Author archives

सावरकरांचा हिंदुत्वविचार

प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखाला उत्तर (उत्तरार्थ)

भारतात निर्माण झालेल्या धर्माचे अनुयायी ते सर्व हिंदू, नास्तिक मते बाळगणारेही हिंदू अशा प्रकारची व्याख्या केल्याने व्यवहारातली परिस्थिती बदलत नाही, शीख, बौद्ध, व जैन स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास तयार नाहीत. व्याख्येनुसार हिंदू असूनही आदिवासींना हिंदू धर्माच्या व संस्कृतीच्या तथाकथित मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम आवजून राबविला जातोच आहे. प्रा. देशपांडे तर या भेदाभेदांचा हवाला देऊन असेही म्हणतात की, ‘हिंदुराष्ट्र धर्मनिरपेक्ष असणे अपरिहार्य आहे.’ हिंदू सेक्युलरच असतात असे जेव्हा हिंदुत्ववादी नेते म्हणतात तेव्हा त्यांच्या म्हणण्याला खराखुरा अर्थ असतो.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक तिसरा

डॉ. आंबेडकरांनी सेक्युलॅरिझमचा आशय अगदी योग्य शब्दात कसा स्पष्ट केला आहे ते यापूर्वी आपण पाहिले. परंतु हिंदू आणि मुसलमान या दोन धार्मिक गटांचा संघर्ष हाच सेक्युलरिझमवरील चर्चेचा मुख्य प्रश्न बनला आहे. प्रस्तुत परिसंवादात उपस्थित केलेले बरेचसे प्रश्न या संघर्षाच्या संदर्भातच निर्माण झालेले आहेत. “धर्माचरणाला जीवनमार्ग मानण्याची धारणा जेथे पक्की आहे अशा भारतीय समाजात धर्माचरण घराच्या चार भिंतींपुरते सीमित ठेवण्याचा आग्रह धरणारी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या कितपत सयुक्तिक म्हणता येईल असा एक प्रश्न प्रश्नावलीत येतो. (प्र.३) धर्माचरण चार भितीपुरते सीमित ठेवणे आपल्या देशात शक्य नाही, तसेच इष्टही नाही असा भाव सूचित करून प्रश्नकर्ते सेक्युलॅरिझसची व्याख्या कितपत सयुक्तिक आहे असे विचारतात.

पुढे वाचा

विवेकवाद – १९

गीतेतील नीतिशास्त्र – आक्षेपांना उत्तरे

‘गीतेतील नीतिशास्त्र’ या माझ्या लेखावर आमचे अनेक मित्र नाराज झाले आहेत. त्यांपैकी प्रा. सुधाकर देशपांडे आणि प्रा. देवदत्त दाभोलकर यांची पत्रे जानेवारी १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली असून प्रा. श्री. गो. काशीकर यांचा लेख या अंकात अन्यत्र छापला आहे. प्रा. सुधाकर देशपांडे यांनी माझ्यावर सत्यशोधकाचा नि:पक्षपातीपणा सोडून वकिली बाणा स्वीकारल्याचा आरोप केला आहे, प्रा. काशीकर यांनी हे विवेचन विवेकवादी नव्हे असा सरळ निर्णय दिला आहे; आणि प्रा. दाभोलकर यांनी मला विनोबा भाव्यांचे ‘स्थितप्रज्ञदर्शन’ हे पुस्तक वाचण्याची आणि त्याला त्याच तोलाचे उत्तर देण्याची शिक्षा फर्मावली आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

संपादक, आजचा सुधारक यांस.
आपण गीतेतील चातुर्वर्ण्य जन्माधारितच होते असे प्रतिपादन ‘आजचा सुधारक मधील विवेकवाद या लेखमालेतून केले आहे. (अशाच प्रकारचे प्रतिपादन मीही माझ्या ‘विषमतेचा पुरस्कर्ता मनू’ या पुस्तकाच्या भूमिकेत १९८३ मध्ये केले होते.) आपल्या या प्रतिपादनावर ‘आजचा सुधारक’च्या ताज्या अंकात सुधाकर देशपांडे यांची प्रतिक्रिया आली आहे. तथापि आपलीच भूमिका मला का पटते यासाठी समर्थनाचे काही मुद्दे देत आहे.

