विषय «सामाजिक समस्या»

युद्ध माझं सुरू

स्त्री, दुःख, हिंसा, बलात्कार, समस्या
—————————————————————————–
पुण्यात राहणारी लष्करातली उच्चपदस्थ महिला अधिकारी परळी वैजनाथहून परतत असताना तिच्यावर 2010 च्या एप्रिल महिन्यात चार दरोडेखोरांनी बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेनंतर खचून न जाता तिनं या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाई नंतर तिला न्याय मिळाला आहे. या चौघा नराधमांना जन्मठेपेची शिक्षा मोक्का न्यायालानं दिली आहे. या सहा वर्षांच्या कालखंडात तिला कुठल्या प्रसंगांतून जावं लागलं, तिलाकाय काय सहन करावं लागलं, पोलिस खात्याचं सहकार्य कसं मिळालं या सगळ्याचा तिच्याशी प्रत्यक्ष भेटीत बोलून घेतलेला हा वेध…
—————————————————————————–
लष्करातली त्रेचाळीसवर्षीय उच्चपदस्थ महिला अधिकारी परळीवैजनाथच्या दर्शनाहून पुण्याला परतत असताना चार तडीपार गुंडांनी पाठलाग करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पुढे वाचा

स्टॅनफर्ड तुरुंग प्रयोग: नक्की काय समजायचे? 

तुरुंग, गुन्हेगारी, वचक, सामाजिक मानसशास्त्र 

तुरुंगरक्षकांमध्ये असलेले क्रूरपणा व आक्रमकता हे गुण ‘स्वाभाविक’ असतात की परिस्थितिजन्य ह्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या वादग्रस्त प्रयोगाचीही कहाणी. प्रयोगासोबातच प्रयोगकार्त्यांचे मानस उलगडून दाखवणारी व आपल्या आसपास असणाऱ्या काही प्रश्नाची उत्तरे सुचविणारी.. 

१७ ऑगस्ट १९७१ च्या सकाळी, कॅलिफोर्नियामधील पालो अल्टो परिसरात नऊ तरुणांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकसत्र चालवलं. त्या तरुणांवर कलम २११ आणि ४५९ (सशस्त्र दरोडा आणि घरफोडी) यांच्या उल्लंघनाचा आरोप ठेवण्यात आला होता. रीतसर झडती, बेड्या वगैरे सोपस्कार उरकून त्यांना वाजत गाजत (सायरनच्या आवाजात) पालो अल्टो पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पुढे वाचा

चौफुलीवर उभे राष्ट्र

हिंदुत्ववादी विचारसरणी आणि हिंदूराष्ट्रवाद या कायम चर्चेत राहिलेल्या विषयावर हा नव्याने टाकलेला प्रकाशझोत.
——————————————————————————–
‘हिंदू सांप्रदायिकता ही इतरांपेक्षा अधिक हानिकारक आहे कारण हिंदू सांप्रदायिकता सोयीस्करपणे भारतीय राष्ट्रवादाचे सोंग आणून सर्व विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांचा धिक्कार करू शकते.’(जयप्रकाश नारायण –अध्यक्षीय भापण, दुसरी सांप्रदायिकताविरोधी राष्ट्रीय परिषद, डिसेंबर 1968)

वैचारिक अभिसरण हे कोणत्याही समाज किवा राष्ट्रासाठी प्राणवायूसारखे असते. आजबर्‍याच वर्षांनंतर राष्ट्राच्या मूलतत्त्वांसंदर्भात वैचारिक अभिसरण होताना दिसते. पहिल्यांदा काँग्रेसपेक्षा भिन्न विचारसरणीचा पक्ष स्वबळावर संपूर्ण बहूमतासह केंद्रात सत्तेवर आहे. आज चौदा राज्यांमध्येभाजप स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या साहाय्याने सत्तेत आहे.

