खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ८)

ऑगस्ट अंकामध्ये म्हटल्याप्रमाणे मी प्रा. श्याम कुळकर्णी ह्यांच्या पत्रातील काही शिल्लक मुद्यांचा परामर्श घेतो व त्यानंतर ह्या चर्चेचा समारोप करतो. हा विषय आता समारोपापर्यन्त आला आहे असे वाटण्याचे कारण माझा दृष्टिकोन आता वाचकांच्या लक्षात आला आहे असे माझ्या ज्यांच्याज्यांच्याशी भेटी झाल्या त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितले आहे. मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे.
मला अभिप्रेत स्वायत्तता स्त्रियांना ताबडतोब मिळू शकणार नाही ह्याची मला पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच इष्ट त्या दिशेकडे आपली वाटचाल सुरू करण्याची मला घाई झाली आहे, त्याच कारणासाठी आपण सर्वांनी मिळून पुढचा कार्यक्रम ठरविण्याची गरज शिल्लक आहे.

पुढे वाचा

मनुष्याची उत्क्रान्ती आणि आधुनिक समाज

प्रत्येक व्यक्तीमध्ये जगणे, तगणे, प्रजोत्पादन करणे, वगैरेंसाठी आवश्यक असे गुण कमी जास्त प्रमाणात असतात. या गुणांच्या संचाला एकत्रितपणे “परिस्थित्यनुरूपता”म्हणतात. कोणता गुणसंच अनुरूप, हे परिस्थितीमुळे ठरते. प्रत्येक परिस्थितीत जास्त अनुरूपता असलेल्या व्यक्तींची प्रजा भावी पिढ्यामध्ये जास्त प्रमाणात टिकते, आणि याउलट कमी अनुरूप व्यक्तींचे वंश रोडावत जातात.
आपल्या शरीररचनांसाठी हे तत्त्व लावणे जवळपास सर्वमान्य आहे. उदाहरणार्थ, सूर्याकडून पृथ्वीवर येणार्या आणि जमिनीपर्यंत पोचणार्याउ किरणांना पाहू शकणारे डोळे आपल्या “इतिहासामुळे घडले. सागर तळाशी राहणार्याा माशांना आणि इतर जीवांना या किरणांशी कर्तव्य नसते, त्यामुळे त्यांचे डोळे हे किरण पाहत नाहीत.

पुढे वाचा

कारणाची संकल्पना आणि परमात्म्याचे अस्तित्व

याच अंकात अन्यत्र डॉ. के. रा. जोशी यांचा ‘विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप हा लेख प्रसिद्ध झाला आहे. काही महिन्यांपूर्वी आजचा सुधारक मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मी आस्तिक का आहे ह्या प्रा. मे. पुं. रेगे यांच्या आणि मी आस्तिक का नाही’ या माझ्या लेखांतील युक्तिवादांना ‘पाश्चात्त्य असे नाव देऊन त्याबद्दल ते पटणारे नाहीत’ असे मत त्यांनी दिले आहे. पाश्चात्त्यांच्या ईश्वरकारणतावादात त्याची मांडणी बरोबर असल्याचे जाणवत नाही आणि त्याचे खंडनही न पटणारे आहे असे ते म्हणतात. ‘वस्तुतः। ईश्वरविरोधी अर्वाचीन विवेकवाद्यांच्या प्रस्तुत आक्षेपापेक्षाही अत्यंत तर्ककठोर आणि शास्त्रीय आक्षेप चार्वाक, बौद्ध, जैन, सांख्य, मीमांसक यांनी प्राचीन काळी उपस्थित केले होते.

पुढे वाचा

विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप

एकीकडे स्वतःच्या आस्तिकतेचे आणि दुसरीकडे स्वतःच्या नास्तिकतेचे क्रमशः मंडन करणारे प्रा. मे. पु. रेगे आणि प्रा. दि. य. देशपांडे यांचे दोन विशेष लेख आजचा सुधारकच्या जानेवारी १९९५ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. ईश्वर हा जगाचे कारण आहे, हा युक्तिवाद पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात कसा मांडला जातो आणि कसा खंडित केला जातो, याचा हा भारतीय अनुवाद दिसतो. त्यात पुढीलप्रमाणे मुद्दे आलेले आहेत. विवेकवाद्यांचा ईश्वरकारणवाद
(१)‘जी कोणती वस्तू अस्तित्वात असते तिचे तिच्याहून भिन्न असे काही कारण असते आणि ह्या कारणामुळे ती अस्तित्वात आली असते. आता जग अस्तित्वात आहे.

