Author archives

प्रा. स. रा. गाडगीळांना उत्तर

श्री. स. रा. गाडगीळ यांनी ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. “लौकिक-ऐहिक व्यवहाराचे नियंत्रण करणारी शासनसंस्था (स्टेट) आणि पारलौकिक संकल्पनेच्या नावे लौकिक व्यवहाराचे नियमन करू पाहणारी धर्मसत्ता यांची पूर्ण फारकत म्हणजे सेक्युलॅरिझम”. त्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे युरोपात दीर्घकाळ संघर्ष चालला तो धर्मपीठ (चर्च) व राजसत्ता यांच्यात. कशावरून? तर अंतिम सार्वभौम सत्ता कोणाच्या हाती असावी, आणि नियंत्रण-नियमनाच्या क्षेत्रांची विभागणी कशी असावी हे मुख्य दोन मुद्दे. सेक्युलर राज्यातही धर्मपीठाचे अस्तित्व राहिले, एवढेच नव्हे तर लौकिक व्यवहारातही धर्मपीठाच्या आदेशांचे स्थान व महत्त्व राहिले. उदा.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

प्रिय श्री. वि. रा. लिमये यांस
स.न.वि.वि.
आपण पाठविलेले कार्ड व पत्र मिळाले. आभारी आहे. ‘आजचा सुधारक’चा फेब्रुवारी १९९२ चा अंक मिळाला. संपूर्ण अंक वाचला.
मी लेखकाच्या मताशी सहमत नाही, कारण लेखक हा पुरुष असल्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून तो विचार करतो. कोणतीही स्त्री लेखकाचे मत मान्य करणार नाही. संकोचामुळे तसे ती कदाचित व्यक्त करणार नाही. स्त्री-पुरुषांत शारीरिक, मानसिक, भावनिक कोणते फरक असतात हे किन्से रिपोर्टचा अभ्यास केल्यावर मला थोडेफार कळले, व मी या निर्णयाप्रत आलो आहे की निसर्गाचे उद्दिष्ट परिपूर्ण करण्यास आवश्यक असलेली भिन्न मानसिकता स्त्री व पुरुष यांना बहाल केलेली आहे.

पुढे वाचा

खरी वैज्ञानिक वृत्ती

वैज्ञानिक वृत्तीचे अलीकडच्या काळातील एक अतिशय लक्षणीय उदाहरण म्हणजे सापेक्षतेच्या उपपत्तीचा सबंध जगाकडून झालेला स्वीकार, आइन्स्टाइन नावाच्या एका जर्मन-स्विस्-ज्यू शांततावाद्याची जर्मन शासनाने संशोधक प्राध्यापक म्हणून पहिल्या महायुद्धाच्या आरंभीच्या काळात नेमणूक केली होती. त्याने वर्तविलेलेली भविष्ये युद्धविरामानंतर १९१९ साली झालेल्या ग्रहणाच्या इंग्लिश अभियानाने केलेल्या निरीक्षणांनी खरी ठरली. त्याच्या उपपत्तीने सबंध प्रस्थापित भौतिकीची उलथापालट झाली. डार्विनने बायबलला दिलेल्या धक्क्यासारखा धक्का आइन्स्टाइनने तत्कालीन भौतिकीला दिला होता, असे असूनही पुरावा त्याला अनुकूल आहे हे जेव्हा दिसून आले तेव्हा सर्व जगातील भौतिकशास्त्रज्ञांनी त्याची उपपत्ती बिनतकार स्वीकारली.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षता : वस्तुस्थिती आणि विचारवंत

‘आजचा सुधारक’च्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या अंकात धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाशी संबंधित दहा प्रश्न प्रसिद्ध करून त्यावर प्रतिक्रिया पाठवण्याचे आवाहन विचारवंतांना केले होते. वर्षभरातील अंकांतून या प्रतिक्रिया वाचकांसमोर आल्याच आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरचा अंक धर्मनिरपेक्षता विशेषांक म्हणूनच प्रकाशित झाला आहे. त्यानंतरही एक प्रदीर्घ लेख क्रमशः तीन अंकांतून आला आहे. (लेखांक १, लेखांक २, लेखांक ३) आमच्या प्रश्नावलीला प्रतिसाद देणाऱ्या या सर्व अभ्यासकांचे आम्ही आभार मानतो आणि वर्षभर चाललेल्या या चर्चासत्राच्या समारोपादाखल काही मुद्दे नोंदवतो.

