विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

संपादक,
आजचा सुधारक
डिसेंबर १९९४ च्या अंकात श्री. धारप यांचे पत्र वाचले. “स्त्रीमुक्ती व स्त्रीपुरुष समानता” याविषयी लोकमत-संग्रहाची कल्पना त्यांना आवडली नसून त्याबद्दल त्यांनी आपले मत तत्परतेने कळविले हे चांगलेच आहे. प्रत्येकाला स्वतःची मते असतात व ती व्यक्त करण्याचा अधिकारही असतो. प्रश्नावलीसोबतच “सुधारकाने” वाचकांच्या प्रतिक्रिया आमंत्रित केल्या होत्याच.
परंतु आपले मतच बरोबर व इतरांचे चूक असा अत्याग्रह धरणे योग्य नाही आणि हा आग्रह इतरांचा उपरोध करून मांडणे सभ्यतेच्या संकेताविरुद्ध आहे. महाराष्ट्रातील ब्राम्हण तरुणांच्या संसाराचा, महिलांच्या स्वतंत्र वृत्तीमुळे, खुळखुळा झाला आहे असे श्री.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक,
स.न.वि. वि.
आजचा सुधारक नोव्हेंबर ९४ च्या अंकातील स्त्रीपुरुषसमता व स्त्रीमुक्तीसंबंधी सर्वेक्षण’ या संबंधातील डॉ. र.वि. पंडित यांची प्रश्नावली वाचली. डॉ. पंडित कोणत्या कालखंडात वावरत आहेत?आज २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर खरोखरी सुखवस्तु मध्यमवर्गीय, विशेषतः ब्राम्हण, समाजात पुरुषमुक्तीची गरज आहे. परंतु या बटबटीत वास्तवाकडे कोणीच लक्ष देत नाही ही खेदाची बाब आहे. विवेकवाद वास्तवाकडे डोळेझाक करून भावनांच्या आहारी कधीच जात नसतो. खालील कवितेत, स्त्रीमुक्तीच्या अतिरेकाने ब्राह्मण युवक कसा अगतिक बनला आहे हे पहायला मिळेल.
।। मॉडर्न ब्राह्मण युवक ।।
(चाल – चोली के पीछे ची)
आपलं चांगलं सोडलं । हीन पाश्चात्त्य घेतलं ।।।
करुनी पत्नीची गुलामी । स्वतः समजे पुरोगामी ।।
पत्नी पतीला दटावी । निमुटपणे ऐकून घेई ।।।
शब्द काढिता चकार । दावी त्राटिका अवतार ।।।
काय करतो बिचारा । सदा तिचाच दरारा ।।
उपमर्द सदा करी । पती तोही सहन करी ।।
पती सदा अँड्जस्ट होतो । तिची कृत्ये खपवुनं घेतो ।।
पत्नी असते सर्वेसर्वा । याला वाटत नाही हेवा ।।।
सगळ्याची ह्या परिणती । कशामध्ये तरी होई ।।
संसाराचा खुळखुळा । करून घेतो मॉडर्न खुळा ।।
करू घातलेले सर्वेक्षण बैल दुभवण्यासारखे आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक स.न.
‘अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म या लेखामधून मधून तुम्ही ‘अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांना धर्मविरोध करावाच लागेल असे प्रतिपादिले आहे. गेल्या ७ वर्षातल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला काही मते नोंदवावीशी वाटतात.
हिंदू म्हणून समजल्या जाणार्या. इथल्या समाजात हिंदू धर्माची समजली जाणारी मूळ बैठक आणि धर्मग्रंथ एकीकडे, आणि विचित्र/विकृत कर्मकांड आणि भ्रष्ट धर्मग्रंथ दुसरीकडे अशी काहीशी विभागणी झालेली आहे. इथला हिंदू वेद-उपनिषदे, दर्शने जाणणारा क्वचित आढळतो. ग्रामीण भागात तर नगण्यच! पण ‘निर्मला मातेचे अध्यात्म ‘गाणगापूरचे माहात्म्य’, ‘ज्ञानेश्वरी, संतोषी माता व्रत/स्तोत्र अशी व्रतवैकल्ये व ग्रंथ तो उराशी कवटाळून असतो.