पुढे वाचा

अनुभव: एच आय व्ही पॉझिटिव्ह

एच आय व्ही
———————————————————————————–
तशी कुणाची काहीच चूक नसता अचानक छोटासा अपघात होतो आणि त्याची शिक्षा एवढी मोठी! आयुष्यभर दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या ‘ति’ला एच आय व्ही ची लागण होते आणि आयुष्य पार बदलून जातं. ही गोष्ट आहे तिच्या झुंजीची, तिच्या जिवलग मैत्रिणीने सांगितलेली…
————————————————————————————

‘क्ष’ गेल्याची बातमी आठवडाभरापूर्वी आली तेव्हा मी डेडलाईनमध्ये होते. गोव्याहून आलेला फोन म्हणून पटकन उचलला, वाटलं आजी पलीकडून म्हणेल, “पाऊस झडोमडोन् लागलाय…मंम्बय्यचं काय?”… कान ठार गेले आहेत म्हणते, तरीही हिच्या कानात पावसाची सर कशी वाजते,कुणास ठाऊक..मनात हे पावसाचं असलं असताना ती बातमी मिळाली.

पुढे वाचा

अनुभव- लाल सवाल

नक्षलवाद, विकास, हिंसा-अहिंसा
—————————————————————————-
छत्तीसगढमध्ये फिरताना तेथील आदिवासी जीवनाचे दाहक दर्शन लेखकाला झाले. ते जगणे आपल्यासमोर मांडताना हिंसा-अहिंसा, विकास-विस्थापन ह्यांविषयी आपल्या सुरक्षित मध्यमवर्गीय दृष्टीने पाहणे किती अपूर्ण व अन्यायकारी आहे ह्याचे भान जागविणारा व तत्त्वज्ञानाच्या व विचारधारांच्या प्रश्नावर होय- नाहीच्या मधला व्यापक पण अंधुक अवकाश दाखविणारा हा अनुभव.
—————————————————————————-
हा प्रदेश आपल्या ओळखीचा नाही. हे रस्ते, दोन्ही बाजूचं जंगल, मधूनच विरळ जंगलात जमिनीवरचं काही वेचणारे लोक, रस्त्यालगतची ही लाल ‘शहीद स्मारकं’, गस्त घालणारे जवान आणि इथल्या वातावरणात जाणवणारा ताण– हे सगळं आपल्याला नवीन आहे.

पुढे वाचा

माहितीपट -परीक्षण अ पिंच ऑफ स्किन: ती बोलते तेव्हा

अ पिंच ऑफ स्किन, प्रिया गोस्वामी, शिश्निकाविच्छेदन
—————————————————————————–
भारतातील एका संपन्न, सुशिक्षित समाजात कित्येक पिढ्या चालत असलेल्या एका रानटी, स्त्री-विरोधी प्रथेबद्दल असणारे मौन तोडून अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न सामोरे आणणाऱ्या माहितीपटाचा एका संवेदनशील तरुण मनाने घेतलेला वेध
———————————————————————-
“मी सहा वर्षांची होते. अम्मी म्हणाली – तुला वाढदिवसालाबोलावलंय. मी छान कपडे घातले, केस विंचरले. अम्मीसोबत निघाले. पण जिथे गेलेतिथे ना फुगे होते ना केक. मला एका अंधाऱ्या खोलीत नेलं. तिथे एक बाईहोत्या. मला कपडे काढायला लावले. त्या बाईंच्या हाती ब्लेड होतं. मला काहीकळायच्या आत दोन पायांमधल्या जागी त्यांनी कापलं.

पुढे वाचा

अनुभव: मुलगी दत्तक घेताना

दत्तक, स्त्री-पुरुष भेदभाव
—————————————————————————
एकविसाव्या शतकात मुलगी दत्तक घेण्याच्या एका जोडप्याच्या निर्णयावर सुशिक्षित समाजाकडून मिळालेला प्रतिसाद, आपल्याला अंतर्मुख करणारा
—————————————————————————
गाथा तिच्या घरी आली त्याला आता पुढच्या महिन्यात (ऑगस्टला) तीन वर्ष होतील. तेव्हा ती एक वर्षाची होती. या तीन वर्षांत आनंदाच्या अगणित क्षणांनी आमची ओंजळ भरलीये तिनं ! मूल दत्तक घ्यायचा निर्णय मी लग्नाआधीच – व्या वर्षी घेतला होता चतुरंगमधल्या एका लेखामुळे. लग्न ठरवताना मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला, अनिलला सांगितलं तेव्हा त्यालाही हा निर्णय आवडला. लग्न झाल्यावर आम्हाला जे मूल होईल त्याच्या अपोझीट सेक्सचं मूल दत्तक घ्यावं असं मला वाटलं.

