डॉ. रिचर्ड क्लार्क कॅबट (१८६८-१९३९) हे हार्वर्ड विद्यापीठात एकाच वेळी निदानीय वैद्यकशास्त्र (Clinical Medicine) आणि सामाजिक नीतिशास्त्र (Social Ethics) या दोन्ही विभागांचे प्राध्यापक होते. त्यांना गुन्हेगारीकडे कल असणाच्या तरुणांनासुधारावे’ असे वाटत असे. त्यांचे असे मत होते की अशा माणसांशी कोणीतरी खूप परिचित व्हावे. हा परिचय मैत्रीच्या पातळीवर आणि खूप सखोल असावा. याने गुन्हेगारी कलाच्या तरुणांना तर फायदा होईलच, पण असा मैत्रीपूर्ण परिचय करून घेणार्यांरचे स्वत:बद्दल आणि भोवतालच्या विश्वाबद्दलचे आकलनही जास्त सखोल होईल.
हे विचार नीतिशास्त्रज्ञाला साजेसेच होते, आणि सोबत डॉ. कॅबट यांच्या वैद्यकशास्त्राचा मूर्त ज्ञानशाखेचा अनुभवही होता.
यांत्रिक (कृत्रिम) बुद्धिमत्ता
बुद्धिमत्ता उपयुक्त की भावना या वादात अलीकडे भावनिक गुणवत्तेचे पारडे जड झाल्यासारखे दिसते आहे (आजचा सुधारक ६ : ३९९). केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून असलेली मानवाची बरीच कठीण कामे, आता यंत्राद्वारे पार पाडण्याच्या उद्देशाने अनेक वैज्ञानिक कठोर परिश्रम करीत आहेत. यांत्रिक अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence = AI) नैसर्गिक मानवी बुद्धिमत्तेच्या स्तरावर नेण्याचे प्रयत्न गेल्या चाळीस वर्षांपासून होत आहेत. अमेरिकेतील अनेक प्रमुख विद्यापीठांतून याविषयी संशोधनअध्यापन होत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानियातील मूर स्कूल ऑफ इंजिनियरिंगमधील डॉ. अरविंद जोशी हे १९७० च्या दशकात या विषयाचे प्रमुख होते व मौखिक भाषेचे संगणकाच्या भाषेत तात्काळ रूपांतर करण्याचे प्रयोग ते करीत होते.
“हट्ट”
आनंद दत्तात्रय मुठे हट्टी होता. वयाच्या पाचव्या वर्षी त्यानं आईपाशी हट्ट धरला, ‘खर्यारखुर्याह’ क्रिकेट बॅटसाठी. आई म्हणाली, “चारशेची आहे ती! चल, हट्ट न करता शहाण्या मुलासारखी दहा रुपयेवाली फूटपाथवरची बॅट घे.’ आनंद ऐकेना, म्हणाला, “मी श्वास कोंडून धरणार, खरीखुरी बँट मिळेपर्यंत’. दम कोंडून तो लालनिळा झाला, पण बॅट मिळाली.
पंधरा वर्षाचा असताना त्यानं व्हिडिओ गेम सिस्टिम’ साठी हट्ट धरला. मोठा भाऊ म्हणाला, चार हजाराचा आहे तो! चल, हट्ट न करता शहाण्यासारखा शंभर रुपयांचा ‘लोगो’ घे.’ आनंद ऐकेना. म्हणाला, “मी अभ्यासच करणार नाही.
काम आणि नीती
कामव्यवहार आणि नीती यांचा परस्परसंबंध काय आहे?
सामान्यपणे असे मानले जाते की नीतीचे क्षेत्र मुख्यत: कामव्यवहाराचे आहे आणि या क्षेत्रात नीती म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कामव्यवहार विवाहांतर्गत होत राहणे म्हणजे नीती, आणि विवाहबाह्य कामव्यवहार म्हणजे अनीती अशी स्वच्छ समीकरणे याबाबतीत आहेत. एखादा पुरुष, त्यातही एखादी स्त्री, अनीतिमान आहे असे कोणी म्हणाले तर त्यांचे विवाहबाह्य लैंगिक संबंध आहेत असे अनुमान काढले जाते, आणि ते बरोबर असते.
परंतु वस्तुत: नीतीचे क्षेत्र कामक्षेत्रापेक्षा कितीतरी व्यापक आहे. चोरी, दरवडे, खून, मारामाच्या, फसविणे, नफेखोरी, काळाबाजार, गरिबांना, अशक्तांना, निराधारांना लुबाडणे, त्यांच्या मेहनतीवर पैसे मिळविणे, वेठबिगारी हे सर्व अनीतीचे भयानक प्रकार आहेत.
अधर्म कशाला म्हणावे?
अनेकदा व्यक्त केली जाणारी ‘सर्वांनी सुखी असावे, कोणी दुःखी असू नये’ ही अपेक्षा उदात्तच आहे. परंतु जगात सहसा असे असत नाही. काही जण सुखी झाले, तर काही जणांच्या वाट्याला दुःख येतेच. ज्याच्या वाट्याला दुःख असेल त्याला धीर देणे, दिलासा देणे व त्याचे दुःख हलके किंवा दूर करण्याचा प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हाती असते. ते केले नाही, तरी त्याच्या दुःखाने दुःखी होऊन त्याच्याशी समरस होणे शक्य असते. त्याच्या दुःखामध्ये आनंद किंवा त्याउलट त्याच्या सुखामध्ये दुःख मानणे ही मात्र विकृती आणि अशी विकृती तो मनुष्य दुसऱ्या, विशिष्ट धर्माचा असल्यामुळे आपल्या मनात निर्माण होत असेल तर अशा विकृतीला जन्म देणाच्या घटकाला आपणधर्म मानू शकत नाही.