पुढे वाचा

गांधींचे सत्य – डॉ. उषा गडकरींना उत्तर

‘गांधींचे सत्य- एक प्रतिक्रिया’ या लेखात डॉ. उषा गडकरी यांनी माझ्या ‘गांधींचे सत्य’ या लेखातील माझ्या प्रतिपादनावर अनेक आक्षेप घेतले आहेत. हे सर्व आक्षेप एकतर चुकीच्या माहितीवर आधारलेले आहेत, किंवा गांधीजींच्या वचनापेक्षाही अधिक दुर्बोध अशा भाषेत लिहिले आहेत. केवळ तीन पानांत त्यांनी इतके मुद्दे उपस्थित केले आहेत की त्या सर्वांना उत्तरे देण्याकरिता त्याच्या अनेकपट पाने खर्ची घालावी लागतील. म्हणून त्यातील प्रमुख मुद्द्यांना संक्षेपाने उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
(१) प्रथम existence आणि subsistence या दोन प्रकारची अस्तित्वे मानणाच्या लोकांच्या मताविषयी. काही तत्त्वज्ञ स्थलकालात असलेल्या वस्तूंनाच अस्तित्व आहे असे मानतात; परंतु अन्य काही तत्त्वज्ञ (उदा.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक,
आजचा सुधारक,
स.न.वि.वि. जून ९४ च्या अंकांतील श्री. वर्हारडपांडे ह्यांचा लेख आणि जुलै ९४ च्या अंकांतील श्री. देशपांडे आणि मोहनी ह्यांचे लेख मला खूप आवडले. ना. सी. फडके ह्यांची भाषा सोपी होती. देशपांडे ह्यांची पण तशीच आहे. मोहनींनी त्यांच्या भाषेचा बोचरेपणा कमी का केला? त्यांनी बोचरे पणानेच लिहावे.
‘आज सर्व धर्माचा आढावा घेतला तर हिंदू धर्मच बरा आहे असे म्हणावेसे वाटते. मी वृद्ध आहे. मी मेल्यावर हिंदूधर्माप्रमाणे जाळणेच योग्य होय. लोकसंख्यावाढीमुळे मेल्यावर पुरावयाचे ठरविले तर कितीतरी जमीन पडीक राहील. तसेच विहिरीत प्रेत टाकणे पण अयोग्य होय.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. सम्पादक आजचा सुधारक यास
स.न.वि.वि.
ऑगस्ट ९४ च्या आजच्या सुधारकमध्ये श्री. पळशीकर ह्यांचे ‘निसर्गाकडे परत चला ह्या मथळ्याखाली आजचा सुधारकमध्ये दिलेल्या अवतरणाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त – करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी रसेल यांचे “अडाणीपण” वऔद्धत्य” वरील अवतरणात व्यक्त झाले आहे असा आरोप केला आहे. वस्तुतः पळशीकरांच्या प्रतिक्रियेवरून त्यांचा रसेलच्या विचारांशी फारसा परिचय नाही व त्या विचारापुरते तरी त्यांचे मतप्रदर्शन हे “अडाणीपणाचे” व “औद्धत्याचे आहे असे म्हटल्यास अन्यायाचे होणार नाही. लाओत्से, रूसो, रस्किन व म. गांधी यांची “निसर्गाकडे चला” ही पुकार तत्कालीन परिस्थितीला उचित होती असे पळशीकरांचे म्हणणे.

पुढे वाचा

चर्चा – अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म

(१)
मा. संपादक “आजचा सुधारक
स.न.वि.वि.
अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्म” या आपल्या जुलैच्या अंकातील लेखानिमित्ताने हे पत्र. (याच विषयी मी आपल्याला पूर्वीही एक पत्र लिहिले होते जे प्रसिद्धीसाठी नव्हते.) मी आजचा सुधारकचा नियमित वाचकव उत्साही प्रचारक आहे हे आपल्याला ठाऊकआहेच. आपल्याविषयी संपादक म्हणून माझ्या मनात आदराची भावना आहे. परंतु आपला हा लेख वाचून मात्र प्रथमच आपल्या विवेकवादाविषयी शंका आली. या लेखाच्या निमित्ताने शिक्षण, पर्यावरण व एकूणच सुधारकच्या अलीकडील अंकांबाबत माझे मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी लिखाणाची शैली थोडी पसरट आहे, माफी असावी.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

स.न.वि. वि.
‘आजचा सुधारक’ च्या जून ९४ च्या अंकात प्रा. श्री. गो. काशीकर यांचे सातारच्या विचारवेध संमेलनाविषयी एक पत्र प्रकाशित झाले आहे. त्यातील सर्व मुद्द्यांचा परामर्श येथे घेत नाही. त्यांच्या शेवटच्या वाक्याविषयी थोडेसे लिहितो. ते वाक्य असे, “एकंदरीत हे विचारवेध संमेलन विचारवेधाऐवजी विचारवध करणारे व विकारव्याधी जडलेले संमेलन झाले, असे खेदाने म्हणावे लागेल.”
प्रा. काशीकरांच्या या विधानाची वस्तुनिष्ठता तपासून घेण्यासाठी वाचकांना मदत होऊ शकेल, अशा फक्त एका घटनेचा तपशील येथे देतो. या संमेलनात २० फेब्रुवारी रोजी एका परिसंवादात मी आणि श्री.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

प्रा. दि. य. देशपांडे यांस,
स. न. वि. वि.
आपले दिनांक १२ एप्रिल, ९४ चे पत्र आणि त्यासोबतचे देवदत्त दाभोलकर यांचे पत्र मिळाले. प्रा. दाभोलकरांचे पत्र आजचा सुधारक या मासिकाच्या ताज्या अंकातही प्रकाशित झालेले आहे. आपल्या पत्रास ताबडतोब उत्तर पाठवू शकलो नाही याबद्दल क्षमस्व.
(१) “सुधारकाचे सर्व अंक उपलब्ध नाहीत हे सीतारामपंत देवधर यांचे म्हणणे खरे आहे.
(२) ३० मे १८९२ ते १८९५ पर्यन्तचे साप्ताहिक सुधारकाचे अंक दिल्लीत तीन मूर्ती या जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी स्मृती ग्रंथालय आहे तेथे उपलब्ध आहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि.
श्री. के. रा. जोशींचा “संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हा लेख संभ्रमात टाकणारा आहेच, शिवाय त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय निर्माण करणारा आहे. पहिल्या भागात त्यांनी केलेले “शौच” चे आंतर-बाह्य स्वच्छता हे भाषांतर मनुस्मृतीतीलआशौच” या शब्दापासून बरेच दूरचे आहे. आशौच ही धार्मिक (religious) क्रिया असून त्याचा शिवाशिवाशी (स्पर्शजन्य विटाळ) संबंध आहे. अभ्यासूंनी मनुस्मृतीतील पाचवा अध्याय वाचल्यास याचा बोध होतो. ‘अस्पृश्यता’ येथूनच उगम पावते.
त्यांच्या दुसर्या’ भागातील भाषांतरात व वि. वा. बापटांच्या भाषांतरात खूप अंतर आहे.

पुढे वाचा