Author archives

मीमांसा: सुखदुःखाची

‘सुख पाहतां जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ असे तुकाराम महाराज म्हणाले! बहुधा सर्वांचाच अनुभव याहून वेगळा नसावा. सुख किंवा दुःख हे अनुभवावे लागते. अनुभव घ्यायचा तर पंचेंद्रियांमार्फत आणि मनामार्फतच ह्याचा अनुभव घेता येतो. सर्वसामान्यांची मजल ‘मन’ आणि ‘इंद्रिये’ यांच्या पलिकडे जात नाही. आणि यांच्या पलिकडे जाता येते किंवा यांच्या पलिकडेच खरे सुख आहे असे सांगणाऱ्यांना अध्यात्म-वादी म्हणतात. सर्वसामान्य माणसे काय किंवा अध्यात्मवादी काय दोघांनाही दुःख नको असते आणि फक्त सुखच सुख हवे असते. उत्तम आरोग्य, चांगली विद्या किंवा कला, भरपूर पैसा आणि इस्टेट, सुशील-सुंदर बायको किंवा नवरा, उत्तमोत्तम कपडे आणि दागदागिने, गुणवान आणि कर्तबगार संतती यांचा लाभ म्हणजे सुख अशी सर्वसामान्यांची सुखाची कल्पना असते.

पुढे वाचा

फटाक्यांना घाला आळा आणि प्रदूषण टाळा

हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी, सणांचा राजाच म्हणा ना! ह्या सणाइतकी आकर्षणे किंवा वैशिष्ट्ये इतर सणांत क्वचितच सापडतील. त्यांतील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे फटाके. फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे जणू रंगांशिवाय होळी,
फटाक्यांची सुरवात चीनमध्ये झाली हे सर्वश्रुत आहे. चीनमध्ये प्राचीन काळी भूत-पिशाच्च-सैतान ह्यांना मोठे आवाज करून घालवण्यासाठी फटाके उडवत असत. म्हणजे फटाक्यांचे उगमस्थान अंधश्रद्धा हे होय. पण भारतात जे पूर्वापार फटाके वाजविले जातात ते मजा म्हणून. पूर्वी फटाके फक्त दिवाळीतच वाजवले जात. पण आजकाल फटाके लावण्याचे ‘प्रसंग’ इतके वाढले आहेत की फटाके फक्त दिवाळीतच वाजतात की सकाळी-संध्याकाळी, उन्हाळी-हिवाळी, असा प्रश्न पडतो.

पुढे वाचा

ग्रीटिंग कार्ड

ग्रीटिंग कार्ड
शुभेच्छा व्यक्त केल्याने शुभ झाले असते
तर कुत्रे कशाला फिरले असते
भोंगळे अन् हराममौत मरणाऱ्या
कुत्र्यासारखे हे आयुष्य कोणत्याही वेळी येऊ शकते
भरधाव वाहनाखाली कुठल्याही z
राजमार्गावर कावळ्याच्या शापाने
जशा मरत नसतात गाई
तितकीच असते शुभेच्छाही वांझ
जेथे शुभेच्छा कशाशी खातात
हेच नसते ठाऊक कवडीमोल असते
पसायदान अन् कविता तर नसते त्यांच्या गावी ही
[गेले काही दिवस नैवेद्य,पूजाअर्चा वगैरेंचे ‘सुपरिणाम’ सांगणारे काही लेख येत आहेत. त्यांचा फोलपणा दाखवणारी ही श्रीकृष्ण राऊतांची कविता, संक्षिप्त स्यात. (‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’.