प्रश्नावली तयार करीत असताना आज आणि आताच्या समकालीन संदर्भाचा विचार आमच्या मनात प्रामुख्याने होता.

पुढे वाचा

मरू घातलेली जात (The Endangered Species)

‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी सेक्युलरिझम व मार्क्सवाद या विषयावर आपल्या वाचकांकडून मतप्रदर्शन मागविले होते. यापैकी ‘सेक्युलॅरिझम’वर बोच लेख आले पण मार्क्सवादासंबंधीच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे संपादकांनी लिहिले आहे. मार्क्सवादावर लेख का आले नाहीत यावर विचार करताना, मला असे वाटले की ज्यांनी जन्मभर मार्क्सवादाचे कुंकू लावले ते आज मार्क्सवादावर चर्चा करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचा हा आशौचकाल आहे. आशौचकालात गेलेल्या जीबाबद्दल चर्चा करायची नसते. ज्यांनी मार्क्सवादाचे कुंकू लावले नाही अशाही लोकांत मार्क्सवादाबद्दल भयंकर आदर आहे. त्यांनी मार्क्सवादाचे कुंकू लावले नाही याचे प्रमुख कारण मासन धर्माला अफूची गोळी ठरविले.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १७)

‘कामप्रेरणा आणि व्यक्तीचे हित’ या प्रकरणात कामप्रेरणा आणि लैंगिक नीती यांच्या व्यक्तीचे हित आणि सुख यावर होणाऱ्या परिणामांविषयी यापूर्वीच्या प्रकरणांत जे लिहिले आहे त्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा विचार आहे. या ठिकाणी मानवी जीवनाचा कामप्रेरणा प्रबळ असण्याचा काळ किंवा प्रत्यक्ष लैंगिक संबंध यांच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. लैंगिक नीतीचे बाल्य, कुमारावस्था(adolesence), आणि वार्धक्यही यांवर विविध प्रकारांनी परिणाम होत असतात, आणि ते प्रसंगवशात् चांगले किंवा वाईट असतात.

रूढिवादी नीतीचा व्यापार बाल्यावस्थेत प्रतिषेध (Laboos) लादण्यापासून सुरू होतो. अतिशय अल्प वयात मुलाला आपल्या शरीराच्या काही अवयवांना चार चौघांसमोर हात लावू नये असे शिकविले जाते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

तात्पर्य सांगताना ते म्हणतातः …. तात्पर्य, व्यक्ती व समूह-जीवनाची अमुक अमुक अंगे ही राज्यसत्तेच्या नियंत्रणाखालीच असणे योग्य व वैध आहे. राज्यसत्ता धर्मपीठाच्यापेक्षा उच्चतर अशी सार्वभौम सत्ता आहे याला मान्यता मिळाली. गाभ्याचा मुद्दा सार्वभौमत्व व अंतिमतः नियंत्रण व अधिकार कोणाचा हा होता. ‘धर्माचा आधार समाजव्यवहारांना असावा की नसावा हा मुद्दा नव्हता. हाच पळशीकरांचा पायाभूत घोटाळा! युरोपमध्ये १२०० वर्षे चाललेला संघर्ष याच मुद्यासाठी होता. राज्यसत्ता विरुद्ध धर्मपीठ असा केवळ दोन सत्ताकेंद्रांचा सार्वभौमत्वासाठी चालेला हा लढा नव्हता. यामागील तत्त्व महत्त्वाचे होते. धर्मपीठ या कल्पनेमागे ईश्वर, त्याने पृथ्वीवर पाठविलेले प्रेषित, प्रेषितांच्या मुखातून व्यक्त झालेले ईश्वराचे संदेश व आज्ञा आणि हे सर्व ज्यात ग्रथित केलेले आहे असे धर्मग्रंथ या चार वस्तू येतात, तेव्हा एका बाजूला ऐहिक पातळीवरून सामाजिक, राजकीय, आर्थिक, विवाहसंस्थाविषयक, मालकी हक्कविषयक, गुन्हाविषयक-थोडक्यात सांगायचे तर सर्व समाजव्यवहाराचे (परलोकविषयक विचार वगळून) नियमन-नियंत्रण करण्यासाठी अवतरलेली मानवनिर्मित राज्यसत्ता, आणि दुसऱ्या बाजूला ईश्वराने पाठविलेले प्रेषित, त्यांनी प्रगट केलेले ईश्वरी संदेश व आज्ञा, अषितांनी ग्रथित केलेले धर्मग्रंथ आणि त्यांतील विधिनिषेध म्हणजेच ईश्वरी कायदा (Divine Law) यांच्यामधील हा संघर्ष होता.