(१) गुणकर्मविभागश: मी चातुर्वर्ण्यव्यवस्था निर्माण केली आहे असे सांगताना स्वतःला ईश्वर म्हणविणाऱ्या श्रीकृष्णाने चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे कर्तृत्व स्वतःकडे घेतले आहे. गुणानुसारच माणसांचे कर्म ठरवायचे असेल तर त्यासाठी अशा “ईश्वरनिर्मित व्यवस्थेची गरज नव्हती.

पुढे वाचा

सावरकरांचा हिंदुत्वविचार

प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखाला उत्तर(१)

आजचा सुधारकन्या सप्टेंबर-ऑक्टोबर १९९१ च्या अंकातील प्रा. स. ह. देशपांडे यांच्या ‘सावरकरांचा हिंदुत्वविचार’ या लेखात उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंबंधी माझी प्रतिक्रिया व विचार नोंदवीत आहे.

सावरकर थिोनटिक स्टेटचा पुरस्कार करीत होते असे मी म्हटलेले नव्हतेच. राष्ट्रवादाची कोणती जातकुळी त्यांना अभिप्रेत होती, हा प्रश्न मग उरतो. याच लेखातले आ. देशपांडे यांचे एक वाक्य असे आहे : “सावरकरांच्या मते हिंदुस्थानात हिंदू हाच ‘राष्ट्रीय समाज आहे आणि हा समाज ते इतर समाजापासून धर्माच्या निकपावर वेगळा काढतात.” व्याख्येमुळेच काही समाज कायमचे ‘अराष्ट्रीय ठरतात.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक दुसरा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सेक्युलर समाजनिर्मितीचे ध्येय स्वीकारले हे योग्यच झाले. भारतासारख्या बहुधर्मीय नागरिक असलेल्या देशात सेक्युलर मूल्यांवर आधारित शासनव्यवस्थाच यशस्वी होऊ शकते. परंतु त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या धर्मभावनेला आवाहन करून एकगठ्ठा मते मिळविण्याचा मोह आवरला पाहिजे आणि धार्मिक गढांचा अनुनय थांबविला पाहिजे. शासनाने अगदी निःपक्षपातीपणाने सेक्युलॅरिझमच्या मूलतत्त्वांची, तसेच भारतीय घटनेने स्वीकारलेल्या धर्मजातिनिरपेक्ष समान नागरिकत्वाची कठोर अंमलबजावणी करण्याचे धैर्य दाखविले पाहिजे. राजकीय स्वार्थापोटी कोणताही सेक्युलर पक्ष हे धैर्य दाखविण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. स्वातंत्र्यपूर्वकाळात हिंदू आणि मुस्लिक या प्रमुख धार्मिक जमातींमध्ये जे संघर्षाचे वातावरण होते ते आजही आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – १९

मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय

प्रकरण १८
सुप्रजननशास्त्र

सुप्रजननशास्त्र म्हणजे एखाद्या जीवजातीचा मुद्दाम हेतुपूर्वक वापरलेल्या जीवशास्त्रीय उपायांनी उत्कर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न. या प्रयत्नाची आधारभूत कल्पना डार्विनवादी आहे, आणि सुप्रजननशास्त्रीय संघटनेचा अध्यक्ष चार्ल्स डार्विनचा पुत्र आहे हे उचितच आहे. परंतु सुप्रजननशास्त्राच्या कल्पनेचा जनक फ्रॅन्सिस गॉल्टन हा होता, गॉल्टनने मानवी संपादतात (achievement) अनुवांशिक घटकांवर विशेष भर दिला होता. आज, विशेषतः अमेरिकेत, अनुवंश (heredity) हा पक्षीय प्रश्न बनला आहे. सनातनी अमेरिकन लोक म्हणतात की प्रौढ मनुष्याचा स्वभाव प्रामुख्याने सहजात गुणांमुळे बनतो; याच्या उलट अमेरिकन आमूलपरिवर्तवाद्यांचे (radicals) म्हणणे असे आहे की शिक्षण सर्व काही आहे, आणि अनुवंश ही गोष्ट शून्यवत् आहे.

