विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

हर्षवर्धन निमखेडकर
माहूर, २९, देवतळे ले-आऊट नागपूर — ४४० ०१०
सुधारकने वेबसाईट उघडावी का?
आजचा सुधारक या मासिकाची इंटरनेटवर ‘वेब-साईट’ काढावी असा आग्रह मी अनेक दिवसांपासून संपादकांकडे करतो आहे. कधी ना कधी तरी ही इच्छा पूर्ण होईल, अशी मला आशा आहे. दरम्यान, याबाबत माझेच मला पडलेले काही प्रश्न मी येथे मांडतो. वेब-साईट उपयुक्त आहे की नाही, या विषयावर थोडी चर्चा व्हावी, या हेतूने. वेब-साईट सुरू करणे म्हटले तर फारसे खर्चाचे नाही—-पण तिचे संगणकीय आरेखन/आलेखन करणे व सातत्याने तिच्या मजकुरात बदल करणे—-यासाठी मात्र तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागणार असल्याने ही बाब खर्चिक ठरते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सेक्युलॅरिझम् (धर्मनिरपेक्षता) शब्द प्रथम कोणी वापरला?
‘सेक्युलॅरिझम्’ या संकल्पनेच्या आशयाबद्दल वेगवेगळे विचारप्रवाह आहेत आणि म्हणूनच १५० वर्षापूर्वी हा शब्द प्रथम वापरला गेला तेव्हापासून आजतागायत या विषयावर अविरतपणे चर्चा चालू असते.

१८५० साली हा शब्द पहिल्या प्रथम वापरणाऱ्या जॉर्ज जेकब हॉलयोकचा जन्म १८१७ साली, इंग्लडमधील बर्मिंगहॅम या शहरात झाला. तरुण वयात त्याची धर्मावर अढळ श्रद्धा होती. धर्मप्रसारकांच्या सभा-बैठकांमध्येही तो सामील होत असे, एवढेच नव्हे तर या श्रद्धेप्रीत्यर्थ आवश्यक असणारा खर्चही तो स्वतःच्या खिशातून करीत असे. या त्याच्या कार्यातून त्याची बढती झाली, आणि १८३६ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी तो दर रविवारी प्रवचनेही करू लागला.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रत्येक व्यक्तीच्या समाज–गटाच्या किंवा समाजाच्या जीवनामध्ये सतत भिन्न प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होत असतात. त्या स्वतःच्या आर्थिक स्थितीतील बदलांमुळे किंवा इतरत्र (बाह्य) होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतात. त्यांचे परिणामही आपल्यावर काही प्रमाणात प्रत्यक्ष आणि काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे घडतात त्या त्या प्रमाणात त्या समस्यांमध्ये आपला सहभाग (involvement) असतो. ज्या समस्यांशी आपला थेट संबंध असतो त्यांच्याबद्दलची आपली जाण चांगली असते. त्यामुळे त्यासंबंधीची इतरांची मते, सरकारी धोरणे कंपन्यांची धोरणे इत्यादी गोष्टी कितपत योग्य आहेत हे आपल्याला चांगले माहीत असते. परंतु थेट संबंध न येणाऱ्या क्षेत्रांतील घडामोडींचा तपशील आपल्याला कमी माहीत असतो.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

गंगाधर गलांडे
4 Aldridge Court, Meadway, High Wycombe, Bucks, HP11 1SE, UK
आ. सु. चे स्वरूप सुधारण्याबद्दल मूळ उद्दिष्टाकडे दुर्लक्ष नको
अंकांतले श्री. श्रीराम गोवंडे यांचे पत्र वाचल्यावर मनात आलेले विचार :
आजचा सुधारकचे संपादक व संपादक मंडळ यांच्या वाचकांच्याविषयी (वर्गणीदारांची संख्या, त्यांची वैचारिक/बौद्धिक पातळी, दर्जा, इत्यादि विविध दृष्टिकोनांतून) काय अपेक्षा आहेत, तसेच वाचकमंडळींची संपादकांकडून,व मासिकाकडून काय अपेक्षा आहेत अशी छाननी/तपासणी करताना मासिकाचे मूळ हेतू, मूळ उद्दिष्ट यांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.
__आता अकराव्या वर्षांत पदार्पण करताना ३७६ ‘आजीव वर्गणीदार’ लाभलेले आहेत आ.सु.ला

