, हिंदुत्व आणि हिंदुइझमा
-१-
डिसेंबर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदुइझम’ या संकल्पनांबाबत काही विवेचन केले आहे. त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणे व त्यावर भाष्य करणे हा या लेखनाचा हेतू आहे. न्यायाधीशांनी या विषयाबाबत केलेली विस्तृत मीमांसा डॉ. रमेश प्रभू वि. श्री. प्रभाकर कुंटे आणि बाळ ठाकरे वि. प्रभाकर कुंटे या दोन प्रकरणांत दिलेल्या निकालपत्रात आली आहे. तिचाच मी मुख्यतः उपयोग करणार आहे.
-२-
प्रथम संक्षेपाने न्यायालयाचे प्रतिपादन काय आहे ते पाहू. सारांशाने ते अशा शब्दांत मांडता येईल: ‘‘हिंदुत्व’ किंवा/ आणि हिंदुइझम’ या संज्ञांना एक व्यापक अर्थ आहे आणि एक संकुचित अर्थ आहे.
हिंदुत्व आणि देशाची एकात्मता :सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा
भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्त्वावर आधारलेली आहे. भारताने हे तत्त्व स्वीकारले त्या काळातील राजकीय व सामाजिक परिस्थिती विशेष उल्लेखनीय आहे. १९४७ साली दुर्दैवाने देशाची नुकतीच फाळणी झाली होती आणि त्या काळात सर्व देशभर व विशेषतःउत्तरेकडे जातीय दंगलींचा डोंब उसळला होता. धर्माच्या नावावर एकमेकांची अमानुषपणे कत्तल चालू होती. देशात निर्वासितांचे लोंढे मोठ्या प्रमाणावर येत होते. देशातले वातावरण अशाप्रकारे धर्मान्ध शक्तींच्या दंगलीने कुंद झालेले असताना आपल्या देशात भारतीय राज्यघटनेचे एकेक कलम तयार होत होते. अशा दंगलीच्या काळातही आपल्या देशाची राज्यघटना तयार होत असताना आपण आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्त्वावरआधारलेली आहे ही अतिशय महत्त्वाची घटना आहे.
हिंदुत्व आणि सर्वोच्च न्यायालय
११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एका त्रिसदस्यीय खंडपीठाने काही खटल्यांमध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अपीलांवर निर्णय जाहीर केले. ही अपीले काही शिवसेना व भा.ज.पा.च्या उमेदवारांच्या निवडणुकांच्या वैधतेविषयीच्या निर्णयाबद्दल होती. मुंबईच्या उच्च न्यायालयाने या उमेदवारांच्या निवडी रद्द केलेल्या होत्या. त्या रद्द करण्याचे कारण असे की १९५१ सालच्या रेप्रिझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्टच्या सेक्शन १२३ (३) मध्ये व्याख्या केलेल्या भ्रष्ट मार्गाचा या उमेदवारांनी वापर केलेला होता. सेक्शन १२३ (३) मध्ये निर्दिष्ट केलेला भ्रष्ट मार्ग म्हणजे उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने उमेदवाराच्या सम्मतीने धर्माच्या भावनेने मत देण्याविषयी किंवा न देण्याविषयी आवाहन करणे.
भारताची धर्मनिरपेक्षता टिकून राहणे आवश्यकः पूर्ण न्यायपीठाने ह्याबद्दलचा संभ्रम दूर करण्याची गरज
आपणहून स्वतःवर संकटे ओढवून घेऊन दुःख, क्लेश भोगण्याची दुर्बुद्धी भारतालाच सुचते. इतर कोणत्याही राष्ट्राच्या बाबतीत ते संभवत नाही. स्वतःला झोडपून, कोरडे ओढून घेण्याच्या शतकानुशतके चालत आलेल्या या परंपरेचे आपणच वारसदार आहोत.
खरोखरच, भारताला फाटाफूट, विभक्तता या अलगवादाच्या “एड्स्’ च्या रोगाचा शाप मिळालेला आहे. ह्या रोगाने जनमानसाचा कब्जा घेतल्यामुळे तो आता सर्वत्र फैलावत आहे आणि या घडीला तरी त्यावर कोणताही रामबाण उपाय दृष्टिपथात दिसत नाही. धर्म आणि जात ह्या दोन सर्वांत अनिष्ट शक्तीच आपल्या या फाटाफुटीला मुख्यत्वेकरून जबाबदार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रसंगी आपल्या देशाची थोर सेवा बजावली आहे.
धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय विशेषांक
संपादकीय : अभ्यागत संपादकांचे
निवडणुकीच्या प्रचारात “हिंदुत्व’ हा मुद्दा घेऊन प्रचार केल्यास निवडणूक कायद्यातील १२३ व्या कलमातील उपकलम (३) मध्ये वर्णिलेल्या भ्रष्ट पद्धतीचा अवलंब होत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रमेश प्रभू वि. प्रभाकर काशीनाथ कुंटे [(१९९६), १ सुप्रीम कोर्ट केसेस, पान १३०] या खटल्यात दिला. या निर्णयाचा फायदा श्री. मनोहर जोशी व प्रा. राम कापसे यांना मिळाला. मनोहर जोशी वि. नितीन भाऊराव पाटील (१९९६), १ सुप्रीम कोर्ट केसेस, पान १५९ व रामचंद्र कापसे वि. हरिवंश रामकुबल सिंग (१९९६), सुप्रीम कोर्ट केसेस, पान २०६ या निर्णयामुळे भाजपा-शिवसेना या हिंदुत्ववादी राजकीय पक्षांना हुरूप आला.