पुढे वाचा

इस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण

 इस्लामच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून जगाने हिंसा आणि दहशतवादाच्या असंख्य घटना झेलल्या आहेत. यातील अनेक इतक्या क्रूर आणि माथेफिरूपणाच्या आहेत की, ना त्या विसरल्या जाऊ शकतात, ना त्यांना माफ करता येते. ओसामा-बिन-लादेनने योग्य ठरविलेल्या 9/11च्या हल्ल्यात 3000 निरपराधी व्यक्तींचे मृत्यू, पेशावरमधील शालेय मुलांवरील हल्ला, बोकोहरमद्वारे केलेले शाळेतील मुलांचे अपहरण, चार्ली हेब्दोवरील हल्ला आणि आयसिसद्वारे केल्या गेलेल्या घृणास्पद हत्या इत्यादी हल्ले यात सामील आहेत. या सर्व घटना घोर निंदा करण्यास पात्र आहेत आणि त्या साऱ्या सभ्य समाजाला शरमेने मान झुकविण्यास बाध्य करणाऱ्या आहेत.

पुढे वाचा

जातीय अत्याचारः प्रतिबंध आणि निर्मूलन

हा विषय केवळ बौद्धिक चर्चेचा किंवा सैद्धांतिक मांडणीचा नाही. तर तो जातीय अत्याचाराच्या मूळ कारणांचा आणि निमित्त कारणांचा शोध घेऊन त्या दोन्ही कारणांचे निर्मूलन तात्त्विक आणि थेट वर्तनव्यवहार करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाशी निगडित आहे. जातीय अत्याचार निर्मूलनाची जाती निर्मूलन ही पूर्व अट आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचार दिवसेंदिवस केवळ वाढताहेत नव्हे, तर त्याची भीषणता आणि क्रूरताही वाढत चालली आहे. प्रशासनाची तांत्रिकतेच्या नावाखाली चाललेली निष्क्रियता, लोक प्रतिनिधींची आणि इतर समूहांची उदासीनता, स्थानिक राजकीय किंवा अराजकीय नेत्यांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे गुन्हेगारांच्या बचावासाठी होत असलेला हस्तक्षेप, चळवळी/आंदोलनाप्रति समाज-शासनस्तरावरील अस्वस्थ करणारा बेदखलपणा, यामुळे जातीय अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचं वाढत चाललेलं बळ.

पुढे वाचा

अंधश्रद्धेचं जोखड उतरवायचं हाय!

कर्मकांड, बुवाबाजी, देवदेवस्कीच्या अंधश्रद्धांत सर्वाधिक बळी जाते ती स्त्री. मात्र समाज व्यवस्थेने-कुटुंबाने लादलेलं परंपरेचं जोखड स्त्रिया आता झुगारून देत आहेत. सारासार विवेकबुद्धी बाजूला ठेवून भावनिक पेचामध्ये अडकलेल्या अनेकजणी अंधश्रद्धेची ही पाचर मोकळी करू पाहत आहेत… बदलाची नांदी सुरू झालीय!

‘बयो हाती घे आता शब्दविचारांची पाटी,
सवाष्णेसंग आता भर एकल्या सखीचीबी ओटी…’

चंद्रपूरच्या ताराबाई आपल्या पहाडी आवाजात नवरा गेलेल्या बाईलाही मान द्यायला सांगतात. भाकरी थापणाऱ्या हातामध्ये पाटी-पुस्तक-अक्षर घ्या, असं मधाळपणे समजावतात. तेव्हा समोर जमलेल्या वस्त्यांमधल्या, पाड्यांमधल्या बायांमध्ये दबकी खुसफूस होते. पोरी-बाया एकमेकींना कोपरानं ढोसतात.

पुढे वाचा