विषय «इतर»

मुलांच्या बुद्धिमत्तेची जोपासना . . .

महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे ह्यांनी असे नमूद केले आहे की इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत भारतात पदार्थ-विज्ञान, रसायन-शास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित इत्यादी क्षेत्रात प्रगती होत होती. त्याचे प्रमुख कारण असे आहे की त्या काळात गुरुशिष्य परंपरा होती आणि शिष्य प्रत्येक बाबतीत गुस्ता अनेक शंका विचारीत असे, आणि गुरु शिष्याचे शंकानिरसन करीत असे. कपिल, कणाद, पाणिनी, पतंजली, चरक, सुश्रुत, चाणक्य इ. त्या काळातील अनेक नावे प्रसिद्ध आहेत. गीतासुद्धा अर्जुन-कृष्णाच्या प्रश्नोत्तरांतूनच निर्माण झाली. अर्थात गीतेतील संस्कृत भाषा ज्याप्रमाणे लिहिली गेली आहे त्यावस्न गीता इसवी सनाच्या चौथ्या शतकात लिहिली गेली असे प्रा.

पुढे वाचा

सामाजिक विकृतिविज्ञान

[शिवसेनेचे नेते आनंद दिघे ठाण्याजवळ एका अपघातात जखमी झाले. इस्पितळात उपाय योजना होत असतानाच ते वारले. ह्यात वैद्यांचा हलगर्जीपणा आहे असे मत बनवून शिवसैनिकांनी ते अद्ययावत खाजगी इस्पितळ नष्ट केले. ह्या घटनेबद्दल डॉक्टर जोशी लिहितात . . .]

वैद्यकक्षेत्रातील लोक व इतर विचारवंत यांनी शिवसैनिकांचा फक्त निषेध करणे पुरेसे नाही. सामाजिक विकृती व त्यांवरील उपाय शोधणे व ते अंमलात आणणे हा वैद्यकीय पेशांचा हेतूच असायला हवा.

काही वर्षांपूर्वी आजचा संतप्त भारतीय या मथळ्याच्या एका (मासिकातील) लेखात असे सुचवले होते की सामाजिक राग व असंतोषाचे नियमन करणाऱ्या पारंपारिक ‘सुरक्षा झडपा’ नष्ट होत असल्याने आजचे तणावपूर्ण जीवन हिंसाचाराच्या उद्रेकांपर्यंत जाऊन पोचते.

पुढे वाचा

मध्यरात्रीनंतर पाच मिनिटे

माणसे धान्य पेरतात, पण त्यातून उगवणारी पिके मात्र कीटकांना आणि इतर जीवाणूंनाही आवडतात. अशा किडींपासून पिकांचे रक्षण करणे, हा शेतीच्या कामाचा अविभाज्य भाग आहे. वेगवेगळे नैसर्गिक व कृत्रिमरीत्या घडवलेले पदार्थ वापरून माणसे किडींचा नायनाट करू पाहतात. कधी किडी ह्या पदार्थांना ‘पचवू’ लागतात, तर कधी हे पदार्थ माणसांना व त्यांच्या परिसराला हानिकारक असल्याचे लक्षात येते. माणसांना त्रासदायक नसणारी, पण किडींना नष्ट करणारी रसायने घडवण्यात रसायनउद्योगाचा एक मोठा भाग गुंतलेला असतो. यूनियन कार्बाइड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या शास्त्रज्ञांनी १९५४ साली अशी काही रसायने तपासली.

पुढे वाचा

उदारीकरणामुळे शिक्षणातही असमतोल!

गेल्या दशकाच्या प्रारंभापासून देशात सुरू झालेल्या रचनात्मक सुधारणा प्रक्रियेचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर नेमका कोणता परिणाम होईल, याबाबत आजवर विस्तृत विश्लेषण झाले आहे. मात्र या ऊहापोहात, या प्रक्रियेचा शैक्षणिक क्षेत्रावर आणि विशेषतः विद्यापीठीय व्यवस्थेवर काय प्रभाव पडेल याकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसते. कार्यक्रमाचे यश हे प्रामुख्याने तांत्रिक प्रगती, उत्पादकता आणि मनुष्यबळ विकास या तीन घटकांवर अवलंबून असते. या तीनही कारक घटकांच्या संदर्भात विद्यापीठीय व्यवस्थेची भूमिका केंद्रवर्ती स्वरूपाची आहे. असे असूनही या चर्चेतून शिक्षणक्षेत्र आणि विद्यापीठ व्यवस्था वगळली जावी, हा विरोधाभास जाणवणारा आहे.

पुढे वाचा

रोजगार आणि पैसा

खादी आणि रोजगार यांच्या संबंधाने आपण मागच्या लेखांकात काही चर्चा केली. या अंकात रोजगार आणि पैशाची उपलब्धता यांचा विचार करावयाचा आहे. पैसा आणि रोजगार यांचे संबंध समजून घेण्यासाठी आधी आपण पैसा म्हणजे काय हे तपासून पाहू.

मला स्वतःला पैसा आणि परमेश्वर यांच्यात अत्यंत साम्य जाणवते. आजचा सुधारक च्या वाचकाला परमेश्वर नाही, पण तो आहे असे गृहीत धरून आपले सारे व्यवहार चालतात हे चांगले ठाऊक आहे. पण पैसा देखील मुळात कोठेही नसून तो आहे इतकेच नव्हे तर देवासारखाच सर्वशक्तिमान आहे असे गृहीत धरून चालल्यामुळे आपले आर्थिक व्यवहार होतात हे माहीत आहे की नाही याविषयी शंका वाटते.