पुढे वाचा

सहजप्रवृत्तीला पटेल तेच करावे

मी जे काही थोडे कार्य केले ते हौशीने, मनाच्या उत्साहाने. त्याग, तपश्चर्या, सेवा, दया हे शब्द उगाच माझ्यासाठी खर्च करू नका. त्यांचा मला नाद नाही. मी कुणासाठी म्हणून काही केले नाही. माझ्या स्वतःच्या आनंदाचा मोठा भाग त्यात होता. तशी मी बुद्धिप्रधान आहे. नेम वगैरे मी मानत नाही. शरीराला ज्याची जेवढी गरज आहे तेवढे मी पुरवते. अट्टाहासाने काही सोडत नाही. मनावर लादून काही करत नाही, लौकिकद्रष्ट्या करायची ती व्रतवैकल्ये मला हास्यास्पद वाटतात. परंतु शास्त्रीजींनी सुचवलेल्या सोमवाराचा उपास मी श्रद्धेने करते.

मनातल्या संयमाचे महत्त्व मला फार वाटते.

पुढे वाचा

हे विवेकवादी विवेचन नव्हे !

प्रा. दि. य. देशपांडे यांचे ‘गीतेतील नीतिशास्त्र ह्या शीर्षकाखाली दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत त्यांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर प्रखर टीका केली आहे. गीतेवर ह्यापेक्षाही प्रखर टीका इतरांनी केलेली आहे. सत्यान्वेषणाच्या दृष्टीने केलेली कोणतीही टीका स्वागताईच ठरावी; कारण त्यातून सत्य अधिकाधिक स्पष्ट होण्याला मदत होते. तेव्हा टीका कोणत्या दृष्टीने केली हे महत्त्वाचे ठरते.

गीतेतील तत्त्वज्ञानाचे आपण ‘विवेकवादी भूमिकेवरून परीक्षण करीत आहोत असे प्रा. देशपांडे म्हणतात. ह्या क्षेत्रांतील त्यांचा अधिकार मान्य करूनही त्यांचे प्रस्तुत परीक्षण विवेकवादाला धरून नाही असे नम्रपणे सुचवावेसे वाटते….

गीता हे मुख्यतः मोक्षशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र आहे हे प्रा.

पुढे वाचा

विवाहयोग्य वय- वास्तव व प्रचार

मुलींच्या विवाहाचे योग्य वय १८ च्या वर व मुलांचे २१ च्या वर असा दूरदर्शनवर अनेक वर्षांपासून प्रचार करण्यात येत आहे. या वयांच्या आधी विवाह करणे हा कायद्याप्रमाणे गुन्हादेखील आहे. १८ वर्षांच्या खाली मूल झाल्याने स्त्रीच्या व अपत्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो हा या कायद्याच्या समर्थनासाठी मुख्य मुद्दा मांडण्यात येतो.

दोन तोटकी विधाने
आश्चर्याची गोष्ट अशी की वरील ठाम विधाने कशाच्या आधारावर केली आहेत हे कधीच सांगण्यात येत नाही. दूरदर्शनाकडे याबद्दल चौकशी करणारे एक पत्र पाठविले पण त्याचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मी स्वतःच या विषयीचे वाङ्मय धुंडाळले.

पुढे वाचा