पुढे वाचा

पत्रसंवाद

श्री. एस्. पी. तारे, टाईप D, 25/6, ऊर्जा नगर, चंद्रपुर — 442 404
महिलांच्या प्रश्नांबद्दल आजचा सुधारक फार जागरूक आहे पण त्यांत श्री. शरद जोशी यांच्या लक्ष्मी मुक्ती चळवळीला स्थान मिळायला हवे होते. १ लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आपल्या स्वीवर इस्टेटीमध्ये पत्नीच्या नावांचा पण संयुक्तपणे समावेश केला आहे. ही फार मोठी सामाजिक क्रांती आहे. त्या खेड्यांमध्ये १०० शेतकऱ्यांनी पत्नीचे नाव शेतीच्या मालकींत समाविष्ट केले आहे. अशा खेड्यांना आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढून प्रत्यक्ष भेट देऊन त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करतात. प्रत्येक जिल्ह्यांतील किमान १०० गांवे ‘लक्ष्मी मुक्ती गांवे’ व्हावीत असा त्यांचा आग्रह व प्रयत्न आहे.

पुढे वाचा

‘ल्यूटाइन बेल’

लॉइज ऑफ लंडन. काही शतके जगाच्या विमाव्यवसायाचे केंद्र समजली जाणारी संस्था. एका मोठ्या दालनात अनेक विमाव्याव-सायिक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा, क्रियेचा किंवा घटनेचा विमा उतरवून देतात. लॉइड्जची सुरुवात झाली जहाजे आणि त्यांच्यात वाहिला जाणारा माल यांच्या विम्यापासून. ‘मरीन इन्शुअरन्स’ ही संज्ञा आज कोणत्याही वाहनातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या विम्यासाठी वापरतात. पूर्वी मात्र जहाजी वाहतूकच महत्त्वाची होती आणि लॉइड्जच्या दालनातील बहुतेकांचा प्रत्येक जहाजाच्या प्रत्येक सफरीच्या विम्यात सहभाग असे. एखादे जहाज बुडाल्याची वार्ता आली की दालनाच्या एका कोपऱ्यातील ‘ल्यूटाइन बेल’ (Lutine Bell) वाजवली जाई.

पुढे वाचा

‘सुधारक’ होने की सूझ

[नागपुरातील एका हिन्दी दैनिकाने सुधारक या आमच्या हिन्दी भावंडाचे केलेले मूल्यमापन खाली देत आहोत. परीक्षणकर्त्याला आमचे हेतु नेमके समजले, याचा आनंद झाला. आम्ही आमच्या मराठी वाचकांचे लक्ष परीक्षणाच्या भाषेकडे वेधू इच्छितो. हिन्दी दैनिकांची भाषा आणि मराठी दैनिकांची भाषा यांची स्वतःच तुलना करावी! —- संपादक, आजचा सुधारक आणि सुधारक]
उर्दू और हिंदी के बीच अगर खड़ी बोली पुल है तो हिंदी और मराठी के बीच देवनागरी लिपि । इस संबंध को सुधारक नाम की पत्रिका सुदृढ़ता तो प्रदान कर ही रही है, वह हिंदी में वैचारिक बहसों को एक नए विवेक के साथ संभव बनाने का ऐतिहासिक काम भी कर रही है। आइए, इस विवेकवान और बौद्धिक परियोजना के बारे में कुछ और जानें। 1888 में मराठी भाषा के एक अग्रगामी गद्य निर्माता, समाजचिंतक और शिक्षाविद् गोपाल गणेश आगरकर ने ‘सुधारक’ नाम की एक हस्तक्षेपकारी पत्रिका शुरू की थी। इसी नाम से अभी हाल में नागपुर से कुछ मराठी भाषा-भाषी बंधुओं ने एक नायाबी वैचारिक पत्रिका निकालनी शुरू की है। श्री दिवाकर द्वारा संपादित इस पत्रिका के संपादक मंडल में दि.

पुढे वाचा

खादी (भाग ५)

स्वावलंबन म्हणजे काय?

मागच्या लेखांकामध्ये दोनतीन महत्त्वाचे मुद्रणदोष राहिले आहेत, त्याचप्रमाणे त्याची भाषा निष्कारण बोजड झाली आहे. हा विषय लिहिताना तो कसा मांडावा ह्याची स्पष्ट कल्पना नसल्यामुळे, फार विस्तार करण्याची इच्छा मुळांत नसल्यामुळे आणि डोक्यांत विचारांची गर्दी झालेली असल्यामुळे लेखनात बांधेसूदपणा नाही, विस्कळीतपणा आहे ह्याची मला जाणीव आहे. लेखनातील ह्या दोषांकडे लक्ष न देता त्याच्या आशयाकडे पाहावे अशी वाचकांना नम्र विनन्ती आहे. पुस्तकाचा कच्चा खर्डा वाचकांपुढे ठेवल्यासारखे हे सारे लिखाण झाले आहे. आणखीही एक गोष्ट. लेखांक संपविताना जे मुद्दे पुढच्या लेखांकात येतील असे म्हटलेले असते त्यांऐवजी निराळेच मुद्दे अगोदर घ्यावे अशी इच्छा होते.