पत्रव्यवहार
श्री दि. य. देशपांडे यांस स. न.
आपला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दलचा लेख वाचला. श्री. रेगे यांनी महाराष्ट्र फौंडेशनच्या बक्षीससमारंभाच्या वेळच्या भाषणात मराठी भाषांतर केलेल्या तत्त्वज्ञान इत्याबद्दलच्या पुस्तकांची आवश्यकता आहे असे म्हटले होते. श्री. भटकळ यांना अशी पुस्तके कॉलेज- विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात रस आहे असे मला समजले. (महाराष्ट्र फौंडेशनच्या बक्षिसांची योजना करणार्या श्री. देशमुखांनी मला ही माहिती दिली.)
अशी पुस्तके, म्हणजे जी मराठी माध्यमातून तत्त्वज्ञानासारख्या लिबरल आर्टच्या शिक्षणासाठी वापरता येतील त्यांचे भाषांतर सुरू करण्याची योजना स्पॉन्सर करावी अशी माझीकल्पना आहे.
पण भारतात कुठली पुस्तके, ती वापरली जातील का?
पत्रव्यवहार
सम्पादक, आजचा सुधारक ह्यांस,
आपण आपल्या नियतकालिकाच्या एप्रिल १९९६ च्या अंकात प्रा. स. ह. देशपांडे ह्यांच्या भूमिकेचा जो प्रतिवाद केला आहे त्यासंबंधी काही शंका. ह्या शंकाच आहेत ह्याचा विसर न व्हावा.
(१)“एका बाजूला धर्मसंस्थापक ईश्वर असल्यामुळे…” ह्या शब्दांनी सुरू होणारा तुमचा तर्क घ्या. त्यात ईश्वर व प्रेषित हे शब्द येतात. आता ह्या संज्ञा सेमिटिक धर्मातल्या आहेत; पौर्वात्य धर्मपरंपरात त्या नाहीत, किंवा ईश्वराच्या संकल्पनेत उभय परंपरांत मूलभूतफरक आहे हे लक्षात घेतले तर धर्मसुधारणा अशक्य आहे किंवा तो व्याघात आहे असे म्हणणे कितपत सयुक्तिक ठरते?
हिंदुत्वः ह. चं. घोंगे यांना उत्तर
एप्रिल १९९६ च्या आजचा सुधारक च्या अंकांत “हिंदुत्व : प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे’ हा श्री. घोंगे यांचा लेख आला आहे. त्याला हे उत्तर आहे.
प्रारंभी ‘‘हिन्दुत्व, अन्वेषण (उत्तरार्ध)” डिसेंबर १९९५ या त्यांच्या लेखातील अवतरणे असून त्या खाली मी फेब्रुवारी १९९६ मधील आजचा सुधारकमधील त्यांना विचारलेले प्रश्न आहेत. त्या खाली एप्रिल १९९६ च्या मासिकांतील श्री. घोंगे यांनी मला विचारलेले प्रश्न आहेत व त्यांना मी दिलेली उत्तरे आहेत.
आरंभीच फेब्रुवारी १९९६ मधील लेखात मी स्पष्टपणे लिहिले होते की, आक्षेप त्यांच्या प्रतिपाद्य विषयाबाबत नसून त्यांत जे ऐतिहासिक उल्लेख आले आहेत त्याबद्दल आहेत.
श्री मधुकर देशपांडे यांच्या पत्राला (मार्च ९६) उत्तर
माझा बडगा फक्त भारतीय व आशियातील पुरुषांवर पडतो व पाश्चात्त्य पुरुष अतिशय उदारमतवादी असतात अशी कुणाची समजूत झाली तर त्यांची मी माफी मागते. स्त्रियांचे स्थान सर्व जगात दुय्यमच आहे. दुय्यमतेच्या पातळीत कमीअधिकपणा आहे एवढेच.
माझ्या मते अमेरिकेत अविवाहित स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य आहे. विवाहपूर्व संबंधांमुळे स्त्रियांची लग्ने अडत नाहीत. बलात्कारित स्त्रियांवर अमेरिकेत कोर्टात अन्यायच होतो.
डोमेस्टिक व्हायोलन्स’मुळे, नवर्याकने, बॉय फ्रेंडने वा घटस्फोटित नवयाने केलेल्या मारहाणीमुळे बॉस्टनच्या परिसरात दर आठवड्याला एक स्त्री मृत्युमुखी पडते.
ज्या समाजात स्त्रिया अधिक प्रमाणात मुक्त आहेत तिथे पुरुष वेश्या असतात.