विषय «इतर»

मेपुरे आणि दियदे

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये झालेले मेळाव्यातील प्र. ब. कुळकर्णी यांच्या वृत्तांताबद्दल हे पत्र लिहीत आहे. पुढची चर्चा आचार्य रेगे व प्रो. दि. य. देशपांडे यांच्या मतभेदाविषयी आहे. आचार्य रेगे यांचे मत ‘धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन साधणे योग्य असे होते.’ तर प्रो. दि. य. देशपांडे हे ‘समाजास’ “धर्म, देव हानिकारक असल्याने समाजसुधारणेसाठी विवेकवादाकडे समाजास वळवावे’ ह्या (कडव्या) मताचे आहेत.
या विषयावर मेळाव्यात झालेल्या चर्चेत मला दोन मुद्दे उपस्थित करायचे आहेत.
१. गेल्या शतकात चीन व रशियात कम्युनिस्ट क्रान्ती झाली. रशियात ७४ वर्षे (१९१७ ते १९९१) व चीनमध्ये १९५० ते आजतागायत कम्युनिस्ट तत्त्वांना अनुसरून जनतेला निधर्मी करण्याचे महाप्रयत्न झाले.

पुढे वाचा

ग्रंथ-परिचय

हंग्री फॉर ट्रेड (हाऊ पुअर पीपल पे फॉर फ्री ट्रेड) (१) (जॉन मेडेली, पेंग्विन बुक्स इंडिया, २००१, पृ. १७८, किं. रु. २००/-.)
परिचायक: श्रीनिवास खांदेवाले
प्रस्तावना
ह्या छोटेखानी ग्रंथात प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जॉन मेडेली ह्यांनी १९९४ साली झालेला जागतिकीकरणाचा करार विषम कसा आहे व तो विकसित देशांच्या —- व त्यातल्या त्यात तेथील बहुराष्ट्रीय खाजगी कंपन्यांच्या —- अधिक फायद्याचा कसा आहे ह्याचे अतिशय सखोल व गंभीर असे विवेचन केले आहे. ह्या कराराच्या मूलभूत असमतोलामुळे विकसनशील देशांतील लहान कास्तकारांचा शेती व्यवसाय व मुख्यत्वेकरून ग्रामीण लोकांची सध्याची अन्नसुरक्षा धोक्यात कशी आली आहे, येत आहे व येणार आहे ह्याचे —- विषयाचा केंद्रबिंदु मानून —- असंख्य संदर्भासह विश्लेषण त्यांनी केले आहे.

पुढे वाचा

दूरदर्शन आणि स्त्रीची दुर्गती

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका अतिशय लोकप्रिय मालिकेच्या संदर्भात एक विस्मयकारक घटना घडली. “क्योंकि सास भी कभी बहू थी’ ह्या मालिकेतले पात्र मिहिर ह्याचा अपघाती मृत्यू घडल्याचे एका भागात दाखवताच संपूर्ण देशभर हाहाःकार उडाला. आपल्या घरचेच कोणी गेल्यासारखे दुःख अनेकांना झाले. लोकांनी फोन, पत्र, ई मेल ह्यांद्वारेच नव्हे तर अगदी मोर्चा काढून मिहिरला पुन्हा जीवदान देण्याची मागणी मालिकेच्या निर्मात्यांकडे केली. एखाद्या मालिकेच्या कथानकाशी आणि पात्रांशी अशा मोठ्या प्रमाणात भावनिक तादात्म्य होण्याची ही घटना अभूतपर्व अशीच म्हटली पाहिजे. छोट्या पडद्यावर प्रथमच दीर्घ मालिका (soap operas) सुरू झाल्या तेव्हाही ‘हम लोग’, ‘बुनियाद’, ‘खानदान’ यांना अशीच अफाट लोकप्रियता लाभल्याचे आता आठवते.