पुढे वाचा

‘धोरणामागचे धोरण’

१२ जून २००१ च्या ‘हिंदू’ मध्ये श्री. राजपूत यांचा लेख वाचायला मिळाला. Inculcating a sense of pride. श्री. राजपूत हे NCERT चे, या धोरणाचा आराखडा मांडणाऱ्या संस्थेचे प्रमुख आहेत, धोरण बनवण्याच्या कामात त्यांचा ‘प्रमुख’ सहभागही आहे. लेखात या धोरणामागचा खरा हेतू श्री. राजपूत यांनी स्पष्ट केलेला आहे, आणि तो आहे, लेखाच्या शीर्षकाचाच — राष्ट्रीय अस्मिता जागवण्याचा. श्री. राजपूत यांची नेमणूक हे धोरण ह्या हेतूनेच घडावे यासाठी झाली आहे असे वाचायला मिळाले. राजपूतांनी म्हटल्याप्रमाणे धोरण बनवताना अनेक चर्चा झाल्या पण प्रत्यक्ष धोरणात त्यांना स्थान मिळालेले नाही असेही अनेक लेखांमध्ये वाचले.

पुढे वाचा

शालेय शिक्षणाविषयी थोडेसे

१. आ.सु.च्या गेल्या काही अंकांतून शालेय शिक्षणाविषयी बऱ्याच चिंता व्यक्त झाल्या आहेत. “आम्हाला का विचारत नाही” असा प्रश्न जुलैच्या अंकाच्या पहिल्या पानावर पालकांतर्फे विचारला गेला आहे. ‘परभारे’ निर्णय घेतल्याबद्दल सरकारवर टीका आहे.
२. १९८६ साली सरकारने शिक्षण धोरणावर जाहीर चर्चेचे आवाहन केले व झालेल्या चर्चेवर आधारलेली स्परेखा प्रसिद्ध केली. या स्परेखेचे पुनरवलोकन करताना NCERT या सरकारी संस्थेने अनेक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक-संस्था, गैरसरकारी संस्था यांच्यात चर्चा घडवून आणल्या व त्या आधारावर नवीन रूपरेखा तयार केली असा त्या संस्थेचा दावा आहे. या संबंधीची बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर मी एका शिक्षण-संस्थेच्या वतीने NCERT कडे या स्परेखेच्या प्रतीची मागणी केली व ती मला सहजपणे मिळाली.

पुढे वाचा

आजचा सुधारक व आगरकरांचे विचार

भारतात नुकत्याच झालेल्या फूलनदेवीच्या हत्येचे कारण व कारस्थान अजून पूर्ण उघडकीस आले नसले तरी शेरसिंग राणा याने राजपुतांच्या खुनाचा बदला घेऊन ठाकूर/राजपूत जातींचे नाव उज्ज्वल करण्यासाठी हा खून केला हे वाचून भारतात आजही जातिनिष्ठा व जात्यभिमान किती तीव्र आहे याची खात्री झाली. दोन वर्षे अगोदर फूलनदेवी जेव्हा न्यूयॉर्कला यु. एन्. ओ. मध्ये आल्या होत्या तेव्हा मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. जास्त शिक्षित नसूनदेखील भारतातल्या मागासलेल्या (दलित) समाजाच्या व विशेषतः त्यांच्या स्त्रियांच्या उन्नतीकरता त्यांची कळकळ पाहून व विचार ऐकून भविष्यात गोर-गरिबांकरता त्या जोरदार आवाज उठवतील असे वाटले होते.

पुढे वाचा