विषय «समाज»

मैं और मेरी नास्तिकता

मैँ बहुत आभारी हूं कि आप लोगों ने मुझे यहां, इस जलसे में बुलाया. यहां आकर मुझे बहुत खुशी है कि इतने अंधेरे में भी लोग दीये जलाये हुए हैं.  और गम इस बात का है कि २१वीं सदी में नास्तिकता पर चर्चा हो रही है. एक ऐसा विषय जिसका फैसला १८वीं सदी में ही हो जाना चाहिए था. सच्ची बात तो यह है कि नास्तिकता तो ऐसी होनी चाहिए थी, जैसे ऑक्सीजन. हम सांस लेते हैं, तो सोचते थोड़े हैं कि हम सांस में ऑक्सीजन ले रहे हैं.

पुढे वाचा

चिथावणीला बळी पडू नका

नमस्कार. मला प्रथम माझी एक आठवण सांगायची आहे. आमच्याकडे एकदा पाहुणे येणार होते. तर त्यांना चहाबरोबर काहीतरी खायला द्यावे लागणार! संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे कशासोबत हे सांगायची गरज नाहीये. काहीतरी मागवायचं होतं खायला. तर आईने मला सांगितलं, “अरे, घरातले काजू आणि बदाम संपले आहेत तर पटकन् जाऊन घेऊन ये.” मी गेलो तर दुकानात काजू-बदाम नव्हते, संपले होते. मी तिथून फोन केला माझ्या भावाला आणि म्हणालो, “आईला विचार की तिथे काजू-बदाम नाहीयेत. तर काय करू?” आईने झटकन् सांगितलं, “दाणे असतील तर दाणे तरी घेऊन ये.”

पुढे वाचा

धर्म और सामाजिकता – जावेद अख़्तर के साथ बातचीत

ज्ञानेश पाटील : जावेद सर, आपका बहुत बहुत स्वागत. हमारा समाज मुख्यतः धार्मिक, श्रद्धालु, ईश्वरीय कल्पना पर आस्था रखनेवाले लोगों का है. इस समाज की एक विशेषता है कि नास्तिकता को या नास्तिक होने को वो kindly नहीं लेता है. दूसरी तरफ जो नास्तिक समाज है वो भी कहीं ना कहीं धर्म से घिरा हुआ ही रहता है. धर्म से, अंधश्रद्धाओं से परेशान रहता है. और फिर धीरे धीरे अपने समाज के बहुत बड़े हिस्से से वो डिस्कनेक्ट हो जाता है.

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणूस

माझ्यासारख्या १९७० च्या दशकात जन्मलेल्या अनेक लोकांसाठी आजच्या तंत्रज्ञानाची झेप भंजाळून टाकणारी आहे. १९८५ च्या काळात दुसऱ्या गावातल्या नातेवाईकांना फोन करण्यासाठी सार्वजनिक टेलिफोन कार्यालयात रांगेत एक-दोन तास उभे राहून वाट बघावी लागायची. आता आपण आपल्या हातातल्या वैयक्तिक फोनवरून जगात कुठेही क्षणात फोन लावू शकतो आणि त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघू शकतो, बोलू शकतो, तसेच एकाच वेळी अनेक लोक एकत्र गप्पा मारू शकतात. 

हे फक्त एक क्षेत्र आहे. आपल्या जगण्यातल्या प्रत्येकच क्षेत्रात कल्पनातीत बदल झाले आहेत. आमच्या पिढीचेच लोक काय पण आजच्या पिढीचे लोकही या बदलाच्या प्रपाताला सामोरे जाताना गडबडून जात आहेत. 

पुढे वाचा

नव्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधणार?

जुलै २०२२ मध्ये ब्लेक लेमोईन या इंजिनीयरला गूगलच्या गुप्ततेच्या कराराचा भंग केल्याबद्दल प्रथम सक्तीच्या रजेवर पाठवले आणि नंतर बडतर्फ केले. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (यापुढे आपण ए.आय. किंवा कृत्रिमप्रज्ञा म्हणू) विभागात काम करत होता. गूगलचे लार्ज लॅंगवेज मॉडेल (दीर्घ भाषा प्रारूप) ‘लामडा‘सोबत केलेली विविध संभाषणे त्याने प्रसिद्ध केली आणि ‘लामडा’ ही कृत्रिमप्रज्ञा असूनही संवेदनशील आहे असे त्याने जाहीर केले. 

२ मे २०२३ रोजी कृत्रिमप्रज्ञेचे पितामह आणि ट्युरिंग पारितोषकाचे मानकरी जॉफरी हिंटन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी गूगलचा राजीनामा दिला. राजीनामा देताना ते म्हणाले, “वातावरणबदलाच्या धोक्यापेक्षा कृत्रिमप्रज्ञा जास्त धोकादायक आहे.”

पुढे वाचा

माझा ब्राइट्स सोसायटीसोबतचा अनुभव आणि अपेक्षा

१८ डिसेंबर २०२२ ची पुण्यातील नास्तिक परिषद पाहिली. त्यासाठी आलेल्या अनेक नामांकित व्यक्ती पाहिल्या, त्यांचे विचार ऐकले आणि थेट ७ वर्षे मागे गेलो. त्यावेळी मी १२वीला होतो. 

ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल पण, जेव्हा मी ब्राईट्स सोसायटी जॉईन केली तेव्हा मी नास्तिक नव्हतो. खरंतर नास्तिक ही संकल्पनादेखील मला माहीत नव्हती. ब्राइट्ससोबत माझी ओळख कुमार नागे यांच्यामुळे झाली अणि तेव्हा मी नुकताच बारावी झालो होतो आणि इंजिनीअरिंगला प्रेवश घेणार होतो. पण प्रवेश कुठे घ्यायचा (कारण त्यावेळी इंजिनीअरिंग हे खूप मोठं विश्व वाटायचं.

पुढे वाचा

भारतीय राज्यघटना – एक सामाजिक करार

आपल्या राज्यघटनेद्वारे आपण आपल्या राज्यशासनाला काही अधिकार दिलेले आहेत. उदाहरणार्थ, आमच्याकडून म्हणजे सर्व जनतेकडून कर वसूल करणे, पोलीसदल आणि इतर यंत्रणांमार्फत दमनशक्ती आणि दंडशक्ती वापरणे, काही वेळा आम्हाला तुरुंगात टाकणे, क्वचित् प्रसंगी आम्हाला फाशीची शिक्षा देणे, आमची मालमत्ता जप्त करणे, वगैरे. या शासनाला दिलेल्या अधिकारांच्या बदल्यात आम्हाला शासनाकडून काही गोष्टी अपेक्षित असतात. उदाहरणार्थ, आम्हाला परस्परांपासून संरक्षण देणे म्हणजेच अंतर्गत सुरक्षा, परचक्रापासून संरक्षण देणे, रानटी पशू आणि नैसर्गिक दुर्घटना यांच्यापासून आम्हाला काही प्रमाणात सुरक्षा देणे, सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी निर्माण करणे. ज्या प्रमाणात समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यामुळे शासनाला जास्त कर मिळून शासनाचीदेखील आर्थिक स्थिती सुधारेल, त्यावेळी याच्यामध्ये अनेक इतर कर्तव्यांचीदेखील भर पडू लागेल.

पुढे वाचा

तीन वैदर्भीय : सर्जनशील ज्ञानानुबंध

सांस्कृतिक संदर्भ ही राजकीय आणि सामाजिक इतिहासाची सामग्री असते. सांस्कृतिक संदर्भ खऱ्या स्वरूपात तेव्हाच्या तेव्हा कागदावर उतरला तर तो इतिहासाचा मौलिक साक्षीदार होतो. पण पुराव्याअभावी सांस्कृतिक संदर्भ लोकमानसात जर मौखिकरूपाने वर्षानुवर्षे टिकून राहिला तर लोकप्रतिभेने त्याची आख्यायिका होते. मग ती इतिहासाचा पुरावा असत नाही. विदर्भातील लोकनायक बापूजी अणे, थोर संशोधक डॉ.य.खु.देशपांडे आणि प्राचार्य राम शेवाळकर या तीन महनीय व्यक्तींचे परस्परांशी ज्ञानानुबंध होते. या सांस्कृतिक इतिहासाचे पुरावे आहेत. पण या इतिहासाचे दस्तावेजीकरण मात्र फारसे झालेले नाही. लोकनायक बापूजी अणे यांनी विदर्भात लेखनाला आणि संशोधनाच्या कार्याला सतत मदतीचा हात दिला.

पुढे वाचा

नीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत?

‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी केलेल्या आवाहनात नीतिविषयक मुख्यत्वे तीन विधाने केली आहेत:

१. विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोक हा विषय विज्ञानात बसत नाही म्हणून वैयक्तिक किंवा फारतर कौटुंबिक स्वार्थ साधणे एवढ्या मर्यादित निकषावर नीती-अनीतीचा निर्णय करू बघतात.
२. बहुतांश लोकांचा धार्मिकता किंवा विशिष्ट विचारधारेशी संलग्नता म्हणजेच नैतिकता असा समज झालेला/करून दिला गेलेला आहे. 
३. काही लोक वाहतुकीचे नियम पाळण्याइतपत नैतिकतेला महत्त्व देतात.

वरील तिन्ही विधाने एका मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे खरी आहेत. पण सीमारेषेवर त्या कल्पना एकमेकींत मिसळतात. त्यामुळे काही प्रसंगी ‘सीमासंघर्ष’ही होताना दिसतो. 

पुढे वाचा

न्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य

या लेखाला मुख्य संदर्भ भारतातील गेल्या दशकातील घडामोडींचा आहे. साधारणपणे याच विषयावर एक लेख मी २०२२ जानेवारीच्या ‘आजच्या सुधारक’मध्ये लिहिला होता. त्या लेखात सांगितल्यानुसार न्याय ही सारभूत संकल्पना आहे; तर नीती ही न्यायाच्या दिशेने जाऊ पहाणारी नियमबद्ध प्रक्रिया. न्याय सापेक्ष (relative) असतो आणि त्याच कारणाने न्यायाची प्रक्रिया (नीती) सुद्धा सापेक्ष असते. याचा अर्थ न्याय-अन्याय या संकल्पना निरर्थक आहेत असे नव्हे. त्यामध्ये अधिक अन्याय्य आणि कमी अन्याय्य (किंवा कमी न्याय्य आणि अधिक न्याय्य) असा तरतमभाव करता येतो. हा तरतमभाव वापरून जेव्हा न्यायिक प्रक्रिया एका विशिष्ट संदर्भात पूर्त (पूर्ण) होते तेव्हा आपण न्याय झाला असे म्हणतो.

पुढे वाचा