मासिक संग्रह: जानेवारी, २०२२

विक्रम आणि वेताळ – भाग ७

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“हां, तर कुठे होतो आपण राजन्?” 

“तू त्या झाडाच्या फांदीवर उलटा लोम्बकळत होतास; मी तिकडून, काट्याकुटयांनी भरलेल्या पायवाटेने येऊन तुला फांदीवरून कसंबसं उतरवून खांद्यावर घेतलं आणि आता  स्मशानाच्या दिशेने निघालो आहे.” 

“तसं नाही रे बाबा, मी म्हणत होतो की गेल्या खेपेस, दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आपण कुठवर आलो होतो?”

“ओह्ह…. विसरला असशील तर बरंच आहे.”

पुढे वाचा

महाग पडलेली मोदीवर्षे

  • नोव्हें २०१६ च्या डिमॉनेटायझशन नंतर काळा पैसा, खोट्या नोटा आणि दहशतवाद कमी झाला का? 
  • मेक-इन-इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, आणि इतर योजनांनी रोजगारनिर्मितीला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाली का?
  • स्वच्छ भारत योजनेपरिणामी उघड्यावर शौच करणे बंद होऊन भारतीयांचे स्वास्थ्य सुधारले का?
  • मोदीकाळात भ्रष्टाचाराला रोख लागून शासनव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम झाली का?
  • जगभरच्या नेत्यांना मिठ्या मारणारे आणि स्वतःचे मित्र म्हणवणारे मोदी भारताचे जगातील स्थान उंचावण्यात यशस्वी झाले आहेत का?
  • निवडणुकांमध्ये दोनदा संपूर्ण बहुमताने निवडून आलेले मोदीसरकार लोकशाही पाळत आहे का?

स्टॉक मार्केट उच्चांक पाहून “सब चंगा सी” म्हणणाऱ्या उच्च मध्यमवर्गासाठी, हिंदी-इंग्लिश-मराठी टीव्ही चॅनेल्सवरच्या झुंजींना बातम्या असे समजणाऱ्या, किंवा सोशल मीडियावरून माहिती मिळवणाऱ्या सर्वांसाठी वरील बहुतांश प्रश्नांचे उत्तर “होय, नक्कीच” असे आहे.

पुढे वाचा

आजची युगनिष्ठा

‘ऐहिक निष्ठा ही आजची युगनिष्ठा आहे.’, असे आज ढोबळमानाने म्हणता येईल. ढोबळमानाने याकरिता कारण, मानवाच्या एकमूलकतेचे गृहितक हे आता मानवशास्त्राने टाकून दिले आहे. त्यामुळे, मानवी समाजाची आणि म्हणून सर्व व्यक्तींची (individuals) मूल्यनिष्ठा सर्वत्र एकसारखीच आहे, असे मानण्यातील तर्कदोष उघड आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, ती तशी कधी होती का? असे विचारल्यास, त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते. उलट, ती किती वैविध्यपूर्ण आणि समृद्ध होती, याला बरेचसे अनुकूल पुरावे मिळू शकतील. भारतीय सामाजिक-धार्मिक परंपरेचा परिपोष हा जसा आत्मवाद, ईश्वरवाद, अद्वैतवाद यांतून झाला, तसाच तो अनात्मवाद, निरिश्वरवाद, द्वैतवाद, संशयवाद आणि अज्ञेयवादातूनही झालेला आढळून येईल.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यावर संक्रांत

(२०१६ साली जलिकट्टू शर्यतींवर बंदी आली होती. त्या विषयावरील निखिल जोशी यांचा लेख ‘बिगुल’ ह्या मराठी ऑनलाईल पोर्टलवर जानेवारी २०१७ सालीं प्रकाशित झाला होता. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठविली असल्याच्या पार्श्वभूमीवर ह्या लेखाचे औचित्य वाटल्याने हा लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत.)

गेल्यावर्षी दहीहंडीवर न्यायालयाने निर्बंध घातले होते. लहान मुलांना धोकादायक परिस्थितीत टाकण्याविरुद्ध आणि सार्वजनिक जागा व्यापून सण साजरे करण्याविरुद्ध आक्षेप घेणे अर्थातच योग्य असले तरीही, प्रौढांनी किती धोका पत्करावा त्याविषयीही सरकारने आणि न्यायालयाने अतार्किक निर्बंध लादले होते. प्रस्थापित पुरोगामी विचारवंतांनी अर्थातच या निर्णयाचे धर्मनिरपेक्षता म्हणून स्वागत केले होते आणि धर्मप्रेमींनी मात्र त्या निर्बंधांना धर्मविरोधी ठरवून बंदीला न जुमानता परंपरा साजर्‍या केल्या होत्या. यावर्षीही

पुढे वाचा

तीन कविता

१. तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 

तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 
पाठवत राहा शुभेच्छा 
महिला दिनाच्या.. 
बस कुरवाळत 
तुझ्या सहनशीलतेच्या दागिन्याला 

तसेच, आयुष्यभर पुन्हा 
सहन करण्यासाठी… 
करत रहा अभिमान 
तुझ्या स्वत्वाच्या त्यागाचा 

दिवसाढवळ्या पाहिलेल्या स्वप्नाला
गुलाबी रंगाचा डोहात 
बुडवून मारण्यासाठी …
भरत रहा ऊर 

‘कशी तारेवरची कसरत करते’ 
हे ऐकून 
तुझ्या मनावर कोरलेल्या 
भूमिकेला न्याय देत 
घराचा ‘तोल’ तुझ्या मूकपणाच्या 
पायावर सांभाळण्यासाठी… 
टाकत राहा 
मनगटात बांगड्यांचे थर

नेसत राहा 
नवरात्रीच्या नऊ साड्या 
करत रहा 
मेंदूला गहाण ठेवणारे उपवास 
भरत रहा 
टिकल्यांचा ठिपका 
तुझ्या प्रशस्त कपाळाच्या  
स्वातंत्र्याच्या चंद्रावर 
ग्रहणासारखा

तुला डॉलच बनून राहायचे असेल तर….

