विषय «इतर»

मानवसमाजातील संस्था आणि पद्धती

जॉर्ज पी. मॅडक (Murdoch) या अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञाने १९४५ साली सर्व मानवी समाजांमध्ये निरपवादपणे सापडणाच्या काही संस्था व पद्धतींची यादी बनवली. ही यादी आमच्या वाचकांपुढे चर्चेसाठी मांडत आहोत.“मराठीकरणावरही” चर्चा व्हावी.
(१) वयानुसार गट पाडणे (Age Grading), (२) शारीरिक क्षमतेच्या क्रीडास्पर्धा (AthleticSports, (३) साज-शृंगार (Bodily Adornment), (४) पंचांग (Calender), (५) शुचितेचे शिक्षण (Cleanliness Training), (६) समूहांतर्गत विरचन (Community Organization), (७) पाकशास्त्र (Cooking), (८) श्रम-सहकार (Cooperative Labour), (९) विश्वरूपशास्त्र (Cosmology), (१०) प्रियाराधन (Courtship)
(११) नृत्य(Dancing), (१२) सुशोभन-कला (Decorative Art), (१३) रमलभविष्यकथन (Divination), (१४) श्रम-विभाजन (Division of Labour), (१५) स्वप्नार्थशास्त्र (Dream-Interpretation), (१६) शिक्षण (Education), (१७) परलोकविज्ञा (Eschatology), (१८) नीतिशास्त्र (Ethics), (१९) वंश वनस्पतीशास्त्र (Ethnobotany), (२०) शिष्टाचार (Enquette)
(२१) श्रद्धेने (मंत्राने) रोग निवारण (Faith-healing), (२२) कौटुंबिक मेजवान्या (Family Feasting) (२३) होम-हवन (Fire-making), (२४) कथा कहाण्या (Folklore), (२५) भक्ष्याभक्ष्यविचार (Food Taboos), (२६) मृत्यूत्तरक्रिया (Funeral Rites), (२७) खेळ (Gamcs), (२८) सूचक (सार्थ) हातवारे (Gestures), (२९) आहेर करणे, (Gift-giving), (३०) शासन (Government)
(३१) अभिवादन (Greetings), (३२) केशभूषा (Hair-styles), (३३) आदरातिथ्य (Hospitality), (३४) वास्तुशास्त्र (Housing), (३५) आरोग्यशास्त्र (Hygiene), (३६) जवळच्या नातलगांमधील लैंगिक व्यवहारावरील निर्बध (Incest Taboos), (३७) वारसाहक्क (Inheritance Rules), (३८) थट्टामस्करी (Joking), (३९) गोत्रविचार (KinGroups), (४०) नातेवाचक शब्द (Kinship Nomenclature), (४१) भाषा (Language), (४२) कायदे (Law), (४३) शकुन-अंधश्रद्धा (Luck Superstitions), (४४) यातु, जादू (Magic), (४५) विवाह (Marriage), (४६) भोजनमुहूर्तविचार (Mealtimes), (४७) वैद्यक (Medicine), (४८) प्रसूतिशास्त्र (Obstetrics), (४९)दंडविधान (Penal Sanctions), (५०) व्यक्तिगत नांवे (Personal Names) (५१) लोकसंख्या-धोरणे (Population Policy), (५२) नवजात संगोपन (Postnatal Care), (५३) गर्भारपणातील “पथ्ये” (Pregnancy Usages),(५४) मालमत्तेचे हक्क (Property Rights), (५५) अतिनैसर्गिक शक्तींची “शांत” (Propitiation of Supernatural Beings), (५६) कौमार्यव्यवहार (Puberty Customs), (५७) धार्मिक कर्मकांडे (Religious Ritual), (५८) निवास-नियम (Residence Rules), (५९) लैंगिक निबंध (Sexual Restrictions), (६०) आत्म्याची संकल्पना (Soul Concept), (६१) सामाजिक श्रेणी-विभाजन (Status differentiation), (६२) शल्यवैद्यक (Surgery), (६३) हत्यारे बनवणे (Tool – making), (६४) व्यापार (Trade), (६५) पाहुणेपण (Visiting), (६६)विणकाम (Weaving), (६७) हवामान नियंत्रण (यज्ञ?)