पुढे वाचा

बौद्धिक स्वातंत्र्याचे महत्त्व

ज्यांना बौद्धिक स्वातंत्र्य स्वतःकरता महत्त्वाचे वाटते असे लोक समाजात अल्पसंख्येत असतील, पण भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे लोक त्यांच्यामध्ये आहेत. आपण कोपर्निकस, गॅलिलिओ आणि डार्विन यांचे मानवाच्या इतिहासात महत्त्व पाहिले आहे, आणि अशी माणसे भविष्यात निर्माण होणार नाहीत असे मानायचे कारण नाही. जर त्यांना आपले काम करू देण्यापासून प्रतिबंध केला आणि त्याचे परिणाम होऊ दिले नाहीत, तर मानव जातीची प्रगति खुटेल, आणि जसे प्राचीन काळातील उज्ज्वल प्रज्ञेच्या युगानंतर तमोयुग आले तसे एक नवे तमोयुग येईल. नवे सत्य पुष्कळदा विशेषतः अधिकारी वर्गाला कटू असते; तरीसुद्धा क्रौर्य आणि कट्टरता यांच्या दीर्घ इतिहासात ते आपल्या बुद्धिमान, परंतु उनाड मनुष्य जातीचे सर्वात मोठे संपादन आहे.

पुढे वाचा

शारदेचा पुनर्जन्म

माझे परम मित्र प्रा. कुळकर्णी यांचा पुनर्जन्मासंबंधी शोध घेणारा एक प्रश्नांकित लेख वाचला. (आजचा सुधारक, ऑगस्ट १९९५) प्रा. व. वि. अकोलकरांनी कधी काळी पुनर्जन्मासंबंधी त्यांना अनुकूल असे जे चूक निष्कर्ष काढलेत त्या लेखाचे वाचन करून त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. त्यांच्या अश्रद्ध अशा भूमिकेला या लेखाने हादरा बसला. एखाद्या मृत व्यक्तीचा आत्मा दुसऱ्यां देहाचा आश्रय घेऊ शकतो हे प्रा. कुळकर्णीना मान्य झाले असावे. अन्यथा त्यांनी प्रा. अकोलकरांशी प्रतिवाद केला असता.
शारदा नावाच्या बंगाली युवतीचा आत्मा बंगालमधून शेकडो मैल अंतर कापून शंभर वर्षानंतर, बंगाल नागपूर दरम्यान असणारी लक्षावधी शरीरे नाकारून फक्त उत्तरा नावाच्या नागपुरातील एका युवतीच्या देहाचा आश्रय घेऊनच अवतीर्ण झालेला असतो अशी ही नाट्यमय घटना, प्रा.

पुढे वाचा

चर्चा : अमेरिकेतील लोकांची लैंगिकता

“अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” (आ. सु. १९९५, ६: २,४९-५४) या माझ्या लेखावर (१) श्रीमती ललिता गंडभीर व (२) प्रा. फक्रुद्दीन बेनूर यांनी अभिप्रायात्मक लेख लिहिले आहेत. (आ. सु., ऑगस्ट ९५). सुधारकातील लेख वाचले जातात व त्यांच्यावर विचार होतो हे पाहून प्रसन्नता वाटते. या उभयतांच्या मतप्रदर्शनाच्या संदर्भात मला थोडे विवेचन करण्याची इच्छा आहे.
(१)लेख अमेरिकेतील लोकांच्या लैंगिकतेविषयी झालेल्या सर्वेक्षणाचा परिचय साक्षेपी मराठी वाचकांना करून देण्यासाठी होता. या सर्वेक्षणाचे निकाल अनपेक्षित असल्यामुळे, सर्वेक्षणाच्या नमुन्यात आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन लोकांचा योग्य प्रमाणात सहभाग नसावा अशी शंका व्यक्त केली होती.

