भविष्याची चिंता मानवाला प्राचीन काळापासून सतावत आली आहे. त्यावर मात करण्यासाठी काळाच्या ओघात भविष्यकथनाच्या विविध पद्धतींनी आकार घेतला. या सर्वांचा उगम पुराणकाळात झाल्याचे दिसून येते. सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणारा आदिमानव जसजसा निसर्गबदलांशी परिचित होऊ लागला तसतसा निसर्गाच्या अफाट सामर्थ्यात स्वतःला जुळवून घेण्यास शिकला. हे शिकत असताना निसर्गाच्या वर्तमान स्थितीतून अथवा बदलातून भविष्यातील सृष्टी आकार घेत असते हे त्याला समजू लागले. झाड फुलांनी बहरलं की काही दिवसांत झाडाला गोड फळे लागतात. मुंगीसारखे कीटक पृष्ठभागावर दिसू लागले की थोड्याच दिवसांत पाऊस येतो. विशिष्ट प्राणी दिसेनासे झाले की उन्हाळा सुरू होतो.
Author archives
भाग दोनः विवरणात्मक मंत्र, मांत्रिक व चमत्कारः
[प्रा. मच्छिन्द्र मुंडे (जन्म १९५८) अंधश्रद्धा-निर्मूलनाचे काम करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन हजाराच्या आसपास व्याख्याने, प्रात्यक्षिके, सहा पुस्तकांचे लेखन, भोंदूबाबांची हातचलाखी ओळखण्यात हातखंडा व त्यामुळे पर्दाफाश करणे, भरपूर संघटनात्मक कार्य अशी त्यांची थोडक्यात ओळख आहे.] तुम्ही विवेकी कसे बनलात?
माझे लहानपण खेड्यात व घरच्या वारकरी वातावरणात गेले. डोंबिवलीजवळचे आगासन हे माझे गाव. माझ्या गावात सातवीपर्यंत शाळा होती. हायस्कूल डोंबिवलीत आणि नंतरचे शिक्षण मुंबईत झाले. मी सातवीत असताना (१९७२ साली) आमच्या गावच्या शाळेत संपतराव कदम गुरुजी हे विवेकी विचाराचे शिक्षक तेथे बदलून आले.
अंधश्रद्धाः काही संकल्पना
आपण अंधश्रद्ध आहोत हे जवळपास कोणीच पटकन म्हणणार नाही. जरा खोलवर विचार केल्यावर कदाचित एक दोन बाबी मान्य केल्या जातील पण त्या तेवढ्याच. सर्वसाधारण अंधश्रद्धा म्हणजे दुसऱ्या कुणाची विचित्र समजूत असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. या सापेक्ष व्याख्येचा एक फायदा म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध सर्वांचे एकमत होऊ शकते! कारण दुसऱ्यांची अंधश्रद्धा दूर करणे हे प्रत्येकाचे स्वाभाविक कर्तव्य असते.
अंधश्रद्धा शब्द उच्चारला की साहजिकपणे मंत्र-तंत्र, शकुन-अपशकुन, फलज्योतिष्य, नवससायास, व्रतवैकल्ये अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात. या सर्वांना अंधश्रद्धा न म्हणता चिपळूणकरांनी ‘लोकभ्रम’ असा शब्दप्रयोग केला.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या चळवळीमध्ये सगळी चळवळ या विषयाभोवती फिरत असते. आणि ज्या काही शिव्या आणि ओव्या आम्हांला चळवळीमध्ये मिळत असतात, त्याचा याच विषयाशी संबंध असतो. काही जणांना असे वाटते, आमचे काम अयोग्य आहे, अनिष्ट आहे, अरास्त आहे. काही जणांना असे वाटते की, हे काम झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपला देश २१ व्या शतकात पदार्पण करणार नाही. आणि काहीजणांना असे वाटते की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आम्ही देव, धर्म, परंपरा बुडवत आहोत. ते म्हणतात, ‘अंधश्रद्धा म्हणजे काय ? अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेच्या निखाऱ्यावरची राख. राख उडवून लावली की आतला निखारा पुन्हा पूर्वीसारखा तेजस्वी होतो.
भाग एकः संकल्पनात्मक श्रद्धा प्रमाण आहे काय?
ज्ञान म्हणजे वस्तुस्थितीविषयी यथार्थ माहिती. ‘ज्ञान’ या शब्दाचा हा एकमेव अर्थ नाही. कारण संज्ञा किंवा जाणीव या अर्थानेही या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थी कोणतीही जाणीव ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, यथार्थ आणि अयथार्थ, किंवा सत्य आणि मिथ्या ज्ञान असेही म्हणतात. पण या लेखात ‘ज्ञान’ हा शब्द सत्य ज्ञान या अर्थानेच वापरला आहे.
ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यांना प्रमाणे म्हणतात. उदा. ज्ञानेंद्रिये ही एक प्रकारची प्रमाणेच आहेत. कारण त्यांनी आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या संवेद्य गुणांचे ज्ञान होते.
पत्रसंवाद
ऑक्टोबर ०९ च्या अंकातील, देवेन्द्र इंगळे यांच्या लेखावर प्रतिक्रिया – भावनांना हात घालणारे आणि प्रचारकी थाटाचे लिखाण आ.सु.ने प्रसिद्ध करणे चूक आहे. आपल्या मूळ हेतूपासून सुधारक दूर जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. इंगळे यांच्या लेखातील आक्षेपार्ह वाक्ये (गडद ठशामधील) आणि त्यांवरील आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत.
जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा डार्विनप्रणीत सिद्धान्त त्यावेळच्या सर्वच ईश्वरवादी धर्मपंथासाठी आह्वानास्पद ठरला. डार्विनच्या उत्क्रांतिसिद्धान्त त्यावेळच्या ख्रिस्ती-इस्लामिक जगताला आह्वानास्पद वाटला तसाच तो ब्राह्मणीधर्मासही आह्वान देणारा ठरला.
इंगळे यांची “आपली (मानवाची) उत्पत्ती आणि विकास कसा आणि कोणत्या क्रमाने होत आला हा प्रश्न भेडसावत होता.
नव्या राज्यशास्त्रीय व्याख्या
इंटरनेट
समाजवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही एक गाय शेजाऱ्याला देता.
साम्यवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला थोडे दूध देते.
फॅसिझम : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला थोडे दूध विकते.
नात्झीवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला गोळ्या घालते.
लालफीतवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, एकीला गोळी घालते, दुसरीला दोहते, आणि दूध फेकून देते.
पारंपरिक भांडवलवादः तुमच्याकडे दोन गाई आहेत.
आरोग्यमंत्र्यांचा आशावाद व तरुणाईतले मनुष्यबळ
“जर वीज असेल तर लोक दूरदर्शनसंचावरील कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत पाहतील व मग उशिरा झोपल्याने मुले होणार नाहीत” असे आरोग्यमंत्री म्हणाल्याचे वर्तमानपत्रीं वाचले. त्याचबरोबर महेश भट्टांसारखे सिनेमातज्ज्ञ म्हणाले की “उत्तम मनोरंजन हे एक संततिनियमनाचे उत्तम साधन आहे.”
सारांश, लोकसंख्यावाढीचा प्रश्न अजून अस्तित्वात आहे, तो संपलेला नाही, याची जाणीव आजही कोठेतरी आहे व ही वाढ रोखण्यासाठी साधनेही सुचविली जातात हे आजच्या भारतीयांना अभिमानास्पद (?) आहे. नाहीतर भारतात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यात काम करण्याच्या वयाच्या (१६ ते ५५) लोकांचे प्रमाण त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्यापेक्षा बरेच जास्त आहे, ही आर्थिक लाभाची गोष्ट आहे, असे सुचविल्याशिवाय भारतातील कोठलीही बैठक आणि चर्चा पूर्ण होत नसल्याचे ऐकतो.
आय.सी.एस.ई.-इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह स्टिम्युलेटिंग एज्युकेशन?
मागील वर्षीचे पर्सेंटाईल सूत्र, ह्या वर्षीचे ९०:१० च्या कोट्याचे प्रकरण, तसेच कपिल सिबलांची वक्तव्ये विचारात घेता मुळात प्रत्येक बोर्डाची अंगभूत वैशिष्ट्ये समजून घेणे गरजेचे आहे. आय.सी.एस.ई.बोर्ड विविध इयत्तांमध्ये गणित, भाषा, विज्ञान आदि विषयांची हाताळणी कशा प्रकारे करते, हे जवळून पाहायची संधी मिळाल्याने गेली बारा वर्षे मला जाणवलेल्या वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकत आहे. माझा अनुभव सार्वत्रिक असेल, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. आय.सी.एस.ई.च्या प्रत्येक शाळेत असेच असेल, असे मुळीच नाही. मुळात हे बोर्ड शाळेला बऱ्याच अंशी स्वायत्तता देते. विषय व पुस्तके निवडण्याचे तसेच परीक्षापद्धती व सत्रनियोजन ठरविण्याचेही शाळेला स्वातंत्र्य असते.
कसोटीचा दगड…… पाठराखा
“आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर तेवढी कृती एकत्र करू या; आणि ती करत असताना संवादही करत राहू या.”
भोळेसर आणि आजचा सुधारक चा छोटेखानी परिवार, यांच्या संबंधांचा पाया वरील परिच्छेदात आहे.