पुढे वाचा

कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग ३)

आपल्या भारतीय नागरित समाजामध्ये कुटुंबाची किंवा कुटुंबप्रमुखाची मुख्य जबाबदारी त्रिविध आहे हे आपण जाणतो. ती म्हणजे (१) मुलांचे आणि नातवंडांचे शिक्षण करणे, (२) त्यांना नोकरी लावून देणे व (३) त्यांची शक्य तितक्या थाटामाटात लग्ने लावून देणे ही होय. बाकीच्या सगळ्या जबाबदार्या( ह्यांच्यापुढे गौण किंवा तुच्छ मानल्या जातात. त्या जबाबदार्यांसमुळे पर्यायाने त्यांसाठी बसविलेल्या आपल्या समाजाच्या घडीमुळे आपल्या शिक्षणक्षेत्रावर जे अनेक परिणाम होतात त्यांपैकी काही आपण आतापर्यंत पाहिले. तसेच ते मुलांना नोकरी लावून देण्याच्या आणि त्यांची लग्ने लावून देण्याच्या बाबतींतही अधिक सविस्तरपणे पाहता येतील, पण मला त्याची गरज वाटत नाही.

पुढे वाचा

बुद्धि उपयुक्त, की भावना?

अति शहाणा, त्याचा बैल रिकामा” अशी एक जुनी म्हण प्रचलित आहे. या म्हणीची पाश्र्वभूमी ग्रामीण महाराष्ट्र ही असली तरी तिचा वापर ग्रामीण तसेच नागरी संदर्भात होत आलेला आहे. एक शेतकरी फार बुद्धिमान होता व आपण आपल्या शेतीची दैनंदिन कामे फार हुशारीने करतो अशी त्याची समजूत होती. शेतीच्या मशागतीसाठी त्याच्याजवळ एक बैल होता. पण इतर सामान्य शेतकर्‍यांप्रमाणे औताला बैल जुंपण्यापूर्वी हा बुद्धिमान शेतकरी खूप सूक्ष्म विचार करी. त्यामुळे रोज त्याचे काम लांबणीवर पडत जाई व बैल रिकामाच राही. असे होता होता शेतीच्या कामाची वेळ टळल्याने या बुद्धिमान शेतकर्याकची अतोनात हानी झाली आणि बैल मात्र सदैव रिकामाच राहिला!

पुढे वाचा

मराठी बाणा (एड्सग्रस्त महाटी भाषा)

मराठी अस्मिता उर्फ मराठी बाणा नामक एकेकाळी पालखीतून वाजत गाजत मिरवणारी चीज आता दुर्मिळ झाली असून, मराठी भाक्किांना वेळीच जाग आली नाही तर ती नामशेष होईल, याबद्दल विचारवंतांत तरी एकमत दिसते. प्रश्न असा की जरूर पडेल तेव्हा अमृतातें जिंकण्याची पैज मारणारी, सुबत्तेच्या काळात नूपुरात रंगणारी, प्रसंग ओळखून डफ तुणतुण्याची वीरश्रीने साथ करणारी मराठी भाषा आजच अशी मृतप्राय का व्हावी? सात कोटी लोकांच्या मुखी, निदान घरात तरी, असणार्याा या भाषेला स्वतःचे सरकार आहे. म्हणजेच ती केवळ लोकभाषा नसून राजभाषाही आहे. मग आजच तिला अशी घरघर का लागावी?

पुढे वाचा

दिवाळीतील आनंद (भाग २)

अनिल अवचटांची भेट हे दिवाळी अंकांचे एक आकर्षण असते. यावर्षी ‘मौजेत ते ‘तेंदूपानांच्या प्रश्नावर काय म्हणतात हे वाचायची उत्सुकता होती. त्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी त्यांच्या ज्या चकरा झाल्या त्यात एकदा ते आ. सुधारकच्या कार्यालयात येऊन गेले होते. अवचट संशोधक अधिक, कार्यकर्ते अधिक की लेखक अधिक असा प्रश्न पडतो. त्यांचे लिखाण वाचल्यावर विवेकशील मानवता हे जे मानवी जीवनाचे साध्य ते त्यांच्या शब्दाशब्दांतून दिसते.
बिडी उद्योगावर लाखो गरीब लोक पोट भरतात. चाळीस लाख नुसते विड्या वळणारे आहेत. विडीचे वेष्टण तेंदूपान असते. ते गोळा करणारे लाखो.

पुढे वाचा

धर्म, सुधारणा आणि विवेक

हे धर्मसुधारणेचे युग आहे. अनेक शतके स्थाणुवत् अपरिवर्तमान राहिलेल्या हिंदुधर्मामध्ये गेल्या शतकापासून तो आजपर्यंत अनेक सुधारणांचा पुरस्कार करण्यात आला आहे. रानडे, टिळक, गांधी, कर्मवीर शिंदे इत्यादि धर्मसुधारकांनी आपापल्या परींनी ग्रंथनिविष्ट हिंदू धार्मिक परंपरेचे नवीन अर्थ लावले आहेत. सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख नवनवीन बदल सुचवीत आहेत. काही बाबतींत तर हिंदुधर्म टाकून वेगळ्या धर्मात एक नवा पंथ स्थापण्यापर्यंत सुधारणेने मजल मारली आहे. या सर्व विविध धर्ममंथनांसंबंधी विचार करू लागल्यावर एक गोष्ट मनात उभी राहते ती ही की धर्मसुधारणा या संकल्पनेत काही तरी विपरीत अभिप्रेत नाही काय ही शंका.