पुढे वाचा

मुस्लिम जातीयवादाचे आव्हान हे आहे

हिंदू-मुस्लिम संघर्ष खरा दोन मनांमधील प्रवृत्तींचा आहे….

मुस्लिम मन हे स्वभावतः विस्तारवादी आहे, कारण ते धर्मविस्तारवादी आहे. हिंदू हा बंधनवादी आहे. सीमा ओलांडावयाच्या नाहीत हा त्याने स्वतःवर घालून घेतलेला नियम….. तेव्हा हिंदू पुरेसा चैतन्यशील होण्यावर हिंदू-मुस्लिम संबंधाचे स्वरूप अवलंबून आहे….
ही चैतन्यशीलता येणे आणि मनाचा समतोलपणा साध्य होणे हे मुस्लिम राजकारणाचे आव्हान स्वीकारण्याचे खरे दोन उपाय आहेत. हिंदू सनातनीपणा कमी कमी होत जाणे, जाती नष्ट होणे, सामाजिक समतेच्या आणि मानवतेच्या मूलभूत कसोटीवर आधारलेल्या समाजाकडे चालू असलेली हिंदूंची वाटचाल अधिक जोराची होणे, हिंदू खऱ्या आधुनिकतेचा स्वीकार करीत असलेला दिसणे हे उपाय आहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
आपली विवेकवाद ही लेखमाला खूप उरोधक आहे. परंतु कधी कधी मला असे वाटते की, आपले निष्कर्ष आधीच ठरलेले असून त्यांच्या पुष्टीसाठी आधारविधाने शक्य त्या मागांनी शोधण्याचे काम आपण करीत आहात. सत्यशोधक शंभर टक्के नि:पक्षपाती नाही असा थोडासा जरी संशय वाचकाला आला तरी वाचक-लेखकसंवादात व्यत्यय येऊ शकतो. असा संशय हेच माझ्या पत्राचे प्रयोजन.

नोव्हेंबर ९१ च्या अंकातील ‘विवेकवाद-१७’ हा लेख व्या ‘गीतेतील नीतिशास्त्र (उत्तरार्ध हे त्याचे शीर्षक, मी स्वतः गीताभक्त नाही. मी जन्मात कधी चुकूनही जन्माधिष्ठित वर्णव्यवस्था मानली नाही.

पुढे वाचा

संपादकीय – फाटलेले आभाळ ?

श्री दिवाकर मोहनी यांचे आम्हाला आलेले एक पत्र आम्ही अन्यत्र छापले आहे. त्यांनी त्या पत्राद्वारे एका अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला भ्रष्टाचाराची जी लागण झाली तिची तीव्रता गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे सतत वाढतच आहे, आणि आज जीवनाचे एकही क्षेत्र असे राहिलेले नाही की जे भ्रष्टाचारामुळे किडलेले नाही. राजकारण आणि व्यापार ही भ्रष्टाचाराची पारंपारिक क्षेत्रे. पण आता शासन आणि शिक्षण यातही हे विष बेसुमार शिरले आहे. आजची तरुण पिढी या वाढत्या भ्रष्टाचाराच्या वातावरणात लहानाची मोठी झाली असल्यामुळे तिच्या ते पूर्ण अंगवळणी पडले आहे, आणि त्यात काही अनिष्ट आहे अशी जाणीवही तिला नाही.

पुढे वाचा