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस,
मी आपल्या आजचा सुधारकचा एक वाचक. अनेक वैचारिक आणि संशोधनात्मक लेख वाचून समाधान वाटते. मी आज न राहवून केशवराव जोशी यांच्या फेब्रु. २००० च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘ब्राह्मणेतर चळवळ’ या लेखा-बद्दल लिहीत आहे. त्यातील काही वाक्ये अत्यंत बेजबाबदार आणि पूर्वग्रहदूषित वाटतात. त्यांची डॉ. आंबेडकरांविषयी दूषित भावना आहे हे त्यांच्या अनेक ओळींवरून दिसते. ते म्हणतात, “ ‘बुद्धिवादी बॅ. आंबेडकर वृद्धापकाळी व विमनस्क परिस्थितीत म्हणू लागले की, बौद्ध धर्मात गेल्याशिवाय गती नाही.’ अस्पृश्य बौद्ध झाले तरी त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजचा सुधारक, जानेवारी २००० मधील नंदा खरे यांचा ‘एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा’ हा लेख परत परत वाचला. इथे कै. मृणालिनी देसाई, या गांधीवादी लेखिकेची आठवण होणे अपरिहार्य आहे. ज्या काळी मिश्रविवाह हेच एक धाडस होते, त्या काळात महाराष्ट्रीय मृणालिनीने गुजराती पतीशी विवाह केला. पतीच्या कुटुंबात ती समरस झालीच पण देसाई कुटुंबीयांनीही या बहूचा प्रेम-आदर राखला. गुजराती समाजात, विवाहप्रसंगी झडणा-या जेवणावळी पाहून गरिबांचा कळवळा असणा-या मृणालिनीने अशा प्रसंगी न जेवण्याचा निर्णय घेतला. नवी बहू ‘नाही’ म्हणतेय हे पाहून हळूहळू सर्व देसाई कुटुंबानेच अशा जेवणावळींवर बहिष्कार घातला.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस,
डिसेंबर ९९ चा आपला अंक मिळाला. मी गेली ९ वर्षे आपले मासिक नियमित व काळजीपूर्वक वाचले आहे. ते मला आवडलेही आहे. त्याने मला विचार करायची दिशा दाखवलेली आहे. तसेच देव, धर्म, जात व त्या संबंधित विषयाचे विचार मी वाचले व पटले आहेत.
लेखक, विषय, तेच तेच आपण प्रसिद्ध करता आहात. एखाद्या यत्तेत चांगल्या प्रकाराने पास झाल्यावर त्या वर्गातच परत बसून शिकल्यावर जसे वाटते तसे मला वाटत होते. म्हणून ह्यापुढे आपले मासिक पाठविणे बंद करावे. दुस-या मासिकाची वर्गणी मी भरली आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

दोन महिन्यांपूर्वी श्री. मोहनी येथे आले होते त्या वेळी डिसेंबर महिन्यात पुण्यात काही कार्यक्रम घेण्याचे विचार बोलले होते. त्याचे पुढे काय झाले? आम्हाला नागपूर एका बाजूस पडल्यासारखे वाटते. पश्चिम महाराष्ट्र वैचारिक बाबतींत बराच पुढारलेला आहे. आपल्या विचाराच्या पूर्व-पश्चिम महाराष्ट्रातल्या मंडळींना एकमेकांस पाहू दे तरी. मग विचार सुरू होतील. एखादी मध्यवर्ती जागा घेतली तरी चालेल. वैचारिक वादळ जोराने सुरू झाले आहे. आपल्या विचारांना गती देणे जरूर आहे. आपल्या सल्लागार मंडळीपुढे हा विचार मांडावा.*
श्री. वा. किर्लोस्कर
४४७, सिंध हौ. सोसायटी, औंध, पुणे – ४११ ००७
*टीप : आता पुणे येथे जानेवारी ६ रोजी सायंकाळी ६ वाजता साधना सभागृहात वाचक मेळावा घेत आहोत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

नोव्हेंबर ‘९९ चा आजचा सुधारकचा अंक वेगळा व लक्षणीय वाटला. लेखांचे विषय अधिक वैविध्यपूर्ण व समाजापुढील वेगवेगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे वाटले. अभिनंदन!
डॉ. सुभाष आठले
२५,नागाळा पार्क,
कोल्हापूर – ४१६००३

संपादक, आजचा सुधारक, यांस,
नोव्हेंबरचा अंक खूप माहितीपूर्ण वाटला. समान्यपणे १ ल्या पानांवर थोर व्यक्तींच्या लेखनातील एखादा महत्त्वाचा मुद्दा उद्धृत केलेला असतोच. यावेळच्या अंकातील हमीद दलवाईंचे मुस्लिम समाजाच्या सामाजिक सुधारणाबाबतचे विचार दिलेले आहेत. त्यातील शेवटचे वाक्य तर फारच महत्त्वाचे आहे.
पूर्वीच्या एका अंकातील ‘संपादकीया’ वर मी टीकाटिप्पणी कळवली होती व आपण ती छापलीही होती.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
जून महिन्याच्या अंकातील श्री. किर्लोस्कर, श्री. पांढरे यांचे पत्र आणि संपादकीय मला खूप आवडले. श्री. किर्लोस्करांचा लेख चांगला आहे असे म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे होय. त्यांचे भारतीय संस्कृती आणि बुद्धिवाद आणि चार्वाक ही नाटके माझ्या संग्रही आहेत.
परंतु त्यांनी मूर्तिभंजक होण्यास सांगितले आहे ते मात्र तितकेसे पटत नाही. याबाबत लो. टिळकांची गोष्ट सांगतो. लोकमान्य टिळकांकडे एकदा शिवराम महादेव परांजपे गेले आणि त्यांना म्हणाले की, “तुम्ही सशस्त्र लढ्याची घोषणा का करीत नाही?” त्यावर टिळक म्हणाले, “तू मला ५०० माणसे अशी आणून दे, की जी मरावयास तयार आहेत.”

पुढे वाचा