पुढे वाचा

मानवी प्राण्यातील जाणीव भान (पूर्वार्ध)

मेंदूतील क्रिया–प्रक्रियांचे निरीक्षण
जगाच्या रहाटगाडग्यात वावरत असताना प्रत्येकाला हजारो समस्यांचा सामना करावा लागतो, प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. काही प्रश्न अगदीच क्षुल्लक असतात; परंतु आपणच त्यांना मोठे समजून आपला श्रम आणि वेळ वाया घालवत असतो. काही वेळा प्रश्न गंभीर असला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे गोत्यात सापडतो. काही समस्या मात्र खरोखरच गुंतागुंतीच्या असल्यामुळे त्यांची उत्तरं शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. काही समस्यांना उत्तरं सापडतात, काहींना अर्धवट अवस्थेत सोडून द्यावे लागते, व इतर कांहींच्या बाबतीत उत्तर नाही म्हणून गप्प बसावे लागते.

पुढे वाचा

विविधतेमध्ये अनेकता

दगडापेक्षा विदा मऊ

भारतातील मुलांच्या मनावर लहानपणापासून पाठ्यपुस्तकांद्वारे ठसवले जाते की भारतात विविधता आहे आणि विविधता असूनही एकता आहे. विविधतेत खाद्यपदार्थ, पेहराव, भौगोलिक स्थिती वगैरे गोष्टी येतात आणि एकतेत मुख्यतः भारतीय असणे आणि त्याचा अभिमान असणे हे. बहुतांश भारतीय हिंदू असूनही विविधतेमध्ये धार्मिक पैलू पण अध्याहृत असत आणि एकता मात्र देशाभिमानाद्वारे केवळ भारतीयता हीच. पाठ्यपुस्तकांमधील हे चित्र फारसे बदलले नाही. प्रत्यक्षात मात्र त्यात थोडीफार तफावत नेहमीच राहिली आहे. काही वर्षांपूर्वी यवतमाळमध्ये एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. साहजिकच समोरच्या रांगेत बसून त्या मुलामुलींचे कार्यक्रम पाहिले – नाच, गाणी आणि काही नाटुकल्या.

पुढे वाचा

इंडियन ॠतू

अनाहूत आलेल्या वादळाने
उडवून नेलीत काही पत्रे,
तुटून पडले काही पंख..!

सोबतीने आलेला मित्र
शांत थोडीच राहणार…!

जीव तोडून बँकेचे हप्ते भरले जात होते..
समतल केलेल्या जमिनीला बांधलेले बांध मात्र साथ सोडून पळाले
अन् वावरेच धो – धो वाहू लागली!

तुटलेल्या छपराला
चिकटलेले आहेत
फक्त काही कोरडे अश्रू!

एक बैल डोंगर पायथ्याशी मरून पडलाय..
एकमेव दागिना मोडून
गुलाल उधळत आणला होता..
तशा.. बांगड्या बाकी होत्या!

वावरातील पिकांचा
उडालेला हिरवा रंग,
आणि निस्तेज पडलेले
वखर आणि पांभर..
टक लावून बघतायेत
आकाशाकडे..

भुरकट पडलेल्या पिकांना
कोपर्‍यात पडलेल्या औषधांची आता गरज नव्हती…
मरून पडलेल्या बैलाच्या मागे राहिलेल्या दोराला मात्र
हवा होता एक नवा गळा!

पुढे वाचा

तुम्ही कुठल्या इंडियातले?

वीर दास ह्या विनोदी अभिनेत्याने “I come from two Indias” नावाचे कवितावजा स्फुट अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथील केनेडी सेंटरमध्ये नोव्हेंबरमध्ये सादर केले व त्याची दृकश्राव्य फीत समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली. ह्या घटनेने एकच हलकल्लोळ उडाला. त्यानं सादर केलं आहे त्यावर “कसला भारी बोलला हा” इथपासून ते “कोण हा टिकोजीराव? ह्याला कुठे काय बोलावे याची काही अक्कल तरी आहे का?” इथपर्यंत सर्व तऱ्हेच्या प्रतिक्रिया आल्या. ध्रुवीकरण झालेल्या आपल्या देशात आजकाल कुठल्याही लोकप्रिय नेत्याच्या विरोधात काही बोलणे म्हणजे देशद्रोह आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे ही देशप्रेमाची व्याख्या होऊ लागली आहे. त्यामुळे अशा टोकाच्या प्रतिक्रिया येणे अभिप्रेतच होते. अर्थातच

पुढे वाचा

न्याय आणि राज्यव्यवस्था: सध्याचे वास्तव

न्याय या संकल्पनेची व्याख्या करणे कठीण आहे. त्यात आपल्या घटनेच्या प्रास्ताविकात समावेश झालेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे गोष्टी तर आहेतच पण आणखीही काही आहे. त्यापैकी एक म्हणजे बहुतेक संस्कृतींनी मान्य केलेली परस्परत्वाची भावना आणि त्यातून आलेला सुवर्ण नियम Treat others as you would like others to treat you. हा नियम परस्पर सहकार्याच्या तत्त्वात विकसित होतो आणि न्यायप्रक्रिया राबवण्यात उपयोगी पडतो. यावर आणि इतर काही संलग्न तत्त्वांवर आधारित संस्थागत न्यायशास्त्राची मांडणी (Theory of Justice) जॉन रॉल्स नावाच्या तत्त्वज्ञाने केली आहे.

पुढे वाचा