पुढे वाचा

अर्थनीती, वैचारिका व संतुलितसमाज

श्री. गं. रा. पटवर्धन (आजचा सुधारक, ऑक्टोबर २००१, पृ. २५७-२६०) ह्यांनी ‘अर्थनीतीमागील वास्तवता आणि वैचारिका’ ह्या लेखात आर्थिक विकासामागील प्रेरणा, वैचारिका (ideologies), सिद्धान्त इत्यादींचा थोडक्यात आढावा घेतला आहे. त्यात त्यांना शुंपीटर ह्या अर्थशास्त्रज्ञाचे विचार अधिक सयुक्तिक व वास्तववादी वाटतात असे म्हटले आहे. शुंपीटर ह्यांच्या ‘नवप्रवर्तनातून विकास’च्या मताची मांडणी करताना त्यांनी सुरुवातीला असे प्रतिपादिले आहे की “खुल्या बाजार-पेठांतून व्यवहार सुरळीतपणे चालत असतात’ वगैरे.
पटवर्धनांनी विकासाच्या विचारांचा आढावा अतिशय अभ्यासू पद्धतीने घेतला. परंतु त्यात एकदोन महत्त्वाचे आयाम विसरल्यासारखे झाले असे वाटले म्हणून हे टिपण.

पुढे वाचा

विक्रम-वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
राजा, ह्या वेळेस मी तुला थोडी अलीकडची गोष्ट सांगणार आहे. अमरावती नावाचे एक राज्य होते. हे राज्य अत्यंत प्रगत राज्य होते. त्या काळच्या राज्यांमध्ये सगळ्यांत प्रगत आणि संपन्न. तेथील प्रजा शिकली-सवरलेली आणि उद्यमशील होती. प्रजेला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते त्यामुळे ह्या देशाचा नागरिक बनण्याची इतर देशांतील लोकांची महत्त्वाकांक्षा असायची. ह्या देशाचे सैन्यदलही बलाढ्य होते आणि इतर कोणत्याही देशाला नामोहरम करण्याची शक्ती त्याच्यात होती.

पुढे वाचा

शस्त्रप्रेम आणि आदर्शवाद

[Cheryl Benard ही ऑस्ट्रियन स्त्री विएनातील एका संशोधन-संस्थेची संचालिका आहे. प्रामुख्याने स्त्री प्रश्नांबाबत जर्मन भाषेत लिहिणाऱ्या या लेखिकेची ‘मर्डर इन पेशावर’ (लेखन १९९८) ही कादंबरी नुकतीच पेंग्विन बुक्स, इंडियाने प्रकाशित केली. मुळात सामान्य गुन्हेगारकथा असलेल्या या कादंबरीत १९९८ च्या जरा आधीच्या पाक-अफगाण सीमेच्या स्थितीचे विवेचन आहे.
मॅलोन ह्या अमेरिकन व्यापाऱ्याला काही कारणाने एका अफगाण निर्वासितांच्या शिबिरात लपावे लागते. तिथे त्याची हमीद या आपल्या आईसोबत राहणाऱ्या सात वर्षांच्या ‘पोरक्या’ मुलाशी मैत्री होते. आता . . .]
हमीदला मॅलोनबद्दल काळजीही वाटते. त्याच्या झोपडीत शस्त्रे नाहीत.

पुढे वाचा

तीच दहशत: लक्ष्य वेगळे

(नोम चोम्स्की |Noam Chomski] हे मॅसॅच्युसेट्स तंत्रविज्ञान संस्थेत भाषाविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. अमेरिकन परराष्ट्रधोरणाचे परखड टीकाकार म्हणून त्यांची कीर्ती आहे. ११ सप्टेंबर २००१ च्या घटना आणि त्यांचे संभाव्य पडसाद याबद्दल बेलग्रेडच्या एका रेडिओवाहिनीने चोम्स्कींची मुलाखत घेतली. तिच्यातील काही उतारे टाईम्स ऑफ इंडियाने २४ सप्टेंबर २००१ ला प्रकाशित केले. त्यांचा हा सारांश —-) तुम्हाला हल्ले का झाले असे वाटते?
ओसामा बिन लादेनला वाटते की १९९० मध्ये अमेरिकेने सौदी अरेबियात तळ स्थापणे, ही रशियाने अफगाणिस्तानावर केलेल्या आक्रमणाचीच आवृत्ती होती. मुळात इस्लामी धर्मस्थळे असलेल्या धर्मसंरक्षक सौदी अरेबियावरच्या या अतिक्रमणा-नंतर ओसामा आणि त्याचे ‘अफगाण’ साथी अमेरिकाविरोधी झाले.

पुढे वाचा

११ सप्टेंबर आणि भारतापुढील पर्याय

११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादाने अमेरिकेत हाहाकार उडवून दिला. अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याचा मानबिंदू असलेले जागतिक व्यापार केंद्र आणि लष्करी सामर्थ्याचे मानबिंदू पेंटॅगॉन, हे दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य बनले. कॅपिटॉल हॉल आणि राष्ट्राध्यक्ष निवास हे राजकीय सामर्थ्याचे मानबिंदू या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. तालिबानच्या आश्रयास असलेला ओसामा बिन लादेन हा या हल्ल्यांमागील प्रमुख सूत्रधार असल्याचे अमेरिकेने घोषित केले. ओसामा, त्याची अल-कायदा ही अतिरेकी संघटना, आणि अफगाणिस्तानातील तालिबान राजवट यांना धडा शिकवण्याचा आता अमेरिकेने निर्धार केला आहे.
अमेरिका, इस्राएल आणि भारत हे आपले प्रमुख शत्रू असल्याचे ओसामाने यापूर्वीच जाहीर केले आहे.

पुढे वाचा