पत्रव्यवहार
मा. संपादक
आजचा सुधारक यांस स. न.
श्री. ह. चं. घोंगे यांचा ‘हिदुत्व अन्वेषण’ हा आक्टोबर ९५ च्या अंकातील लेख वाचनात आला. या आधीच्या म्हणजे सप्टेंबर ९५ च्या अंकातील ‘शारदेच्या पुनर्जन्मावरील त्यांचा लेख वाचलेला होताच. आधीचा लेख वाचल्यानंतर लेखकाच्याबद्दल काही अपेक्षा आधीच निर्माण झाल्या होत्या. मात्र ‘हिन्दुत्व अन्वेषण हा लेख वाचून भ्रमनिरास झाला. लेखकाच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास केवळ ‘शाब्दिक चावटीचाच नव्हे, तर ‘वैचारिक चावटीचाही आश्रय घेऊन लिहिलेला हा लेख वाटला. जागोजाग ‘हिंदुत्व आणि ‘हिंदु यांतील वैयर्त्य दाखविताना लेखकाने ‘वैचारिक चावटीचा केलेला उपयोग निषेधार्ह वाटतो.
अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी,वेगळ्या दृष्टिकोणातून
अंताजीची बखर ही बखरीचा घाट दिलेली कादंबरी अर्थात् ही ऐतिहासिक कादंबरी आहे. तिच्यात खरा इतिहास आहेच, पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोणातून पाहिलेला आहे. ही आगळी दृष्टी हेच या कादंबरीचे मुख्य वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास मराठ्यांचाच पण प्रकाशझोत वेगळ्या क्षेत्रावर टाकला आहे. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेचा उपयोग एखादा पताकास्थानासारखा करून लेखकाने आपल्या दृष्टिकोणाचा परिचय करून दिला आहे.
अर्पण पत्रिका म्हणते :
‘सर्वश्री रणजित देसाई, ना. सं. इनामदार, वासुदेव बेलवलकर, गो. नी. दांडेकर, ब. मो. पुरंदरे, वि. ना. हडप, नाथमाधव….. आणि हो…. जॉर्ज मॅकडॉनल्ड फ्रेञ्जर यांस हे लिखाण सादर, सप्रेम अर्पण’
१.
हिंदुत्व -प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे
‘हिंदुत्व एक अन्वेषण’ या लेखासंबंधी आजच्या सुधारकात, प्रश्न करणाच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रा. आचार्यांनी ऐतिहासिक विधानांच्या सत्यासत्यतेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. श्री. रिसबुडांनी या विषयाच्या अनुषंगाने आपली वैचारिक प्रतिक्रिया मांडलेली आहे. या दोन्ही विचारवंतांच्या प्रतिक्रिया मननीय आहेत. हिंदुत्वासंबंधी आमच्या विधानांना या विद्वानांचा फारसा आक्षेप असलेला दिसत नाही. तरीपण या विचारवंतांनी लेखनातील ज्या नेमक्या त्रुटी दाखविल्या आहेत त्या भरून काढण्यापूर्वी या लेखामागे असणारी आमची मनोभूमिका प्रदर्शित करणे आवश्यक वाटते. हिंदुत्व ही संकल्पना विशिष्ट गटापुरती का होईना रूढ झालेली आहे. ती नाकारण्यात अर्थ नाही.
‘बैंडिट क्वीन’च्या निमित्ताने
काही दिवसांपूर्वी माझ्या एका विद्यार्थी मित्राचे पत्र आले. त्यात त्याने लिहिलेल्या ‘बैंडिट क्वीन’वरील प्रसिद्ध झालेल्या लेखाचे कात्रण होते. तो लेख वाचला, मनापासून आवडला, तसे त्याला कळविले अन् सिनेमा पाहण्याचे ठरविले. तोवर सिनेमा पाहावा हे तीव्रतेने जाणवले नव्हते. कुटुंबीय आणि इष्ट मित्रांसह सिनेमा पाहून आलो. परवा घातलेली बंदी वाचून आपण सिनेमा पाहण्याची संधी हुकवली नाही ह्याचे समाधान वाटले. नाहीतर एक अतिशय भेदक वास्तव कलाकृती पाहायचे राहूनच गेले असते.
‘बैंडिट क्वीन’ ही फूलनदेवीची जीवन कहाणी! लहान, अल्लड, निरागस फूलनचा डाकूची राणी बनण्यापर्यंतचा तिच्या आयुष्याचा प्रवास त्यात दाखवलेला.
न्यायाधीश आणि अंधश्रद्धा
सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या घटनेत विशेष स्थान आहे. आजकाल ज्या घटना घडत आहेत त्यामुळे तर त्या न्यायालयाबद्दलचा नागरिकांचा आदर अनेकपटींनी वाढला आहे व अपेक्षाही वाढल्या आहेत.
अशा वेळी या न्यायालयाचे पद भूषविणारे एक न्यायाधीश के. रामस्वामी यांनी नुकत्याच दिलेल्या एका निकालातील विधाने आश्चर्यजनक आहेत.
भूमिसंपादनाचे हे प्रकरण शिरडीच्या साईबाबा संस्थानचे. या संस्थानाला शिरडीचे साईबाबा मंदिर व द्वारकामाई मंदिर यांना जोडणार्या. रस्त्याकरिता बाजीराव कोते यांची जमीन व घर पाहिजे होते. खाजगी वाटाघाटी यशस्वी न झाल्यामुळे शासनाकरवी सार्वजनिक उपयोगाकरिता मालमत्ता संपादन करण्याची कारवाई सुरू झाली.