पुढे वाचा

नियमबद्धतानियमाच्या मर्यादा

मला विश्वातील सर्व रचनांची या क्षणीची स्थाने आणि गती सांगा, म्हणजे मी आत्तापासून अनंत काळापर्यंतच्या त्यांच्या (सर्व रचनांच्या) स्थानांचे आणि गतींचे भाकित वर्तवून दाखवीन” – हे लाप्लासचे वाक्य म्हणजे वैज्ञानिक नियमबद्धतावादाचे ब्रीदवाक्य मानले जाते. खरे तर “मानले जात असे” असे म्हणणे जास्त योग्य.
लाप्लासने हे विधान केले तेव्हा न्यूटन नुकताच “होऊन गेला होता. गुरुत्वाकर्षणाने आणि गतीच्या नियमांनी विश्वातील सर्व रचनांबाबतच्या भविष्यकथनांची शक्यता निर्माण झाली, असे भासत होते. एक अंतिम, मूलभूत निसर्ग-नियम सापडला आहे, आणि यापुढे फक्त तपशील भरून काढायचे काम उरले आहे, अशी जबर आत्मविश्वासाची भावना काही वैज्ञानिकांमध्ये बळावली होती.

पुढे वाचा

दिवाळीतला आनंद (भाग १)

माझी जॉर्ज गिसिंगशी ओळख झाली त्याला पुष्कळ वर्षे लोटली. नतर तो कुठेच भेटला नाही. इंटरच्या ‘हायरोड्स आफ इंग्लिश प्रोज मध्ये ‘माय बुक्स च्या रूपने झालेली पहिली अन् शेवटची भेट. पण काही ओळखी जन्मभर लक्षात राहतात तशी ही राहिली. एखाद्या आईने ‘माय चिल्ड्रेन या विषयावर जितक्या ममतेने बोलावे तितक्या जिव्हाळ्याने त्याने ‘माय बुक्स ची ‘कवतुकें सांगितली होती. माणूस अर्धबेकार-फटिचर पण ऐट अशी की पुस्तक वाचायचे ते विकत घेऊनच. धंदा लेखनाचा. नियमित उत्पन्न नाही. आहे ते अपुरे अशा स्थितीत पठ्ठा मैलोगणती अंतर पायी तुडवायचा.

पुढे वाचा

चर्चा

श्री. संपादक,
आजचा सुधारक यांस,
डॉ. र. वि. पंडित ह्यांच्या सप्टेंबर ९५ च्या पत्राला हे प्रत्युत्तर.
डॉ. पंडित लिहितात की त्यांच्या मूळ लेखात (मे ९५) भारतीयांच्या लैंगिकतेचा उल्लेख नव्हता.
त्यांची मे ९५ च्या लेखातली पुढील विधाने मला भारतीयांच्या लैंगिकतेबद्दलची वाटली.“थायलंड वगळता सर्व आशिया व चीन यामध्ये लैंगिक स्वातंत्र्य बरेच मर्यादित आहे.”“लैंगिक सुख हवे तेवढे हव्या त्या प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे असा विचारप्रवाह अमेरिकेत निर्माण झाला आहे. भारतात आज जरी अशा प्रवृत्तीकडे तिरस्काराने व तुच्छतेने पाहिले जात असले तरी…”
थोडक्यात डॉ. पंडितांचे म्हणणे भारतात अमेरिकेसारखा स्वैराचार सध्या नाही.

पुढे वाचा

आगरकरांचे अर्थचिंतन

प्रस्तावना
प्रस्तुत निबंधाचे तीन भाग पाडले आहेत. पहिल्या भागात आगरकरांच्या अगोदरच्या काळात महाराष्ट्रात आर्थिक चिंतनाची स्थिती काय होती हे दर्शविले आहे. दुसन्या भागात आगरकरांच्या निबंधांमधून प्रकर्षाने दिसून येणारे विचारांचे पैलू दिग्दर्शित केले आहेत. निबंधाच्या तिसऱ्या भागात त्यांच्या एकूण आर्थिक चिंतनाचे समालोचन करण्याचा प्रयत्न
केला आहे.
(१) आगरकरपूर्व आर्थिक चिंतन
१८२० च्या सुमारास पेशवाईचे पतन झाल्यानंतरही ब्रिटिशांशी लढाया करून आपले उरलेसुरले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे व ब्रिटिशांना घालवून देण्याचे प्रयत्न चालू होते. उत्तर भारतात हे प्रयत्न बराच काळ चालू होते. १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, उत्तरप्रदेश व बिहारमधील उठाव ही त्या प्रयत्नांची काही उदाहरणे आहेत.

पुढे वाचा