पुढे वाचा

नैतिक उपपत्तींचे दोन प्रकार

नीतिशास्त्राच्या इतिहासाकडे थोड्या बारकाईने पाहिल्यास त्यातील नीतिशास्त्रीय व्यवस्थांचे किंवा उपपत्तींचे स्थूलमानाने दोन प्रकार आढळून येतात. त्यांना अनुक्रमे empirical आणि transcendental अशी नावे देता येतील. empirical म्हणजे अनुभववादी आणि transcendental म्हणजे अतिक्रामी. अनुभववादी उपपत्ती अर्थातच पंचज्ञानेंद्रिये आणि मन यांच्यावर आधारलेली; आणि अतिक्रामी म्हणजे सामान्य अनुभवांखेरीज अन्य ज्ञानस्रोतांवर विश्वास ठेवणारी. या दुसऱ्या वर्गातील उपपत्तीत intuition (साक्षात्कार)१ या ज्ञानसाधनाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो, उदा. goodness किंवा साधुत्व हा काही इंद्रियगोचर गुण नव्हे. तो जाणण्याकरिता अनेंद्रिय साक्षात्काराची आवश्यकता असते. तसेच कर्तव्याची कल्पनाही अनेंद्रिय साक्षात्काराशिवाय आकलन करणे अशक्य आहे.

पुढे वाचा

खादीचे नवसर्जन

[‘साम्ययोग साधना’ (१६ मे २००१) या नियतकालिकातील हा लेख आ. सु. त सुरू असलेल्या विचारमंथनाचा भाग वाटला, म्हणून तो त्यांच्या सौजन्याने येथे घेत आहे. हा लेख मोहनींच्या लेखाला उत्तरादाखल लिहिलेला नाही. (तिरपा टाइप आ. सु. च्या संपादकाचा)]
१९०८ मध्ये गांधींच्या मनात चरख्याची कल्पना पहिल्यांदा आली. गिरण्या उभ्या राहिल्या तर विणकरांचे काय होईल, हा प्रश्न मनात उभा झाला आणि गांधी हातकताईच्या शोधात लागले. एका महिला कार्यकर्तीने गुजराथमध्ये विजापूरला कताई जाणणाऱ्या मुसलमान भगिनींचा शोध लावला आणि कताईचा जन्म झाला. १९१५ मध्ये गांधी प्रथम विणकर झाले.

पुढे वाचा

कुटुंब-व्यवस्था — मुलांना वाढविणे (भाग १)

१.कुटुंबाच्या दोनतीन व्याख्या करणे शक्य आहे. विकेंद्रित समाजव्यवस्थेतील सर्वांत लहान स्वायत्त घटक अशी एक काहीशी राजकीय-व्यवस्थापकीय-व्यावहारिक जगातील व्याख्या होऊ शकेल. विशाल समाजपुरुषाची ती एक छोटीशी घटकपेशी आहे अशी पण व्याख्या होऊ शकते. कुटुंबाची जैविक व्याख्या पण होऊ शकते – नर मादी-पिले अशी.
मानववंशसाखळी ही अखंड, अतूट असली तरी व्यक्ती, कुटुंबे ह्या त्यातल्या सुट्या सुट्या कड्या आहेत आणि त्यांचे महत्त्व आहेच. कुटुंबाची कोणतीही व्याख्या असो, मुलांना वाढविणे ही एक सामाजिक पण व्यक्तिअभिमुख महत्त्वाची बाब आहे, आणि यात आईबाबा, आजी आजोबा, मोठी भावंडे, घरातील नोकरवर्ग, सख्खे शेजारी या सर्वांचा समावेश असतो.

पुढे वाचा

काही समीक्षण, काही चिन्तन

‘प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ हा मराठी भाषेतील एक अपूर्व असा ग्रन्थ आहे. एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या हयातीतच त्याच्या तत्त्वचिंतनाविषयी मोकळेपणाने समकक्ष लोकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवावी व तत्त्ववेत्त्याने त्यांचा त्याच ग्रन्थात परामर्श घ्यावा अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. अन्य भारतीय भाषांतही अशा स्वरूपाचा ग्रन्थ प्रसिद्ध झाल्याचे मला माहीत नाही. इंग्रजीमध्ये मात्र Living Philosopher’s Library या ग्रन्थमालेत अनेक दशके अशा स्वरूपाचे ग्रन्थ प्रसिद्ध होत आलेले आहेत.
या ग्रन्थाच्या अपूर्वतेचे दुसरे अंग असे की रेगे यांच्या भूमिकेविषयी महाराष्ट्रात गेल्या दशकात जे काही संदेह निर्माण झाले त्याविषयीचा धागा या ग्रन्थातील सर्व लेखांना जोडताना आढळतो.