पुढे वाचा

बंडखोर पंडिता (भाग ४)

आगरकरांनीही अखेर पाठिंबा काढून घेतला ही गोष्ट रमाबाईंना लागली असणार. ज्या समाजात मोठमोठ्या धुरंधर नेत्यांबरोबर त्यांची उठबस होती, ज्योतिबा फुल्यांसारख्या बहुजनसमाजातल्या सुधारक कार्यकत्र्यापासून तो केरूनाना छत्र्यांसारख्या ज्योतिर्विद पंडितापर्यंत सर्वांच्या कौतुकादराचा विषय त्या झालेल्या होत्या, त्या समाजापासून त्या तुटत जाऊन एखाद्या मठस्थ जोगिणीचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. तेही त्यांनी शांतपणे पत्करले.
यानंतर १८९६ सालची गोष्ट. आता शारदासदनात ख्रिस्ती झालेल्या १५ मुली उरल्या होत्या. त्यांच्या पालक अर्थातच रमाबाई होत्या. या १५ धर्मकन्यकांना घेऊन एका प्रार्थनाशिबिरासाठी त्या लोणावळ्याला गेलेल्या होत्या. तिथे त्यांनी अत्यंत मनोभावे देवापाशी प्रार्थना चालविली की, ‘देवा!

पुढे वाचा

एक प्रतिक्रिया- खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (७)

‘सायंटिफिक अमेरिकन’ फेब्रुवारी ९५ च्या अंकामध्ये पार्थ दासगुप्ता ह्यांच्या ‘लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण’ ह्या शोधनिबंधाविषयी माहिती आली आहे. उद्याचे जग जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे सुखी होण्यासाठी लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण ह्या घटकांचा विकासाशी संबंध आहे अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. ह्या संदर्भात लेखकाने ह्यामध्ये स्त्रियांच्या स्थानाबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या मते, स्त्रिया जेव्हा संपूर्ण आर्थिक स्वावलंबन मिळवितात तेव्हाच कौटुंबिक सामाजिक निर्णयप्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. आपल्याला आकडो न आवडो, समाजामध्ये ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच मानाने व आदराने वागविले जाते. मारून मुटकून कुणी कुणाला मान देऊ शकत नाही किंवाआदराने बघणार नाहीं.

पुढे वाचा

‘स्त्रीमुक्ती चे सुस्पष्ट चित्र हवे!

‘चतुरंग पुरवणीतील मीना देवल यांचा ‘स्त्रीमुक्ती : मिथक आणि वास्तव हा लेख वाचनात आला. ‘स्त्रीमुक्तीसंबंधी कार्य करणार्या’ अनेक संघटना सध्या सक्रिय आहेत. या संकल्पनेवरील लेख, भाषणे, परिसंवाद आदींतून उलटसुलट विचार मांडले जात आहेत. देवल यांच्या लेखात कार्यकर्त्यांना स्त्रीमुक्तीची चळवळ समाजापर्यंत पोहोचवता आली नाही, तसेच स्त्रीवादी भूमिका समाज तसेच स्त्रिया स्वीकारावयास तयार नाहीत, ही खंत दिसून येते. लिंगभेदविरहित समाजव्यवस्था अस्तित्वात आली तरच हे दुष्टचक्र संपेल, असे आशावादी चित्र त्यांनी रेखाटले आहे.
तेव्हा त्याच दृष्टीने हे विचार मांडत आहे. स्त्रीला एक उपभोगाची वस्तू समजले जाऊ नये किंवा तसा तिचा वापर होऊ नये, कोणत्याही क्षेत्रात तिच्या गुणवत्तेवर तिला प्रवेश असावा, स्त्री म्हणून मज्जाव, आडकाठी असू नये, तिला अमानवी वागणूक मिळू नये, समान हक्क, मतस्वातंत्र्य असावे याबद्दल दुमत असायचे काहीच कारण नाही.

पुढे वाचा