पुढे वाचा

आम्हाला विचारत का नाहीत?

एका गोष्टीचा मात्र जरूर विचार करायला हवा. आपल्या मुलांच्या आयुष्यासंदर्भातल्या ह्या महत्त्वाच्या निर्णयात आपलं स्थान काय? राजकारणी आणि सरकार यांच्या ताब्यात मुलांचे भवितव्य सोपवून नि िचंत रहाणं योग्य ठरेल का? आपल्याला केवळ कल्पनांचे पतंग नको आहेत. आपल्या मुलांसाठी आनंदाचं आणि चांगलं शिक्षण जर खरोखर हवं असेल तर आपल्यासाठी नेमकं काय भलं, काय नाही हे समजावून घेण्यासाठी आपण समर्थ व्हायला हवं. शासनाची भूमिका, त्यावर तज्ज्ञांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया यांचं आपल्या अनुभवांच्या कसोटीवर घासून विश्लेषण करायला हवं, त्या समजावून घ्यायला हव्यात. अशा प्रकारच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी, विशेषतः सरकारच्या धोरणांसंदर्भातली माहिती सहजी उपलब्ध होत नाही.

पुढे वाचा

चौथ्या क्रांतीचे शिल्पकार नररत्न मुरली मनोहर जोशी!

युगायुगाच्या अंधकारानंतर भारतवर्ष पुन्हा एकवार सूर्यासमान तळपणार! देशात दुधाची गंगा वाहणार! अन्नधान्य, फळफळावळांची रेलचेल असेल. समस्त जनता धष्टपुष्ट आणि सुखी समाधानी असणार. रोगराईची निशाणी उरणार नाही. डॉक्टर मंडळी इतर क्षेत्रांत कौशल्याचा ठसा उमटवतील. चौसष्ट कलांमधून आपलाच ध्वज दिसेल. ऑलिंपिकची सगळी सुवर्ण पदके आपल्यासाठीच असतील. बकाल सिलिकॉनच्या व्हॅलीत स्मशान शांतता आणि ऐश्वर्याने नटलेल्या गंगेच्या खोऱ्यात जाल तेथे सोन्याचा धूर दिसेल. कुबेराला लाजवणारी आपली समृद्धी पाहून जगातले शास्त्रज्ञ, विद्वान रोजगारासाठी आपल्याकडे याचना करतील. अमेरिका, जपानमधील भारतीय दूतावासाबाहेर रांगा लागतील. ते पाहून एकेकाळची धनाढ्य राष्ट्र मनात जळफळाट करून घेतील.

पुढे वाचा

खादी (भाग ३)

गरज आणि उत्पादन

खादीग्रामोद्योगप्रधान समाजरचनेमुळे खेड्यापाड्यांमधला पैसा खेड्यांतच राहतो, तो शहरांत जात नाही आणि पैसा खेड्यांतच खेळल्यामुळे शहरे त्यांचे शोषण करू शकत नाहीत अशा जो एक समज आहे —- आणि हा समज विकेन्द्रित अर्थव्यवस्थेचे म्हणजे खादीग्रामोद्योगांचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो —- तो आता तपासून पाहू. तसे करताना पैसा म्हणजे काय आणि शोषण कशामुळे होते हे आपणापुढे स्पष्ट होईल अशी आशा आहे.
ग्रामीण प्रदेशात मुळात पैशांचा उपयोग फार थोडा असतो. पैशांशिवायच बराचसा व्यवहार पार पडतो. धान्याची किंवा इतर वस्तूंची देवाणघेवाण करून आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचा प्रघात फार प्राचीन आहे.

पुढे वाचा